शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताने आमची शस्त्रास्त्रे, सैनिकी तळ उद्ध्वस्त केले, युद्धविरामानंतर शाहबाज शरीफ यांची कबुली
2
“भारताला युद्ध नको, पण...”; अजित डोवाल यांनी चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांना स्पष्टच सांगितले
3
पाकिस्तानकडून युद्धविरामाचं घोर उल्लंघन, भारताची संतप्त प्रतिक्रिया, दिला सक्त इशारा
4
मोहम्मद युनूस यांचा मोठा निर्णय; शेख हसीन यांच्या ‘अवामी लीग’वर आणली बंदी
5
Pakistan Ceasefire Violations : पाकिस्तानकडून जम्मूमध्ये गोळीबार, BSF जवान मोहम्मद इम्तियाज शहीद, सात जण जखमी
6
"पाकिस्तानी लोक 'ऑफिशियल भिकमंगे'..."; असदुद्दीन ओवेसींनी पाकड्यांची पार लक्तरं काढली!
7
Pakistan Violates Ceasefire: पाकिस्तानचं शेपूट वाकडंच!! चार तासांतच शस्त्रसंधीचे उल्लंघन; जम्मूमध्ये पुन्हा ड्रोन हल्ले, गोळीबार
8
"युद्धविरामाचं झालं काय? श्रीनगरमध्ये अनेक स्फोट’’, पाकिस्तानच्या आगळीकीनंतर ओमर अब्दुल्ला संतप्त 
9
India Pakistan Ceasefire: पाकिस्तानकडून ३.३५ वाजता फोन आला, अन्...; परराष्ट्र सचिवांनी सांगितलं नेमकं काय ठरलं! १२ तारीख महत्त्वाची
10
पाकिस्तानशी 'युद्धविराम' करण्याच्या निर्णयानंतर शरद पवार यांचे ट्विट, म्हणाले- "भारताने कधीच..."
11
सकाळपर्यंत डागली जात होती क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, अचानक संध्याकाळी युद्धविराम कसा झाला? मागच्या ४८ तासांत काय घडलं
12
पाकिस्तानसोबतच्या युद्धविरामावर असदुद्दीन ओवेसींनी उपस्थित केलं प्रश्नचिन्ह, सरकारला विचारले चार सवाल  
13
India Pakistan Ceasefire: युद्धविराम! देशासाठी सर्वात मोठी बातमी; भारत-पाकिस्तान संघर्षात सहमतीने तोडगा; दोन्हीकडून हल्ले बंद
14
"काँग्रेस पक्षाचा आणि देशाचा डीएनए एकच, काँग्रेस कधीही न संपणारा पक्ष’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास   
15
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा खरंच तुरुंगात मृत्यू झाला? जाणून घ्या काय आहे सत्य
16
पुढे धोका आहे! रात्री मोबाईलचा जास्त वापर करणं 'डेंजर'; शरीरातील 'हा' हार्मोन होतो कमी अन्...
17
India Pakistan Ceasefire: भारत-पाकिस्तान संघर्षात अखेर 'युद्धविराम', हल्ले पूर्ण थांबणार! सिंधू पाणी वाटप करारचं काय?
18
Operation Sindoor Live Updates: नागरोटा येथे लष्कराच्या तळावर गोळीबार, १ जवान जखमी
19
Vyomika Singh : कडक सॅल्यूट! "डॅडी, मम्मीला सांगू नका, ती मला जाऊ देणार नाही"; व्योमिका सिंह यांची संघर्षकथा
20
हृदयस्पर्शी! "पप्पा..."; ड्युटीवर जाणाऱ्या जवानाला लेकीने मारली मिठी, डोळे पाणावणारा Video

प्लाॅटच्या तुकडा बंदीमुळे बजेटमधील घर महागणार !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 04:44 IST

लोकमत न्यूज नेटवर्क लातूर : शासनाच्यावतीने अकृषिक जमिनीचे तुकडे पाडून खरेदी-विक्रीचा व्यवहार करण्यासाठी आता सक्षम अधिकाऱ्यांच्या परवानगीची आवश्यकता आहे. ...

