मराठवाडा मुक्ती संग्राम दिनी मुख्यमंत्री मराठवाड्याच्या विकासासाठी काय घोषणा करणार इकडे सर्वांचे लक्ष लागून होते. पण त्यांनी विकासावर काहीच न बोलता भावी हा शब्द वापरमन मराठवाड्यातील जनतेची दिशाभूल करण्याचे काम केले, असा आरोप आ. निलंगेकर यांनी केला आहे. मुक्ती संग्राम दिन हा निजामाच्या तावडीतून मराठवाडा मुक्त झालेला दिवस. त्यादिवशी मुख्यमंत्री विकासाच्या काही घोषणा करतील अशी अपेक्षा होती. पण त्यांनी विकासाला तर बगल दिलीच पण मराठवाड्यातील जनतेला दिशाभूल करण्याचे काम केले. सध्याचे आघाडी सरकार हे वेगवेगळ्या माध्यमातून मराठवाड्याच्या विकासाला खीळ घालण्याचे काम करत आहे आणि मुक्ती संग्राम दिनीसुद्धा मुख्यमंत्र्यांचे वक्तव्य हे अत्यंत चुकीचे, विकासाला बगल देणारे आहे, अशी टीका त्यांनी केली. मुक्ती संग्राम दिन हा मराठवाड्याच्या दृष्टिकोनातून खऱ्या अर्थाने स्वातंत्र्याचा दिवस. कारण मुक्ती संग्रामदिनी मराठवाडा हा निजामाच्या तावडीतून मुक्त झाला पण लोकांना मुक्ती संग्रम दिनी मुख्यमंत्री काय बोलतील, अशी अपेक्षा असताना केवळ दिशाभूल केल्याचा आरोप आ. पाटील यांनी केला आहे.
मुख्यमंत्र्यांकडून मराठवाड्यातील जनतेची दिशाभूल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2021 04:22 IST