व्यापारी काय म्हणतात...
सध्या पावसाळा सुरु आहे. शेतात जाणेही अवघड झाल्याने बाजारात भाजीपाल्याची आवक कमी झाली आहे. पितृपंधरवड्यामुळे भाजीपाल्याला मोठ्या प्रमाणात मागणी असते; मात्र आवक कमी असल्याने दरात वाढ केली जाते - भाजीविक्रेते
पावसामुळे फळभाज्या व भाजीपाल्यांचे नुकसान मोठ्या प्रमाणात झाले आहे. सध्या बाजारात स्थानिक शेतकऱ्यांकडून पालेभाज्या व फळभाज्या येत आहेत. त्याची आवक कमी आहे. त्यामुळे चार दिवसांपासून दर वाढले आहेत. आवक वाढल्यावर दर कमी होतील. भाजीविक्रेते
भाज्या बाजारातील दर घराजवळील दर
भोपळा ४० ५०
गवार ८० १००
कारली ४० ६०
टोमॅटो २० ३०
बटाटे २० ३०
फ्लॉवर ६० ८०
सिमला मिरची ५० ८०
काकडी ३० ४०
दोडका ६० ८०
मागणी वाढली...
सध्या पितृपक्ष असल्याने भाज्यांना मागणी वाढली आहे.
पावसामुळे शेतात जाण्यास अडचण असल्याने आवक घटली.
सिमला मिरची, गवार, फ्लॉवरला मिळतोय अधिकचा दर
अर्धा किलोसाठी बाजारात कोण जाणार...
सध्या पितृ पंधरवाडा सुरु आहे. त्यातच पाऊस असल्याने भाजीपाला खरेदीसाठी बाजारात जाणे शक्य नाही. त्यामुळे घरासमाेर येणाऱ्या गाडीतूनच भाजीपाला खरेदी केला जातो. दर वाढले आहेत. आवक वाढल्यावर कमी होतील. - शुभांगी साळुंके, गृहिणी
पितृपक्ष पंधरवडा सुरू असल्याने भाज्यांची जास्त गरज असते. पितृपक्षातील जेवणात भाज्यांना जास्त महत्त्व असते. भाज्या घेतल्याशिवाय पर्याय नसतो. महागाई वाढली आहे. पेट्रोल, डिझेल, घरगुती गॅस आणि आता भाजीपाल्याचे दरही वाढले आहेत. - राणी ढोले, गृहिणी