शहरं
Join us  
Trending Stories
1
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
2
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार
3
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
4
मिनियापोलिस शहरातील शाळेवर हल्ला; तिघांचा मृत्यू, अनेक विद्यार्थी जखमी
5
कर्जाच्या ओझ्याखाली दबला पाकिस्तान; IMFच्या बेलआऊट पॅकेजनंतरही अर्धा देश उपाशी!
6
Vaishno Devi Landslide: ना सावरण्याची संधी मिळाली, ना पळण्याची... प्रत्यक्षदर्शींनी सांगितली आपबिती
7
गुगलवर चुकूनही सर्च करू नका 'या' गोष्टी, अन्यथा पोलीस पकडून घेऊन जातील!
8
'एआय'चा झटका! २२-२५ वयोगटातील तरुणांना नोकरी मिळेना, या नोकऱ्यांवर सर्वाधिक परिणाम
9
Vidarbha Rain: विदर्भातील चार जिल्ह्यांना पाऊस झोडपणार; हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा
10
जल्लोषपूर्ण वातावरणात श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पा विराजमान; जया किशोरी यांच्या हस्ते झाली प्राणप्रतिष्ठा!
11
विरारमध्ये दुर्घटना बचावकार्य युद्धपातळीवर सुरू, जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला बचावकार्याचा आढावा
12
Nikki Murder Case : निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण
13
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण
14
गंगेचा प्रवाह धोका? गंगोत्री ग्लेशियर १० टक्के वितळला, पाणी होतंय कमी; IIT इंदूरच्या संशोधनात काय? 
15
'आम्ही तिला मारलं नाही' निक्कीच्या सासरच्या लोकांचा दावा! पण पतीच्या एका कृतीने वाढला संशय
16
ऑनलाईन गेमिंगचे व्यसन जडले, तरुणाने घरातील दागिने चोरले अन् गेममध्ये उडवले 'इतके' पैसे!
17
भारतीय औषध कंपन्यांसमोर डोनाल्ड ट्रम्प झुकले! ५० टक्के टॅरिफमधून दिली सूट, नेमके कारण काय?
18
लव्ह मॅरेज, २ आलिशान शोरूम आणि ३६ पानी पत्र...; कोट्यवधीची संपत्ती तरीही उद्योगपतीचं कुटुंब संपलं कसं?
19
शेजाऱ्यांना खुश करण्यासाठी मार्क झुकेरबर्ग वाटतायेत 'हेडफोन'; का वैतागले आहेत शेजारी?
20
टाटानं केली नव्या 'एआय अँड सर्व्हिस ट्रांसफॉर्मेशन' युनिटची स्थापन, काय असणार काम? कुणाला मिळाली जबाबदारी? जाणून घ्या

भिज पावसामुळे भाजीपाल्यावर रोगांचा प्रादुर्भाव; नासाडी वाढली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2021 04:24 IST

उदगीर : तालुक्यातील सर्व भागात सतत ५- ६ दिवस कमी- जास्त प्रमाणात पाऊस पडल्याने खरिपातील पिकांना लाभ झाला असला ...

उदगीर : तालुक्यातील सर्व भागात सतत ५- ६ दिवस कमी- जास्त प्रमाणात पाऊस पडल्याने खरिपातील पिकांना लाभ झाला असला तरी, भाजीपाला उत्पादकांना फटका बसला आहे. रिमझिम पावसामुळे भाजीपाल्यावर विविध रोगांचा प्रादुर्भाव झाला आहे. दरम्यान, बाजारपेठेत भाजीपाल्याला चांगली मागणी असली तरी, दर्जा खालावल्याने दरात घसरण झाली आहे. त्यामुळे भाजीपाला उत्पादक संकटात सापडले आहेत.

यंदा मृगाच्या प्रारंभी पाऊस पडल्याने खरिपाचा वेळेवर पेरा झाला. दरम्यान, यंदा सोयाबीनचा पेरा वाढला आहे. तालुक्यातील कुमठा, हेर, लिंबगाव, तोंडार, माळेवाडी आदी भागातील बहुतांश शेतकरी भाजीपाल्याचे उत्पादन घेतात. नेहमीप्रमाणे पावसाळ्याच्या तोंडावर या भागातील शेतक-यांनी पालेभाज्या व फळभाज्यांची मोठ्या प्रमाणात लागवड केली. परंतु, मागील सहा दिवसांपासून तालुक्यात सतत भिज पाऊस होत आहे. हा पाऊस पोषक ठरण्याऐवजी तोडणी करून विक्रीसाठी तयार असलेल्या भाजीपाल्यास मारक ठरत आहे.

हिरवी मिरची, कोथिंबीर, दोडका, वांगी, टोमॅटो, फ्लॉवर, पत्ता गोबी, शिमला मिरची यासारख्या भाजीपाल्यास या पावसाचा मोठ्या प्रमाणात फटका बसला आहे. भाजीपाला हा जास्त दिवस टिकत नाही. त्यामुळे भाजीपाल्याची काढणी केलेले शेतकरी तो त्याचदिवशी बाजारात विक्रीसाठी नेतात. त्यामुळे दर चांगला मिळतो. परंतु, सततच्या पावसामुळे भाजीपाल्याचा दर्जा घसरला आहे. बाजारपेठेत मागणी असूनही असा भाजीपाला ग्राहक खरेदी करीत नसल्याने फटका बसत आहे. दरम्यान, भाजीपाल्यावर विविध रोगांचा प्रादुर्भाव झाला आहे. त्यामुळे भाजीपाला उत्पादक शेतकरी विविध औषधांची फवारणी करीत असल्याचे पाहावयास मिळत आहे.

टोमॅटो टाकावे लागताहेत बांधावर...

सततच्या पावसामुळे तालुक्यातील बहुतांश भागातील टोमॅटो उत्पादकांना फटका बसला आहे. टोमॅटोवर रोगांचा प्रादुर्भाव झाल्याने दर्जा घसरला आहे. परिणामी, शेतकऱ्यांना टोमॅटो शेतातून काढून बांधावर टाकावे लागत आहेत. त्यामुळे टोमॅटो उत्पादक हतबल झाले असल्याचे पाहावयास मिळत आहे.

यंदा उत्पन्न चांगले होईल, या आशेने अडीच एकर शेतीत अडीच लाख रुपये खर्चून वांगी व टॉमेटोची लागवड केली होती. परंतु, सततच्या पावसामुळे रोगाचा प्रादुर्भाव झाला. त्यामुळे दर्जा घसरला. परिणामी, लागवडीचाच नव्हे, तर मजुरांचाही खर्च निघत नसल्याची खंत तालुक्यातील पिंपरी येथील शेतकरी बळवंत पटवारी यांनी व्यक्त केली.