शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध; कतारने क्षेपणास्त्रे हवेतच रोखली, जीवितहानी झाली नसल्याचा दावा
2
आखाती देशांत तणाव वाढण्याची चिन्हे, अनेक ठिकाणी एअरस्पेस बंद; एअर इंडिया, इंडिगोकडून सूचना जारी
3
इराणचा पलटवार...! कतारमधील अमेरिकेच्या सर्वात मोठ्या एअरबेसवर डागली 6 क्षेपणास्त्रे
4
IND vs ENG मालिके दरम्यान दु:खद बातमी! भारताच्या दिग्गज फिरकीपटूचं निधन; लंडनमध्ये घेतला अखेरचा श्वास
5
“त्रिभाषा सूत्रावर सर्व संबंधितांशी बोलूनच अंतिम निर्णय घेणार”; CM फडणवीसांनी केले स्पष्ट
6
ENG vs IND : फलंदाजांनी आपलं काम केलं! टीम इंडियानं हा मंत्र जपला तर विजय पक्का, पण...
7
“स्वसंरक्षणाचा इराणला पूर्ण अधिकार”; रशियाने स्पष्टच सांगितले, तणाव वाढण्याची चिन्हे
8
ठरले! महादेव बाबर NCPमध्ये करणार प्रवेश; DCM अजित पवार राहणार उपस्थित, पुण्यात ताकद वाढणार
9
कुर्ला-सायनदरम्यान ओव्हरहेड वायर तुटली; मध्य रेल्वेच्या जलद फेऱ्या ठप्प, प्रवाशांचे हाल
10
"...तेलाच्या किमती कमी ठेवा, मी बघतोय!" इराण-इस्रायल युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांचं मोठं विधान
11
ENG vs IND: KL राहुल-पंतच्या सेंच्युरीनंतर जड्डूची उपयुक्त खेळी! इंग्लंडसमोर ३७१ धावांचे टार्गेट
12
इस्रायलचा इराणवर मोठा हल्ला, ५० हून अधिक लढाऊ विमानांचा कहर; महत्त्वाच्या लष्करी तळांवर तुफान बॉम्बिंग
13
"२०२२ मध्ये केवळ वादळ होतं, २०२७ मध्ये....", पोटनिवडणुकीच्या निकालानं केजरीवाल खूश, केली मोठी भविष्यवाणी
14
खामेनेई पळून जाण्याच्या तयारीत! इराणच्या माजी युवराजांचा दावा, 'सुप्रीम लीडर'बद्दल काय म्हणाले?
15
२८ जुलैचा दावा खरा होणार? तिसरे महायुद्ध अटळ? बाबा वेंगा-नास्त्रेदमस यांची मोठी भविष्यवाणी
16
"तमीज से खेलने के चक्कर में..." कडक खेळी शिवाय पंतची 'मन की बात' चर्चेत (VIDEO)
17
राजाच्या पैशानेच बनली त्याच्या मृत्यूची योजना! लग्नाआधीच सुरू केलेलं नवं खातं, सोनमनं तेच पैसे वापरले अन्... 
18
रिषभ पंतला तोड नाय! सेंच्युरीसह रचला इतिहास; स्टेडियम स्टँडमधून गावसकरांचा 'कोलांटी उडी' मार असा इशारा
19
७६ लाख रहस्यमय मतांबाबतच्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी पूर्ण; प्रकाश आंबेडकरांनी मांडली बाजू
20
आषाढी वारीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ सहभागी होणार; दिवसभर दिंडीसोबत चालणार

उदगीरातील केवळ २५ टक्केच शेतकऱ्यांनी केली ई-पीक पाहणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2021 04:24 IST

उदगीर : राज्य सरकारने या वर्षी ई-पीक पाहणी ॲप सुरू केले असून, महसूल विभाग आणि कृषी विभागाच्या वतीने हा ...

