शहरं
Join us  
Trending Stories
1
Ujjwal Nikam MP: उज्ज्वल निकम यांचे खासदारकीचे स्वप्न अखेर पूर्ण! राष्ट्रपतींकडून राज्यसभेवर चार जणांची नियुक्ती
2
बिहार हादरले! भाजप नेत्याची गोळ्या घालून हत्या! दोन तरुणांनी झाडल्या चार गोळ्या
3
तामिळनाडूमध्ये डिझेलने भरलेल्या मालगाडीला भीषण आग; संपूर्ण परिसरात आगीच्या ज्वाळा अन् धुराचे लोट
4
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! या दिवशी पीएम किसानचा २० वा हप्ता जमा होणार
5
तुमच्या PF खात्यात व्याजाचे पैसे आले का? फक्त एका मिनिटात 'या' सोप्या पद्धतीने शिल्लक तपासा!
6
फक्त दहावी शिकलीये तेजस्विनी पंडित, म्हणाली- "कॉलेजची फी भरायला वडिलांकडे पैसे नव्हते..."
7
वर्षा उसगावकरांसोबत डान्स करणार नाही, असं त्या 'महा'नटाने सांगितलं..; महेश टिळेकर यांचा मोठा खुलासा
8
Beed Video: 'डोक्यात मार... पायावर मार... मार... मार'; उपसरपंचाला काठ्या, दगडाने मारहाण, बीड पुन्हा हादरले
9
Air India Plane Crash : विमानाचे इंजिन पायलटमुळे बंद पडले की यांत्रिक बिघाडामुळे? एअर इंडियाच्या अपघाताच्या अहवालावर अनेकांनी प्रश्न उपस्थित केले
10
दक्षिण भारत प्रसिद्ध खलनायकाला मुकला; कोटा श्रीनिवास राव यांचे ८३ व्या वर्षी निधन
11
सोनं-शेअर्स विसरा! चांदीने दिला सर्वाधिक परतावा, किंमत १.११ लाख रुपयांवर, अजून किती वाढणार?
12
'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तान भारतावर अणुहल्ल्याची तयारी करत होता? शाहबाज शरीफ यांनी दिले उत्तर
13
Delhi Accident: भरधाव कारने फूटपाथवर झोपलेल्या पाच जणांना चिरडले, चालक होता नशेत
14
पायलटकडूनच मोठी चूक? दोन्ही इंजिनांचा इंधनपुरवठा सेकंदाच्या फरकाने झाला बंद
15
तीन वेळा पदमुक्त होण्याची इच्छा व्यक्त केलेली, जयंत पाटलांचा राजीनामा? राष्ट्रवादी, भाजप म्हणतेय...
16
आजचे राशीभविष्य, १३ जुलै २०२५ : आज आर्थिक गुंतवणूक विचार पूर्वक करा
17
"जीव घेतलात तरी मराठी बोलणार नाही", प्रसिद्ध अभिनेता बरळला, म्हणाला- "मी घाबरत नाही..."
18
म्हाडाची जाहिरात आली; ५,२८५  घरांची लॉटरी, या दिवशी होणार बुकिंगला सुरुवात...
19
शत्रूचं ड्रोन ५ लाखांचं, पाडायला लागते १० लाखांचं मिसाइल...; ब्रिगेडिअरनी सांगितला ऑपरेशन सिंदूरचा खर्च...
20
मंत्री शिरसाट म्हणाले...पैशांची एखादी बॅग देऊ, आजकल हमारा नाम बहुत चल रहा है 

खरिपातील पिकांच्या नुकसानाचे पंचनामे करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2021 04:22 IST

लातूर : जिल्ह्यात यंदाच्या हंगामात साेयाबीनचा माेठ्या प्रमाणावर पेरा झाला आहे. अशास्थितीत जवळपास एक महिन्यापासून पावसाने हुलकावणी दिली आहे. ...

लातूर : जिल्ह्यात यंदाच्या हंगामात साेयाबीनचा माेठ्या प्रमाणावर पेरा झाला आहे. अशास्थितीत जवळपास एक महिन्यापासून पावसाने हुलकावणी दिली आहे. त्यामुळे साेयाबीनसह इतर पिकांनी सध्या माना टाकल्या आहेत. पावसाअभावी साेयाबीनचे पीक जाग्यावरच वाळत आहे. अद्यापही महसूल आणि कृषी विभागाने या पिकांच्या नुकसानाचे पंचनामे केलेले नाहीत. याबाबत जिल्हा प्रशासनाने तातडीने पंचनाम्याचे आदेश देऊन शेतकऱ्यांना नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने करण्यात आली आहे.

लातूर जिल्ह्यातील साेयाबीनचे पीक सध्या धाेक्यात आले आहे. कृषी विभाग, महसूल विभाग आणि संबंधित पीक विमा कंपन्यांचे प्रतिनिधी अद्यापही शेतकऱ्यांच्या बांधावर आले नाहीत. विमा कंपन्यांनी लादलेले निकष शेतकऱ्यांना समजत नाहीत. जाचक अटी आणि निकषांमुळे शेतकऱ्यांना आपल्या पिकाच्या नुकसानाबाबत दाद मागता येत नाही. शेतकऱ्यांकडे अगलचा कॅमेरा असलेले माेबाईल उपलब्ध नाहीत. जर अगलचा कॅमेरा घेऊन शेतकरी शेतात गेले तर विमा कंपनीची लिंक ओपन हाेत नाही. आता दाद काेणाकडे मागायची, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. खरिपातील सर्वच पिकांचा पंचनामा करुन शेतकऱ्यांना सरसकट विमा देण्यात यावा, अशी मागणीही स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून करण्यात आली आहे.

यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष सत्तार पटेल, बाजार समितीचे संचालक तथा भिसे वाघाेलीचे उपसरपंच संभाजी वायाळ, नबी सय्यद, विजयकुमार वायाळ, रामेश्वर वायाळ, नानासाहेब भिसे, व्यंकट निलंगे, सुधाकर वायाळ, फारुख सय्यद, लिंबराज पानखडे यांच्यासह शेतकरी उपस्थित हाेते.