शहरं
Join us  
Trending Stories
1
विरोधकांची इच्छा पूर्ण होणार...? NDA मध्ये फुट पडणार...? "15 जागा मिळाल्या नाही तर..."; 'या' पक्षानं केली मोदींचं टेन्शन वाढवणारी 'मागणी'
2
“ह्याच जागेतून इतिहास घडविला गेला”; हर्षवर्धन सपकाळ यांची लंडन येथील आंबेडकर हाऊसला भेट
3
"पाकिस्तानसोबत मॅच खेळायची असेल तर पहलगाममध्ये मारला गेलेला माझा भाऊ परत आणून द्या"
4
ITR भरण्यासाठी फक्त एक दिवस उरला; पण, 'या' कारणांमुळे करदाते टेन्शनमध्ये; मुदतवाढीसाठी सोशल मीडियावर ट्रेंड
5
'ऑपरेशन सिंदूरदरम्यान काँग्रेस पाकिस्तानी सैन्याच्या बाजूने होती', पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
6
शिक्षिकेचा जडला महिला मुख्याध्यापकावर जीव, प्रेम मिळवण्यासाठी AI टूल्स वापरून रचला भयानक खेळ
7
IND vs PAK: भारत- पाकिस्तान यांच्यातील ५ टी-२० सामन्यांचा रेकॉर्ड, कुणाचं पारडं जड?
8
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना अनुकूलता, यश-प्रगती-लाभ; बुडालेले पैसे मिळतील, वचन देऊ नये!
9
बाहेर ‘झटपट कॉम्प्युटर शिका’ची पाटी, आत वेगळाच खेळ, सापडल्या ९ तरुणी, ४ पुरुष आणि...
10
परी म्हणू की सुंदरा... Gemini Prompt ने 'असा' करा ९० च्या दशकातील 'रेट्रो साडी लूक'
11
"मी शिव भक्त, सर्व विष गिळून टाकतो...", पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; म्हणाले...
12
गृहकर्ज घेताय? जाणून घ्या ५० लाखांच्या कर्जावर कोणत्या बँकेत सर्वात कमी ईएमआय
13
पाकिस्तानविरुद्ध खेळण्यास देशातून तीव्र विरोध, टीम इंडिया दबावात, ड्रेसिंग रूममधून आली अशी बातमी
14
हरमनप्रीत कौरनं रचला इतिहास; आता 'या' दिग्गज खेळाडूंसोबत घेतलं जाईल नाव!
15
Video - अग्निकल्लोळ! गुजरातच्या संघवी ऑर्गेनिक्स फॅक्ट्रीमध्ये भीषण आग, धुराचं साम्राज्य
16
BMW ने कार आणि बाईक्सच्या किमतीत केली मोठी कपात; तब्बल ₹१३.६ लाखांची होणार बचत...
17
सोन्याची विक्रमी झेप! आठवड्यात ३,३०० रुपयांनी महागले; चांदीचाही नवा उच्चांक, आजचा दर काय?
18
टीम इंडियाला धक्का! पाकिस्तानविरूद्धच्या सामन्याआधी शुबमन गिलच्या हाताला दुखापत, अपडेट काय?
19
Sushila Karki: 'आम्ही सत्तेचा आस्वाद घेण्यासाठी आलेलो नाही, ६ महिन्यांतच...' पंतप्रधान सुशीला कार्की 'अ‍ॅक्शन मोड'मध्ये!
20
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी

स्टेट बँकेच्या सुविधांअभावी औरादमध्ये लाखोंचे व्यवहार ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2021 04:25 IST

लातूर जिल्ह्यातील तिसर्या क्रमांकाची बाजारपेठ असलेल्या येथील कृषी उत्पन्न बाजार समितीतील शेतकऱ्यांचे शेतीमालाचे व्यवहार येथील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या ...

लातूर जिल्ह्यातील तिसर्या क्रमांकाची बाजारपेठ असलेल्या येथील कृषी उत्पन्न बाजार समितीतील शेतकऱ्यांचे शेतीमालाचे व्यवहार येथील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेत आहेत. मात्र, याठिकाणी वेळेत कामे होत नसल्याने व्यापार्यांसह शेतकरीही अडचणीत सापडले आहे. परिणामी लाखोंचे व्यवहार ठप्प झाले आहेत.

शेतकरी, आडत व्यापारी, शहरातील अन्य व्यापारी यांचे व्यवहार याच शाखेत आहेत. शिवाय सदर बाजार पेठेत महाराष्ट्र कर्नाटकातील ५० ते ८० गावांचा शेतीमाल विक्रीसाठी येतो. सोबतच इतर बाजारपेठ, कपडा, जनरल, किराणा, मेडिकल, पेट्रोल पंप सह आदी व्यापाऱ्यांच्या आर्थिक व्यवहार खाती याच बँकेत असल्याने दररोज पैसे भरणे काढणे सुरूच असते. शिवाय, एनएफटी, आरटीजीएस चे व्यवहार याच बँकेत केली जातात. सदर बँकेत व्यापाऱ्यांची शेतकऱ्यांना देणे असलेली पेमेंट आरटीजीएस मार्फत केली जातात पण संबंधित बँकेतील कर्मचारी हा सदर नेफ्ट आरटीजीएस व चेक ट्रान्सफर चार ते पाच दिवस न करता तसेच ठेवत असल्याने आर्थिक व्यवहार ठप्प झाले आहेत. त्यामुळे बाजारपेठेत येणारा कृषिमाल हा इतरत्र वळला जात आहे. परिणामी हमाल व मापाडी त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली तर ऐन लग्नसराईत व्यवहारासाठी शेतीमाल घालून शेतकऱ्यांना पैसे मिळत नसल्याने शेतकऱ्यांची अडवणूक होत आहे. यासंबंधी मंगळवारी येथील आडत व्यापारी असोसिएशनने व इतर व्यापाऱ्यांनी एकत्र येऊन बँकेत शाखा व्यवस्थापक यांना मागणीचे निवेदन दिले आहे. यावेळी पूनम राठी, विष्णुदास सोमानी, राजअप्पा वलांडे, विनोद सोनी, अशोक थेटे, शिवपुत्र धबाले, स्वप्नील देवणे, चन्नबस तडाेळगे आदी व्यापारी उपस्थित होते.

वरिष्ठांना माहिती दिली- शाखा व्यवस्थापक

दरम्यान शाखा व्यवस्थापक हरीश तांबे यांच्याशी संपर्क केला असता, ते म्हणाले की संबंधित अधिकारी हा त्यांची नेफ्ट व आरटीजीएस ट्रान्सफरची कामे न करता वेळ घालवतो. ग्राहकांना उध्दट वागतो अशा तक्रारी ग्राहकांच्या आहेत. याची माहिती वरिष्ठांना कळवली आहे. सर्व व्यापारी यांना लवकरच चांगल्या सुविधा बँकेकडून पुरवल्या जातील, असे आश्वासन त्यांनी व्यापारी शिष्टमंडळाला दिले.

याविषयी बँकेचे विभागीय सहाय्यक महाव्यवस्थापक नंदकिशोर भोसले यांच्याशी संपर्क केला असता ते म्हणाले की या विषयीची अद्याप तक्रार झालेली नाही तक्रार आल्यानंतर चौकशीअंती कारवाई करण्यात येईल असे ते म्हणाले