उदगीर : राज्य सरकारने या वर्षी ई-पीक पाहणी ॲप सुरू केले असून, महसूल विभाग आणि कृषी विभागाच्या वतीने हा संयुक्त प्रकल्प राबवण्यात येत आहे. माझी शेती, माझा सातबारा, माझा पीकपेरा या आधारावर राज्य सरकारने सुरू केलेल्या पीक पाहणीला १५ ऑगस्टपासून सुरुवात झाली आहे. उदगीर तालुक्यातील ६२ हजार ३३४ शेतकऱ्यांपैकी केवळ १५ हजार ७३२ शेतकऱ्यांनी ई-पीक पाहणी ॲपला प्रतिसाद दिला आहे. गावात तलाठी, मंडळ अधिकारी व कृषी साहाय्यक यांच्यामार्फत ॲपचा वापर करावा, यासाठी जनजागृती केली जात आहे.

ई-पीक पाहणी ॲपद्वारे पीकपेरा नोंदवण्यास सुरुवात होऊन एक महिन्याचा कालावधी होऊन गेला असला तरी केवळ २५ टक्के शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे. शेतकऱ्यांमध्ये जागृती होण्यास लागणारा वेळ तसेच ऑनलाइन नोंदणीसाठी येणाऱ्या अडचणी पाहता सरकारने ३० सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ दिली आहे. सातबारा उताऱ्यावर ऑनलाइन पद्धतीने खरीप हंगामातील पिकाच्या नोंदणीला अवघे १५ दिवस शिल्लक राहिले आहेत. या राहिलेल्या काळात ७५ टक्के शेतकऱ्यांना नोंदणी करावी लागणार आहे. उदगीर तालुक्यातील उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, मंडळ अधिकारी, तलाठी या कामासाठी थेट बांधावर शेतकऱ्यांचे प्रबोधन करत आहेत. येत्या १५ दिवसांच्या आता या ॲपद्वारे नोंदी न झाल्यास शासनाकडून नैसर्गिक आपत्ती योजनेतून मिळणाऱ्या आर्थिक मदतीला शेतकरी बांधवांना मुकावे लागणार आहे. तालुक्यात ६२ हजार ३३४ शेतकरी खातेदार आहेत. एक महिना उलटला तरी शेतकऱ्यांकडून या ई-पीक पाहणी ॲपला पाहिजे तसा प्रतिसाद नसल्याचे चित्र आहे. एका महिन्यात केवळ १५ हजार ७३२ शेतकऱ्यांनी ई-पीक नोंदणी केली आहे. त्यामुळे आता राहिलेल्या १५ दिवसांत ४६ हजार ६०० शेतकऱ्यांकडून नोंदणी करण्यासाठी महसूल व कृषी विभागाला गावोगावी जात शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन या ई-पीक पाहणी ॲपची माहिती देत खरिपाची पीक नोंदणी करावी लागणार आहे.

डिजिटल प्रणाली शेतकऱ्यांच्या फायद्याची...

अतिवृष्टीमुळे तर कधी पाऊस न पडल्याने पिकांचे नुकसान होते आहे. अशा काळात शासनाला शेतकरी बांधवांना नुकसानभरपाई देताना अनेक अडचणी येतात. त्या वेळी पंचनामे करणे कठीण असते. पण या डिजिटल प्रणालीमुळे शेतकऱ्यांना मदत होणार आहे. तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांनी या ई-पीक पाहणी ॲपद्वारे नोंदणी मुदतीच्या आत करून घ्यावी.

- रामेश्वर गोरे, तहसीलदार

शेतकऱ्यांचा प्रतिसाद वाढविण्याची गरज...

ई-पीक पाहणी मोबाइल ॲपद्वारे करावी लागत आहे. त्यामुळे प्रशासनाच्या वतीने जनजागृती केली जात आहे. ३० सप्टेंबर नोंदणीची अंतिम मुदत आहे. ॲपमध्ये पिकांची माहिती नोंदविल्यास नैसर्गिक आपत्तीची मदत वितरित करण्यात सुलभता येणार आहे. मात्र, अनेक शेतकऱ्यांकडे ॲण्ड्राइड मोबाइलची सुविधा नसल्याने त्यांची गैरसोय होत आहे. यावर शासनाने तोडगा काढण्याची मागणी शेतकरी बांधवांमधून होत आहे.