लोकमत न्यूज नेटवर्क

लातूर : शासनाच्यावतीने अकृषिक जमिनीचे तुकडे पाडून खरेदी-विक्रीचा व्यवहार करण्यासाठी आता सक्षम अधिकाऱ्यांच्या परवानगीची आवश्यकता आहे. या संदर्भातील अधिनियमात सुधारणा करण्यात आल्या आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांच्या घराच्या स्वप्नावर परिणाम हाेणार आहे. आवाक्यात असलेल्या बजेटमधील घर महागणार आहे. यासाठी नव्या बदलांचा, अधिनियमातील सुधारणांचा फटका सामान्यांना बसणार आहे. यासाठी पूर्वीच्याच नियमानुसार प्लाॅटच्या खरेदी-विक्रीला परवानगी देण्याची गरज आहे, असे मत बांधकाम व्यवसायातील अनेकांनी व्यक्त केले आहे. तर हा निर्णय चांगला असल्याची प्रतिक्रियाही काहींनी व्यक्त केली आहे. ग्रामीण भागात २० गुंठ्यांच्या आतील रजिस्ट्री हाेत नाही. २० गुंठ्यांपर्यंतच्या जमिनीला बागायती जमीन म्हणून प्रमाणपत्र आवश्यक आहे. ज्यांना आता प्लाॅट खरेदी करायचा आहे, त्यांनी एन. ए. लेआऊटची पाहणी करणे गरजेचे आहे.

काय आहे नवा निर्णय...

अकृषिक जमिनीचे तुकडे पाडून खरेदी-विक्री करण्यासाठी आता सक्षम अधिकाऱ्याची परवानगी आवश्यक आहे. पूर्वी तुकडा पद्धतीने प्लाॅट, जमिनीचा खरेदी-विक्री व्यवहार हाेत हाेता. आता एखाद्याला जमिनीचे तुकडे करुन प्लाॅटची विक्री करायची असेल तर नव्या नियामानुसार एनए-लेआऊट करुन घेणे बंधनकारक आहे.

पूर्वीप्रमाणेच परवानगी हवी...

ग्रामीण भागात प्रत्येक जमीन एनए-लेआऊटनुसार खरेदी-विक्री करणे कठीण आहे. त्यासाठी सक्षम अधिकाऱ्याची परवानगी, नव्या अधिनियमानुसार सुधारणा करण्यात आलेल्या नियमांचे पालन करणे जाचक ठरणार आहे. यासाठी पूर्वीप्रमाणेच परवानगी हवी.

- विष्णू कांबळे, उदगीर

दीडपानी एनएनुसार अनेकांनी प्लाॅट खरेदी केली आहे. आता त्यांना त्या प्लाॅटला गुंठेवारी करावी लागणार आहे. यासाठी लागणारा खर्च संबंधित प्लाॅटमालकाला करावा लागणार आहे. यातून सामान्यांना फटका बसणार आहे. एखाद्याला प्लाॅट विक्री करायचा तर एनए-लेआऊटनुसारच विक्री करावा लागणार आहे. यासाठी नव्या सुधारणांचा फटका सहन करावा लागणार आहे. - अंगद पाटील किनीकर

काय हाेणार परिणाम...

ग्रामीण भागात पूर्वी तुकडा पद्धतीने प्लाॅट विक्री हाेत हाेती. आता यावर निर्बंध आले आहेत. शिवाय २० गुठ्यांच्या आतील जमिनीची रजिस्ट्री हाेणार नाही. त्यासाठी बागायती प्रमाणपत्र सादर करावे लागणार आहे. शिवाय एनए-लेआऊट महत्त्वाचे आहे.

माेठ्या जागेसाठी पैसा आणणार काेठून...

शासनाच्या नव्या अधिनियमानुसार सुधारणा करण्यात आलेल्या नियमामध्ये छाेट्या-छाेट्या जागेचे व्यवहार आता करणे अवघड आहे. प्रत्येक प्लाॅटच्या खरेदी-विक्रीसाठी आता एनए-लेआऊट आवश्यक आहे. यासाठी माेठ्या जागेसाठी पैसा आणणार काेठून, हा प्रश्न सामान्यांना सतावत आहे.

- अमन गायकवाड, लातूर

प्लाॅटिंगच्या क्षेत्रातील नव्या सुधारणांनुसार आता तुकडा पद्धतीवर निर्बंध आले आहेत. ग्रामीण भागातील प्लाॅटचे व्यवहार आता नियमानुसार, एनए-लेआऊटनुसार करावे लागणार आहे. विशेष म्हणजे, २० गुंठ्यांच्या आतील जमिनीचे खरेदी-विक्री व्यवहार हाेणार नाहीत. त्याचा सामान्यांना फटका बसणार आहे.

- दिगांबर बारसकर, लातूर