शहरं
Join us  
Trending Stories
1
"काँग्रेसचे १५ खासदार विकले गेले, मुख्यमंत्री रेड्डींच्या आदेशामुळे भाजपच्या उमेदवाराला केले मतदान"; कोणत्या आमदाराने केला गौप्यस्फोट?
2
"नक्की कोण जिंकलं? आणि…’’, राज ठाकरेंचा व्यंगचित्रातून शाह पिता-पुत्रावर टीकेचा बाऊन्सर 
3
केवळ ₹१ विकली जाणार होती अपोलो टायर्स; आज आहे टीम इंडियाची ओळख, कोण आहेत मालक, किती आहे संपत्ती?
4
Janta Darshan: किडनी, हृदय रुग्णांना मोठा दिलासा; उपचाराचा खर्च उचलणार योगी सरकार!
5
शेअर बाजारात पुन्हा तेजी, सेन्सेक्स २०४ अंकांनी वधारला; Nifty २५,३०० च्या जवळ, 'हे' स्टॉक्स वधारले
6
नक्षलवादी संघटनांकडून केंद्र सरकारला शांततेचा प्रस्ताव; १ महिना सशस्त्र संघर्ष विरामाची मागणी
7
हेल्थ-लाईफ इन्शुरन्सवर सूट, ITC वर कठोर भूमिका; पाहा २२ सप्टेंबरपासून काय-काय बदलणार?
8
३१ जानेवारीपर्यंत निवडणुका पार पाडा; सर्वोच्च न्यायालयाचा आदेश, राज्य निवडणूक आयोगाला सुनावले खडेबोल
9
केवळ संशयामुळे लाेकांची झडती घेता येणार नाही, अपवादात्मक परिस्थितीत लेखी कारणे बंधनकारक : कोर्ट
10
सोशल मीडियावर ‘फोटो एडिट’ ॲपची धूम; सुरक्षित ठेवा तुमचे फोटो, फसवणूक वाढली
11
मुलाच्या वाढदिवसादिवशी पोहोचलं वडिलांचं शेवटचं गिफ्ट, कुटुंबीयांना झाले अश्रू अनावर
12
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मानले पंतप्रधान मोदींचे आभार!
13
"इथं काम करणं आता कठीण..."; रस्त्यांवरील खड्डे अन् वाहतूक कोंडीमुळे बंगळुरूतील कंपनी शिफ्ट होणार
14
Crime: "माझ्या बहिणीपासून दूर राहा", वारंवार समजावूनही मित्र ऐकत नव्हता; मग...
15
Today's Horoscope : शेअर्स बाजारात लाभ होईल, आर्थिक स्थिती सुधारेल; वाचा तुमचे आजचे राशीभविष्य काय?
16
मोदी हाच जगातील सर्वांत मोठा ब्रँड; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस : भाजप कार्यकर्त्यांचा ब्रँड निर्माण करून देणारा पक्ष
17
अभियांत्रिकीचे यंदा विक्रमी १ लाख ६६ हजार प्रवेश; कॉम्प्युटर, आयटी, एआयच्या ८८ टक्के जागा भरल्या
18
छगन भुजबळांना कोर्टाचा दणका, बेनामी मालमत्तेचा खटला पुन्हा चालविण्याचे आदेश
19
परशुराम महामंडळाच्या अध्यक्षांना दिला मंत्रिदर्जा; अजित पवार गटाचे आशिष दामले आहेत अध्यक्ष
20
विना‘आधार’ आडमुठेपणा...ती नामुष्की निवडणूक आयोगामुळे सरकारवर ओढवेल

अहमदपूर उपविभागातील ९२ गावात पाेलीस पाटील पद रिक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2021 04:19 IST

अहमदपूर आणि चाकूर तालुक्यात १४८ गावे असून, गावनिहाय १८४ पोलीस पाटलाची पदे मंजूर आहेत. त्यातील अमदपूर तालुक्यातील १२१ गावांसाठी ...

