शहरं
Join us  
Trending Stories
1
याला म्हणतात 'दृढनिश्चय'...! मणिपूरमध्ये पाऊस बनला अडथळा, मग पंतप्रधान मोदींनी 'हा' मार्ग अवलंबला! 
2
२०७ खुनाचा आरोप, तिला पकडण्यासाठी होते २ कोटींचे इनाम ! पण तिच्या 'या' निर्णयाने तिलाच मिळतील २५ लाख
3
"होय, मतचोरी झाली !" मत चोरीतूनच भाजप सत्तेत; काँग्रेसच्या आरोपाला नक्षल्यांचे समर्थन
4
IND vs PAK Head To Head Record : पाकचा नवा डाव; पण टीम इंडियाविरुद्ध फिकी ठरेल त्यांची ही चाल, कारण...
5
लाईफबॉय साबण ८, डव शाम्पू ५५, टूथपेस्ट १६ रुपयांनी स्वस्त झाली; हिंदुस्तान युनिलिव्हरची यादी आली...   
6
आता पश्चाताप करून काय उपयोग? रोखण्याचा प्रयत्न करूनही तरुणीनं खोल पाण्यात उडी घेतली; थरकाप उडवणारा VIDEO
7
सासऱ्यावर गोळी झाडली, स्वतःला वाचवण्यासाठी पळत सुटला अन् पुराच्या पाण्यात पडला जावई! पुढे जे झालं...
8
असुरक्षित! पहाटे पुणे स्टेशनला उतरलेल्या तरुणाने पैसे न दिल्याने पोटात चाकूने वार
9
उल्हासनगरातील हॅन्ड्रेड बारमध्ये महिला वेटर्सचे अश्लील चाळे, महिला वेटर्ससह ९ जणांवर गुन्हा 
10
घरात ‘टॉप टू बॉटम’ डॉक्टर ; पण आयएएस झाले आणि लोकसेवेत आले...
11
योगेश आळेकरी यांना मिळाली नवीकोरी दुचाकी; पुढच्या प्रवासाला सुरुवात करणार पण...
12
Sonu Sood : दिलदार सुपरहिरो! "रोटी का कर्ज चुकाना है"; पंजाबमधील पूरग्रस्तांसाठी सोनू सूदचा पुढाकार
13
मध्य प्रदेश मुख्यमंत्र्यांचा 'ऑन द स्पॉट' निर्णय; महिंद्राचा रतलामचा डीलर ४२० मध्ये तुरुंगात जाणार...
14
'तुम्ही जीआरमध्ये फेरफार करून बघा, मग तुम्हाला मराठे कळतील'; मनोज जरांगेंचा इशारा
15
VIRAL : चोरांनी कार चालकावर झाडली गोळी, पण पुढे जे झालं त्यानं स्वतःच घाबरले! Video बघून सगळेच झाले हैराण
16
या सुंदर प्रदेशावर हिंसाचाराची सावली पडलेली; पंतप्रधान नरेंद्र मोदी मणिपूरमध्ये, म्हणाले...
17
जगातला 'असा' एकमेव देश, जिथे घरात पाळल्या जातात मगरी; विकून होते कोटी रुपयांची कमाई!
18
Who Is Yash Rathod : विदर्भाची रन मशीन! पोट्याचं द्विशतक अवघ्या ६ धावांनी हुकलं
19
Aishanya Dwivedi : Video - "BCCI पहलगाम हल्ला, ऑपरेशन सिंदूर विसरलं; आपण पाकिस्तानला ही संधी का देतोय?"
20
यामाहाची FZ किती रुपयांनी स्वस्त झाली? जुना काळ आठवला..., फसिनो, आर१५ वर किती जीएसटी कमी झाला...

जिल्ह्यातील तीन लाख शालेय विद्यार्थ्यांना कडधान्य, डाळ, तांदळाचे झाले वितरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:23 IST

लातूर : शालेय विद्यार्थ्यांना पौष्टिक आहार मिळावा, यासाठी शालेय पोषण आहार उपक्रम राबविला जातो. कोरोनाच्या संकटामुळे शाळा बंद होत्या. ...

लातूर : शालेय विद्यार्थ्यांना पौष्टिक आहार मिळावा, यासाठी शालेय पोषण आहार उपक्रम राबविला जातो. कोरोनाच्या संकटामुळे शाळा बंद होत्या. शाळांमध्ये असलेला पोषण आहार खराब होऊ नये, यासाठी विद्यार्थ्यांना वितरीत करण्यात आला. जिल्ह्यातील जवळपास ३ लाख ६ हजार १०४ विद्यार्थ्यांना याचा लाभ मिळाला आहे.

पोषण आहाराअंतर्गत विद्यार्थ्यांना तांदूळ, कडधान्य व डाळींचे वाटप करण्यात आले आहे. आता शाळा सुरू झाल्या असून, पोषण आहार अद्याप दिला जात नाही. कोरोना काळात उरलेला पोषण आहार पालकांना, विद्यार्थ्यांना शाळेत बोलावून वाटप करण्यात आला. जिल्ह्यातील पात्र विद्यार्थ्यांना कडधान्य, डाळ आणि तांदळाचे वितरण करण्यात आले असल्याचे पोषण आहार विभागाच्या वतीने सांगण्यात आले.

कोरोना नियमांचे पालन...

n पोषण आहार वाटप करताना मास्क, फिजिकल डिस्टन्स, सॅनिटायझर, आदी नियमांचे काटेकोरपणे पालन करण्यात आले. शाळास्तरावर दररोज वर्गनिहाय पालकांना बोलाविले जात होते. त्यानुसार शिल्लक असलेला पोषण आहार वाटप झाला आहे.

n कोरोना नियमांचे पालन करीत शाळा सुरू झाल्या असून, पाचवी ते दहावीचे वर्ग सुरू झाले आहेत. शिक्षण विभागाकडून निर्देश प्राप्त होताच पोषण आहार दिला जाणार आहे. जिल्ह्यात जवळपास २ हजार ६९७ शाळा आहेत. यामध्ये प्राथमिक व माध्यमिक शाळांचा समावेश आहे. आता नियमित वर्ग सुरू झाल्याने विद्यार्थ्यांची उपस्थितीही वाढत आहे.

शासनाच्या निर्देशानुसार जिल्ह्यातील सर्वच शाळांमध्ये पोषण आहार दिला जातो. नियमितपणे तांदूळ, कडधान्य, डाळींचे वितरण केले जाते. कोरोनामुळे शाळा बंद होत्या. परिणामी, शाळेत साठवणूक करून ठेवलेला पोषण आहार खराब होऊ नये, यासाठी विद्यार्थ्यांना वितरीत करण्याच्या सूचना करण्यात आल्या होत्या. त्यानुसार मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख यांच्या माध्यमातून पालक, विद्यार्थ्यांना शाळेत बोलावून तांदूळ, कडधान्य, डाळींचे वाटप करण्यात आले. कोरोना नियमांचे पालन करीत सर्व प्रक्रिया पार पडली.

- प्रदीप गायकवाड, शालेय पोषण आहार विभाग