शहरं
Join us  
Trending Stories
1
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
2
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
3
मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
4
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
5
तुफान राडा! असं काय झालं की सुरक्षा रक्षकांनी ५० लाखांची मर्सिडीज फोडली; व्हायरल व्हिडीओतील घटना काय?
6
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
7
"वडिलांप्रमाणेच मलाही पुरस्कार आवडतात...", सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा अवॉर्ड मिळाल्यानंतर आर्यन खानची प्रतिक्रिया
8
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
9
"पहिल्यांदाच लेकाला सोडून शहराबाहेर आलोय..." विकी कौशलची भावुक प्रतिक्रिया
10
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
11
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
12
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
13
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
14
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
15
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
16
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
17
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
18
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
19
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
20
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
Daily Top 2Weekly Top 5

पाच वर्षांपासून अल्पसंख्याक कल्याण समितीची ना पुनर्रचना ना बैठक; प्रशासनाची उदासीनता

By आशपाक पठाण | Updated: December 17, 2023 22:15 IST

१५ कलमी कार्यक्रमावर प्रभावी अंमलबजावणी हवी

आशपाक पठाण, लातूर : अल्पसंख्याक समाजाच्या सामाजिक, आर्थिक व शैक्षणिक उन्नतीसाठी तसेच त्यांच्यासाठी असलेल्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी व्हावी, यासाठी जिल्हास्तरावर जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली अल्पसंख्याक कल्याण समिती २०१७ पासून रखडली आहे. समितीच गठित नसल्याने योजनांचा आढावा घेण्यासाठी बैठकही होत नाही. प्रशासनाच्या उदासीन धोरणामुळे राज्यात शासन आदेशाची अंमलबजावणी होत नसल्याची ओरड वाढली आहे.

शासन निर्णय १५ एप्रिल २०१७ नुसार जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा अल्पसंख्याक कल्याण समितीची पुनर्रचना करून समितीत खासदार, आमदार यांचा समावेश करण्यात आला आहे. या समितीची दर तीन महिन्याला बैठक घेऊन अल्पसंख्याक योजनांच्या अंमलबजावणीचा आढावा घेण्याचे आदेश आहेत; मात्र राज्यभरात शासन आदेशावर अंमलबजावणीच झाली नाही. त्यामुळे जवळपास पाच वर्षांपासून योजनांचा आढावा घेण्यात आला नाही, असा आरोप मुव्हमेंट फॉर पीस ॲन्ड जस्टीसचे सचिव रजा खान यांनी केला आहे. दरवर्षी १८ डिसेंबर हा दिवस अल्पसंख्याक हक्क दिन म्हणून साजरा केला जातो; मात्र हा दिवस हक्काचा नसून थट्टा करण्यासाठी साजरा केला जात असल्याचे मुस्लीम आरक्षण चळवळीचे नेते मोहसीन खान यांनी सांगितले.

शासन आदेशाचे तरी पालन करा...

राज्यात अल्पसंख्याक योजनांवर व १५ कलमी कार्यक्रमावर परिणामकारक अंमलबजावणी करावी. जिल्हास्तरावर कल्याण समितीचे गठण करून अशासकीय सदस्य नियुक्त करावेत. नियमित बैठका घ्यायला हव्यात. तसेच प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी मुला-मुलींसाठी शासकीय वसतिगृह उभारण्यात यावे, राज्यात अल्पसंख्याक आयुक्तालयाची स्थापना करावी, शासन धोरणाच्या विरुद्ध अल्पसंख्याक योजनांवर अंमलबजावणी न करणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांवर दप्तर दिरंगाई कायदा व लोकसेवा अधिनियम अन्वये कार्यवाही करावी, अशी मागणी सामाजिक संस्था, संघटनांनी केली आहे.

मौलाना आझाद महामंडळाला हवा निधी...

अल्पसंख्याक समाजाच्या आर्थिक उन्नतीसाठी स्थापन करण्यात आलेल्या मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळाची अवस्था दयनीय झाली आहे. अनेक ठिकाणी कार्यालयांना जागाही नाही. शिवाय, उद्योग, व्यवसायासाठी देण्यात येणारे कर्ज प्रस्ताव ठराविक वेळेतच घेतले जातात. त्यातही अनेकांचे प्रस्ताव प्रलंबित आहेत. महामंडळाला निधी वाढवून देण्याची गरज आहे.

स्वायत्त संस्था स्थापन करावी...

समाजाच्या शैक्षणिक उन्नतीसाठी बार्टी, सारथी, महाज्योती सारख्या स्वायत्त संस्था स्थापन करण्यात आल्या आहेत. याच धरतीवर मुस्लीम समाजाची शैक्षणिक प्रगती व त्यांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था अशी स्वायत्त संस्थेची स्थापना करण्याची मागणी आहे.

लातुरात मुलांचे वसतिगृह प्रलंबित...

लातूर शहरात अल्पसंख्याक मुलांचे वसतिगृह उभारणीसाठी चार वर्षांपूर्वी मनपाने खोरी गल्लीतील मनपाची शाळा क्र. ६ ची जागा उपलब्ध करून दिली. प्रशासकीय मान्यतेसाठी प्रस्ताव मंजुरीसाठी मंत्रालयात प्रलंबित आहे. शासनाने निधी दिला, त्यावेळी जागा मिळाली नाही. आता ४ वर्षांपूर्वी मनपाने जागा दिली आता शासन प्रशासकीय मान्यता कधी देणार याकडे लक्ष लागले आहे.

टॅग्स :laturलातूर