शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

उदगीरातील केवळ २५ टक्केच शेतकऱ्यांनी केली ई-पीक पाहणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2021 04:24 IST

उदगीर : राज्य सरकारने या वर्षी ई-पीक पाहणी ॲप सुरू केले असून, महसूल विभाग आणि कृषी विभागाच्या वतीने हा ...

उदगीर : राज्य सरकारने या वर्षी ई-पीक पाहणी ॲप सुरू केले असून, महसूल विभाग आणि कृषी विभागाच्या वतीने हा संयुक्त प्रकल्प राबवण्यात येत आहे. माझी शेती, माझा सातबारा, माझा पीकपेरा या आधारावर राज्य सरकारने सुरू केलेल्या पीक पाहणीला १५ ऑगस्टपासून सुरुवात झाली आहे. उदगीर तालुक्यातील ६२ हजार ३३४ शेतकऱ्यांपैकी केवळ १५ हजार ७३२ शेतकऱ्यांनी ई-पीक पाहणी ॲपला प्रतिसाद दिला आहे. गावात तलाठी, मंडळ अधिकारी व कृषी साहाय्यक यांच्यामार्फत ॲपचा वापर करावा, यासाठी जनजागृती केली जात आहे.

ई-पीक पाहणी ॲपद्वारे पीकपेरा नोंदवण्यास सुरुवात होऊन एक महिन्याचा कालावधी होऊन गेला असला तरी केवळ २५ टक्के शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे. शेतकऱ्यांमध्ये जागृती होण्यास लागणारा वेळ तसेच ऑनलाइन नोंदणीसाठी येणाऱ्या अडचणी पाहता सरकारने ३० सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ दिली आहे. सातबारा उताऱ्यावर ऑनलाइन पद्धतीने खरीप हंगामातील पिकाच्या नोंदणीला अवघे १५ दिवस शिल्लक राहिले आहेत. या राहिलेल्या काळात ७५ टक्के शेतकऱ्यांना नोंदणी करावी लागणार आहे. उदगीर तालुक्यातील उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, मंडळ अधिकारी, तलाठी या कामासाठी थेट बांधावर शेतकऱ्यांचे प्रबोधन करत आहेत. येत्या १५ दिवसांच्या आता या ॲपद्वारे नोंदी न झाल्यास शासनाकडून नैसर्गिक आपत्ती योजनेतून मिळणाऱ्या आर्थिक मदतीला शेतकरी बांधवांना मुकावे लागणार आहे. तालुक्यात ६२ हजार ३३४ शेतकरी खातेदार आहेत. एक महिना उलटला तरी शेतकऱ्यांकडून या ई-पीक पाहणी ॲपला पाहिजे तसा प्रतिसाद नसल्याचे चित्र आहे. एका महिन्यात केवळ १५ हजार ७३२ शेतकऱ्यांनी ई-पीक नोंदणी केली आहे. त्यामुळे आता राहिलेल्या १५ दिवसांत ४६ हजार ६०० शेतकऱ्यांकडून नोंदणी करण्यासाठी महसूल व कृषी विभागाला गावोगावी जात शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन या ई-पीक पाहणी ॲपची माहिती देत खरिपाची पीक नोंदणी करावी लागणार आहे.

डिजिटल प्रणाली शेतकऱ्यांच्या फायद्याची...

अतिवृष्टीमुळे तर कधी पाऊस न पडल्याने पिकांचे नुकसान होते आहे. अशा काळात शासनाला शेतकरी बांधवांना नुकसानभरपाई देताना अनेक अडचणी येतात. त्या वेळी पंचनामे करणे कठीण असते. पण या डिजिटल प्रणालीमुळे शेतकऱ्यांना मदत होणार आहे. तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांनी या ई-पीक पाहणी ॲपद्वारे नोंदणी मुदतीच्या आत करून घ्यावी.

- रामेश्वर गोरे, तहसीलदार

शेतकऱ्यांचा प्रतिसाद वाढविण्याची गरज...

ई-पीक पाहणी मोबाइल ॲपद्वारे करावी लागत आहे. त्यामुळे प्रशासनाच्या वतीने जनजागृती केली जात आहे. ३० सप्टेंबर नोंदणीची अंतिम मुदत आहे. ॲपमध्ये पिकांची माहिती नोंदविल्यास नैसर्गिक आपत्तीची मदत वितरित करण्यात सुलभता येणार आहे. मात्र, अनेक शेतकऱ्यांकडे ॲण्ड्राइड मोबाइलची सुविधा नसल्याने त्यांची गैरसोय होत आहे. यावर शासनाने तोडगा काढण्याची मागणी शेतकरी बांधवांमधून होत आहे.