अहमदपूर आणि चाकूर तालुक्यात १४८ गावे असून, गावनिहाय १८४ पोलीस पाटलाची पदे मंजूर आहेत. त्यातील अमदपूर तालुक्यातील १२१ गावांसाठी ६० पोलीस पाटील सध्याला कार्यरत असून, ६१ जागा रिक्त आहेत. तर चाकूर तालुक्यातील ६३ पैकी ३२ गावात पोलीस पाटील कार्यरत आहेत. ३१ ठिकाणची पदे रिक्त आहेत. जवळपास ९२ गावामध्ये पोलीस पाटील यांची पदे रिक्त आहेत. २०१५ पासून सदर पदे भरण्यात आली नाहीत. परिणामी, गावात कायदा आणि सुव्यवस्थेबाबत अडचणी निर्माण हाेत आहेत. पोलीस पाटील गावचे प्रमुख असून, महसूल व पोलिस प्रशासनाला याेग्य माहिती देणारा दुवा समजला जाताे. त्यांच्यावर गावाची जबाबदारी असून, गावातील वाद मिटविण्याचे काम पाेलीस पाटील करतात. काेराेनाच्या काळात रुग्णांना काेविड केअर सेंटरमध्ये नेणे, आशा कार्यकर्तीला सहकार्य करणे आदी कामेही पाेलीस पाटलांनी केली आहेत. मात्र, अहमदपूर उपविभागातील मंजूर पदापैकी ९२ पदे अद्यापही भरण्यात आली नाहीत. यातून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण होत आहे. अनेक गावातील छोटे-मोठे तंटे थेट पोलिस ठाण्यात दाखल हाेत आहेत. शिवाय, महसूल विभागाकडेही दाखल हाेत असल्यामुळे डोकेदुखी वाढली आहे. प्रशासनाने रिक्त गावातील पदे भरावीत, अशी मागणी पोलिस पाटलांच्या वतीने करण्यात आली आहे. अहमदपूर तालुक्यातील मोठ्या गावातील शिरूर ताजबंद, शिवणखेड, वायगाव, रोकडा सावरगाव, काजळ हिप्परगा या गावासारखी अनेक गावे पोलीस पाटलांविनाच आहेत. तर चाकूर तालुक्यातील वडवळ नागनाथ, घरणी, मुळेगाव, नायगाव, चापोली आदी गावांतही पाेलीस पाटील नाहीत. पोलीस पाटील नसल्यामुळे दररोज तंटे वाढत आहेत.

पाेलीस पाटलांची भूमिका महत्वाची...

महसूल आणि पोलीस प्रशासनातील दुवा म्हणून पाेलीस पाटील यांची भूमिका महत्वाची आहे. गावातील छाेटे-छाेटे वाद, तंटे गावपातळीवर मिटविण्यासाठी पाेलीस पाटील पुढाकार घेतात. गावातील वाद आणि इतर माहिती पाेलीस पाटील प्रशासनाला देतात. गावात पोलील पाटीलच नसल्यामुळे अनेक गावात भांडण-तंटे वाढले आहेत. पाेलीस पाटील यांची रिक्त भरण्यात यावीत, अशी मागणी पोलीस पाटील संघटनेचे अध्यक्ष विनोद शिंदे यांनी यांनी केली.

शासन आदेशानुसार पदभरती...

अहमदपूर उपविभागात पोलीस पाटलांची जवळपास ९२ पदे अद्यापही रिक्त आहेत. मात्र, जवळच्या गावातील पाेलीस पाटलांना येथील गावांचा अतिरिक्त भार देण्यात आला आहे. परिणामी, कायदा आणि सुव्यवस्थेचा सध्यातरी प्रश्न नाही. भरतीचा अधिकार शासनाच्या निर्देशानुसारनुसार होणार असल्याचे अहमदपूर येथील उपविभागीय अधिकारी प्रभोदय मुळे यांनी सांगितले.