शहरं
Join us  
Trending Stories
1
SRH vs DC : दिल्लीच्या फलंदाजांनी नांगी टाकली; पण पावसाच्या बॅटिंगमुळे हैदराबाद फक्त बॉलिंग करून 'आउट'
2
"९० हजार सैनिकांचे पायजमे आजही तिथे टांगलेले आहेत’’, मुनीर आणि पाकिस्तानचं बलूच नेत्याकडून वस्रहरण   
3
IPL 2025 Playoffs Race : आता ४ जागेसाठी ७ दावेदार! कोणत्या संघासाठी कसे आहे प्लेऑफ्सचे समीकरण?
4
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं सरपंच संतोष देशमुख यांची कन्या वैभवीचं कौतुक
5
दोन्ही दिल्लीकर एकाच क्रीजमध्ये; रन आउटसाठी स्टँडमध्ये काव्या मारनची 'दातओठ खात' तळमळ (VIDEO)
6
"वेगळे राजकारण करून पॅनलला गालबोट लावण्याचा प्रयत्न केल्यास माझ्या दारात येऊ नका",अजित पवार यांचा इशारा
7
SRH vs DC : पॅट कमिन्सचा विकेट्सचा खास पॅटर्न! स्पेल बघून काव्या मारनही झाली शॉक
8
निकाल ऐकण्यापूर्वीच विद्यार्थिनीने संपवलं जीवन, नापास झाल्याच्या भीतीतून उचलले पाऊल
9
Shivalik Sharma: क्रिकेटरला अटक; लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार केल्याचा आरोप
10
रेल्वे स्थानकाच्या पायऱ्यांवर पाकिस्तानी ध्वज चिकटवला; पाहताच महिलेने घातला गोंधळ, व्हिडीओ व्हायरल
11
SRH vs DC : "डिअर क्रिकेट प्लीज प्लीज ..." दुसऱ्यांदा पदरी भोपळा पडल्यावर करूण नायर झाला ट्रोल
12
"महायुती म्हणजे 'तीन तिघाडा, काम बिघाडा"; काँग्रेस फोडण्याच्या मुद्द्यावरून प्रणिती शिंदेंची टीका
13
ड्रग्स टेस्टमध्ये दोषी आढळलेला कगिसो रबाडा पुन्हा IPL खेळणार, 'या' संघाविरूद्ध होणार 'कमबॅक'
14
हवाई हल्ल्याची तयारी... पाकिस्तानसोबत तणावाच्या पार्श्वभूमीवर गृह मंत्रालयाचे सर्व राज्यांना निर्देश
15
भारताच्या संरक्षण वेबसाईट्सवर पाकिस्तानकडून सायबर हल्ला, महत्त्वपूर्ण गोपनीय माहिती लीक झाल्याचा संशय
16
काही लोक काँग्रेस सोडत आहेत, आमची वेळ आल्यावर आम्हीही बदला घेऊ- विजय वडेट्टीवार
17
वाहतुकीचे नियम तोडले तर मिळतील निगेटिव्ह पॉईंट्स, ड्रायव्हिंग लायसन होणार सस्पेंड, अशी आहे नवी पॉईंट सिस्टिम
18
ही आहे भारताची ताकद; जर्मनी-फ्रान्सचा पाकिस्तानबाबत मोठा निर्णय, जाणून घ्या...
19
पाकवर आर्थिक हल्ला; ADB अध्यक्षांना भेटल्या निर्मला सीतारामण, निधी रोखण्याची केली मागणी
20
२२ महीने राबला, पगार मागताच हॉटेल मालक, मॅनेजरने स्वयंपाक्याचा गुप्तांग ठेचून खून केला

वाय- फाय सुविधेने नागतीर्थवाडी झाले हायटेक !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2021 04:21 IST

लातूर : कोविडमुळे ऑनलाईनला महत्त्व आले आहे. परंतु, बहुतांश जणांना पैशाअभावी इंटरनेट सुविधा घेणे कठीण झाल्याचे पाहून नागतीर्थवाडी (ता. ...

