शहरं
Join us  
Trending Stories
1
8 कोटी, १२ पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
2
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
3
"मनसेचे जे काही नगरसेवक निवडून येतील, तेदेखील पळवतील", भाजपचा राज ठाकरेंना सावधगिरीचा सल्ला
4
गॅल्व्हेस्टनजवळ मेक्सिकन नौदलाच्या विमानाचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
6
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
7
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
8
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
9
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
10
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
11
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
12
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
13
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
14
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
15
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
16
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
17
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
18
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
19
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
20
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील तीन लाख शालेय विद्यार्थ्यांना कडधान्य, डाळ, तांदळाचे झाले वितरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:23 IST

लातूर : शालेय विद्यार्थ्यांना पौष्टिक आहार मिळावा, यासाठी शालेय पोषण आहार उपक्रम राबविला जातो. कोरोनाच्या संकटामुळे शाळा बंद होत्या. ...

लातूर : शालेय विद्यार्थ्यांना पौष्टिक आहार मिळावा, यासाठी शालेय पोषण आहार उपक्रम राबविला जातो. कोरोनाच्या संकटामुळे शाळा बंद होत्या. शाळांमध्ये असलेला पोषण आहार खराब होऊ नये, यासाठी विद्यार्थ्यांना वितरीत करण्यात आला. जिल्ह्यातील जवळपास ३ लाख ६ हजार १०४ विद्यार्थ्यांना याचा लाभ मिळाला आहे.

पोषण आहाराअंतर्गत विद्यार्थ्यांना तांदूळ, कडधान्य व डाळींचे वाटप करण्यात आले आहे. आता शाळा सुरू झाल्या असून, पोषण आहार अद्याप दिला जात नाही. कोरोना काळात उरलेला पोषण आहार पालकांना, विद्यार्थ्यांना शाळेत बोलावून वाटप करण्यात आला. जिल्ह्यातील पात्र विद्यार्थ्यांना कडधान्य, डाळ आणि तांदळाचे वितरण करण्यात आले असल्याचे पोषण आहार विभागाच्या वतीने सांगण्यात आले.

कोरोना नियमांचे पालन...

n पोषण आहार वाटप करताना मास्क, फिजिकल डिस्टन्स, सॅनिटायझर, आदी नियमांचे काटेकोरपणे पालन करण्यात आले. शाळास्तरावर दररोज वर्गनिहाय पालकांना बोलाविले जात होते. त्यानुसार शिल्लक असलेला पोषण आहार वाटप झाला आहे.

n कोरोना नियमांचे पालन करीत शाळा सुरू झाल्या असून, पाचवी ते दहावीचे वर्ग सुरू झाले आहेत. शिक्षण विभागाकडून निर्देश प्राप्त होताच पोषण आहार दिला जाणार आहे. जिल्ह्यात जवळपास २ हजार ६९७ शाळा आहेत. यामध्ये प्राथमिक व माध्यमिक शाळांचा समावेश आहे. आता नियमित वर्ग सुरू झाल्याने विद्यार्थ्यांची उपस्थितीही वाढत आहे.

शासनाच्या निर्देशानुसार जिल्ह्यातील सर्वच शाळांमध्ये पोषण आहार दिला जातो. नियमितपणे तांदूळ, कडधान्य, डाळींचे वितरण केले जाते. कोरोनामुळे शाळा बंद होत्या. परिणामी, शाळेत साठवणूक करून ठेवलेला पोषण आहार खराब होऊ नये, यासाठी विद्यार्थ्यांना वितरीत करण्याच्या सूचना करण्यात आल्या होत्या. त्यानुसार मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख यांच्या माध्यमातून पालक, विद्यार्थ्यांना शाळेत बोलावून तांदूळ, कडधान्य, डाळींचे वाटप करण्यात आले. कोरोना नियमांचे पालन करीत सर्व प्रक्रिया पार पडली.

- प्रदीप गायकवाड, शालेय पोषण आहार विभाग