शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
2
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
3
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
4
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
5
वक्फ-दिलासा आणि खुलासा; कोर्टाने धार्मिक स्वातंत्र्यात ढवळाढवळ करण्याचा सरकारचा प्रयत्न हाणून पाडला
6
उपाशी लोक धनदांडग्यांना खुर्चीवरून खेचतात, तेव्हा..
7
‘जेएनपीए’त १२ कोटींचा पाकिस्तानी मुद्देमाल जप्त; मुंबई डीआरआयच्या पथकाची कारवाई, २८ कंटेनर जप्त; दोघांना अटक
8
‘डिएला’ म्हणते, मी पैसे खात नाही, कोणाला खाऊ देणार नाही!
9
राज कुंद्रांची ६० कोटींच्या फसवणूकप्रकरणी चौकशी; पुढील आठवड्यात पुन्हा हजर राहावे लागणार
10
अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल
11
...तर बिहारमधील मतदार पुनरावलोकन प्रक्रिया रद्द करू : सर्वोच्च न्यायालय
12
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
13
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
14
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
15
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
16
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
17
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
18
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
19
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
20
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक

माता मृत्यू रोखण्यासाठी आता 'सेव्ह मॉम' मोहीम, जिल्हा परिषदेचा आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित उपक्रम

By हरी मोकाशे | Updated: February 17, 2024 16:26 IST

मोहिमेअंतर्गत अतिजोखमीच्या गरोदर महिलांच्या कुटुंबियांच्या मोबाईलवर आपली आरोग्य सेवा उद्या असून ती घ्यावी, असा संदेश दिला जाणार आहे.

लातूर : रक्तक्षय, मधुमेह, उच्च रक्तदाब, कमी उंचीची माता, गंभीर आजार अशा कारणांमुळे गरोदर मातांच्या जीवास प्रसूतीदरम्यान मोठा धोका असतो. अनेकदा या समस्यांमुळे मातांचा मृत्यू होतो. तो रोखण्यासाठी जिल्हा परिषदेच्या वतीने आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करीत प्रयोगिक तत्त्वावर सेव्ह मॉम हा नवा उपक्रम सुरु करण्यात आला आहे. मोहिमेअंतर्गत अतिजोखमीच्या गरोदर महिलांच्या कुटुंबियांच्या मोबाईलवर आपली आरोग्य सेवा उद्या असून ती घ्यावी, असा संदेश दिला जाणार आहे.

माता व बालमृत्यू रोखण्यासाठी शासनाच्या वतीने विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. त्यास चांगले यश आले असले तरी ग्रामीण भागात माता मृत्यूचे प्रमाण काही प्रमाणात आहे. गरोदर महिलांपैकी १५ ते २० टक्के महिला ह्या अतिजोखमीच्या असतात. त्यांना नियमितपणे उपचार न मिळाल्यास गरोदर ते प्रसूतीपश्चात दरम्यानच्या कालावधीत काही महिलांच्या जीवास धोका होण्याची भीती अधिक असते. त्यामुळे अतिजोखमीच्या गरोदर महिलांना वेळेवर आरोग्य सेवा मिळावी म्हणून तामिळनाडूतील सेव्ह मॉम या संस्थेची मदत घेत हा उपक्रम सुरु करण्यात आला आहे.

सात प्रकारच्या ऑनलाईन नोंदीतामिळनाडूतील सेव्ह मॉम संस्था आणि राज्य शासनाच्या सहभागातून हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. याअंतर्गत गरोदर महिलांच्या सात प्रकारच्या नोंदी ऑनलाईनरित्या होणार आहेत. त्यात जोडप्याचे वयाेगट, गरोदर महिलेची वैद्यकीय माहिती, नोंदणी, वजन, उंची, रक्त, प्रसूतीची अपेक्षित तारीख, प्रसूती कोठे केली जाणार अशा प्रकारच्या आहेत.

आरोग्य कर्मचाऱ्यांची चारदा गृहभेटगरोदरपणाच्या कालावधीत आरोग्य कर्मचारी चारदा सदरील महिलेच्या घरी भेट देऊन ऑनलाईन नोंदी भरण्याबरोबर समुपदेशन करणार आहेत. या नोंदी जिल्हास्तरावर दिसणार आहेत. त्याआधारे सदरील मातेस पुढील तपासणी, उपचाराची आठवण करुन देणारा संदेश मोबाईलवर येणार आहे. तसेच अतिजोखमीच्या मातांना उपचारासाठी पाठपुरावा केला जाणार आहे.

चार आरोग्य केंद्रात सुरुहा उपक्रम प्रायोगिक तत्त्वावर राबविण्यात येत आहे. त्याअंतर्गत जिल्ह्यातील निलंगा तालुक्यातील कासार बालकुंदा, हलगरा तर उदगीर तालुक्यातील हेर आणि देवर्जन या चार प्राथमिक आरोग्य केंद्रांचा समावेश आहे.

आरोग्य यंत्रणाही सतर्कआरोग्य कर्मचाऱ्यांमार्फत गरोदर मातांची ऑनलाईन नोंदणी केली जाते. त्यातील एखाद्या मातेची आरोग्य तपासणी, साेनोग्राफी अशा तपासण्या राहिल्या असल्यास त्या करुन घेण्यासाठी ऑनलाईनरित्या मोबाईलवर संदेश येणार आहे. त्याचबरोबर सदरील मातेच्या सेवेबद्दल आरोग्य यंत्रणेलाही सतर्क करण्यात येणार आहे.

अधिकाधिक गरोदर महिलांना आरोग्य सेवामाता मृत्यू रोखण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन नवा उपक्रम सुरु करण्यात आला आहे. त्यामुळे कुठलीही गरोदर माता उपचारापासून दुरावली असेल तर त्याची नोंद होऊन त्या महिलेच्या कुटुंबियांच्या मोबाईलवर आरोग्यसेवेबद्दल संदेश जाणार आहे. त्यामुळे ती लवकरात लवकर उपचार घेईल.- अनमोल सागर, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद.

टॅग्स :laturलातूर