शहरं
Join us  
Trending Stories
1
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
2
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
3
'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ
4
West Indies Squad For India Test Series : दिग्गजाच्या पोराला संधी; माजी कर्णधाराचा पत्ता कट
5
लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक
6
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
7
दोन मुंबईकरांसोबत नेट प्रॅक्टिस करताना दिसला हिटमॅन रोहित शर्मा; फोटो व्हायरल
8
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
9
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...
10
म्युच्युअल फंड असावा तर असा...! ₹10000 ची SIP गुंतवणूक ₹1.79 कोटींवर पोहोचली, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
11
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
12
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
13
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय
14
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
15
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
16
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
17
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
18
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
19
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग
20
Nagpur Rains : अंदाज खरा ठरला ! मुसळधार पावसाने नागपूरकरांना झाेडपले; अजून किती दिवस असाच बरसणार?

परळी- मिरज रेल्वेचा हरंगुळ स्थानकावरील थांबा अद्यापही बंद, तीन ग्रामपंचायती सरसावल्या

By हरी मोकाशे | Updated: August 29, 2022 12:23 IST

प्रवाशांची गैरसोय होत असल्याने रेल्वे थांब्यासाठी तीन ग्रामपंचायतींचे ठराव

लातूर : लातूरनजीकच्या हरंगुळ बु. येथील रेल्वे स्थानकावर परळी- मिरज रेल्वे थांबत होती. त्यामुळे प्रवाशांसह वारकऱ्यांची सोय होत होती. परंतु, कोविडच्या कालावधीपासून येथील रेल्वे थांबा बंद करण्यात आला आहे. त्यामुळे परिसरातील पाच गावांतील प्रवाशांची गैरसोय होत आहे. दरम्यान, येथे पूर्ववत थांबा देण्यात यावा, असा ठराव तीन ग्रामपंचायतीने घेतला आहे.

लातूरनजीकच्या हरंगुळ बु. येथे रेल्व स्टेशन आहे. या ठिकाणी परळी- मिरज पॅसेंजर गाडीला थांबा होता. त्यामुळे हरंगुळ बु. सह पाखरसांगवी, खंडापूर, चिंचोलीराव, शामनगर, चिंचोलीराववाडी, साखरा आदी गावांतील प्रवाशांसह वारकऱ्यांची सोय होत होती. कमी दरात आणि जवळच्या ठिकाणाहून रेल्वे सेवा मिळत असल्याने समाधान व्यक्त होत होते. विशेष म्हणजे, या भागातील प्रवाशी संख्याही चांगली होती.

कोविडचा प्रादुर्भाव झाल्यानंतर परळी- मिरज रेल्वे गाडीचा थांबा बंद करण्यात आला आहे. त्यामुळे या भागातील प्रवाशांची गैरसोय होत आहे. येथील स्थानकात परळी- मिरज रेल्वेला जाताना आणि येताना थांबा देण्यात यावा, अशी मागणी करीत हरंगुळ बु., शामनगर आणि पाखरसांगवी ग्रामपंचायतीने ठराव घेतला आहे. हा ठराव आणि मागणीचे निवेदन मध्य रेल्वेचे विभागीय प्रबंधक शैलेश गुप्ता, खा. सुधाकर शृंगारे यांना देण्यात आले आहे. तसेच माजी पंचायत समिती सदस्य, भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनीही साकडे घातले आहे. यावेळी सरपंच सूर्यकांत सुडे, सरपंच सुरेखा बनसोडे, कोमल इर्लेवाड, माजी पंचायत समिती सदस्य अरविंद सुरकुटे, विठ्ठल शेंडगे, चंद्रकांत खटके, राजकुमार गुरमे, भगवान भालेराव, रेल्वे सल्लागार समितीचे सदस्य शामसुंदर मानधना आदी उपस्थित होते

टॅग्स :Railway Passengerरेल्वे प्रवासीlaturलातूरtourismपर्यटन