शहरं
Join us  
Trending Stories
1
जग पाहण्याआधीच बाळाचा जीव गेला, आईनं गमावलं लेकरू; महाराष्ट्रात आरोग्य सेवेचे धिंडवडे निघाले
2
मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
3
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
4
४० तोळं सोने अन् २० लाख खर्च करून लग्न लावलं; २ वर्षात पोरीनं स्वत:ला कायमचं संपवलं
5
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
6
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
7
Asia Cup 2025 : गिल वर्षभरानंतर संघात आला अन् उप-कर्णधार झाला! सूर्यकुमार यादवनं सांगितली आतली गोष्ट
8
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
9
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली
10
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
11
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)
12
सेंच्युरीसह मुंबईकर पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दुसऱ्या बाजूला पुणेकर ऋतुराजनं घातला घोळ, अन्...
13
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
14
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
15
Mumbai Rain Mithi River: दोरी फेकली, पण अंदाज चुकला; मिठी नदीच्या पुरात तरुण गेला वाहून
16
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
17
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
18
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका
19
याला म्हणतात शेअर...! 24 तासांत 1 लाखाचे केले 88 लाख, एवढी तेजी आली की ट्रेडिगच थांबवावी लागली! नेमकं काय घडलं?
20
जिओने खिसा कापला...! १ जीबी, २८ दिवसांचा प्लॅन बंद केला; आता २९९ रुपये मोजावे लागणार

ना कुणाची मदत, ना जगण्याचे साधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2021 04:18 IST

शहराच्या व बनशेळकी गावच्या सीमेवर असलेल्या गोपाळ नगर भागात हे तृतीयपंथी राहतात. शहरातील बाजारपेठेतील नागरिकांसमोर सकाळपासून ते रात्रीपर्यंत हात ...

शहराच्या व बनशेळकी गावच्या सीमेवर असलेल्या गोपाळ नगर भागात हे तृतीयपंथी राहतात. शहरातील बाजारपेठेतील नागरिकांसमोर सकाळपासून ते रात्रीपर्यंत हात पसरून जे देतील ते घेऊन त्यांना आशीर्वाद द्यायचा हा त्यांचा नित्यक्रम. प्रसंगी काही तृतीयपंथी रेल्वेने प्रवास करीत भीक मागतात. पुरुषांच्या डब्यात गेल्यानंतर भीक मिळत नाही, उलट अश्लील भाषेत बोलले जाते. हे सर्व सहन करीत टिचभर पोटासाठी हे प्रवास करीत असतात. महिलांच्या डब्यात गेल्यास महिला त्यांना हुसकावून लावतात. परंतु, हे त्यांच्या अंगवळणी पडले आहे. प्रवासात कुण्या महिलांची छेड काढल्यास रेल्वे पोलीस अथवा प्रवासी त्यांची दखल घेतात. परंतु, त्यांना सर्वांसमोर अश्लील भाषेत बोलले जाते. मात्र, त्यांची कोणीही दखल घेत नाही, अशी खंत व्यक्त करीत आम्हाला जगण्याचा हक्क आहे की नाही असा प्रश्न पडतो, असेही अंजली पटेल म्हणाली.

कोरोनामुळे जीवन जगणे कठीण झाले आहे. समाजातील अशा उपेक्षितांचे हाल तर न विचारलेले बरे. त्यांना राहायला चांगल्या वस्तीत कोणीही भाड्याने घर देत नाही. जिथे मिळेल तिथे राहावे म्हटले तर दुप्पट- तिप्पट घरभाडे द्यावे लागते. शासकीय दप्तरी नोंद नसल्याने साधे ओळखपत्रही नाही. मागील वर्षीच्या टाळेबंदीच्या वेळी तत्कालीन तहसीलदारांनी व इतर सामाजिक संघटनांनी धान्याच्या रूपात मदत केली होती. रेशनकार्ड देण्याचे त्यांनी कबूल केले होते. परंतु, नंतर त्यांची बदली झाली आणि परिस्थिती जैसे थे राहिली.

यावेळी कोणीही फारशी मदत केली नाही. त्यामुळे प्रसंगी उपाशी राहण्याची वेळ आली. कुठलेही शासकीय कागदपत्र, ओळखपत्र नसल्याने रेशनचे धान्य मिळू शकत नाही. मग आम्ही काय खायचे? सरकारने आम्हाला मदत करावी. किमान अन्नधान्य तरी उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी अंजली पटेल यांनी केली.

तृतीयपंथियांकडे उपजीविकेचे कोणतेच साधन उपलब्ध नसल्याने मोठ्या प्रमाणात मानसिक तणावातून जावे लागत आहे. समाजापासून अगोदरच वंचित असताना कोरोनामुळे आणखीनच दूर लोटले आहे, असेही त्या म्हणाल्या.

आश्वासनांशिवाय पदरी काहीही नाही...

तृतीयपंथीयांसाठी काही वर्षांपासून काम करणारे भरत गायकवाड हे आपल्या आधार सेवा प्रतिष्ठानमार्फत रेशन कार्ड, निवासासाठी घरकुल मिळवून देण्याचा प्रयत्न करीत आहेत. परंतु मदतीसाठी सामाजिक व राजकीय लोकप्रतिनिधीकडे गेल्यास आश्वासनाशिवाय पदरी काहीच पडले नाही. त्यामुळे हळूहळू धीर खचत आहे.

मृत्यूनंतरही हाल...

उदगीर येथे राहणाऱ्या अंजली पटेल म्हणाल्या, जगण्यासाठीचा आमचा संघर्ष अंगवळणी पडला आहे. परंतु, मृत्यूनंतरही आमचे हाल आहेत. कारण या भागात जर कोणी मृत्यू पावला, तर त्याला अंत्यविधीसाठी हैदराबाद, तुळजापूर अथवा अंबाजोगाईला घेऊन जावे लागते. जिल्ह्यामध्ये तृतीयपंथीयांच्या अंत्यविधीसाठी जागाच उपलब्ध नाही.