शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

मांजरा धरण ५० टक्के भरले; अजूनही मोठ्या पावसाची प्रतीक्षा !

By हणमंत गायकवाड | Updated: September 20, 2022 16:03 IST

पूर्ण क्षमतेने पाणी पातळी होण्यासाठी प्रकल्प क्षेत्रात मोठा पाऊस पडणे आवश्यक आहे. 

लातूर : लातूर शहरासह केज, धारूर, अंबाजोगाई, कळंब आदी प्रमुख गावांना पाणी पुरवठा करणारा मांजरा प्रकल्प ५० टक्के भरला असून, ८८.५२५ दलघमी जिवंत पाणीसाठा झाला आहे. यंदाच्या पावसाळ्यात प्रकल्पात ४१.२३८ दलघमीची आवक झाली आहे. दरम्यान, प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरण्यासाठी मोठ्या पावसाची गरज आहे. 

मांजरा धरणाच्यावर अप्पर प्रकल्प आहे. हा प्रकल्पही भरलेला नाही. त्यामुळे मांजरा प्रकल्प अद्याप भरलेला नाही. प्रकल्प क्षेत्रात आतापर्यंत ५१३.५० मि.मी. पाऊस झाला असला तरी धरणात आतापर्यंत ४१.२३८ दलघमी नवीन पाणी आलेले आहे. धरणात एकूण ८८.५२५ दलघमी जिवंत पाणीसाठा आहे. धरणाच्या पाणी पातळीची क्षमता ६४२.३७ मि.मी. आहे. मात्र सध्याची पाण्याची पातळी ६३९.८० मीटर आहे. पूर्ण क्षमतेने पाणी पातळी होण्यासाठी प्रकल्प क्षेत्रात मोठा पाऊस पडणे आवश्यक आहे. 

गेल्या २४ तासामध्ये प्रकल्प क्षेत्रात १२.५० मि.मी. पाऊस झाला आहे. त्यातून १.०९६ दलघमी पाण्याची आवक झालेली आहे. ही आवक गेल्या २४ तासांतील आहे. धरणात सध्या जिवंत साठा ८८.५२५ दलघमी आहे. पण जिवंत पाणीसाठ्याची क्षमता १७६.९६३ दलघमी आहे. ही क्षमता गाठण्यासाठी प्रकल्प क्षेत्रात पाऊस होणे गरजेचे असल्याचे शाखाधिकारी सूरज निकम यांनी सांगितले.

 

टॅग्स :laturलातूरManjara Damमांजरा धरण