शहरं
Join us  
Trending Stories
1
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
2
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
3
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
4
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
5
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
6
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
7
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
8
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
9
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
10
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
11
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
12
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
13
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
14
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
15
Chanakya Niti: रातोरात श्रीमंत व्हाल, जर चाणक्यनीतीच्या 'या' ५ सवयी आजच लावून घ्याल
16
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
17
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
18
“कुणीही एकत्र येऊ शकते, पण मराठी माणूस हा पूर्णपणे भाजपाच्या पाठीशी उभा आहे”; कुणाचा दावा?
19
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
20
घसरत्या रुपयाला सावरण्यासाठी आरबीआयची धडपड; बाजारात विकले तब्बल....अब्ज डॉलर
Daily Top 2Weekly Top 5

पानगाव दहा खेडी पाणी याेजनेचा थकीत बिलापोटी वीजपुरवठा तोडला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2021 04:20 IST

रेणापूर तालुक्यातील पानगाव व परिसरातील नागरिकांना शुद्ध आणि मुबलक पाणीपुरवठा व्हावा. पाण्यासाठी भटकंती होऊ नये म्हणून शासनाने जीवन प्राधिकरणामार्फत ...

रेणापूर तालुक्यातील पानगाव व परिसरातील नागरिकांना शुद्ध आणि मुबलक पाणीपुरवठा व्हावा. पाण्यासाठी भटकंती होऊ नये म्हणून शासनाने जीवन प्राधिकरणामार्फत भंडारवाडी मध्यम प्रकल्पावरून पानगाव दहा खेडी योजना राबविली आहे. या योजनेअंतर्गत पाथरवाडी येथे जलशुद्धीकरण केंद्र उभारण्यात आले. या केंद्रावरून पानगावसह परिसरातील गावांना पाणीपुरवठा होऊ लागल्याने नागरिकांची होणारी भटकंती थांबली.

पानगाव हे रेणापूर तालुक्यातील मोठ्या बाजारपेठेचे गाव आहे. गावची लोकसंख्याही अधिक आहे. त्यामुळे गावची तहान या योजनेवर भागत असे. दरम्यान, या योजनेवर अवलंबून असलेल्या गावांनी नियमितपणे महावितरणकडे वीजबिलाचा भरणा केला नाही. त्यामुळे महावितरणने सातत्याने पानगाव, खरोळा, घनसरगाव, मुरढव, फावडेवाडी, नरवटवाडी, आदी ग्रामपंचायतीकडे थकीत वीज बिल भरण्याचे आवाहन करून सूचना केल्या. परंतु, त्याकडे ग्रामपंचायतींनी दुर्लक्ष केल्याने अखेर महावितरणने जलयोजनाचा पाणीपुरवठा तोडला आहे. त्यामुळे आठ दिवसांपासून या योजनेवर अवलंबून असलेल्या गावांवर जलसंकट ओढवले आहे. परिणामी, नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. त्यामुळे संताप व्यक्त करण्यात येत आहे.

३ लाखांचा भरणा करण्याचा निर्णय

महावितरणने १ कोटी ४२ लाखांच्या थकीत वीज बिलापोटी २० फेब्रुवारी रोजी वीजपुरवठा तोडला आहे. त्यामुळे नागरिकांची होणारी गैरसोय पाहून पाणीपुरवठा शिवार समितीची बैठक सरपंच सुकेश भंडारे यांनी घेऊन महावितरणच्या अधीक्षक अभियंत्यासोबत खंडित वीजपुरवठ्यासंदर्भात चर्चा केली. तेव्हा थकीत वीज बिल भरल्याशिवाय वीजपुरवठा सुरळीत केला जाणार नाही, असे सांगितले. त्यामुळे ग्रामपंचायतीने तीन लाख रुपयांचा भरणा करण्याचा निर्णय घेतला असल्याचे सरपंच सुकेश भंडारे, ग्रामविकास अधिकारी गोपिनाथ टकले यांनी सांगितले.

नागरिकांनी पाणीपट्टी भरणा करावा

महावितरणची १ कोटी ४२ लाख ४३ हजारांची थकीत बाकी आहे. वीजपुरवठा तोडल्याने गावातील नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. दोन दिवसांत काही रक्कम भरण्यात येणार आहे; परंतु, गावातील नागरिकांनी आपल्याकडे असलेली पाणीपट्टी भरावी, असे आवाहन सरपंच सुकेश भंडारे, ग्रामविकास अधिकारी गोपिनाथ टकले यांनी केले आहे.