लातूर : कोविडमुळे ऑनलाईनला महत्त्व आले आहे. परंतु, बहुतांश जणांना पैशाअभावी इंटरनेट सुविधा घेणे कठीण झाल्याचे पाहून नागतीर्थवाडी (ता. देवणी) ने संपूर्ण गावातच मोफत वाय-फाय सुविधा सुरू केली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण मिळण्यास मदत तर झालीच आहे याशिवाय, गावातील शेतकरी ऑनलाईन बाजारभाव पाहत असून महिला बचत गटाच्या बैठकाही ऑनलाईन होत आहेत. त्यामुळे संपूर्ण गाव हायटेक झाले आहे.

देवणी तालुक्यातील नागतीर्थवाडी हे ११० उंबरठ्यांचे आणि ६७४ लोकसंख्येचे गाव आहे. गावात जिल्हा परिषदेची इयत्ता चौथीपर्यंतची शाळा आहे. सीमावर्ती भागात गाव असल्याने गावातील बहुतांश कुटुंबांचा उदरनिर्वाह शेतीवर आहे. त्यामुळे आर्थिक परिस्थिती जेमतेम असली तरी ग्रामपंचायतीचा गावकऱ्यांच्या सहकार्याने गावात नवनवीन उपक्रम राबविण्याचा सातत्याने प्रयत्न राहिला आहे. लोकसहभागातून वृक्ष लागवड केली असून बाल उपक्रमासाठी सव्वा लाखाची गावकऱ्यांनी मदत दिली आहे.

कोविडमुळे ऑनलाईन शिक्षण सुरु झाले. अशा परिस्थितीत काही पालकांना आपल्या मुलांच्या मोबाईलसाठी इंटरनेट सेवा उपलब्ध करुन देणे शक्य होईना. याशिवाय, सतत इंटरनेट सेवा खंडित होत असल्याने ग्रामपंचायतीच्या ऑनलाईन सेवेत व्यत्यय येऊ लागला. त्यामुळे ग्रामपंचायतीने ३० हजार खर्चून गावात ६ ठिकाणे निश्चित करुन मोफत वाय-फाय सुविधा सुरू केली. त्यामुळे गावातील मुलांसोबत शेतकरी, महिलाही ऑनलाईन झाल्या आहेत.

जिल्ह्यातील पहिले अग्रेसर गाव...

गावास यापूर्वी संत गाडगेबाबा महाराज ग्रामस्वच्छता अभियानात एक लाखाचे, वॉटर कप स्पर्धेत ५ लाखाचा पुरस्कार मिळाला आहे. निर्मल ग्राममध्ये राष्ट्रपतींच्या हस्ते गौरव झाला आहे. गावाने पर्यावरणाचे संतुलन राखण्याबरोबर ग्रामपंचायतीचे उत्पन्न वाढावे म्हणून चार एकर गायरान जागेत ३०० चिंचेच्या झाडांची लागवड केली आहे. जिल्ह्यातील पहिले वाय-फाय सुविधेचे गाव झाले आहे.

स्वयंपाक करणाऱ्या महिलेला ग्रामसभेची माहिती...

गावातील नागरिकांना कुठलीही माहिती देण्यासाठी संपूर्ण गावात ध्वनिक्षेपकाची सुविधा निर्माण करण्यात आली आहे. त्याद्वारे सूचना, माहिती दिली जात आहे. एवढेच नव्हे तर ग्रामसभेतील चर्चेची माहितीही स्वयंपाक करणाऱ्या महिलेला सहजरीत्या मिळत आहेत. त्यामुळे ग्रामपंचायतीची पेपरलेसकडे वाटचाल सुरू आहे.

स्मार्ट व्हिलेजसाठी प्रयत्न...

गावातील प्रत्येकाला देशभरातील माहिती मिळावी. तसेच विद्यार्थ्यांचे ऑनलाईन शिक्षण सुरु रहावे. ग्रामपंचायतीबरोबर अंगणवाडी, शाळा, रेशन दुकानाला

येणाऱ्यांची कुठलीही अडचण होऊ नये म्हणून ही सुविधा उपलब्ध केली आहे.

- राज गुणाले, सरपंच.

डिजिटल युगात गरज...

सध्याचे डिजिटल युग आहे. त्यात गावातील कोणीही मागे राहू नये म्हणून ही सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. त्याचा चांगला फायदा होत आहे.

गावकऱ्यांचेही सहकार्य मिळते.

- श्रीकांत पताळे, ग्रामसेवक.