शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन राज्यांचे पोलीस होते मागावर, अखेर असे मारले गेले दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणारे हल्लेखोर
2
पाकिस्तानवर कुणी हल्ला केल्यास तर 'हा' इस्लामिक देश थेट युद्धात उतरणार; काय आहे 'डिफेन्स डील'?
3
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
4
आजचे राशीभविष्य- १८ सप्टेंबर २०२५: नोकरी- व्यवसायात अडचणी येतील; अनपेक्षित घटना घडण्याची शक्यता
5
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
6
लोकशाहीचा पाचोळा होऊ नये !... तर लोकशाही केवळ नावापुरती उरेल
7
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
8
नोकरीच्या नावाखाली बनवले ‘गुलाम’, थायलंडमध्ये नोकरीचे आमिष दाखवून केली फसवणूक
9
उपराष्ट्रपतींची निवडणूक : ‘कोऱ्या’ मतपत्रिकांचे रहस्य!
10
एअर इंडिया अपघाताची सरकारने चौकशी करावी; माझ्या मुलावर बट्टा नको, सुमितच्या वडिलांची मागणी
11
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
12
देशातील दोनच राज्यांत त्रिभाषा सूत्र, हिंदी सक्तीवरून वाद; नरेंद्र जाधव समितीची पहिली बैठक संपन्न; जनमत जाणून देणार अहवाल
13
विरार-डहाणू रोडदरम्यान सात स्टेशन; चौपदरीकरणामुळे गर्दी टाळण्यास मदत
14
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
15
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
16
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
17
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
18
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
19
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
20
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!

लातूरात ग्रामसेवकांचे असहकार आंदोलन; जिल्हा प्रशासनास माहिती देणे थांबविले

By हरी मोकाशे | Updated: February 5, 2024 17:08 IST

प्रलंबित मागण्या मान्य न झाल्यास १५ फेब्रुवारी रोजी जिल्ह्यातील प्रत्येक पंचायत समितीसमोर धरणे आंदोलन करण्यात येणार

लातूर : आश्वासित प्रगती योजना १०,२०,३० मंजुरी आदेश काढावेत, कंत्राटी ग्रामसेवकांना नियमित करण्यात यावे, यासह अन्य मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियनच्या जिल्हा शाखेच्या वतीने असहकार आंदोलन सुरु केले आहे. त्यामुळे गावपातळीवरील नोंदींची माहिती जिल्हा परिषदेस देणे थांबले आहे.

महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियनचे जिल्हाध्यक्ष अनंत सूर्यवंशी यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन सुरु आहे. आंतर जिल्हा बदलीने बदलून आलेल्या ग्रामसेवकांना आगाऊ वेतनवाढ देण्यात यावी, सन २०१९- २० ते २०२२- २३ या कालावधीतील आदर्श ग्रामसेवक पुरस्कार जाहीर करुन वितरित करण्यात यावेत, सन २०१६- १७ चा आदर्श ग्रामसेवक पुरस्काराची वेतनवाढ इतर जिल्हा परिषदांप्रमाणे देण्यात यावी, प्रलंबित वैद्यकीय बिले देण्यात यावेत, प्रशासकीय बदली झालेल्या ग्रामसेवकांना प्रवासभत्ता देण्यात यावा, ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी संवर्गावर असलेली अतिरिक्त कामे कमी करावीत, अशा मागण्यांसाठी हे असहकार आंदोलन सुरु करण्यात आले आहे. हे आंदोलन १ फेब्रुवारीपासून सुरु झाले आहे, असे संघटनेेचे जिल्हा सरचिटणीस श्याम मुस्के यांनी सांगितले.

जिल्हा परिषदेसमोर धरणे...प्रलंबित मागण्या मान्य न झाल्यास १५ फेब्रुवारी रोजी जिल्ह्यातील प्रत्येक पंचायत समितीसमोर धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. त्यानंतर १६ फेब्रुवारी रोजी जिल्हा परिषदेसमोर धरणे आंदोलन केले जाणार असल्याचे संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनंत सूर्यवंशी यांनी सांगितले.

टॅग्स :laturलातूरgram panchayatग्राम पंचायत