शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेचा प्रत्येक नागरिक आणि सैनिक आमच्या निशाण्यावर, अणुकेंद्रावर हल्ल्यानंतर इराणचा थेट इशारा  
2
US Airstrikes Iran: तीन अणुऊर्जा केंद्रावर बॉम्बचा वर्षाव, अमेरिकेने इराणवर हवाई हल्ला कसा केला?
3
"आधी ताकद दाखवली जाते, मग..."; अमेरिकेच्या हल्ल्यांवर इस्रायलने व्यक्त केला आनंद, नेतान्याहू म्हणाले, "धन्यवाद ट्रम्प"
4
आजचे राशीभविष्य - २२ जून २०२५, मान-प्रतिष्ठा ह्यात वाढ झाल्याने आपण आनंदित व्हाल
5
America Iran: अमेरिकेचा इराणमध्ये घुसून हल्ला! अनेक अणुऊर्जा केंद्रावर टाकले बॉम्ब; ट्रम्प म्हणाले, "आता..."
6
विशेष लेख: शिंदे-ठाकरे दोघांना भांडू द्या, तुम्ही निवडून कसे येणार हे बघा!
7
विमान कर्मचारी वेळापत्रकात आढळल्या गंभीर त्रुटी, एअर इंडियाच्या तीन अधिकाऱ्यांवर कारवाईचे आदेश
8
'मला नोबेल मिळणार नाही'; डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यक्त केली खंत
9
हिंदी भाषा पुस्तकांच्या छपाईचे आदेशच नाहीत, कच्च्या आराखड्यास अंतिम मान्यताच नाही
10
लेख: पूल कोसळला, रेल्वेतून पडून मृत्यू... जे जबाबदार, तेच बेजबाबदार म्हणून या आपत्ती
11
विशेष लेख: कुंभमेळ्याचं नवं स्टेटस! येणार ‘रील’वाली गर्दी
12
कर्जमाफीचा निर्णय योग्य वेळी घेणार -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
13
अटल सेतूवर खड्डे! कंत्राटदाराला २० लाखांचा दंड; पाऊस, तेल गळतीमुळे प्रकार 
14
लेख: आषाढी पायी वारी :विज्ञाननिष्ठ उत्सव
15
मुंबईत विमानाच्या महिला पायलटचा कॅब प्रवासादरम्यान विनयभंग; चालकासह दोन तरुणांविरोधात गुन्हा 
16
मुलाला आईची जात लावण्यास मुंबई उच्च न्यायालयाने दिला नकार; प्रकरण काय? 
17
भारतीय संगीत पुढे आणण्याची गरज, आशा भोसले यांनी मांडले मत; देवेंद्र फडणवीसांनी गायले गाणे
18
फिजिओथेरपीच्या इंटर्न्सच्या वेतनात वाढ, बीएस्सी नर्सिंगच्या इंटर्सना मिळणार विद्यावेतन
19
पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी कुत्रा जरी...; लष्करप्रमुख मुनीर यांनी अमेरिकेत सभा घेतली अन् शोभा केली
20
Video : हॉट एअर बलूनमध्ये लागली आग, २१ जण जमिनीवर कोसळले! ८ जणांचा जागीच मृत्यू

मिरचीचा भावा घसरला, शेतकऱ्यांनी फिरविला नांगर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2021 04:21 IST

शिरूर अनंतपाळ आणि चाकूर तालुक्यातील येरोळ, कबनसांगवी, नागेवाडी, सताळा, डिगोळ, सुमठाणा, आंबेवाडी, बावलगाव, चांबरगा, बोळेगाव येथील तरुण शेतकऱ्यांनी नोकरीच्या ...

शिरूर अनंतपाळ आणि चाकूर तालुक्यातील येरोळ, कबनसांगवी, नागेवाडी, सताळा, डिगोळ, सुमठाणा, आंबेवाडी, बावलगाव, चांबरगा, बोळेगाव येथील तरुण शेतकऱ्यांनी नोकरीच्या मागे न लागता वडिलोपार्जित शेतात युवा शेतकरी व्हाॅट्सअॅप ग्रुप तयार करून एकमेकाच्या संवादाने एकत्र येऊन शेतीमध्ये लाखो रुपये खर्च करून मल्चिंग पेपरवर मिरची लागवड केली. मिरचीही चांगलीच बहरली हाेती. मात्र, हिरव्या मिरचीला बाजारात कवडीमोल भाव मिळत असल्याने मिरची उत्पादक शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी आहे. या परिसरातील शेतकरी आपली मिरची नळेगाव, उदगीर आणि लातूर येथील भाजी मार्केटमध्ये विक्रीसाठी घेऊन जातात. लिलावामध्ये मिरचीला जेमतेम सहा ते दहा रुपये किलोप्रमाणे भाव मिळत आहे. महिला मजुराला तोडण्यासाठी किलोला पाच रुपये व मार्केटपर्यंत मालवाहतुकीसाठी एका पोत्याला ५० रुपये भाडे द्यावे लागत आहे. त्यामुळे मिरचीला एक्करी ५० हजार रुपये केलेला खर्चही निघत नसल्याने मिरची उत्पादक शेतकरी पुरता हवालदिल झालेला आहे. उन्हाळ्यामध्ये विकतचे पाणी आणून जगविलेल्या मिरचीला भाव मिळत नसल्याने बाजारात कवडीमाेलाच्या भावात विक्री करावी लागत आहे. यातून शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.

खर्चाचा तालमेळ बसेना...

उदगीर शहरातील बाजारात मिरची उत्पादक शेतकऱ्यांकडून लिलावामध्ये सहा ते बारा रुपये किलोप्रमाणे शेतकऱ्यांकडून व्यापारी मिरचीची खरेदी करीत असल्याने मिरची तोडणीचा खर्च आणि मालवाहतुकीचे भाडे परवडत नसल्याने शेतातील मिरचीच्या फडावरच नांगर फिरवला असल्याचे कबनसांगवी येथील शेतकरी ओम वैजीनाथ सांगवे यांनी सांगितले.

लाखाे रुपयांचा फटका...

शिरूर अनंतपाळ आणि चाकूर तालुक्यातील गावात अनेक शेतकऱ्यांनी पारंपरिक शेतीला फाटा देत प्रयाेगशील शेती करण्यासाठी प्राधान्य दिले आहे. मात्र, बाजारात शेतीमाल, भाजीपाल्याला मिळणारा कवडीमाेल भाव हा शेतकऱ्यांना आर्थिक संकटात टाकणारा ठरला आहे. सध्याला हिरव्या मिरचीला भावच नसल्याने शेतकऱ्यांची हिरवी मिरची जाग्यावरच पिकली आहे. यातून लाखाे रुपयांचा फटका सहन करण्याची वेळ आली आहे. लागवड खर्चही पदरी पडत नसल्याने माेठे नुकसान झाले आहे.