शहरं
Join us  
Trending Stories
1
Pakistan Ceasefire Violations : पाकिस्तानकडून जम्मूमध्ये गोळीबार, BSF जवान मोहम्मद इम्तियाज शहीद, सात जण जखमी
2
Pakistan Violates Ceasefire: पाकिस्तानचं शेपूट वाकडंच!! चार तासांतच शस्त्रसंधीचे उल्लंघन; जम्मूमध्ये पुन्हा ड्रोन हल्ले, गोळीबार
3
"युद्धविरामाचं झालं काय? श्रीनगरमध्ये अनेक स्फोट’’, पाकिस्तानच्या आगळीकीनंतर ओमर अब्दुल्ला संतप्त 
4
India Pakistan Ceasefire: पाकिस्तानकडून ३.३५ वाजता फोन आला, अन्...; परराष्ट्र सचिवांनी सांगितलं नेमकं काय ठरलं! १२ तारीख महत्त्वाची
5
पाकिस्तानशी 'युद्धविराम' करण्याच्या निर्णयानंतर शरद पवार यांचे ट्विट, म्हणाले- "भारताने कधीच..."
6
सकाळपर्यंत डागली जात होती क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, अचानक संध्याकाळी युद्धविराम कसा झाला? मागच्या ४८ तासांत काय घडलं
7
India Pakistan Ceasefire: युद्धविराम! देशासाठी सर्वात मोठी बातमी; भारत-पाकिस्तान संघर्षात सहमतीने तोडगा; दोन्हीकडून हल्ले बंद
8
"काँग्रेस पक्षाचा आणि देशाचा डीएनए एकच, काँग्रेस कधीही न संपणारा पक्ष’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास   
9
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा खरंच तुरुंगात मृत्यू झाला? जाणून घ्या काय आहे सत्य
10
पुढे धोका आहे! रात्री मोबाईलचा जास्त वापर करणं 'डेंजर'; शरीरातील 'हा' हार्मोन होतो कमी अन्...
11
India Pakistan Ceasefire: भारत-पाकिस्तान संघर्षात अखेर 'युद्धविराम', हल्ले पूर्ण थांबणार! सिंधू पाणी वाटप करारचं काय?
12
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तानकडून काही तासांतच युद्धविरामाचं उल्लंघन, जम्मू, श्रीनगरमध्ये ड्रोनहल्ले
13
Vyomika Singh : कडक सॅल्यूट! "डॅडी, मम्मीला सांगू नका, ती मला जाऊ देणार नाही"; व्योमिका सिंह यांची संघर्षकथा
14
हृदयस्पर्शी! "पप्पा..."; ड्युटीवर जाणाऱ्या जवानाला लेकीने मारली मिठी, डोळे पाणावणारा Video
15
Act of War: 'यापुढे कुठलाही दहशतवादी हल्ला हा देशाविरोधातील युद्ध मानलं जाणार’, केंद्र सरकारचा मोठा निर्णय
16
लष्कराच्या हालचालीचे सोशल मीडियावर पोस्ट केले व्हिडीओ, पोलिसांनी तरुणाला केली अटक
17
फारच वाईट! 'ऑपरेशन सिंदूर' व्यापार चिन्ह मिळवण्यासाठी ११ जणांची धडपड; प्रकरण पोहोचलं सुप्रीम कोर्टात
18
अफगाणिस्ताननेही फाडला खोटारड्या पाकिस्तानचा बुरखा; भारताविरोधात काय केला होता दावा?
19
‘बेगाने शादी मे’ मला कशाला ‘अब्दुल्ला दीवाना’ करता? राष्ट्रवादी एकत्रीकरणाचा प्रश्न फडणवीसांनी भिरकावला
20
आधी देशसेवा! लग्नाच्या दुसऱ्या दिवशी फोन आला, नवरदेवाचा पोशाख काढून ‘तो’ सीमेकडे निघाला

अहमदपूर बसस्थानकास लागले समस्यांचे ‘ग्रहण’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2021 04:19 IST

अहमदपूर तालुक्यातील वाडी-तांड्यासह जवळपास १२४ गावांचा दररोज बसस्थानकाशी संपर्क येताे. रत्नागिरी - नागपूर हा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ३६५ शहरातून ...

