शहरं
Join us  
Trending Stories
1
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
2
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
3
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
4
Latest Marathi News LIVE: इस्रायलच्या हल्ल्यात 203 लोकांचा मृत्यू, १००० पेक्षा जास्त जखमी
5
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
6
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
7
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
8
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
9
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
10
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
11
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
12
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
13
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
14
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
15
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
16
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
17
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
18
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
19
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
20
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
Daily Top 2Weekly Top 5

लेकीच्या माहेरासाठी माय सासरी नांदते...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2021 04:17 IST

मागील मार्च महिन्यापासून कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू आहे. त्यामुळे अनेक मुलींना तसेच बच्चे कंपनीला आपल्या मामाच्या गावाला जाता आलेले नाही. ...

मागील मार्च महिन्यापासून कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू आहे. त्यामुळे अनेक मुलींना तसेच बच्चे कंपनीला आपल्या मामाच्या गावाला जाता आलेले नाही. अक्षय तृतीयेला अनेक मुली माहेरी जाण्याची परंपरा आहे. मात्र यंदा कोरोनामुळे अक्षय तृतीयाही मोठ्या उत्साहात साजरी करता आली नाही.

माझं माहेर माहेर...

कोरोनामुळे आईची भेट होऊ शकली नाही. नऊ ते दहा महिन्यांचा कालावधी झाला, तेव्हाच भेट झाली होती. दरवर्षी उन्हाळ्यात, अक्षय तृतीया, सणावाराला माहेरी जाण्याचा योग येत होता. मात्र कोरोनामुळे माहेरी जाण्याचा योग आलाच नाही.

- योगिता कांबळे

आई-वडील गावी राहतात. सासरी येऊन दहा महिने झाले आहेत. मात्र कोरोनामुळे माहेरच्या मंडळींची भेट होऊ शकली नाही. केवळ फोनवरच ख्यालीखुशाली विचारता येत आहे. प्रत्यक्ष भेट आता कोरोनाचे संकट संपल्यानंतरच होईल.

- वैष्णवी महामुनी

रक्षाबंधनाच्यावेळी भावाची भेट झाली होती. मात्र तेव्हापासून माहेरी जाण्याची ओढ आहे. संचारबंदीमुळे एसटी बसेस तसेच प्रवासासाठी मनाई असल्याने माहेरी जाता आलेले नाही. मुलेही मामाच्या गावाला जाण्यासाठी उत्सुक आहेत.

- वैशाली शिंदे

लागली लेकीची ओढ...

मागील एक वर्षापासून मुलगी माहेरी आलेली नाही. मुलीसोबतच नातवांना भेटण्याची ओढ आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव अधिक असल्याने भेट दुरावत चालली आहे. संकट लवकर संपो आणि आमच्या माय-लेकींची भेट होवो.

- सुनीता आगळे

मागीलवर्षी दिवाळीला मुलगी घरी आली होती, तेव्हापासून तिची अजूनपर्यंत भेट नाही. केवळ फोनवरतीच आणि व्हिडिओ कॉलवरच दररोज संभाषण होत आहे. कोरोनामुळे माणसे दुरावत चालली आहेत.

- राणी ढोले

कोरोनाने अनेक नाती दूर केली. मुलीला माहेरी येण्यापासून रोखले आहे. कधी कोरोना कमी होतो, तर अचानक वाढतो, तर कधी गाड्याच बंद असतात. त्यामुळे मुलीला माहेरी येता आले नाही. आठवण येते.

- सुभद्रा शिंदे

मामाच्या गावाला कधी जायला मिळणार

दरवर्षी उन्हाळ्याच्या सुट्यांत मामाच्या गावाला जात असतो. मात्र गेल्या दोन वर्षांपासून जाता आलेले नाही. कोरोना संपला की मामाच्या गावाला जाऊ, असे आई सांगते. शाळा बंद असल्याने कंटाळाला आला आहे.

-

वर्षभर शाळा बंद असल्याने खूप कंटाळा आला आहे. मामाच्या गावाला वर्षातून दोन ते तीन वेळेस जाणे व्हायचे. मात्र कोरोना आल्यापासून मामाच्या गावाला काही जाता आलेले नाही. आजी-आजोबांचीही भेट झालेली नाही.

-

कोरोनामुळे बाहेर खेळायला जाणेही बंद आहे. घरातच राहून कंटाळा आला आहे. सण-उत्सवाला मामाच्या घरी जात असतो. मात्र यावर्षी मामाही न्यायला आला नाही. त्यामुळे कोरोना संपल्यानंतरच मामाच्या गावाला जाता येणार आहे. -