शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

लातूरमध्ये पाणीपट्टी, घरपट्टी वसुलीचा विक्रम; ६० कोटी ४९ लाखांची वसुली

By हरी मोकाशे | Updated: April 9, 2023 15:11 IST

काय म्हणता, जिल्ह्यातील ३१ गावचे नागरिक करमुक्त!

हरी मोकाशे, लातूर : ग्रामीण भागातील पाणीपट्टी, घरपट्टी वसुली म्हणजे ग्रामपंचायतींपुढील कठीण अन् किचकट प्रश्न. मात्र, जिल्हा परिषदेच्या सीईओंच्या संकल्पनेतून राबविण्यात आलेल्या विशेष कर वसुली दिनामुळे ही समस्या निकाली निघाली आहे. मार्चअखेरपर्यंत ६२ कोटी ५६ लाख २४ हजारांपैकी ६० कोटी ४९ लाख ८८ हजारांची कर वसुली झाली आहे. विशेष म्हणजे, ३१ ग्रामपंचायतींतील नागरिकांनी शंभर टक्के कर भरणा केल्याने ही गावे मालामाल झाली असून गावकरीही करमुक्त झाले आहेत.

कुठल्याही ग्रामपंचायतींची घरपट्टी, नळपट्टी नियमित वसूल होत नसल्याने त्याचा गावच्या विकासावर परिणाम होतो. त्यामुळे मुलभूत सुविधाही पुरविणे ग्रामपंचायतीस कठीण होते. जिल्ह्यातील प्रत्येक ग्रामपंचायत आत्मनिर्भर व्हावी म्हणून जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल यांनी गेल्या वर्षीपासून दर महिन्यास विशेष कर वसुली मोहीम राबविण्यास सुरुवात केली.

सुरुवातीस जिल्ह्यातील ७८६ ग्रामपंचायतींतून अल्प प्रतिसाद मिळाला. मात्र, ग्रामपंचायतीचे स्वउत्पन्न वाढविल्याशिवाय गावात नवीन उपक्रम राबविणे शक्य नाही. शिवाय, शासनाच्या निधीवर अवलंबून राहिल्यास गावचा विकासही साधता येणार नाही, हे या विशेष मोहिमेच्या माध्यमातून पटवून देण्यात आले.

इतिहासात पहिल्यांदाच ९७ टक्के वसुली...

सन २०२२-२३ या वर्षात पाणीपट्टी व घरपट्टीपोटी एकूण ६२ कोटी ५६ लाख २४ हजार रुपयांची वसुली अपेक्षित होती. मार्चअखेरपर्यंत एकूण ६० कोटी ४९ लाख ८८ हजार रुपयांची वसुली झाली आहे. जिल्ह्याच्या इतिहासात प्रथमच एवढ्या मोठ्या प्रमाणात कर वसुली झाली आहे.

ग्रामपंचायत बरखास्तीची धास्ती...

७० टक्क्यांपेक्षा कमी कर वसुली झाल्यास ग्रामपंचायत बरखास्त करण्यात येईल, अशी सूचना प्रशासनाकडून करण्यात आली होती. त्यामुळे ग्रामसेवकांसह सरपंच, उपसरपंचांचा ताण वाढला होता. या पदाधिकाऱ्यांनी पुढाकार घेऊन वसुली केल्याने जिल्ह्यातील एकाही ग्रामपंचायतीची ७० टक्क्यांपेक्षा कमी वसूली झालेली नाही.

शंभर टक्के कर वसुलीची गावे...

लातूर : खाडगाव, सिकंदरपूर, वरवटी, बोरगाव. औसा : आपचुंदा, उटी बु., करजगाव, किल्लारी, खुंटेगाव, जवळगा पो., जायफळ, दावतपूर, फत्तेपूर, बेलकुंड, भादा, मंगरुळ, माळकोंडजी, लिंबाळा दा., वडजी, हिप्परगा क. अहमदपूर : केंद्रेवाडी, परचंडा, बोडका. रेणापूर : भंडारवाडी, खानापूर, नरवटवाडी, रामवाडी, तळणी. शिरुर अनंतपाळ : लक्कड जवळगा, तुरुकवाडी. देवणी : नागतीर्थवाडी.

लातूरचा राज्यभर लौकिक...

पहिल्यांदाच जवळपास ९८ टक्के कर वसुली झाली असून हा लातूर पॅटर्न राज्यभर होईल. कर वसुलीतून प्राधान्याने पथदिवे व पाणीपुरवठ्याचे वीजबिल भरणा करणे तसेच गावातील स्वच्छता आणि पाणीपुरवठाविषयक कामे करण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. - दत्तात्रय गिरी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, पंचायत.

गावकऱ्यांचे सहकार्य...

पायाभूत सुविधांसाठी कर भरणा आवश्यक असल्याचे गावकऱ्यांना सांगितले. गावकऱ्यांनीही स्वत:हून कर भरणा केला. त्यामुळे शंभर टक्के वसुली. या पैश्यातून गावात आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करण्यास मदत हाेणार आहे. - राज गुणाले, सरपंच, नागतीर्थवाडी.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

टॅग्स :laturलातूर