शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताला दिलासा! मित्र देश पाकिस्तानलाच चीननं दिला मोठा झटका; शहबाज शरीफांचं टेन्शन वाढले
2
ठाकरे बंधूंच्या मोर्चात राष्ट्रवादी अजित पवार गट सहभागी होणार का? सुनील तटकरेंचे सूचक विधान
3
पाकिस्तानात मोठा आत्मघातकी हल्ला; स्फोटात १३ जवान ठार तर २० हून अधिक गंभीर जखमी
4
₹५००० ची सामान्य एसआयपी की स्टेप अप SIP; कोणती पद्धत लवकर बनवू शकते श्रीमंत? पाहा नफ्याचं गणित
5
'लेडी सेहवाग'च्या 'कमबॅक'मध्ये सचिन तेंडुलकरचा हात! जाणून घ्या त्यामागची स्टोरी
6
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
7
रशियानं निभावली मैत्री! युक्रेन युद्धात मदत करणाऱ्या हुकुमशाह किमसाठी बनवला सुंदर सागरी किनारा
8
राज्यातील सर्वांत मोठे स्क्रॅपिंग सेंटर STच्या जागेवर उभारले जाणार; प्रताप सरनाईकांची माहिती
9
"भाषा धोरणात भाजपाचा दुटप्पीपणा उघड, गुजरातमध्ये पहिलीपासून हिंदीची सक्ती नाही तर महाराष्ट्रातच कशासाठी?’’ काँग्रेसचा सवाल   
10
प्रेमभंग झालेल्या युवतीनं १२ राज्यातील पोलिसांची झोप उडवली; समोर आली कहाणी, कोण आहे 'ती'?
11
Ashadhi Ekadashi 2025: वारकऱ्यांनी घेतली प्रेमानंद महाराजांची भेट, म्हणाले आमचा विठू तुमचा कृष्ण एकच!
12
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!
13
पाकिस्तानच्या प्रत्येक हालचालीची माहिती, ऑपरेशन सिंदूरमध्ये बजावली मोठी भूमिका; कोण आहेत 'रॉ'चे नवे बॉस पराग जैन?
14
सिंधुदुर्गातील घनदाट जंगलात सापडला मानवी सांगाडा, मृतदेह कुणाचा? तपासातून समोर आली धक्कादायक माहिती
15
Railway Job: रेल्वेत नोकरीची संधी, सहा हजारांहून अधिक पदं भरली जाणार, लगेच करा अर्ज!
16
Viral Video : याला म्हणाव तरी काय... बायकोसोबत भांडला अन् मेट्रोत लावली आग! व्हिडीओ होतोय व्हायरल
17
WTC Latest Points Table : टीम इंडियाला शह देणाऱ्या इंग्लंडला ऑस्ट्रेलियानं दिला धक्का; लंकेचाही डंका
18
पतीने 'ती' गोष्ट लपवली; पत्नीला कळताच सरळ पोलीस स्टेशनला गेली! तक्रार करत म्हणाली... 
19
कुख्यात दहशतवादी साकीब नाचनचा मृत्यू, तिहार तुरुंगात होता कैदेत, समोर आलं मृत्यूचं असं कारण
20
६००० कर्मचाऱ्यांना काढूनही 'या' कंपनीचं मन भरलं नाही, आता पुन्हा एकदा कपातीची टांगती तलवार

भिज पावसामुळे भाजीपाल्यावर रोगांचा प्रादुर्भाव; नासाडी वाढली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2021 04:24 IST

उदगीर : तालुक्यातील सर्व भागात सतत ५- ६ दिवस कमी- जास्त प्रमाणात पाऊस पडल्याने खरिपातील पिकांना लाभ झाला असला ...

उदगीर : तालुक्यातील सर्व भागात सतत ५- ६ दिवस कमी- जास्त प्रमाणात पाऊस पडल्याने खरिपातील पिकांना लाभ झाला असला तरी, भाजीपाला उत्पादकांना फटका बसला आहे. रिमझिम पावसामुळे भाजीपाल्यावर विविध रोगांचा प्रादुर्भाव झाला आहे. दरम्यान, बाजारपेठेत भाजीपाल्याला चांगली मागणी असली तरी, दर्जा खालावल्याने दरात घसरण झाली आहे. त्यामुळे भाजीपाला उत्पादक संकटात सापडले आहेत.

यंदा मृगाच्या प्रारंभी पाऊस पडल्याने खरिपाचा वेळेवर पेरा झाला. दरम्यान, यंदा सोयाबीनचा पेरा वाढला आहे. तालुक्यातील कुमठा, हेर, लिंबगाव, तोंडार, माळेवाडी आदी भागातील बहुतांश शेतकरी भाजीपाल्याचे उत्पादन घेतात. नेहमीप्रमाणे पावसाळ्याच्या तोंडावर या भागातील शेतक-यांनी पालेभाज्या व फळभाज्यांची मोठ्या प्रमाणात लागवड केली. परंतु, मागील सहा दिवसांपासून तालुक्यात सतत भिज पाऊस होत आहे. हा पाऊस पोषक ठरण्याऐवजी तोडणी करून विक्रीसाठी तयार असलेल्या भाजीपाल्यास मारक ठरत आहे.

हिरवी मिरची, कोथिंबीर, दोडका, वांगी, टोमॅटो, फ्लॉवर, पत्ता गोबी, शिमला मिरची यासारख्या भाजीपाल्यास या पावसाचा मोठ्या प्रमाणात फटका बसला आहे. भाजीपाला हा जास्त दिवस टिकत नाही. त्यामुळे भाजीपाल्याची काढणी केलेले शेतकरी तो त्याचदिवशी बाजारात विक्रीसाठी नेतात. त्यामुळे दर चांगला मिळतो. परंतु, सततच्या पावसामुळे भाजीपाल्याचा दर्जा घसरला आहे. बाजारपेठेत मागणी असूनही असा भाजीपाला ग्राहक खरेदी करीत नसल्याने फटका बसत आहे. दरम्यान, भाजीपाल्यावर विविध रोगांचा प्रादुर्भाव झाला आहे. त्यामुळे भाजीपाला उत्पादक शेतकरी विविध औषधांची फवारणी करीत असल्याचे पाहावयास मिळत आहे.

टोमॅटो टाकावे लागताहेत बांधावर...

सततच्या पावसामुळे तालुक्यातील बहुतांश भागातील टोमॅटो उत्पादकांना फटका बसला आहे. टोमॅटोवर रोगांचा प्रादुर्भाव झाल्याने दर्जा घसरला आहे. परिणामी, शेतकऱ्यांना टोमॅटो शेतातून काढून बांधावर टाकावे लागत आहेत. त्यामुळे टोमॅटो उत्पादक हतबल झाले असल्याचे पाहावयास मिळत आहे.

यंदा उत्पन्न चांगले होईल, या आशेने अडीच एकर शेतीत अडीच लाख रुपये खर्चून वांगी व टॉमेटोची लागवड केली होती. परंतु, सततच्या पावसामुळे रोगाचा प्रादुर्भाव झाला. त्यामुळे दर्जा घसरला. परिणामी, लागवडीचाच नव्हे, तर मजुरांचाही खर्च निघत नसल्याची खंत तालुक्यातील पिंपरी येथील शेतकरी बळवंत पटवारी यांनी व्यक्त केली.