शहरं
Join us  
Trending Stories
1
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
2
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
3
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
4
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
5
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
6
अदानींच्या 'या' उद्योगासंदर्भात मोठी अपडेट, ₹62 चा शेअर खरेदी करण्यासाठी उडाली लोकांची झुंबड
7
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
8
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
9
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
10
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
11
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
12
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
13
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
14
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
15
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
16
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
17
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
18
Chanakya Niti: रातोरात श्रीमंत व्हाल, जर चाणक्यनीतीच्या 'या' ५ सवयी आजच लावून घ्याल
19
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
20
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
Daily Top 2Weekly Top 5

लेकीच्या माहेरासाठी माय सासरी नांदते...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2021 04:17 IST

मागील मार्च महिन्यापासून कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू आहे. त्यामुळे अनेक मुलींना तसेच बच्चे कंपनीला आपल्या मामाच्या गावाला जाता आलेले नाही. ...

मागील मार्च महिन्यापासून कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू आहे. त्यामुळे अनेक मुलींना तसेच बच्चे कंपनीला आपल्या मामाच्या गावाला जाता आलेले नाही. अक्षय तृतीयेला अनेक मुली माहेरी जाण्याची परंपरा आहे. मात्र यंदा कोरोनामुळे अक्षय तृतीयाही मोठ्या उत्साहात साजरी करता आली नाही.

माझं माहेर माहेर...

कोरोनामुळे आईची भेट होऊ शकली नाही. नऊ ते दहा महिन्यांचा कालावधी झाला, तेव्हाच भेट झाली होती. दरवर्षी उन्हाळ्यात, अक्षय तृतीया, सणावाराला माहेरी जाण्याचा योग येत होता. मात्र कोरोनामुळे माहेरी जाण्याचा योग आलाच नाही.

- योगिता कांबळे

आई-वडील गावी राहतात. सासरी येऊन दहा महिने झाले आहेत. मात्र कोरोनामुळे माहेरच्या मंडळींची भेट होऊ शकली नाही. केवळ फोनवरच ख्यालीखुशाली विचारता येत आहे. प्रत्यक्ष भेट आता कोरोनाचे संकट संपल्यानंतरच होईल.

- वैष्णवी महामुनी

रक्षाबंधनाच्यावेळी भावाची भेट झाली होती. मात्र तेव्हापासून माहेरी जाण्याची ओढ आहे. संचारबंदीमुळे एसटी बसेस तसेच प्रवासासाठी मनाई असल्याने माहेरी जाता आलेले नाही. मुलेही मामाच्या गावाला जाण्यासाठी उत्सुक आहेत.

- वैशाली शिंदे

लागली लेकीची ओढ...

मागील एक वर्षापासून मुलगी माहेरी आलेली नाही. मुलीसोबतच नातवांना भेटण्याची ओढ आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव अधिक असल्याने भेट दुरावत चालली आहे. संकट लवकर संपो आणि आमच्या माय-लेकींची भेट होवो.

- सुनीता आगळे

मागीलवर्षी दिवाळीला मुलगी घरी आली होती, तेव्हापासून तिची अजूनपर्यंत भेट नाही. केवळ फोनवरतीच आणि व्हिडिओ कॉलवरच दररोज संभाषण होत आहे. कोरोनामुळे माणसे दुरावत चालली आहेत.

- राणी ढोले

कोरोनाने अनेक नाती दूर केली. मुलीला माहेरी येण्यापासून रोखले आहे. कधी कोरोना कमी होतो, तर अचानक वाढतो, तर कधी गाड्याच बंद असतात. त्यामुळे मुलीला माहेरी येता आले नाही. आठवण येते.

- सुभद्रा शिंदे

मामाच्या गावाला कधी जायला मिळणार

दरवर्षी उन्हाळ्याच्या सुट्यांत मामाच्या गावाला जात असतो. मात्र गेल्या दोन वर्षांपासून जाता आलेले नाही. कोरोना संपला की मामाच्या गावाला जाऊ, असे आई सांगते. शाळा बंद असल्याने कंटाळाला आला आहे.

-

वर्षभर शाळा बंद असल्याने खूप कंटाळा आला आहे. मामाच्या गावाला वर्षातून दोन ते तीन वेळेस जाणे व्हायचे. मात्र कोरोना आल्यापासून मामाच्या गावाला काही जाता आलेले नाही. आजी-आजोबांचीही भेट झालेली नाही.

-

कोरोनामुळे बाहेर खेळायला जाणेही बंद आहे. घरातच राहून कंटाळा आला आहे. सण-उत्सवाला मामाच्या घरी जात असतो. मात्र यावर्षी मामाही न्यायला आला नाही. त्यामुळे कोरोना संपल्यानंतरच मामाच्या गावाला जाता येणार आहे. -