शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
2
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
3
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...
4
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
5
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
6
6 एअरबॅगची सुरक्षा, 23Km चे मायलेज अन् ₹70000 + ₹1.10 लाखाचा डिस्काउंट, आताच करा बुक...
7
“संजय राऊत शरद पवारांकडे बसलेले असायचे, त्यांच्यामुळेच ठाकरे गटाचे नुकसान”; शिंदे गटाचे उत्तर
8
"जेव्हा कोणतंच काम नव्हतं तेव्हा..."; लोकप्रिय अभिनेत्याने केला ७ वर्षे खूप स्ट्रगल
9
Asia Cup 2025: जो मॅटर गाजला तोच पॅटर्न! IND vs PAK हायहोल्टेज सामन्यासंदर्भात मोठा निर्णय
10
त्र्यंबकेश्वर: पत्रकारांवर हल्ला करणाऱ्या गुंडांचा तातडीने बंदोबस्त करा; काँग्रेसची मागणी
11
अवघ्या युरोपच्या विमानतळांवर मोठा सायबर हल्ला; विमाने अडकली, प्रवाशांच्या गर्दीने एअरपोर्ट खचाखच भरले...
12
याला म्हणतात धमाका शेअर...! केवळ 2 वर्षांत दिला 900 टक्के परतावा, आजही करतोय मालामाल; तुमच्याकडे आहे का?
13
सचिन तेंडुलकरसोबत अफेअरची चर्चा, आता अनेक वर्षांनंतर शिल्पा शिरोडकर सोडलं मौन, म्हणाली...
14
'सर्वात मोठा शत्रू म्हणजे परावलंबन'; टॅरिफ वाद आणि H-1B व्हिसासंदर्भातील बदलानंतर, काय म्हणाले पंतप्रधान मोदी?
15
पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यासाठी कर्णधार सूर्याने टीम इंडियाला दिला असा सल्ला, म्हणाला फोन बंद करा आणि...  
16
Scuba Diving : १०, २० की ३० मीटर? पाण्यात नेमके किती खोलवर जातात स्कूबा डायव्हर्स?
17
Navratri 2025: नवरात्रीत का घ्यावा सात्त्विक आहार? त्यामुळे शरीराला कोणते लाभ होतात?
18
VIDEO: माकडाने अचानक महिलेच्या डोक्यावरून हिसकावला गॉगल.. पुढे जे झालं ते पाहून व्हाल थक्क
19
"मी पुन्हा सांगतो, भारताकडे एक कमकुवत पंतप्रधान", H-1B व्हिसा प्रकरणावरून राहुल गांधींचा हल्लाबोल
20
MSRTC: एसटी महामंडळात १७ हजारांहून अधिक पदांची भरती; चालक आणि सहाय्यक नेमणार, 'इतका' पगार!

पानगाव दहा खेडी पाणी याेजनेचा थकीत बिलापोटी वीजपुरवठा तोडला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2021 04:20 IST

रेणापूर तालुक्यातील पानगाव व परिसरातील नागरिकांना शुद्ध आणि मुबलक पाणीपुरवठा व्हावा. पाण्यासाठी भटकंती होऊ नये म्हणून शासनाने जीवन प्राधिकरणामार्फत ...

रेणापूर तालुक्यातील पानगाव व परिसरातील नागरिकांना शुद्ध आणि मुबलक पाणीपुरवठा व्हावा. पाण्यासाठी भटकंती होऊ नये म्हणून शासनाने जीवन प्राधिकरणामार्फत भंडारवाडी मध्यम प्रकल्पावरून पानगाव दहा खेडी योजना राबविली आहे. या योजनेअंतर्गत पाथरवाडी येथे जलशुद्धीकरण केंद्र उभारण्यात आले. या केंद्रावरून पानगावसह परिसरातील गावांना पाणीपुरवठा होऊ लागल्याने नागरिकांची होणारी भटकंती थांबली.

पानगाव हे रेणापूर तालुक्यातील मोठ्या बाजारपेठेचे गाव आहे. गावची लोकसंख्याही अधिक आहे. त्यामुळे गावची तहान या योजनेवर भागत असे. दरम्यान, या योजनेवर अवलंबून असलेल्या गावांनी नियमितपणे महावितरणकडे वीजबिलाचा भरणा केला नाही. त्यामुळे महावितरणने सातत्याने पानगाव, खरोळा, घनसरगाव, मुरढव, फावडेवाडी, नरवटवाडी, आदी ग्रामपंचायतीकडे थकीत वीज बिल भरण्याचे आवाहन करून सूचना केल्या. परंतु, त्याकडे ग्रामपंचायतींनी दुर्लक्ष केल्याने अखेर महावितरणने जलयोजनाचा पाणीपुरवठा तोडला आहे. त्यामुळे आठ दिवसांपासून या योजनेवर अवलंबून असलेल्या गावांवर जलसंकट ओढवले आहे. परिणामी, नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. त्यामुळे संताप व्यक्त करण्यात येत आहे.

३ लाखांचा भरणा करण्याचा निर्णय

महावितरणने १ कोटी ४२ लाखांच्या थकीत वीज बिलापोटी २० फेब्रुवारी रोजी वीजपुरवठा तोडला आहे. त्यामुळे नागरिकांची होणारी गैरसोय पाहून पाणीपुरवठा शिवार समितीची बैठक सरपंच सुकेश भंडारे यांनी घेऊन महावितरणच्या अधीक्षक अभियंत्यासोबत खंडित वीजपुरवठ्यासंदर्भात चर्चा केली. तेव्हा थकीत वीज बिल भरल्याशिवाय वीजपुरवठा सुरळीत केला जाणार नाही, असे सांगितले. त्यामुळे ग्रामपंचायतीने तीन लाख रुपयांचा भरणा करण्याचा निर्णय घेतला असल्याचे सरपंच सुकेश भंडारे, ग्रामविकास अधिकारी गोपिनाथ टकले यांनी सांगितले.

नागरिकांनी पाणीपट्टी भरणा करावा

महावितरणची १ कोटी ४२ लाख ४३ हजारांची थकीत बाकी आहे. वीजपुरवठा तोडल्याने गावातील नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. दोन दिवसांत काही रक्कम भरण्यात येणार आहे; परंतु, गावातील नागरिकांनी आपल्याकडे असलेली पाणीपट्टी भरावी, असे आवाहन सरपंच सुकेश भंडारे, ग्रामविकास अधिकारी गोपिनाथ टकले यांनी केले आहे.