शहरं
Join us  
Trending Stories
1
“भावाला न्याय मिळत नाही तोपर्यंत चप्पल घालणार नाही”; संतोष देशमुख यांच्या बहिणीचा निर्धार
2
वादग्रस्त आयएएस प्रशिक्षणार्थी पूजा खेडकर पुणे पोलिसांत हजर; मनाने आलेली नाही, सामाजिक कार्यकर्त्यांचा आरोप 
3
केवळ १००० रुपयांनी गुंतवणूक करून तुमच्या मुलांना बनवू शकता कोट्यधीश; कोणती आहे ही स्कीम?
4
पाकिस्तानने भारताची भीती घेतली! पीओकेमधील हॉटेल्स अन् गेस्ट हाऊसमध्ये सैन्य; मदरसे बंद
5
पाकिस्तानने अटारी, वाघा बॉर्डरचे गेट उघडले; धास्ती एवढी की पाकिस्तानींनाही घेत नव्हते...
6
प्रेक्षकांचा सूरज चव्हाणला 'गोलीगत धोका', 'झापुक झुपूक'ने पहिल्या आठवड्यात केली फक्त इतकी कमाई
7
श्रीराम दर्शनाची ओढ लागली, ३०० वर्षे जुनी परंपरा मोडली; हनुमानगढीचे महंत मंदिराबाहेर पडले!
8
हवाई दलाचं जबरदस्त शक्तिप्रदर्शन, हायवेवर उतरवली मिराज, राफेलसह ही लढाऊ विमानं
9
सिद्धार्थ-मितालीच्या घरी आला छोटा पाहुणा, फोटो शेअर करत दिली गुड न्यूज
10
WhatsApp वेबवर व्हॉइस आणि व्हिडीओ कॉलिंग फीचर लाँच; आता तुम्ही थेट करू शकता कॉल
11
बजाज चेतकला एप्रिल फूल बनविले; टीव्हीएस पहिल्यांदाच नंबर १, विक्रीत ओला कुठे...
12
पाकिस्तानी हवाई क्षेत्र बंद; एअर इंडियाला 5000 कोटी रुपयांचा फटका बसण्याचा अंदाज...
13
दारूच्या व्यसनाने आई आणि चुलतीचा खून; बीड जिल्हा दोन हत्येच्या घटनांनी हादरला
14
पंकजा मुंडेंना कॉल अन् पाठवला अश्लील मेसेज, पुण्यातील तरुणाला पोलिसांनी केली अटक
15
CEOs चा १ तासाचा पगार सामान्य कर्मचाऱ्याच्या वर्षाच्या पगाराइतका, एका रिपोर्टमध्ये झाले अनेक आश्चर्यकारक खुलासे
16
अन्न पुन्हा गरम करणं आरोग्यासाठी ठरतंय घातक; 'या' ५ गोष्टी टाळाल तरच ठणठणीत राहाल
17
 संतापजनक! मासिक पाळीत स्वयंपाक करणं महिलेच्या जीवावर बेतलं,नणंद आणि सासूने खून केल्याचा आरोप, दोन मुलं अनाथ
18
नवी मुंबईत ठाकरे गटाला खिंडार! माजी नगरसेवकांचे उद्धवसेनेला जय महाराष्ट्र, शिंदेसेनेत प्रवेश
19
"मॅडम येत आहेत, त्यांना..."; पोलीस असल्याचं सांगून दुकानात घुसले अन् २ लाखांचे दागिने चोरले
20
ISI कडून मिळाले आदेश, बेताब खोऱ्यात लपवली शस्त्रे; NIA च्या अहवालात धक्कादायक खुलासा

स्टेट बँकेच्या सुविधांअभावी औरादमध्ये लाखोंचे व्यवहार ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2021 04:25 IST

लातूर जिल्ह्यातील तिसर्या क्रमांकाची बाजारपेठ असलेल्या येथील कृषी उत्पन्न बाजार समितीतील शेतकऱ्यांचे शेतीमालाचे व्यवहार येथील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या ...

लातूर जिल्ह्यातील तिसर्या क्रमांकाची बाजारपेठ असलेल्या येथील कृषी उत्पन्न बाजार समितीतील शेतकऱ्यांचे शेतीमालाचे व्यवहार येथील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेत आहेत. मात्र, याठिकाणी वेळेत कामे होत नसल्याने व्यापार्यांसह शेतकरीही अडचणीत सापडले आहे. परिणामी लाखोंचे व्यवहार ठप्प झाले आहेत.

शेतकरी, आडत व्यापारी, शहरातील अन्य व्यापारी यांचे व्यवहार याच शाखेत आहेत. शिवाय सदर बाजार पेठेत महाराष्ट्र कर्नाटकातील ५० ते ८० गावांचा शेतीमाल विक्रीसाठी येतो. सोबतच इतर बाजारपेठ, कपडा, जनरल, किराणा, मेडिकल, पेट्रोल पंप सह आदी व्यापाऱ्यांच्या आर्थिक व्यवहार खाती याच बँकेत असल्याने दररोज पैसे भरणे काढणे सुरूच असते. शिवाय, एनएफटी, आरटीजीएस चे व्यवहार याच बँकेत केली जातात. सदर बँकेत व्यापाऱ्यांची शेतकऱ्यांना देणे असलेली पेमेंट आरटीजीएस मार्फत केली जातात पण संबंधित बँकेतील कर्मचारी हा सदर नेफ्ट आरटीजीएस व चेक ट्रान्सफर चार ते पाच दिवस न करता तसेच ठेवत असल्याने आर्थिक व्यवहार ठप्प झाले आहेत. त्यामुळे बाजारपेठेत येणारा कृषिमाल हा इतरत्र वळला जात आहे. परिणामी हमाल व मापाडी त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली तर ऐन लग्नसराईत व्यवहारासाठी शेतीमाल घालून शेतकऱ्यांना पैसे मिळत नसल्याने शेतकऱ्यांची अडवणूक होत आहे. यासंबंधी मंगळवारी येथील आडत व्यापारी असोसिएशनने व इतर व्यापाऱ्यांनी एकत्र येऊन बँकेत शाखा व्यवस्थापक यांना मागणीचे निवेदन दिले आहे. यावेळी पूनम राठी, विष्णुदास सोमानी, राजअप्पा वलांडे, विनोद सोनी, अशोक थेटे, शिवपुत्र धबाले, स्वप्नील देवणे, चन्नबस तडाेळगे आदी व्यापारी उपस्थित होते.

वरिष्ठांना माहिती दिली- शाखा व्यवस्थापक

दरम्यान शाखा व्यवस्थापक हरीश तांबे यांच्याशी संपर्क केला असता, ते म्हणाले की संबंधित अधिकारी हा त्यांची नेफ्ट व आरटीजीएस ट्रान्सफरची कामे न करता वेळ घालवतो. ग्राहकांना उध्दट वागतो अशा तक्रारी ग्राहकांच्या आहेत. याची माहिती वरिष्ठांना कळवली आहे. सर्व व्यापारी यांना लवकरच चांगल्या सुविधा बँकेकडून पुरवल्या जातील, असे आश्वासन त्यांनी व्यापारी शिष्टमंडळाला दिले.

याविषयी बँकेचे विभागीय सहाय्यक महाव्यवस्थापक नंदकिशोर भोसले यांच्याशी संपर्क केला असता ते म्हणाले की या विषयीची अद्याप तक्रार झालेली नाही तक्रार आल्यानंतर चौकशीअंती कारवाई करण्यात येईल असे ते म्हणाले