शहरं
Join us  
Trending Stories
1
विवेकानंद रॉक मेमोरियल इथं ध्यान अवस्थेत बसले PM मोदी; 'असे' असतील पुढचे ४५ तास 
2
Explainer: छगन भुजबळांच्या मनात चाललंय काय?; 'या' ४ घटनांमुळे निर्माण झालं संशयाचं वातावरण
3
आशिष शेलारांनी घेतली राज ठाकरेंची भेट; विधानपरिषदेच्या जागेवरून निर्माण झालेला तिढा सुटणार?
4
Time Magazine च्या 100 प्रभावशाली कंपन्यांच्या यादीत रिलायन्स, टाटा आणि सीरमचा समावेश
5
गत आर्थिक वर्षांत ६३ बँकांमध्ये १४,५९६ कोटींचे घोटाळे, केवळ ७५४ कोटी वसूल
6
'इंडिया'ची सत्ता आली तर पंतप्रधान कोण होणार? काँग्रेसचे अध्यक्ष खर्गे यांनी दिलं असं उत्तर  
7
धक्कादायक! गटारात स्त्री जातीचं अर्भक सापडलं; साताऱ्यातील घटनेनं खळबळ 
8
२०० पेक्षा अधिक रॅली, रोड शो, सभा, ८० मुलाखती..; देशात PM नरेंद्र मोदींचा तगडा प्रचार
9
"महाराष्ट्रासह या 4 राज्यात काँग्रेस जोरदार मुसंडी मारणार", जयराम रमेश यांचा दावा
10
ब्लॉक सुरु होण्यापूर्वीच लोकलला १५ ते ३० मिनिटांचा लेटमार्क; आज १६१ लोकल फेऱ्या रद्द
11
मृणाल दुसानीसच्या चाहत्यांसाठी खुशखबर! अभिनेत्री लवकरच करणार कलाविश्वात कमबॅक; म्हणाली...
12
रिलायन्सचे पेटीएम, फोनपेला मोठं आव्हान! JioFinance ॲप लाँच; युजर्सना मिळणार 'हे' फायदे
13
"मी भारताकडून खेळणार म्हणजे खेळणारच, बाकी मला...", रियान परागचं विधान
14
६ महिन्यांचे काम अडीच दिवसांत! मध्य रेल्वेच्या 'स्पेशल ब्लॉक'नंतर प्रवाशांना 'स्पेशल' ट्रिटमेंट
15
" ‘इंडिया’चा विजय झाल्यास ४८ तासांत होणार नव्या पंतप्रधानांची घोषणा, असा असेल निवडीचा फॉर्म्युला’’, जयराम रमेश यांचा दावा
16
जम्मू-काश्मीरमध्ये यात्रेकरूंची बस दरीत कोसळली, २१ जणांचा मृत्यू
17
Fact Check : सट्टा बाजाराच्या नावाने व्हायरल होणारी 'लोकसभेची भविष्यवाणी' FAKE; जाणून घ्या सत्य
18
धंगेकरांसह सुषमा अंधारेही अडचणीत येणार?; मंत्री शंभूराज देसाईंनी दिला आक्रमक इशारा
19
सलमान, अजय अन् अक्षयनेही नाकारलेला सिनेमा पडला पदरात! अभिनेत्याचं उजळलं नशीब
20
"तेव्हा तुमचे डोळे कुठे गेले होते?’’, इस्राइलचा हमास समर्थकांना सवाल

सोनखेडमध्ये पुन्हा वानराचा धुमाकूळ; रविवारी पाच जखमी, एक गंभीर

By आशपाक पठाण | Published: December 04, 2022 11:33 PM

निलंगा तालुक्यातील साेनखेड येथे रविवारी सायंकाळी पुन्हा उपद्रवी वानराने धुमाकूळ घालत पाच नागरिकांना जखमी केले.

औराद शहाजानी (जि.लातूर): निलंगा तालुक्यातील साेनखेड येथे रविवारी सायंकाळी पुन्हा उपद्रवी वानराने धुमाकूळ घालत पाच नागरिकांना जखमी केले. दरम्यान, पुन्हा सहा दिवसांनंतर वानराने धुमाकूळ घातल्याने ग्रामस्थांत दहशत पसरली आहे.

साेनखेड येथे गेल्या आठवड्यात उपद्रवी वानराने धुमाकूळ घालत तब्बल ६० नागरिकांवर हल्ला करून जखमी केले हाेते. सदर गावात जिल्ह्यातील अनेक वनविभागाच्या पथकाने पकडण्याचा प्रयत्न केला; पण यश न आल्याने औरंगाबाद येथील खासगी रेस्क्यू टीमला पाचारण करून २७ नाेव्हेंबर रोजी सहा वानराला जेरबंद करून औरंगाबादला घेऊन गेले. यात उपद्रवी वानर पकडल्याचा दावा वनविभागाने केला हाेता; पण त्याच सायंकाळी पुन्हा वानराने पाच ग्रामस्थांचा चावा घेत त्यांना जखमी केले हाेते. यानंतर दाेन दिवस गावात वनविभागाची टीम ठाण मांडुन हाेती. 

रविवार, ४ डिसेंबर रोजी सायंकाळी अचानक वानराने धुमाकूळ सुरू करत गावातील किराणा दुकानात प्रवेश करुन एकाच्या नाकाचा चावा घेतला.इतर चार नागरिकांचा चावा घेत धुमाकूळ घातल्याने या अचानक झालेल्या हल्ल्याने ग्रामस्थ घाबरले असून गावात काठ्या घेऊन फिरावे लागत असल्याचे ग्रामस्थ बजरंग पाटील यांनी सांगितले. रविवारी रात्री उशिरापर्यंत अनेकजण जागरण करीत बसले होते.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :laturलातूर