शहरं
Join us  
Trending Stories
1
'बिहारमध्ये वीजच नाही तर बिल कुठून येणार'; नितीश कुमारांच्या घोषणेची भाजप मंत्र्याने उडवली खिल्ली
2
"असले राजकीय स्टंट सहन करणार नाही, माफी मागा"; राज ठाकरेंच्या वक्तव्याने गुजरातमध्ये संताप
3
IND vs ENG : बुमराह 'ऑन ड्यूटी'; सिराजला मिळणार सुट्टी! टीम इंडियात शिजतोय हा प्लॅन
4
'कोल्डप्ले' कॉन्सर्टमध्ये CEO आणि HRचं अफेअर झालं उघड, आता कंपनीने केली 'ही' कारवाई
5
आधी 'जिथं तू तिथं मी...' सीन; आता एकमेकांना अनफॉलो करत हार्दिक-जास्मिन यांच्यातील प्रेमाचा खेळ संपला!
6
Electric Scooter: ओला, टीव्हीएस, बजाजसाठी धोक्याची घंटा, बाजारात येतेय रेट्रो स्टाईल इलेक्ट्रीक स्कूटर!
7
सुंदरा मनामध्ये भरली... फ्रान्समध्ये दिसला सारा तेंडुलकरचा नवा लूक, चाहतेही झाले फिदा
8
विनयभंगाच्या गुन्ह्याखाली तरुंगात गेला; सुटून आल्यानंतर पीडिताच्या घरासमोरच फोडले फटाके!
9
"...मग नितेश राणे सरकारमध्ये बसून फक्त पंखा हलवणार का?"; मनसे नेत्याचा खोचक सवाल
10
Rohini Khadse : "अरे कुणाला मूर्ख बनवता? पोलीस सत्ताधाऱ्यांच्या इशाऱ्यावर नाचताहेत...”, रोहिणी खडसेंचा संताप
11
Mallikarjun Kharge : "४२ देश फिरले, पण मणिपूरला एकदाही नाही गेले", मल्लिकार्जुन खरगेंचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल
12
'कुणबी प्रमाणपत्र,व्हॅलिडिटीचा प्रश्न सोडवा'; धाराशिवमध्ये सरनाईकांना मराठा तरुणांचा घेराव!
13
“राज ठाकरेंसोबत जो जाईल, तो संपेल, तेच मराठीचा अनादर करतात”; आणखी एका भाजपा खासदाराची टीका
14
सुनेवर होती वाकडी नजर, सतत मुलाशी भांडण अन् एके दिवशी सासऱ्याने टोकच गाठलं...
15
“दिवस निवड, वेळ अन् जागा तुझी, कुठे येऊ ते फक्त सांग”; मनसे नेत्यांचे निशिकांत दुबेंना आव्हान
16
२ सख्ख्या भावांनी एकाच मुलीसोबत केले लग्न, कारण...; अजब लग्नाची ही गजब गोष्ट काय आहे?
17
बजाजची साथ सोडून अंबांनींसोबत आली ही दिग्गज जर्मन विमा कंपनी, लाखो कोटींच्या व्यवसायावर नजर
18
“विधानभवनातील मारामारीला CM फडणवीसच जबाबदार, हनीट्रॅपचे धागेदारे...”: हर्षवर्धन सपकाळ
19
IND vs ENG: आमची बरोबरी करायची असेल तर तुमची खरी ताकद दाखवा; इंग्लंडच्या दिग्गजाचा टीम इंडियाला सल्ला
20
'त्याचं तोंड उघडत नाहीये'; पत्नीचे दिरासोबत प्रेमसंबंध; भावाला चॅट सापडले अन् समोर आला हत्येचा कट

पानगाव दहा खेडी पाणी याेजनेचा थकीत बिलापोटी वीजपुरवठा तोडला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2021 04:20 IST

रेणापूर तालुक्यातील पानगाव व परिसरातील नागरिकांना शुद्ध आणि मुबलक पाणीपुरवठा व्हावा. पाण्यासाठी भटकंती होऊ नये म्हणून शासनाने जीवन प्राधिकरणामार्फत ...

रेणापूर तालुक्यातील पानगाव व परिसरातील नागरिकांना शुद्ध आणि मुबलक पाणीपुरवठा व्हावा. पाण्यासाठी भटकंती होऊ नये म्हणून शासनाने जीवन प्राधिकरणामार्फत भंडारवाडी मध्यम प्रकल्पावरून पानगाव दहा खेडी योजना राबविली आहे. या योजनेअंतर्गत पाथरवाडी येथे जलशुद्धीकरण केंद्र उभारण्यात आले. या केंद्रावरून पानगावसह परिसरातील गावांना पाणीपुरवठा होऊ लागल्याने नागरिकांची होणारी भटकंती थांबली.

पानगाव हे रेणापूर तालुक्यातील मोठ्या बाजारपेठेचे गाव आहे. गावची लोकसंख्याही अधिक आहे. त्यामुळे गावची तहान या योजनेवर भागत असे. दरम्यान, या योजनेवर अवलंबून असलेल्या गावांनी नियमितपणे महावितरणकडे वीजबिलाचा भरणा केला नाही. त्यामुळे महावितरणने सातत्याने पानगाव, खरोळा, घनसरगाव, मुरढव, फावडेवाडी, नरवटवाडी, आदी ग्रामपंचायतीकडे थकीत वीज बिल भरण्याचे आवाहन करून सूचना केल्या. परंतु, त्याकडे ग्रामपंचायतींनी दुर्लक्ष केल्याने अखेर महावितरणने जलयोजनाचा पाणीपुरवठा तोडला आहे. त्यामुळे आठ दिवसांपासून या योजनेवर अवलंबून असलेल्या गावांवर जलसंकट ओढवले आहे. परिणामी, नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. त्यामुळे संताप व्यक्त करण्यात येत आहे.

३ लाखांचा भरणा करण्याचा निर्णय

महावितरणने १ कोटी ४२ लाखांच्या थकीत वीज बिलापोटी २० फेब्रुवारी रोजी वीजपुरवठा तोडला आहे. त्यामुळे नागरिकांची होणारी गैरसोय पाहून पाणीपुरवठा शिवार समितीची बैठक सरपंच सुकेश भंडारे यांनी घेऊन महावितरणच्या अधीक्षक अभियंत्यासोबत खंडित वीजपुरवठ्यासंदर्भात चर्चा केली. तेव्हा थकीत वीज बिल भरल्याशिवाय वीजपुरवठा सुरळीत केला जाणार नाही, असे सांगितले. त्यामुळे ग्रामपंचायतीने तीन लाख रुपयांचा भरणा करण्याचा निर्णय घेतला असल्याचे सरपंच सुकेश भंडारे, ग्रामविकास अधिकारी गोपिनाथ टकले यांनी सांगितले.

नागरिकांनी पाणीपट्टी भरणा करावा

महावितरणची १ कोटी ४२ लाख ४३ हजारांची थकीत बाकी आहे. वीजपुरवठा तोडल्याने गावातील नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. दोन दिवसांत काही रक्कम भरण्यात येणार आहे; परंतु, गावातील नागरिकांनी आपल्याकडे असलेली पाणीपट्टी भरावी, असे आवाहन सरपंच सुकेश भंडारे, ग्रामविकास अधिकारी गोपिनाथ टकले यांनी केले आहे.