शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

शेंगदाणे, साखर, डाळींचे दर स्थिर; भाजीपाला बाजारात आवक वाढली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2021 04:13 IST

लातूर : इंधन दरवाढीची झळ सर्वसामान्यांना सहन करावी लागत आहे. त्यातच शेंगदाणे, साखर आणि डाळींचे दर स्थिर आहेत. ही ...

लातूर : इंधन दरवाढीची झळ सर्वसामान्यांना सहन करावी लागत आहे. त्यातच शेंगदाणे, साखर आणि डाळींचे दर स्थिर आहेत. ही दिलासादायक बाब असून, भाजीपाल्याची आवकही वाढली असल्याचे चित्र आहे.

बाजारपेठेत सध्या किराणा, भाजीपाला, फळांना मागणी वाढली आहे. शेंगदाणे १०० ते ११०, साखर ३५ ते ३६, रवा ३२ ते ३५, गोडतेल १२० ते १३०, तूरडाळ ११० ते १२०, मसूरडाळ १०० ते ११०, मूगडाळ ११५ ते १२०, चनाडाळ ६५ ते ७५, पोहे ३८ ते ४०, मैदा ३४ ते ३६, शाबुदाणा ५५ ते ६० तर खोबरे १८० रुपये प्रति किलो आहे.

भाजीपाला बाजारात हिरवी मिरची ४० ते ५०, मेथी १०, पालक १५, करडई १५, पत्ताकोबी १०, भेंडी ५०, वांगी २०, काकडी ३०, गवार ६०, कांदे ४० ते ६०, बटाटा २० ते ३०, तर टोमॅटो १० ते १५ रुपये प्रति किलो दराने विक्री होत आहेत. वातावरणातील बदलामुळे पिकांवर परिणाम होत असला तरी भाजीपाल्याची आवक वाढत आहे. त्यामुळे दरही स्थिर असल्याचे लातूर शहरातील चित्र आहे.

फळबाजारात सध्या सफरचंद १५० ते २००, संत्री ६० ते ८०, डाळिंब १८०, २००, पपई २० रुपये, खरबूज ३० रुपये किलो, मोसंबी १२० रुपये, अननस ८० रुपये, चिकू ४० ते ६०, स्वीट काॅर्न १० ते २० रुपये, टरबूज प्रति तीन किलो ६० रुपये, द्राक्ष ६० ते ८० रुपये किलो आहे. सध्या फळ बाजारात आवकही वाढल्याचे चित्र आहे.

पेट्रोल-डिझेलचे दर वाढल्याने वाहतूक खर्च वाढीव जात आहे. किराणा मालाच्या दरात अल्पशी वाढ झाली आहे. मागणीही वाढत आहे.

- महेश पाटील,

दुकानदार

फळ बाजारात सफरचंद, संत्री, मोसंबी, चिकू, केळी, अननस, द्राक्ष, टरबूज, खरबूज आदींची आवक आहे. दरात चढ-उतार असून, मागणी वाढत आहे.

- सलमान बागवान,

फळविक्रेता

शहरातील बाजारात भाजीपाल्याची आवक वाढली आहे. दरही स्थिर आहेत. कांद्याचे दर वाढले असले तरी बटाटा आणि टोमॅटो दर जैसे थे आहेत.

- सुधाकर शेंडगे,

भाजीपाला विक्रेता