शहरं
Join us  
Trending Stories
1
8 कोटी, १२ पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
2
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
3
"मनसेचे जे काही नगरसेवक निवडून येतील, तेदेखील पळवतील", भाजपचा राज ठाकरेंना सावधगिरीचा सल्ला
4
गॅल्व्हेस्टनजवळ मेक्सिकन नौदलाच्या विमानाचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
6
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
7
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
8
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
9
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
10
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
11
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
12
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
13
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
14
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
15
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
16
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
17
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
18
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
19
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
20
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
Daily Top 2Weekly Top 5

रस्ता दुभाजकातील वृक्षांना जगविण्यासाठी पालिकेची धडपड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 04:35 IST

उदगीर : शहरातील मुख्य रस्त्याच्या दुभाजकातील वृक्षांना जगविण्याबरोबरच हरित, स्वच्छ व सुंदर उदगीर शहर निर्माण करण्यासाठी पालिकेने पुढाकार ...

उदगीर : शहरातील मुख्य रस्त्याच्या दुभाजकातील वृक्षांना जगविण्याबरोबरच हरित, स्वच्छ व सुंदर उदगीर शहर निर्माण करण्यासाठी पालिकेने पुढाकार घेतला आहे. माझी वसुंधरा अभियानांतर्गत देगलूर रोड व नळेगाव रोडवरील रस्ता दुभाजकातील वृक्षांना पाण्यासाठी वापरलेल्या सलाइनच्या बाटलीचा वापर करण्यात आला आहे. तसेच या दुभाजकातील वृक्षांच्या बाजूने पाण्याच्या टाकाऊ बाटल्यांचा वापर करून सुशोभीकरण करण्यात आले आहे. त्यामुळे शहराच्या वैभवात भर पडण्यास मदत होत आहे.

यंदा फेब्रुवारीत कडक उन्हाळा जाणवू लागला आहे. दरम्यान, पावसाळ्यात नगरपालिकेकडून शहरातील विविध भागांतील मुख्य रस्त्यावरील दुभाजकात मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण करण्यात आले होते. सदरील वृक्षांनी चांगले बाळसे धरले आहे. मात्र या वर्षी आतापासूनच कडक उन्हाळा जाणवत असल्याने हे वृक्ष जगतील की नाही, अशी शंका निर्माण झाली होती. मात्र, पालिकेच्या स्वच्छता विभागाने नामी शक्कल लढवून या वृक्षांना जमविण्याचा संकल्प केला. या वृक्षांना ठिबकने पाणी मिळाल्यास जमिनीत कायम ओलावा टिकून राहील व पाण्याचीही बचत होईल. म्हणून या कर्मचाऱ्यांनी सलाइन बाटल्यांचा वापर करण्याचे ठरविले. पाणी बचत होऊन या वृक्षांच्या मुळांना २४ तास पाणी मिळणार आहे. तसेच कायम ओलावा असल्याने सदरील वृक्ष टवटवीत दिसत आहेत. तसेच दुभाजकातील या वृक्षांच्या भोवती पाण्याच्या टाकाऊ बाटल्यांचा वापर करून सुशोभीकरण करण्यात आले आहे. सदरील बाटलीत रंगीबेरंगी पाणी भरून जमिनीत थोडे रोवले आहे. या बाटल्यांमुळे रस्ता दुभाजकाचे सौंदर्य वाढले आहे. त्यामुळे शहराच्या वैभवात भर पडत आहे. नळेगाव रस्ता हा सामाजिक बांधकाम विभागांतर्गत येतो. तरीही नगरपालिकेने या दुभाजकात वृक्षारोपण करून ती जगली पाहिजेत म्हणून पुढाकार घेतला आहे. शहराचा विकास व वैभव कायम राहावा तसेच पर्यावरण संरक्षण व संवर्धनासाठी आपला हातभार लागावा, म्हणून नगरपालिका माझी वसुंधरा अभियानांतर्गत पुढाकार घेत आहे.

सर्व रोपे जगविण्यावर भर...

नगर परिषदेकडून विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. माझी वसुंधरा अभियानांतर्गत आम्ही हरित, स्वच्छ व सुंदर उदगीरचा संकल्प केला आहे. या वर्षी जी वृक्ष लागवड झाली, ते सर्व वृक्ष जगविण्यावर भर दिला जात आहे. पर्यावरण संरक्षण व संवर्धन ही आपली जबाबदारी आहे. त्यासाठी आम्ही रस्ता दुभाजकातील झाडे, वेली जगविण्यासाठी धडपड करीत आहोत. तसेच शहराच्या वैभवात व सौंदर्यात भर पडावी, म्हणून आम्ही पुढाकार घेत आहोत. नागरिकांकडूनही सहकार्य अपेक्षित आहे, असे नगराध्यक्ष बस्वराज बागबंदे व मुख्याधिकारी भारत राठोड यांनी सांगितले.