शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: नव्या वक्फ कायद्यातील दोन तरतुदींना सुप्रीम कोर्टाची स्थगिती; सरकारकडून मागितलं उत्तर
2
माझा आजचा दौरा जड अंतःकरणाने रद्द करावा लागतो आहे; कारण सांगत धनंजय मुंडेंनी दिली माहिती
3
२०३२ पर्यंत गुरुची अतिचारी गती: ९ राशींना गुरुबळ, पद-पैसा-प्रतिष्ठा वाढ; बक्कळ लाभ, भरभराट!
4
Brahmos Deal with Vietnam : 'ब्रह्मोस' भारताला आणखी मालामाल करणार, हा छोटासा देश चीनशी टक्कर घेणार; होणार 700 मिलियन डॉलरची डील!
5
"तुम मराठी लोग गंदा है...", घाटकोपरमध्ये पुन्हा मराठी-गुजराती वाद, मनसैनिकांनी काय केलं पाहा...
6
सोन्याच्या दरात मोठी तेजी, पोहोचलं १ लाखांच्या जवळ, किंमत कमी होण्याची शक्यता आहे का? पाहा नवे दर
7
लोणावळा रेल्वे रुळाजवळ सुटकेसमध्ये महिलेचा मृतदेह आढळला; परिसरात खळबळ!
8
IPL 2025: २५ दिवसांपूर्वी केलेली भविष्यवाणी आज काव्या मारनला हसवणार की रडवणार? प्रकरण काय
9
"एकनाथ शिंदेंच्या घरात शूटिंग केलं तेव्हा.."; क्षितीश दातेने सांगितला 'धर्मवीर'चा अनुभव
10
Vastu Tips: घराच्या उत्तर दिशेला ठेवा कुबेर महाराजांची तसबीर आणि 'या' पाच भाग्यदायी वस्तू!
11
"स्क्रीनवर चांगली दिसण्यासाठी ती...", श्रीदेवीच्या मृत्यूबाबतीत बोनी कपूर यांचा धक्कादायक खुलासा
12
Dia Mirza : "तो सीन करताना मी थरथरत होती, मला उलटी झाली"; दीया मिर्झाने सांगितला शुटिंगचा अनुभव
13
५ वर्षात १ लाख रुपयांचे झाले दीड कोटी! आता बोनस शेअर्स आणि लाभांशाची लागणार लॉटरी
14
भारतासमोर चीन गुडघ्यांवर, ड्रॅगन सर्व अटी मानण्यास तयार; नक्की काय आहे प्रकरण?
15
जून आणि ऑगस्टमध्ये रेपो दरात पुन्हा RBI कपात करणार का? लोन होऊ शकतात आणखी स्वस्त
16
लोकांच्या आरोग्याला गंभीर धोका अन् सीडीएससीओने ‘त्या’ ३५ औषधांवर घातली बंदी
17
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर शनी देणार 'या' पाच राशींना अक्षय्य धनलाभ आणि कीर्ती!
18
"...म्हणून जाती धर्माचे मुद्दे पुढे केले जात आहेत का?", जयंत पाटलांचा महायुती सरकारला सवाल
19
ट्रम्प टॅरिफ धोरणामुळे अमेरिकेची रिझर्व्ह बँकही चिंतेत; अध्यक्ष जेरोम पॉवेल यांनी व्यक्त केली मोठी भीती
20
कामाच्या वेळी पायावर पाय ठेवला तरी शिक्षा, मुंबईच्या तरुणाचा भयंकर अनुभव, 60 जणांची सुटका

परळी- मिरज रेल्वेचा हरंगुळ स्थानकावरील थांबा अद्यापही बंद, तीन ग्रामपंचायती सरसावल्या

By हरी मोकाशे | Updated: August 29, 2022 12:23 IST

प्रवाशांची गैरसोय होत असल्याने रेल्वे थांब्यासाठी तीन ग्रामपंचायतींचे ठराव

लातूर : लातूरनजीकच्या हरंगुळ बु. येथील रेल्वे स्थानकावर परळी- मिरज रेल्वे थांबत होती. त्यामुळे प्रवाशांसह वारकऱ्यांची सोय होत होती. परंतु, कोविडच्या कालावधीपासून येथील रेल्वे थांबा बंद करण्यात आला आहे. त्यामुळे परिसरातील पाच गावांतील प्रवाशांची गैरसोय होत आहे. दरम्यान, येथे पूर्ववत थांबा देण्यात यावा, असा ठराव तीन ग्रामपंचायतीने घेतला आहे.

लातूरनजीकच्या हरंगुळ बु. येथे रेल्व स्टेशन आहे. या ठिकाणी परळी- मिरज पॅसेंजर गाडीला थांबा होता. त्यामुळे हरंगुळ बु. सह पाखरसांगवी, खंडापूर, चिंचोलीराव, शामनगर, चिंचोलीराववाडी, साखरा आदी गावांतील प्रवाशांसह वारकऱ्यांची सोय होत होती. कमी दरात आणि जवळच्या ठिकाणाहून रेल्वे सेवा मिळत असल्याने समाधान व्यक्त होत होते. विशेष म्हणजे, या भागातील प्रवाशी संख्याही चांगली होती.

कोविडचा प्रादुर्भाव झाल्यानंतर परळी- मिरज रेल्वे गाडीचा थांबा बंद करण्यात आला आहे. त्यामुळे या भागातील प्रवाशांची गैरसोय होत आहे. येथील स्थानकात परळी- मिरज रेल्वेला जाताना आणि येताना थांबा देण्यात यावा, अशी मागणी करीत हरंगुळ बु., शामनगर आणि पाखरसांगवी ग्रामपंचायतीने ठराव घेतला आहे. हा ठराव आणि मागणीचे निवेदन मध्य रेल्वेचे विभागीय प्रबंधक शैलेश गुप्ता, खा. सुधाकर शृंगारे यांना देण्यात आले आहे. तसेच माजी पंचायत समिती सदस्य, भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनीही साकडे घातले आहे. यावेळी सरपंच सूर्यकांत सुडे, सरपंच सुरेखा बनसोडे, कोमल इर्लेवाड, माजी पंचायत समिती सदस्य अरविंद सुरकुटे, विठ्ठल शेंडगे, चंद्रकांत खटके, राजकुमार गुरमे, भगवान भालेराव, रेल्वे सल्लागार समितीचे सदस्य शामसुंदर मानधना आदी उपस्थित होते

टॅग्स :Railway Passengerरेल्वे प्रवासीlaturलातूरtourismपर्यटन