शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
3
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
4
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
5
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
6
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
7
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
10
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
11
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
12
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
13
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
14
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
15
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
16
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
17
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
18
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
19
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
20
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
Daily Top 2Weekly Top 5

भिज पावसामुळे भाजीपाल्यावर रोगांचा प्रादुर्भाव; नासाडी वाढली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2021 04:24 IST

उदगीर : तालुक्यातील सर्व भागात सतत ५- ६ दिवस कमी- जास्त प्रमाणात पाऊस पडल्याने खरिपातील पिकांना लाभ झाला असला ...

उदगीर : तालुक्यातील सर्व भागात सतत ५- ६ दिवस कमी- जास्त प्रमाणात पाऊस पडल्याने खरिपातील पिकांना लाभ झाला असला तरी, भाजीपाला उत्पादकांना फटका बसला आहे. रिमझिम पावसामुळे भाजीपाल्यावर विविध रोगांचा प्रादुर्भाव झाला आहे. दरम्यान, बाजारपेठेत भाजीपाल्याला चांगली मागणी असली तरी, दर्जा खालावल्याने दरात घसरण झाली आहे. त्यामुळे भाजीपाला उत्पादक संकटात सापडले आहेत.

यंदा मृगाच्या प्रारंभी पाऊस पडल्याने खरिपाचा वेळेवर पेरा झाला. दरम्यान, यंदा सोयाबीनचा पेरा वाढला आहे. तालुक्यातील कुमठा, हेर, लिंबगाव, तोंडार, माळेवाडी आदी भागातील बहुतांश शेतकरी भाजीपाल्याचे उत्पादन घेतात. नेहमीप्रमाणे पावसाळ्याच्या तोंडावर या भागातील शेतक-यांनी पालेभाज्या व फळभाज्यांची मोठ्या प्रमाणात लागवड केली. परंतु, मागील सहा दिवसांपासून तालुक्यात सतत भिज पाऊस होत आहे. हा पाऊस पोषक ठरण्याऐवजी तोडणी करून विक्रीसाठी तयार असलेल्या भाजीपाल्यास मारक ठरत आहे.

हिरवी मिरची, कोथिंबीर, दोडका, वांगी, टोमॅटो, फ्लॉवर, पत्ता गोबी, शिमला मिरची यासारख्या भाजीपाल्यास या पावसाचा मोठ्या प्रमाणात फटका बसला आहे. भाजीपाला हा जास्त दिवस टिकत नाही. त्यामुळे भाजीपाल्याची काढणी केलेले शेतकरी तो त्याचदिवशी बाजारात विक्रीसाठी नेतात. त्यामुळे दर चांगला मिळतो. परंतु, सततच्या पावसामुळे भाजीपाल्याचा दर्जा घसरला आहे. बाजारपेठेत मागणी असूनही असा भाजीपाला ग्राहक खरेदी करीत नसल्याने फटका बसत आहे. दरम्यान, भाजीपाल्यावर विविध रोगांचा प्रादुर्भाव झाला आहे. त्यामुळे भाजीपाला उत्पादक शेतकरी विविध औषधांची फवारणी करीत असल्याचे पाहावयास मिळत आहे.

टोमॅटो टाकावे लागताहेत बांधावर...

सततच्या पावसामुळे तालुक्यातील बहुतांश भागातील टोमॅटो उत्पादकांना फटका बसला आहे. टोमॅटोवर रोगांचा प्रादुर्भाव झाल्याने दर्जा घसरला आहे. परिणामी, शेतकऱ्यांना टोमॅटो शेतातून काढून बांधावर टाकावे लागत आहेत. त्यामुळे टोमॅटो उत्पादक हतबल झाले असल्याचे पाहावयास मिळत आहे.

यंदा उत्पन्न चांगले होईल, या आशेने अडीच एकर शेतीत अडीच लाख रुपये खर्चून वांगी व टॉमेटोची लागवड केली होती. परंतु, सततच्या पावसामुळे रोगाचा प्रादुर्भाव झाला. त्यामुळे दर्जा घसरला. परिणामी, लागवडीचाच नव्हे, तर मजुरांचाही खर्च निघत नसल्याची खंत तालुक्यातील पिंपरी येथील शेतकरी बळवंत पटवारी यांनी व्यक्त केली.