शहरं
Join us  
Trending Stories
1
लक्ष्मणरेषा ओलांडाल तर तुमचा विनाश अटळ, समूळ उच्चाटन करू; PM मोदींचा पुन्हा खणखणीत इशारा
2
आजचे राशीभविष्य १४ मे २०२५: आजचा दिवस आगळा - वेगळा अनुभव देणारा
3
काश्मीरचा बळकावलेला भूभाग पाकने परत करावा; भारताची आग्रही मागणी, कोणाची मध्यस्थी मान्य नाही
4
दहशतवादी मसूद अजहरच्या कुटुंबीयांना पाकिस्तान देणार १४ कोटी; विशेष 'शुहाद पॅकेज'ची घोषणा
5
डॉ. विजय दर्डा, आपला अमृतमहोत्सव शुभंकर असो...; PM नरेंद्र मोदी यांचा विशेष शुभेच्छा संदेश
6
राज ठाकरेंना उद्धव ठाकरेंपासून दूर ठेवण्याचे प्रयत्न? शिंदे गटाकडून हालचाली, चर्चांना उधाण
7
तयार होतेय 'शक्ती' चक्रीवादळ, देशभर तीन दिवस जोरदार पाऊस; पावसाची कधी आणि कुठे शक्यता?
8
लष्कराने दहशतवादी तळ नेमके शोधले तरी कसे? या शस्त्रांमुळे पाकला दयेची मागावी लागली भीक
9
ऑपरेशन सिंदूर: 'त्या' १२ दहशतवादी तळांवर कारवाईसाठी पाकवर दबाव; २१ तळांची होती भारताची यादी
10
काश्मिरात लष्कर-ए-तैयबाच्या म्होरक्यासह ३ दहशतवाद्यांचा खात्मा
11
निवृत्तीनंतर कोणतेही सरकारी पद घेणार नाहीत सरन्यायाधीश खन्ना; भूषण गवई आज पदभार स्वीकारणार
12
"कामगारच विकासाचे खरे शिल्पकार"; राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांचे प्रतिपादन
13
राज्याला रेल्वे फाटकमुक्त करणार: मुख्यमंत्री; नागपुरातील १० पुलांचेही लवकरच होणार उद्घाटन
14
उद्धवसेनेच्या माजी नगरसेविका तेजस्वी घोसाळकर भाजपच्या वाटेवर? ठाकरे गटाला जय महाराष्ट्र
15
दहावीतही मुलींचा 'स्ट्राइक रेट' जबरदस्त! सीबीएसईतही कन्या 'शक्ती'
16
साईभक्तांना देणगीनुसार विशेष प्राधान्य; श्री साईबाबा संस्थानचे सुधारित सुविधा धोरण
17
पश्चिम-मध्य रेल्वेच्या नव्या मार्गांच्या कामाला गती; २९.३२ हेक्टरवरची झाडे तोडण्यास परवानगी
18
“...तर लाखो लोक संघर्षाचे बळी ठरले असते”; डोनाल्ड ट्रम्प पुन्हा भारत-पाक युद्धविरामावर बोलले
19
“२४ तासांत देश सोडा”; भारताने केली पाकिस्तानी उच्चायुक्तालयातील अधिकाऱ्यावर कठोर कारवाई
20
शेख हसीना यांच्या पक्षावर बंदी; बांगलादेशच्या निर्णयावर भारताची नाराजी, स्पष्ट केली भूमिका

गॅसच्या किमती आवाक्याबाहेर, सामान्यांच्या अर्थकारण बिघडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2021 04:18 IST

गॅस सिलिंडरच्या सततच्या वाढत्या किमतींमुळे गॅसचा वापर केवळ चहा करण्यासाठीच केला जात आहे. ग्रामीण भागात या योजनेच्या माध्यमातून ...

गॅस सिलिंडरच्या सततच्या वाढत्या किमतींमुळे गॅसचा वापर केवळ चहा करण्यासाठीच केला जात आहे. ग्रामीण भागात या योजनेच्या माध्यमातून गॅस पोहोचविले, तरी महिला वाढत्या दराच्या भीतीने अद्यापही चुलीवरच स्वयंपाक करताना दिसून येत आहेत. गॅस सिलिंडरच्या वाढत्या महागाईमुळे खेड्यांमधून पुन्हा चुली पेटू लागल्या आहेत. दुकानांतून रॉकेल मिळत नसल्याने गृहिणी गोवऱ्या, सरपणाकडे वळल्या आहेत. धुरापासून मुक्तीसाठी केंद्र सरकारने उज्ज्वला योजना सुरू केली. शंभर रुपयांत जोडणी मिळत असल्याने, सुरुवातीच्या काळात योजनेला प्रतिसाद मिळाला. गॅस जोडणीनंतर मात्र सिलिंडरची मागणी हळूहळू कमी होत गेली. चुली धूर ओकू लागल्या आहेत. अनुदानित सिलिंडरच्या किमतीतील दरवाढ आवाक्याबाहेर गेल्याने आपली चूलच बरी... अशी भावना गरीब कुटुंबातील महिलांमधून व्यक्त हाेत आहे. ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर झाडांची कत्तल करून इंधनाचा वापर केला जातो. यामुळे वायुप्रदूषणाबरोबरच पर्यावरणाचाही ऱ्हास मोठ्या प्रमाणावर होत आहे. गरीब व सर्वसामान्य कुटुंबातील महिलांना चुलीवर स्वयंपाक करताना त्रास होताे. यामुळे डोळे, श्वसनाचा आजार होऊन आरोग्यावर परिणाम होतो. त्यामुळे सिलिंडरचे दर कमी करण्याची मागणी महिलावर्गातून केली जात आहे.

विशेष म्हणजे, उज्ज्वला योजनेतून ज्यांना गॅस मिळाला आहे. त्यांना शासन सवलत अनुदान देत नाही.

सिलिंडर अडगळीत, केरोसिनही बंद...

केंद्र शासनाकडून प्रधानमंत्री उज्ज्वला गॅस जोडणी योजनेंतर्गत मोफत गॅस जोडणी देण्यात आली. बहुतांश घरात गॅस जोडणी दिली. मात्र, त्यामुळे त्या कुटुंबाचा रेशनकार्डवरील रॉकेल पुरवठा बंद झाला आहे.

रॉकेल मिळेना, सिलिंडरचे भाव परवडेना, रॉकेल मिळेना, सिलिंडरचे भाव वाढले. परिणामी, सिलिंडर खरेदी करणे महागात पडत आहे. परिणामी, ग्रामीण भागातील अनेक सिलिंडर अडगळीत पडल्याचे दिसून येत आहे. भाव वाढल्याने सिलिंडर खरेदी करता येत नाही आणि रेशन कार्डवरील रॉकेलही मिळत नाही. परिणामी, ग्रामीण भागातील महिलांना दुहेरी संकटाला सामाेरे जावे लागत आहे.