शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही युद्धाला घाबरत नाही, आमचं संपूर्ण आयुष्य..."; सीरियाच्या राष्ट्राध्यक्षांचा इस्रायलला इशारा
2
उद्योगपती कल्याणींच्या कन्येची वडिलोपार्जित मालमत्तेवरील मालकी हक्कासाठी कराड न्यायालयात धाव
3
IND vs ENG : नो रिस्क; बुमराह चौथा कसोटी सामना खेळणार हे जवळपास फिक्स! प्रशिक्षकांनीच दिली हिंट
4
VIDEO: अंबरनाथ पालिकेत दोन ठेकेदारांमध्ये पोलिसांसमोरच सुरू झाली फ्री-स्टाइल हाणामारी
5
टाटा समूहाच्या हॉटेल कंपनीला २९६ कोटींचा नफा, ५ वर्षांत गुंतवणूकदारांना केलं मालामाल; दिला बंपर परतावा!
6
"महाराष्ट्र झाले २० टक्के कमिशनचे राज्य, राज्यात सत्ताधारी टॉवेल बनियन गँगचा धुमाकूळ’’, विजय वडेट्टीवार यांची टीका  
7
"राज्यात पाच महिन्यात १ लाख ६० हजार गुन्हे, ९२४ हत्या", अंबादास दानवे यांनी मांडली धक्कादायक आकडेवारी
8
विधिमंडळात पडळकर आणि आव्हाडांच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी; CM फडणवीस म्हणाले, 'हे योग्य नाही'
9
अहमदाबादमधील विमान अपघात वैमानिकांच्या चुकीमुळे? AAIBने स्पष्टच सांगितलं, ते दावे फेटाळले
10
काल पडळकर आणि आव्हाडांमध्ये वाद, आज दोन्ही नेत्यांचे कार्यकर्ते भिडले, विधानभवन परिसरात पुन्हा राडा, पाहा VIdeo
11
"भगवद्गीता वाचून हिंदू झालो, पण हिंदू होण्यासाठी...?" बाबा बागेश्वर आणि पाकिस्तानचे आरिफ अजाकिया यांच्यातील प्रश्नोत्तर व्हायरल
12
CM फडणवीस म्हणाले त्रिभाषा सूत्र लागू करणार; उद्धव ठाकरेंनी हिंदीला विरोध करणारे पुस्तकच भेट दिलं
13
Ghatkopar Wall Collapse: घराच्या दुरुस्तीदरम्यान भिंत कोसळल्याने कामगाराचा मृत्यू, घाटकोपर येथील घटना!
14
दिसला गं बाई दिसला... अखेर सारा तेंडुलकर अन् शुबमन गिलचा 'तो' VIDEO सापडलाच..!!
15
२४ तासांत ३० किलो वजन कमी करण्याची हमी, शस्त्रक्रियेनंतर लगेच महिलेचा मृत्यू   
16
यूपी पोलिसांच्या एन्काउंटरमध्ये २३८ गुन्हेगार ठार, तर ९ हजारांहून अधिक गोळीबारात जखमी
17
IND W vs ENG W : वनडेत एक नंबर कामगिरी! स्मृती-प्रतिका सलामी जोडीनं सेट केला वर्ल्ड रेकॉर्ड
18
"बिहारमध्ये बांगलादेशी-रोहिंग्या सापडले, पण पहलगामचे दहशतवादी..."; ओवैसींची सरकारवर टीका
19
भारतीय ग्रँडमास्टर्स समोर 'बुद्धी' चालेना! आर. प्रज्ञानंद याने वर्ल्ड नंबर वन कार्लसनला दिला शह
20
२ राजयोग करणार ९ राशींची भरघोस भरभराट, अडकलेली कामे होतील; हाती पैसा राहील, शुभ वरदान काळ!

जिल्ह्यातील तीन लाख शालेय विद्यार्थ्यांना कडधान्य, डाळ, तांदळाचे झाले वितरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:23 IST

लातूर : शालेय विद्यार्थ्यांना पौष्टिक आहार मिळावा, यासाठी शालेय पोषण आहार उपक्रम राबविला जातो. कोरोनाच्या संकटामुळे शाळा बंद होत्या. ...

लातूर : शालेय विद्यार्थ्यांना पौष्टिक आहार मिळावा, यासाठी शालेय पोषण आहार उपक्रम राबविला जातो. कोरोनाच्या संकटामुळे शाळा बंद होत्या. शाळांमध्ये असलेला पोषण आहार खराब होऊ नये, यासाठी विद्यार्थ्यांना वितरीत करण्यात आला. जिल्ह्यातील जवळपास ३ लाख ६ हजार १०४ विद्यार्थ्यांना याचा लाभ मिळाला आहे.

पोषण आहाराअंतर्गत विद्यार्थ्यांना तांदूळ, कडधान्य व डाळींचे वाटप करण्यात आले आहे. आता शाळा सुरू झाल्या असून, पोषण आहार अद्याप दिला जात नाही. कोरोना काळात उरलेला पोषण आहार पालकांना, विद्यार्थ्यांना शाळेत बोलावून वाटप करण्यात आला. जिल्ह्यातील पात्र विद्यार्थ्यांना कडधान्य, डाळ आणि तांदळाचे वितरण करण्यात आले असल्याचे पोषण आहार विभागाच्या वतीने सांगण्यात आले.

कोरोना नियमांचे पालन...

n पोषण आहार वाटप करताना मास्क, फिजिकल डिस्टन्स, सॅनिटायझर, आदी नियमांचे काटेकोरपणे पालन करण्यात आले. शाळास्तरावर दररोज वर्गनिहाय पालकांना बोलाविले जात होते. त्यानुसार शिल्लक असलेला पोषण आहार वाटप झाला आहे.

n कोरोना नियमांचे पालन करीत शाळा सुरू झाल्या असून, पाचवी ते दहावीचे वर्ग सुरू झाले आहेत. शिक्षण विभागाकडून निर्देश प्राप्त होताच पोषण आहार दिला जाणार आहे. जिल्ह्यात जवळपास २ हजार ६९७ शाळा आहेत. यामध्ये प्राथमिक व माध्यमिक शाळांचा समावेश आहे. आता नियमित वर्ग सुरू झाल्याने विद्यार्थ्यांची उपस्थितीही वाढत आहे.

शासनाच्या निर्देशानुसार जिल्ह्यातील सर्वच शाळांमध्ये पोषण आहार दिला जातो. नियमितपणे तांदूळ, कडधान्य, डाळींचे वितरण केले जाते. कोरोनामुळे शाळा बंद होत्या. परिणामी, शाळेत साठवणूक करून ठेवलेला पोषण आहार खराब होऊ नये, यासाठी विद्यार्थ्यांना वितरीत करण्याच्या सूचना करण्यात आल्या होत्या. त्यानुसार मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख यांच्या माध्यमातून पालक, विद्यार्थ्यांना शाळेत बोलावून तांदूळ, कडधान्य, डाळींचे वाटप करण्यात आले. कोरोना नियमांचे पालन करीत सर्व प्रक्रिया पार पडली.

- प्रदीप गायकवाड, शालेय पोषण आहार विभाग