शहरं
Join us  
Trending Stories
1
8 कोटी, १२ पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
2
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
3
"मनसेचे जे काही नगरसेवक निवडून येतील, तेदेखील पळवतील", भाजपचा राज ठाकरेंना सावधगिरीचा सल्ला
4
गॅल्व्हेस्टनजवळ मेक्सिकन नौदलाच्या विमानाचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
6
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
7
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
8
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
9
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
10
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
11
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
12
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
13
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
14
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
15
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
16
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
17
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
18
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
19
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
20
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
Daily Top 2Weekly Top 5

स्टेट बँकेच्या सुविधांअभावी औरादमध्ये लाखोंचे व्यवहार ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2021 04:25 IST

लातूर जिल्ह्यातील तिसर्या क्रमांकाची बाजारपेठ असलेल्या येथील कृषी उत्पन्न बाजार समितीतील शेतकऱ्यांचे शेतीमालाचे व्यवहार येथील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या ...

लातूर जिल्ह्यातील तिसर्या क्रमांकाची बाजारपेठ असलेल्या येथील कृषी उत्पन्न बाजार समितीतील शेतकऱ्यांचे शेतीमालाचे व्यवहार येथील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेत आहेत. मात्र, याठिकाणी वेळेत कामे होत नसल्याने व्यापार्यांसह शेतकरीही अडचणीत सापडले आहे. परिणामी लाखोंचे व्यवहार ठप्प झाले आहेत.

शेतकरी, आडत व्यापारी, शहरातील अन्य व्यापारी यांचे व्यवहार याच शाखेत आहेत. शिवाय सदर बाजार पेठेत महाराष्ट्र कर्नाटकातील ५० ते ८० गावांचा शेतीमाल विक्रीसाठी येतो. सोबतच इतर बाजारपेठ, कपडा, जनरल, किराणा, मेडिकल, पेट्रोल पंप सह आदी व्यापाऱ्यांच्या आर्थिक व्यवहार खाती याच बँकेत असल्याने दररोज पैसे भरणे काढणे सुरूच असते. शिवाय, एनएफटी, आरटीजीएस चे व्यवहार याच बँकेत केली जातात. सदर बँकेत व्यापाऱ्यांची शेतकऱ्यांना देणे असलेली पेमेंट आरटीजीएस मार्फत केली जातात पण संबंधित बँकेतील कर्मचारी हा सदर नेफ्ट आरटीजीएस व चेक ट्रान्सफर चार ते पाच दिवस न करता तसेच ठेवत असल्याने आर्थिक व्यवहार ठप्प झाले आहेत. त्यामुळे बाजारपेठेत येणारा कृषिमाल हा इतरत्र वळला जात आहे. परिणामी हमाल व मापाडी त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली तर ऐन लग्नसराईत व्यवहारासाठी शेतीमाल घालून शेतकऱ्यांना पैसे मिळत नसल्याने शेतकऱ्यांची अडवणूक होत आहे. यासंबंधी मंगळवारी येथील आडत व्यापारी असोसिएशनने व इतर व्यापाऱ्यांनी एकत्र येऊन बँकेत शाखा व्यवस्थापक यांना मागणीचे निवेदन दिले आहे. यावेळी पूनम राठी, विष्णुदास सोमानी, राजअप्पा वलांडे, विनोद सोनी, अशोक थेटे, शिवपुत्र धबाले, स्वप्नील देवणे, चन्नबस तडाेळगे आदी व्यापारी उपस्थित होते.

वरिष्ठांना माहिती दिली- शाखा व्यवस्थापक

दरम्यान शाखा व्यवस्थापक हरीश तांबे यांच्याशी संपर्क केला असता, ते म्हणाले की संबंधित अधिकारी हा त्यांची नेफ्ट व आरटीजीएस ट्रान्सफरची कामे न करता वेळ घालवतो. ग्राहकांना उध्दट वागतो अशा तक्रारी ग्राहकांच्या आहेत. याची माहिती वरिष्ठांना कळवली आहे. सर्व व्यापारी यांना लवकरच चांगल्या सुविधा बँकेकडून पुरवल्या जातील, असे आश्वासन त्यांनी व्यापारी शिष्टमंडळाला दिले.

याविषयी बँकेचे विभागीय सहाय्यक महाव्यवस्थापक नंदकिशोर भोसले यांच्याशी संपर्क केला असता ते म्हणाले की या विषयीची अद्याप तक्रार झालेली नाही तक्रार आल्यानंतर चौकशीअंती कारवाई करण्यात येईल असे ते म्हणाले