अहमदपूर तालुक्यातील वाडी-तांड्यासह जवळपास १२४ गावांचा दररोज बसस्थानकाशी संपर्क येताे. रत्नागिरी - नागपूर हा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ३६५ शहरातून जात आहे. परिणामी, माेठ्या प्रमाणावर दिवसभर वाहनांची वर्दळ असूून येथील बसस्थानकामध्ये सुविधांचा अभाव असल्याने प्रवाशांना याचा फटका बसत आहे. बसस्थानकाला पावसाळ्यामध्ये पूर्णत: गळती लागली आहे. प्रवाशांनी आपला जीव मुठीत धरुन थांबावे लागते. त्याचबराेबर मोकाट जनावरांचा वावरही परिसरात अलिकडे वाढला आहे. या माेकाट जनावरांचा मुक्काम बसस्थानकातच असल्याने घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. बसस्थानकातील पंखे बंद असून, उन्हाळ्यामध्ये प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे. येथील स्वच्छतेचा प्रश्न गंभीर आहे. प्रवाशांना या अच्छतेला समाेरे जावे लागत आहे. अशा स्थितीत प्रवाशांना बसस्थानकात बसची वाट पाहत थांबावे लागत आहे. तर बसस्थानकात पिण्याच्या पाण्याची सुविधाही उपलब्ध नाही. प्रवाशांसाठी करण्यात आलेली आसन व्यवस्था माेडकळीला आली आहे. आसन व्यवस्थेच्या फरशा निघाल्या आहेत. परिणामी, प्रवाशांची माेठ्या प्रमाणावर हेळसांड हाेत आहे.

बसस्थानक परिसर बनले कचऱ्याचे आगार...

अहमदपूर येथील नगरपालिकेच्या वतीने शाैचालयांची उभारणी करण्यात आली नाही. परिणामी, लघुशंकेसाठी अहमदपूर शहरात येणारे अनेक व्यक्ती बसस्थानक परिसराचा वापर लघुशंकेसाठी करत असल्याचे समाेर आले आहे. त्याचबराेबर बसस्थानकालगत असलेल्या छाेट्या-माेठ्या व्यापाऱ्यांकडून दुकानातील कचराही बसस्थानक परिसरात टाकला जात आहे. परिणामी, बसस्थानक परिसत कचऱ्याचे आगार झाले आहे.

कचऱ्याचे ढीग जाग्यावरच...

रस्त्यालगत व्यवसाय करणारे हातगाडेवाले बसस्थानक परिसरात कचरा टाकत आहेत. परिणामी, अहमदपूर नगर पालिकेला वारंवार सांगूनही हा कचरा उचलला जात नाही. त्याचबराेबर लघुशंकेसाठी अहमदपूर शहरात व्यवस्था नसल्याने हातगाडेवाले, व्यापारी आणि इतर नागरिक बसस्थानकाच्या खुल्या जागेचा लघुशंकेसाठी वापर करत आहेत. त्यामूळे बसस्थानक परिसरात दुर्गंधी पसरली आहे. शहरात नगरपालीकेने बाजारपेठेतील व्यावसायीकांसाठी स्वच्छतागृह बांधणे आवश्यक आहे.

- एस.जी. सोनवणे, आगार प्रमुख, अहमदपूर

भंगार बसेसने प्रवासी झाले त्रस्त...

ग्रामीण भागात दळणवळणासाठी, प्रवासासाठी महत्वपूर्ण असलेल्या बसच्या उत्पन्न वाढीसाठी महामंडळाकडून प्रवाशांना आकर्षित केले जात आहे. यासाठी विविध योजना राबविल्या जात आहेत. मात्र, भंगार बसेसमुळे प्रवासी एसटीकडे पाठ फिरवीत असल्याचे दिसून येत आहे. अनेक बसेसच्या खिडक्या, आसन व्यवस्थेची दुरवस्था झाली आहे.याचा त्रास प्रवाशांना सहन करावा लागत आहे.

- रामानंद मुंड, प्रवासी