शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानचे किती विमान पाडले? हा प्रश्न विरोधकांच्या मनात कधी आला नाही; राजनाथ सिंह कडाडले
2
ऑपरेशन सिंदूरदरम्यान नेमकं काय घडलं, किती दहशतवादी मारले गेले? राजनाथ सिंह यांनी लोकसभेत दिली माहिती, म्हणाले...
3
Operation Mahadev: सैन्याला मोठे यश! पहलगाम हल्ल्यातील दहशतवादी मुसा मारला गेल्याची शक्यता, तीन दहशतवादी ठार
4
IND vs ENG: टीम इंडियाला मोठा धक्का! ऋषभ पंत पाचव्या कसोटीतून बाहेर, CSKच्या खेळाडूला संघात स्थान
5
सातव्या वेतन आयोगांतर्गत पगारात लवकरच होणार अखेरची वाढ; कसा होणार १ कोटी कर्मचाऱ्यांना फायदा?
6
९० दीच्या लाटेवर स्वार व्हायला आली! कायनेटीकची DX ईव्ही लाँच झाली, पहा किंमत आणि रेंज...
7
Nitin Shete: शनि शिंगणापूर संस्थानचे उपकार्यकारी अधिकारी नितीन शेटे यांनी संपवलं आयुष्य
8
Mumbai : 'Mhada अधिकाऱ्याची महिन्याला ४०-५० लाख काळी कमाई'; पत्नी वैतागली आणि संपवलं आयुष्य
9
"अल्लाह हू अकबर, विमानात बॉम्ब, मी तो उडवून देईन", प्रवाशाच्या धमकीनंतर विमानाचे आपत्कालीन लँडिंग
10
कुठे गायब झाली 'तेरे नाम'मधील भिकारीची भूमिका करणारी अभिनेत्री? पूर्ण बदललाय तिचा लूक
11
'मौन व्रत, मौन व्रत...', संसदेत बोलणाऱ्या काँग्रेस खासदारांच्या यादीतून शशी थरुर यांना वगळले
12
घरात मोठ्या आवाजात गाणी लावून पत्नीच्या डोक्यात टाकली वीट; हत्येनंतर पतीनेही संपवले जीवन
13
मेहनतीचं चीज! आई करते मजुरी, जेवणासाठी नव्हते पैसे, कोचिंगशिवाय ३ बहिणी UGC NET पास
14
जबरदस्त नफ्याचे संकेत देतोय GNG Electronics IPO चा GMP; शेअर्स अलॉट झालेत का, कसं चेक कराल?
15
परदेशात डॉक्टरी शिकून थेट भारतात प्रॅक्टीस करण्याचा मार्ग सोपा होणार; एनएमसी आणतेय नवे नियम...
16
आजीबाई जोमात, नागोबा कोमात; 8 फूट लांब सापाला अलगद पकडले, पाहा Video
17
IND vs ENG: "शुबमन गिलने जर शतक केलं नसतं तर..."; प्रशिक्षक गौतम गंभीरने ठणकावून सांगितलं
18
'हिंजवडी' हातची गेली तर तोटा कोणाचा? पुण्याचा की महाराष्ट्राचा...; १५ वर्षांत किती बदलली...
19
Shravan Somvar 2025: महादेवाला केतकीची फुले वाहू नये; त्यामागे आहे एक पौराणिक कथा!
20
'बॉर्डर २'मध्ये वरुण धवनसोबत झळकणार 'ही' अभिनेत्री, मेकर्सने केली अधिकृत घोषणा

एमपीएससी परीक्षेला संधीचे बंधन; तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये नाराजीचा सूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2021 04:20 IST

महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाने यूपीएससीच्या धर्तीवर एमपीएससीच्या परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांना संधीचे बंधन घालून देण्यात आले ...

महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाने यूपीएससीच्या धर्तीवर एमपीएससीच्या परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांना संधीचे बंधन घालून देण्यात आले आहे. खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना ६ वेळेस परीक्षा देता येणार असून, इतर मागास प्रवर्गातील उमेदवारांना ९ वेळेस परीक्षा देता येणार आहे. अनुसूचित जाती -जमातीमधील उमेदवारांना कमाल मर्यादेचा नियम लागू राहणार नसल्याचे सांगण्यात आले आहे़ लातूर जिल्ह्यात स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या जास्त आहे़ या निर्णयामुळे काही विद्यार्थ्यांचा हिरमोड झाला असून, काहींनी तीव्र नाराजी तर काहींनी या निर्णयाचे स्वागत केले आहे़ आयोगाने नियमात बदल केला असला तरी परीक्षांचे अर्ज, वेळापत्रक याबाबत काटेकोर पालन करण्याची मागणी स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी केली आहे़

अशाप्रकारे होईल संधीची गणना

एखाद्याने एमपीएससीच्या पूर्व परीक्षेत भाग घेतल्यास ही संबंधित परीक्षेची संधी समजली जाईल. एखादा विद्यार्थी पूर्व परीक्षेच्या कोणत्याही एका पेपरसाठी उपस्थित राहिल्यास त्याची ती संधी समजली जाईल. परीक्षेच्या कोणत्याही टप्प्यावर परीक्षार्थी कोणत्याही कारणास्तव अपात्र ठरल्यास किंवा त्याचा प्रवेश रद्द झाल्यास ती परीक्षेची उपस्थिती समजली जाईल.

आयोगाच्या निर्णयाचे स्वागत...

केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या धर्तीवर राज्य लोकसेवा आयोगाने संधीचा निर्णय घेतला आहे़ या निर्णयाचे स्वागत आहे़ त्यामुळे आयोगाने पूर्व, मुख्य, मुलाखत, निकाल आदी बाबींच्या तारखा अगोदर जाहीर कराव्यात़ यामुळे विद्यार्थ्यांची गैरसोय दूर होईल़

-रामेश्वर सोडगीर, स्पर्धा परीक्षा परीक्षार्थी.

वेळेवर निकाल जाहीर करावा...

एमपीएससी परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या जास्त आहे़ परीक्षा झाल्यावर वेळेवर निकाल लागत नाही़ त्यामुळे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने परीक्षा घेतल्यानंतर वेळेवर निकाल जाहीर करावा़ या नवीन निर्णयाचे स्वागत असून, यामुळे विद्यार्थी अधिक जोमाने तयारी करतील़

-मेहरुन शेख, स्पर्धा परीक्षा परीक्षार्थी.

योग्य प्रमाणात जागा भराव्यात...

या निर्णयाचे स्वागत आहे़; मात्र आयोगाने यूपीएससीच्या धर्तीवर जास्त जागांवर भरती प्रक्रिया राबवावी़ अनेक वर्षांपासून विद्यार्थी तयारी करत आहेत़ मोजक्याच जागा असल्याने तयारी करणाऱ्यांचा हिरमोड होतो़ संधीबाबत निर्णय योग्य असला तरी इतर बाबींचा विचार व्हावा़

-सारिका जमादार, स्पर्धा परीक्षा परीक्षार्थी.

विद्यार्थी अभ्यासाला लागतील...

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने यूपीएससीच्या धर्तीवर घेतलेला निर्णय योग्य आहे़ परीक्षांचे वेळापत्रक अगोदर जाहीर करण्याची आवश्यकता आहे़ संधीच्या निर्णयामुळे विद्यार्थी जोमाने अभ्यास करतील़ परिणामी, शासकीय सेवेत लवकर निवड होईल़

-सरोजा शिंदे, स्पर्धा परीक्षा परीक्षार्थी.