शहरं
Join us  
Trending Stories
1
नारायण राणेंचा उद्धव ठाकरेंवर प्रहार; "राज ठाकरेंना त्रास देऊन उद्धव यांनी त्यांना..." 
2
रशियातून समुद्रमार्गे इंद्राची तलवार येतेय; शेवटची परदेशी युद्धनौका, आयएनएस तमाल आज नौदलाच्या ताफ्यात येणार
3
धोनीचा 'कॅप्टन कूल' नावाच्या ट्रेडमार्कचा अर्ज कार्यालयाने स्वीकारला, पण अजूनही आहे एक अडथळा
4
१००० रुपयांच्या वर लिस्टिंग; नंतर अपर सर्किट; Raymond समूहाच्या शेअरची जोरदार एन्ट्री
5
...अन्यथा अहमदाबादसारखा अपघात दिल्लीत घडला असता, उड्डाण करताच ९०० फूट खाली आलं एअर इंडियाचं विमान
6
व्यापार करारापूर्वीच भारताचा अमेरिकेला धोबीपछाड! ४ वर्षात पहिल्यांदाच असं घडलं, ट्रम्प पाहतच राहिले
7
प्रेमप्रकरणातून मुलीनं संपवलं जीवन, बदला घेण्यासाठी संतप्त पित्याचं भयंकर कृत्य, तरुणावर केला ॲसिड हल्ला
8
Crime: महिला शिक्षिकेचा विद्यार्थ्यासोबत सेक्स; पुढं असं घडलं की... अख्खं आयुष्य झालं खराब!
9
मुलींच्या टोमण्यांना कंटाळलेल्या निवृत्त सैनिकाने तब्बल ४ कोटींची संपत्ती केली मंदिराला दान
10
आजचा दिवस SBI साठी एकदम खास, माहितीये कशी झालेली सरकारी बँकेची सुरुवात?
11
वापरा अन् फेका...! IPL मधील क्रिकेटरवर गर्लफ्रेंडचा खळबळजनक आरोप; लैंगिक शोषण केल्याचा दावा
12
'मुलाचा मृतदेह शोधून काढा अन्यथा आम्हीही नीरा नदीत उड्या मारू'; वारकऱ्यांचा प्रशासनाला इशारा
13
"जाडी वाटले तर सहन करा...", शेफाली जरीवालाच्या मृत्यूनंतर राखी सावंतने घेतला धसका, म्हणाली - "सौंदर्यासाठी..."
14
Video - तामिळनाडूच्या शिवकाशी येथील फटाक्याच्या कारखान्यात भीषण स्फोट, ५ जणांचा मृत्यू
15
मान्सून लवकर आला, पण 'या' उद्योगांना रडवले! तुमच्या नोकरीवरही संकट?
16
ट्रम्प यांच्या पक्षातील नेत्याची भारताला धमकी; "जर रशियाची मदत केली तर अमेरिका भारतावर..."
17
३० लाख कर भरणाऱ्या आयटी अभियंत्याची नोकरी गेली अन्... पोस्टने सोशल मीडियावर खळबळ
18
बीएसएफमध्ये असलेल्या जवानाच्या पत्नीवर दिरांनी केला बलात्कार, व्हिडीओ काढून...
19
"१७ जूनची ती भेट शेवटची ठरेल असं वाटलं नाही..."; माजी आमदाराचं निधन, अजित पवार भावूक
20
तरुणीने मंदिरात जाऊन लग्न केले, नवरदेवापासून अशी गोष्ट लपविली की लग्न १८ तासच टिकले...

वाय- फाय सुविधेने नागतीर्थवाडी झाले हायटेक !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2021 04:21 IST

लातूर : कोविडमुळे ऑनलाईनला महत्त्व आले आहे. परंतु, बहुतांश जणांना पैशाअभावी इंटरनेट सुविधा घेणे कठीण झाल्याचे पाहून नागतीर्थवाडी (ता. ...

