शहरं
Join us  
Trending Stories
1
बलुचिस्तान आता पाकिस्तानचा भाग नाही, बलूच नेत्यांनी केली स्वातंत्र्याची घोषणा, भारतासह जगाकडे मागितला पाठिंबा  
2
Devendra Fadnavis : "कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
3
सीसीटीव्ही लावा, कर्मचाऱ्यांची अल्कोहल टेस्ट करा आणि...; राज्य सरकारची शाळांसाठी नवी नियमावली
4
युद्धविराम झाला, पण घशाची कोरड कायम, पाकिस्तानने भारताला पत्र लिहून केली अशी विनंती
5
युद्धविरामाची घोषणा आधी ट्रम्प यांनी का केली? काँग्रेसचा पंतप्रधान मोदींना प्रश्न
6
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
7
चेहरा सुजला, आईच्या कुशीतच जीव सोडला; हेअर ट्रान्सप्लांटमुळे आणखी एका तरुणाचा मृत्यू
8
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
9
नायब सुभेदार ते लेफ्टनंट कर्नल! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा आर्मीसोबतचा खास प्रवास
10
रोहित- कोहली यांचा निवृत्तीचा निर्णय युवराज सिंहच्या वडिलांना खटकला, म्हणाले...
11
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
12
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
13
अर्ध्या किंमतीत करत होती हेअर ट्रान्सप्लांट, रुग्णाचा मृत्यू होताच डॉक्टर झाली फरार!
14
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत
15
कौतुकास्पद! दहावीच्या परीक्षेत ६५ वर्षीय आजी आणि नातू एकत्र झाले पास, मिळवलं घवघवीत यश
16
"अभिनेत्री केवळ शोभेच्या बाहुल्या...", दीपिका पादुकोणने मांडलं स्पष्ट मत; करिअरबद्दल म्हणाली...
17
"आमच्या २६ बहिणींचं कुंकू पुसलं ते दहशतवादी कुठे आहेत?"; काँग्रेस नेत्याचा भाजपावर निशाणा
18
"लक्ष्याने जगाचा निरोप घेण्यापूर्वी मला..."; ज्येष्ठ मराठी अभिनेत्याने सांगितला भावुक किस्सा
19
Solapur Accident: वडिलांचा अंत्यविधी उरकून परतताना लेकालाही मृत्यूनं गाठलं, सोलापुरातील घटना!
20
भारताचे २ वेगवेगळे संघ निवडले जाणार; इंग्लंड दौऱ्यापूर्वी सिलेक्टर्सचा मोठा निर्णय, पण का?

कारखान्यावर आरोप करणाऱ्यांनाच १३ कोटींच्या वसुलीची नोटीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2021 04:14 IST

येथील राष्ट्रवादी पक्ष कार्यालयात बोलताना आमदार बाबासाहेब पाटील म्हणाले, विरोधकांचे आरोप वास्तवाला धरून नाहीत. कुठलाही पुरावा नाही. अवसायनात निघालेल्या ...

येथील राष्ट्रवादी पक्ष कार्यालयात बोलताना आमदार बाबासाहेब पाटील म्हणाले, विरोधकांचे आरोप वास्तवाला धरून नाहीत. कुठलाही पुरावा नाही. अवसायनात निघालेल्या कारखान्याची १० वर्षांत प्रगती केली. २५० मेट्रिक टन क्षमतेच्या कारखान्यात सध्या ४ हजार मेट्रिक टन उसाचे गाळप केले जाते. पाच लाख ७५ हजार क्विंटल साखर उत्पादित होते. ७०० पेक्षा अधिक कर्मचारी काम करीत आहेत. कारखाना दररोज ३० हजार लिटर स्पिरीट अल्कोहोल तत्सम पदार्थाचे उत्पादन करीत आहे. त्यामुळे कारखान्याच्या उत्पन्नात भर पडली आहे. तसेच शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती सुधारली आहे.

२०११ मध्ये केवळ एक लाख मेट्रिक टन उत्पन्न होणाऱ्या तालुक्यात आज ८ लाख मेट्रिक टन उसाचे उत्पादन घेतले जाते. त्यासाठी आवश्यक सिंचन व्यवस्था माजी मंत्री बाळासाहेब जाधव यांच्या प्रयत्नातून झाली आहे. ज्यांना कारखाना चालविण्यास दिला होता, त्यांनी मुंबई जिल्हा मध्यवर्ती बँकेचे १३ कोटी ४१ लाख ३१ हजारांचे कर्ज काढून ठेवले. त्याच्या वसुलीची नोटीस संबंधितांना मिळाली आहे. चांगल्या कारखान्याला बदनाम करण्याचे षड्यंत्र विरोधकांनी चालविले आहे, असेही आ. बाबासाहेब पाटील म्हणाले.

यावेळी सिद्धी शुगरचे व्यवस्थापक प्रफुल्लचंद्र होनराव, बाजार समितीचे सभापती शिवानंद हेंगणे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष शिवाजीराव देशमुख, जिल्हा परिषद सदस्य मंचकराव पाटील, माधव जाधव, प्रशांत देवकते, नगरसेवक फुजैल जागीरदार, अभय मिरकले, मुन्ना सय्यद, सरवरलाल सय्यद, राष्ट्रवादीचे जिल्हा कार्याध्यक्ष प्रशांत भोसले, दयानंद पाटील, अझर बागवान, गोपीनाथ जायेभाये, शेतकरी अनिल बेंबडे, ईश्वर कारनाळे, गणेश जाधव उपस्थित होते.

जुन्या बालाघाटचे संचालक जबाबदार...

बालाघाट कारखान्याने १० वर्षांत केवळ ५ लाख मे. टन उसाचे गाळप केले. बारदाणा ज्यादा दराने घेतला. ऊसतोड करार केले नाहीत. त्यास तत्कालीन संचालक जबाबदार होते. त्यामुळे कारखाना दिवाळखोरीत निघाला, असा आरोपही आ. बाबासाहेब पाटील यांनी केला.

ईडीला घाबरत नाही...

कारखान्यात कुठलीही अनियमितता नाही. असेल तर इतकी वर्षे विरोधक गप्प का राहिले, त्याचे उत्तर त्यांनीच द्यावे. विनाकारण ईडी चौकशीच्या धमक्या देऊ नये. आपण घाबरत नाही, असेही आ. पाटील यांनी सांगितले.