शहरं
Join us  
Trending Stories
1
यवत हिंसाचारात कोणाचं किती नुकसान, सध्याची परिस्थिती कशी? जाणून घ्या ताजी अपडेट्स!
2
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
3
IND vs ENG : सिराजसह प्रसिद्ध कृष्णानं मारला 'चौकार'! यजमान इंग्लंडचा पहिला डाव अल्प आघाडीसह संपला
4
ऐसे लोग *** होते है! महबूब मुजावर यांचं नाव घेताच अरविंद सांवत संतापले!
5
IND vs ENG : मियाँ मॅजिक! ओव्हलच्या मैदानात DSP सिराजनं साजरं केलं 'द्विशतक'
6
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
7
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
8
Video: रागावलेल्या सिंहीणपुढे सिंहाचीच झाली 'शेळी'... जंगलच्या राजाची अवस्था पाहून तुम्हालाही येईल हसू
9
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
10
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
11
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
12
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
13
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
14
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
15
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
16
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
17
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
18
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
19
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर
20
IND vs ENG : आता कसं वाटतंय...! डकेटचा वचपा काढल्यावर आकाशदीपनं त्याच्या खांद्यावर हात टाकला अन्... (VIDEO)

परळी- मिरज रेल्वेचा हरंगुळ स्थानकावरील थांबा अद्यापही बंद, तीन ग्रामपंचायती सरसावल्या

By हरी मोकाशे | Updated: August 29, 2022 12:23 IST

प्रवाशांची गैरसोय होत असल्याने रेल्वे थांब्यासाठी तीन ग्रामपंचायतींचे ठराव

लातूर : लातूरनजीकच्या हरंगुळ बु. येथील रेल्वे स्थानकावर परळी- मिरज रेल्वे थांबत होती. त्यामुळे प्रवाशांसह वारकऱ्यांची सोय होत होती. परंतु, कोविडच्या कालावधीपासून येथील रेल्वे थांबा बंद करण्यात आला आहे. त्यामुळे परिसरातील पाच गावांतील प्रवाशांची गैरसोय होत आहे. दरम्यान, येथे पूर्ववत थांबा देण्यात यावा, असा ठराव तीन ग्रामपंचायतीने घेतला आहे.

लातूरनजीकच्या हरंगुळ बु. येथे रेल्व स्टेशन आहे. या ठिकाणी परळी- मिरज पॅसेंजर गाडीला थांबा होता. त्यामुळे हरंगुळ बु. सह पाखरसांगवी, खंडापूर, चिंचोलीराव, शामनगर, चिंचोलीराववाडी, साखरा आदी गावांतील प्रवाशांसह वारकऱ्यांची सोय होत होती. कमी दरात आणि जवळच्या ठिकाणाहून रेल्वे सेवा मिळत असल्याने समाधान व्यक्त होत होते. विशेष म्हणजे, या भागातील प्रवाशी संख्याही चांगली होती.

कोविडचा प्रादुर्भाव झाल्यानंतर परळी- मिरज रेल्वे गाडीचा थांबा बंद करण्यात आला आहे. त्यामुळे या भागातील प्रवाशांची गैरसोय होत आहे. येथील स्थानकात परळी- मिरज रेल्वेला जाताना आणि येताना थांबा देण्यात यावा, अशी मागणी करीत हरंगुळ बु., शामनगर आणि पाखरसांगवी ग्रामपंचायतीने ठराव घेतला आहे. हा ठराव आणि मागणीचे निवेदन मध्य रेल्वेचे विभागीय प्रबंधक शैलेश गुप्ता, खा. सुधाकर शृंगारे यांना देण्यात आले आहे. तसेच माजी पंचायत समिती सदस्य, भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनीही साकडे घातले आहे. यावेळी सरपंच सूर्यकांत सुडे, सरपंच सुरेखा बनसोडे, कोमल इर्लेवाड, माजी पंचायत समिती सदस्य अरविंद सुरकुटे, विठ्ठल शेंडगे, चंद्रकांत खटके, राजकुमार गुरमे, भगवान भालेराव, रेल्वे सल्लागार समितीचे सदस्य शामसुंदर मानधना आदी उपस्थित होते

टॅग्स :Railway Passengerरेल्वे प्रवासीlaturलातूरtourismपर्यटन