शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
4
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
5
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
6
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
7
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
8
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
9
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
10
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
11
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
12
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
13
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
14
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
15
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
16
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
17
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
18
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
19
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
20
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता

मराठा आरक्षण: आता पुढाऱ्यांना गावबंदी, मतदानावर बहिष्कार

By आशपाक पठाण | Updated: October 1, 2023 16:28 IST

मांजरा पट्ट्यात ३० गावांनी घेतली सामुहिक शपथ

लातूर : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी लातूर तालुक्यातील मांजरा पट्टा म्हणून ओळख असलेल्या ३० गावात पुढाऱ्यांना गावबंदी आणि मतदानावर बहिष्कार टाकण्याची शपथच समाजबांधवांनी घेतली आहे. मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावे, या मागणीसाठी गादवड येथे मागील १८ दिवसांपासून साखळी उपोषण आहे.

मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे, जोपर्यंत राज्य सरकार आरक्षण देणार नाही, तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवणार असल्याची भूमिका गादवड येथील समाजबांधवांनी घेतली आहे. तसेच परिसरातील गावांमध्ये जनजागृती करण्यासाठी कार्यकर्ते भेटी घेत आहेत. आरक्षणाच्या मागणीसाठी मागील अनेक वर्षांपासून लढा सुरू आहे. मात्र, सरकार चालढकल करीत असल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे. आता शासनाने ठोस भूमिका घ्यावी, तत्काळ आरक्षण लागू करावे, अशी भूमिका कार्यकर्त्यांनी घेतली आहे. गावोगावी जाऊन समाजातील नागरिकांना एकत्र करून आरक्षणाची गरज लक्षात आणून दिली जात आहे.

या गावांनी घेतली सामुहिक शपथ...

लातूर तालुक्यातील गादवड, तांदुळजा, वांजरखेडा, पिंपळगाव, भोसा, पिंपरी, कानडी बोरगाव, टाकळगाव, सारसा, बोडका, जोडजवळा आदी ३० गावांनी आपापल्या ग्रामदैवताची शपथ घेतली आहे. त्यामुळे आता गावांमध्ये राजकीय पक्षाच्या पुढाऱ्यांना गावबंदी करण्यात आली आहे.

अशी घेतली जात आहे शपथ....मी माझ्या ग्रामदैवताची शपथ घेतो की, जोपर्यंत मराठा आरक्षण मिळणार नाही, तोपर्यंत कोणत्याही निवडणुकीत मतदान करणार नाही. तसेच कुठल्याही राजकीय पक्षाच्या पुढाऱ्यांना गावात येऊ नाही. जोपर्यंत आरक्षण मिळणार नाही, तोपर्यंत हा माझा निश्चय असणार आहे.

टॅग्स :laturलातूर