लातूर : कोविडमुळे ऑनलाईनला महत्त्व आले आहे. परंतु, बहुतांश जणांना पैशाअभावी इंटरनेट सुविधा घेणे कठीण झाल्याचे पाहून नागतीर्थवाडी (ता. देवणी) ने संपूर्ण गावातच मोफत वाय-फाय सुविधा सुरू केली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण मिळण्यास मदत तर झालीच आहे याशिवाय, गावातील शेतकरी ऑनलाईन बाजारभाव पाहत असून महिला बचत गटाच्या बैठकाही ऑनलाईन होत आहेत. त्यामुळे संपूर्ण गाव हायटेक झाले आहे.

देवणी तालुक्यातील नागतीर्थवाडी हे ११० उंबरठ्यांचे आणि ६७४ लोकसंख्येचे गाव आहे. गावात जिल्हा परिषदेची इयत्ता चौथीपर्यंतची शाळा आहे. सीमावर्ती भागात गाव असल्याने गावातील बहुतांश कुटुंबांचा उदरनिर्वाह शेतीवर आहे. त्यामुळे आर्थिक परिस्थिती जेमतेम असली तरी ग्रामपंचायतीचा गावकऱ्यांच्या सहकार्याने गावात नवनवीन उपक्रम राबविण्याचा सातत्याने प्रयत्न राहिला आहे. लोकसहभागातून वृक्ष लागवड केली असून बाल उपक्रमासाठी सव्वा लाखाची गावकऱ्यांनी मदत दिली आहे.

कोविडमुळे ऑनलाईन शिक्षण सुरु झाले. अशा परिस्थितीत काही पालकांना आपल्या मुलांच्या मोबाईलसाठी इंटरनेट सेवा उपलब्ध करुन देणे शक्य होईना. याशिवाय, सतत इंटरनेट सेवा खंडित होत असल्याने ग्रामपंचायतीच्या ऑनलाईन सेवेत व्यत्यय येऊ लागला. त्यामुळे ग्रामपंचायतीने ३० हजार खर्चून गावात ६ ठिकाणे निश्चित करुन मोफत वाय-फाय सुविधा सुरू केली. त्यामुळे गावातील मुलांसोबत शेतकरी, महिलाही ऑनलाईन झाल्या आहेत.

जिल्ह्यातील पहिले अग्रेसर गाव...

गावास यापूर्वी संत गाडगेबाबा महाराज ग्रामस्वच्छता अभियानात एक लाखाचे, वॉटर कप स्पर्धेत ५ लाखाचा पुरस्कार मिळाला आहे. निर्मल ग्राममध्ये राष्ट्रपतींच्या हस्ते गौरव झाला आहे. गावाने पर्यावरणाचे संतुलन राखण्याबरोबर ग्रामपंचायतीचे उत्पन्न वाढावे म्हणून चार एकर गायरान जागेत ३०० चिंचेच्या झाडांची लागवड केली आहे. जिल्ह्यातील पहिले वाय-फाय सुविधेचे गाव झाले आहे.

स्वयंपाक करणाऱ्या महिलेला ग्रामसभेची माहिती...

गावातील नागरिकांना कुठलीही माहिती देण्यासाठी संपूर्ण गावात ध्वनिक्षेपकाची सुविधा निर्माण करण्यात आली आहे. त्याद्वारे सूचना, माहिती दिली जात आहे. एवढेच नव्हे तर ग्रामसभेतील चर्चेची माहितीही स्वयंपाक करणाऱ्या महिलेला सहजरीत्या मिळत आहेत. त्यामुळे ग्रामपंचायतीची पेपरलेसकडे वाटचाल सुरू आहे.

स्मार्ट व्हिलेजसाठी प्रयत्न...

गावातील प्रत्येकाला देशभरातील माहिती मिळावी. तसेच विद्यार्थ्यांचे ऑनलाईन शिक्षण सुरु रहावे. ग्रामपंचायतीबरोबर अंगणवाडी, शाळा, रेशन दुकानाला

येणाऱ्यांची कुठलीही अडचण होऊ नये म्हणून ही सुविधा उपलब्ध केली आहे.

- राज गुणाले, सरपंच.

डिजिटल युगात गरज...

सध्याचे डिजिटल युग आहे. त्यात गावातील कोणीही मागे राहू नये म्हणून ही सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. त्याचा चांगला फायदा होत आहे.

गावकऱ्यांचेही सहकार्य मिळते.

- श्रीकांत पताळे, ग्रामसेवक.