शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
3
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
4
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
5
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
6
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
7
Health Tips: लघवीची दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
8
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
9
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
10
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
11
Summer Special: भेळ तर नेहमीच खाता, पण 'हा' सिक्रेट' मसाला वाढवेल सुकी भेळेची लज्जत
12
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
13
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
14
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
15
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
16
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
17
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
18
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
19
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
20
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
Daily Top 2Weekly Top 5

ना कुणाची मदत, ना जगण्याचे साधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2021 04:18 IST

शहराच्या व बनशेळकी गावच्या सीमेवर असलेल्या गोपाळ नगर भागात हे तृतीयपंथी राहतात. शहरातील बाजारपेठेतील नागरिकांसमोर सकाळपासून ते रात्रीपर्यंत हात ...

शहराच्या व बनशेळकी गावच्या सीमेवर असलेल्या गोपाळ नगर भागात हे तृतीयपंथी राहतात. शहरातील बाजारपेठेतील नागरिकांसमोर सकाळपासून ते रात्रीपर्यंत हात पसरून जे देतील ते घेऊन त्यांना आशीर्वाद द्यायचा हा त्यांचा नित्यक्रम. प्रसंगी काही तृतीयपंथी रेल्वेने प्रवास करीत भीक मागतात. पुरुषांच्या डब्यात गेल्यानंतर भीक मिळत नाही, उलट अश्लील भाषेत बोलले जाते. हे सर्व सहन करीत टिचभर पोटासाठी हे प्रवास करीत असतात. महिलांच्या डब्यात गेल्यास महिला त्यांना हुसकावून लावतात. परंतु, हे त्यांच्या अंगवळणी पडले आहे. प्रवासात कुण्या महिलांची छेड काढल्यास रेल्वे पोलीस अथवा प्रवासी त्यांची दखल घेतात. परंतु, त्यांना सर्वांसमोर अश्लील भाषेत बोलले जाते. मात्र, त्यांची कोणीही दखल घेत नाही, अशी खंत व्यक्त करीत आम्हाला जगण्याचा हक्क आहे की नाही असा प्रश्न पडतो, असेही अंजली पटेल म्हणाली.

कोरोनामुळे जीवन जगणे कठीण झाले आहे. समाजातील अशा उपेक्षितांचे हाल तर न विचारलेले बरे. त्यांना राहायला चांगल्या वस्तीत कोणीही भाड्याने घर देत नाही. जिथे मिळेल तिथे राहावे म्हटले तर दुप्पट- तिप्पट घरभाडे द्यावे लागते. शासकीय दप्तरी नोंद नसल्याने साधे ओळखपत्रही नाही. मागील वर्षीच्या टाळेबंदीच्या वेळी तत्कालीन तहसीलदारांनी व इतर सामाजिक संघटनांनी धान्याच्या रूपात मदत केली होती. रेशनकार्ड देण्याचे त्यांनी कबूल केले होते. परंतु, नंतर त्यांची बदली झाली आणि परिस्थिती जैसे थे राहिली.

यावेळी कोणीही फारशी मदत केली नाही. त्यामुळे प्रसंगी उपाशी राहण्याची वेळ आली. कुठलेही शासकीय कागदपत्र, ओळखपत्र नसल्याने रेशनचे धान्य मिळू शकत नाही. मग आम्ही काय खायचे? सरकारने आम्हाला मदत करावी. किमान अन्नधान्य तरी उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी अंजली पटेल यांनी केली.

तृतीयपंथियांकडे उपजीविकेचे कोणतेच साधन उपलब्ध नसल्याने मोठ्या प्रमाणात मानसिक तणावातून जावे लागत आहे. समाजापासून अगोदरच वंचित असताना कोरोनामुळे आणखीनच दूर लोटले आहे, असेही त्या म्हणाल्या.

आश्वासनांशिवाय पदरी काहीही नाही...

तृतीयपंथीयांसाठी काही वर्षांपासून काम करणारे भरत गायकवाड हे आपल्या आधार सेवा प्रतिष्ठानमार्फत रेशन कार्ड, निवासासाठी घरकुल मिळवून देण्याचा प्रयत्न करीत आहेत. परंतु मदतीसाठी सामाजिक व राजकीय लोकप्रतिनिधीकडे गेल्यास आश्वासनाशिवाय पदरी काहीच पडले नाही. त्यामुळे हळूहळू धीर खचत आहे.

मृत्यूनंतरही हाल...

उदगीर येथे राहणाऱ्या अंजली पटेल म्हणाल्या, जगण्यासाठीचा आमचा संघर्ष अंगवळणी पडला आहे. परंतु, मृत्यूनंतरही आमचे हाल आहेत. कारण या भागात जर कोणी मृत्यू पावला, तर त्याला अंत्यविधीसाठी हैदराबाद, तुळजापूर अथवा अंबाजोगाईला घेऊन जावे लागते. जिल्ह्यामध्ये तृतीयपंथीयांच्या अंत्यविधीसाठी जागाच उपलब्ध नाही.