शहरं
Join us  
Trending Stories
1
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
2
विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
3
'चुल्लूभर पानी में डूब मरो...' भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून ओवैसी भाजपवर संतापले!
4
‘सॉरी... आम्ही हे जग सोडतोय’, CA च्या पत्नीनं मुलासह १३ व्या मजल्यावरून मारली उडी, समोर आलं धक्कादायक कारण
5
पंजाब की शेरनी! चालत्या ऑटोमध्ये चोरांशी लढली, जीव धोक्यात घालून मदत मागितली अन्...
6
Pakistan: पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात १९ सैनिकांचा मृत्यू; ४५ दहशतवाद्यांचा खात्मा
7
सूर्या, पांड्या की आफ्रिदी... IND vs PAK सामन्यात 'हे' १० खेळाडू ठरू शकतात 'गेमचेंजर'
8
'दशावतार' सिनेमासाठी रजनीकांतचा झालेला विचार? दिग्दर्शक म्हणाले- "दिलीप प्रभावळकरांनी नकार दिला असता तर..."
9
युपीआय व्यवहारांच्या नियमांत मोठे बदल; विमा, गुंतवणूक, क्रेडिट कार्ड पेमेंटसाठी मर्यादा वाढली
10
Dashavtar: दिलीप प्रभावळकरांच्या 'दशावतार'ने मनं जिंकली; दुसऱ्या दिवशी कमावले तब्बल 'इतके' कोटी
11
आजचे राशीभविष्य- १४ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस फायद्याने भरलेला, पण हितशत्रूंपासून सावध राहा
12
गुन्हेगारी पार्श्वभूमी, तुरुंगवास आणि..., कोण आहे टॉमी रॉबिन्सन, ज्याच्या आवाहनानंतर लंडनमध्ये निघाला लाखोंचा मोर्चा
13
World Boxing Championship: भारताच्या लेकीचा 'गोल्डन पंच' ! जास्मिन लंबोरियाने बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये जिंकलं सुवर्ण
14
"तुम्हाला काय वाटतं याला काही महत्त्व नसतं..."; IND vs PAK सामन्यावर सुनील गावसकरांचे मत
15
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी आंदोलक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
16
मतपेढीच्या राजकारणामुळे ईशान्य भारताचे मोठे नुकसान : पंतप्रधान मोदी
17
पोलिसांच्या ८ तासांच्या ड्युटीचे काय झाले? मनुष्यबळ वाढल्यास ८ तासांची ड्युटी शक्य
18
तुम्ही आता मागास झालात, आपआपसात विवाह ठरवूया; प्रा. लक्ष्मण हाके यांचा मनोज जरांगे यांना प्रस्ताव
19
अंगात 'सिंदूर' नव्हे तर खरी देशभक्ती भिनली पाहिजे; उद्धव ठाकरे यांची भाजपवर टीका
20
'एआय'मुळे खासगी आयुष्य धोक्यात! चेहऱ्यांचे बनावट फोटो, खोटे आवाज, सही याचा गैरवापर

नागतीर्थवाडी पंचायतीने वृक्षलागवडीतून साधले अर्थकारण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:21 IST

देवणी तालुक्यातील नागतीर्थवाडी हे गाव तालुक्यातील सर्वप्रथम हागणदारीमुक्त गाव असून, केवळ ११० उंबरे असलेल्या या छोट्याशा गावाने सन २०१८ ...

देवणी तालुक्यातील नागतीर्थवाडी हे गाव तालुक्यातील सर्वप्रथम हागणदारीमुक्त गाव असून, केवळ ११० उंबरे असलेल्या या छोट्याशा गावाने सन २०१८ च्या पाणी फाउंडेशनच्या वतीने घेतलेल्या वॉटरकप स्पर्धेत जलसंधारणाचे उत्कृष्ट कार्य केले. गावातील लोकांनी रात्रंदिवस श्रमदान करून, गावेच पाणीदार केली आहेत. या गावाची आता स्वतंत्र ओळख गावकऱ्यांनी आपल्या श्रमदानातून केली आहे. येथील ग्रामपंचायतीने वृक्षलागवडीतून अर्थकारण साधले आहे. तालुक्यात दुसरा येण्याचा मान गावाला मिळाला असून, पाच लाखांचे बक्षीसही मिळाले आहे. याच निधीतून गावातील गायरानावर तहसीलदार सुरेश घाेळवे, गटविकास अधिकारी मनोज राऊत यांनी पुढाकार घेत कोईमतूर जातीचे २५० चिंचवृक्षाची लागवड केली. या वृक्षलागवडीची पाहणी शनिवारी जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांनी केली. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते वृक्षलागवड करण्यात आली; तर लोकसहभागातून जिल्हा परिषदेच्या शाळेत सुरू करण्यात आलेल्या बाल उपक्रमाची पाहणीही त्यांनी केली.

यावेळी देवणीचे तहसीलदार सुरेश घोळवे, गटविकास अधिकारी मनोज राऊत, सरपंच प्रभाकर पाटील, उपसरपंच विष्णुदास गुणाले, भाजयुमो तालुकाध्यक्ष रामलिंग शेरे, बाळासाहेब बिरादार, ग्रामसेवक श्रीकांत पताळे, तलाठी निंगुले अनिता, विस्तार अधिकारी मस्के, कैलवाडे, ग्रामपंचायत सदस्य नरसिंग गुरुडे, दत्ता कोंबडे, तंटामुक्ती अध्यक्ष तुळशीराम गुणाले, धोंडराज गुणाले, शिक्षिका गुंगे, गायकवाड, केंद्रप्रमुख येलमटे, आदी उपस्थित होते.

गावकऱ्यांनी राबविला विधायक उपक्रम...

नागतीर्थवाडी ग्रामपंचायतीला पाणी फाउंडेशनच्या वतीने घेण्यात आलेल्या स्पर्धेत पाच लाखांचे पारितोषिक मिळाले. याच रकमेतून गावातील गायरान जमिनीवर अतिक्रमण न होऊ देता, फळझाडे लागवड करण्यात आली. यातून पर्यावरण संतुलनाबरोबर आर्थिक उत्पन्न कसे वाढेल, यासाठी प्रयत्न करण्यात आले. या उपक्रमाचे जिल्हाधिकाऱ्यांनी काैतुक केले असून, याचा आदर्श इतर गावांनी घेतला तर ग्रामपंचायती स्वयंपूर्ण होतील, असे जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. म्हणाले.