शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
4
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
5
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
6
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
7
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
8
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
9
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
10
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
11
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
12
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
13
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
14
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
15
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
16
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
17
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
18
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
19
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
20
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू

नागतीर्थवाडी पंचायतीने वृक्षलागवडीतून साधले अर्थकारण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:21 IST

देवणी तालुक्यातील नागतीर्थवाडी हे गाव तालुक्यातील सर्वप्रथम हागणदारीमुक्त गाव असून, केवळ ११० उंबरे असलेल्या या छोट्याशा गावाने सन २०१८ ...

देवणी तालुक्यातील नागतीर्थवाडी हे गाव तालुक्यातील सर्वप्रथम हागणदारीमुक्त गाव असून, केवळ ११० उंबरे असलेल्या या छोट्याशा गावाने सन २०१८ च्या पाणी फाउंडेशनच्या वतीने घेतलेल्या वॉटरकप स्पर्धेत जलसंधारणाचे उत्कृष्ट कार्य केले. गावातील लोकांनी रात्रंदिवस श्रमदान करून, गावेच पाणीदार केली आहेत. या गावाची आता स्वतंत्र ओळख गावकऱ्यांनी आपल्या श्रमदानातून केली आहे. येथील ग्रामपंचायतीने वृक्षलागवडीतून अर्थकारण साधले आहे. तालुक्यात दुसरा येण्याचा मान गावाला मिळाला असून, पाच लाखांचे बक्षीसही मिळाले आहे. याच निधीतून गावातील गायरानावर तहसीलदार सुरेश घाेळवे, गटविकास अधिकारी मनोज राऊत यांनी पुढाकार घेत कोईमतूर जातीचे २५० चिंचवृक्षाची लागवड केली. या वृक्षलागवडीची पाहणी शनिवारी जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांनी केली. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते वृक्षलागवड करण्यात आली; तर लोकसहभागातून जिल्हा परिषदेच्या शाळेत सुरू करण्यात आलेल्या बाल उपक्रमाची पाहणीही त्यांनी केली.

यावेळी देवणीचे तहसीलदार सुरेश घोळवे, गटविकास अधिकारी मनोज राऊत, सरपंच प्रभाकर पाटील, उपसरपंच विष्णुदास गुणाले, भाजयुमो तालुकाध्यक्ष रामलिंग शेरे, बाळासाहेब बिरादार, ग्रामसेवक श्रीकांत पताळे, तलाठी निंगुले अनिता, विस्तार अधिकारी मस्के, कैलवाडे, ग्रामपंचायत सदस्य नरसिंग गुरुडे, दत्ता कोंबडे, तंटामुक्ती अध्यक्ष तुळशीराम गुणाले, धोंडराज गुणाले, शिक्षिका गुंगे, गायकवाड, केंद्रप्रमुख येलमटे, आदी उपस्थित होते.

गावकऱ्यांनी राबविला विधायक उपक्रम...

नागतीर्थवाडी ग्रामपंचायतीला पाणी फाउंडेशनच्या वतीने घेण्यात आलेल्या स्पर्धेत पाच लाखांचे पारितोषिक मिळाले. याच रकमेतून गावातील गायरान जमिनीवर अतिक्रमण न होऊ देता, फळझाडे लागवड करण्यात आली. यातून पर्यावरण संतुलनाबरोबर आर्थिक उत्पन्न कसे वाढेल, यासाठी प्रयत्न करण्यात आले. या उपक्रमाचे जिल्हाधिकाऱ्यांनी काैतुक केले असून, याचा आदर्श इतर गावांनी घेतला तर ग्रामपंचायती स्वयंपूर्ण होतील, असे जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. म्हणाले.