शहरं
Join us  
Trending Stories
1
“पाक कायम शत्रू, मोदी-शाहांनी परवानगी दिल्यास युद्धास जायला तयार”; कर्नाटकातील मंत्री आक्रमक
2
Charanjit Singh Channi : "सर्जिकल स्ट्राईकचा पुरावा मागत नाही"; टीकेची झोड उठताच चरणजीत सिंग चन्नी यांचा यू-टर्न
3
पाकिस्तानची आर्थिक कोंडी; भारताने ट्रेड स्ट्राईक करत आयातीवर घातली बंदी, जहाजांचा मार्ग रोखला
4
“मोदींनी अद्यापही युद्ध सुरू केलेले नाही, त्यांची मानसिकता...”; संजय राऊतांची पुन्हा टीका
5
Narasimha Navratri 2025: आजपासून ११ मे पर्यंत नृसिंह नवरात्रीत न विसरता म्हणा 'हे' तापमुक्ती देणारे स्तोत्र!
6
Bhiwandi Crime: पती कामावरून घरी आला अन् पत्नीसह तीन लेकींचे मृतदेहच दिसले, पोलिसही हादरले!
7
Delhi Rains : हृदयद्रावक! मुसळधार पावसामुळे उद्ध्वस्त झालं कुटुंब; २० दिवसांपूर्वी आलेल्या ४ जणांचा मृत्यू
8
House Arrest Ullu app: एजाज खानच्या अडचणी वाढल्या! 'हाउस अरेस्ट शो' प्रकरणात पोलिसांकडून पहिली अ‍ॅक्शन
9
तुम्हाला धीरुभाई अंबानींचं खरं नाव माहितीये का, कोणत्या वयात उभी केलेली रिलायन्स?
10
Pune Crime: 'कोयता काढला अन्...'; पुण्यातील बिबवेवाडीत भररस्त्यात थरकाप उडवणारी घटना, व्हिडीओ व्हायरल
11
गोव्यातील लईराई जत्रोत्सवात चेंगराचेंगरी, CM प्रमोद सावंतांची प्रतिक्रिया; म्हणाले, “५० हजार लोक...”
12
रोज १२ तास मोबाईलवर गेम खेळायचा मुलगा; पाठीच्या कण्याचे वाजले तीन तेरा, परिस्थिती गंभीर
13
Charanjit Singh Channi : "सर्जिकल स्ट्राईक कुठेही दिसला नाही, जर बॉम्ब पडला तर…"; काँग्रेस नेत्याने मागितले पुरावे
14
लईराई देवी यात्रा चेंगराचेंगरी: यात्रेला आले अन् काकू-पुतण्याने गमावला जीव, मृतांची नावे आली समोर
15
मुकेश अंबानींची 'ही' कंपनी IPO साठी करतेय तयारी, नफ्यासाठी रणनीतीमध्ये केला बदल
16
लईराई देवीच्या जत्रोत्सवात चेंगराचेंगरी; ६ भाविकांचा मृत्यू, ४० जण जखमी, उत्सवाला गालबोट
17
Ladki Bahin Yojana: अक्षय्य तृतीयेला येणार होते, पण अजून ‘लाडकी बहीण’चे पैसे आले नाहीत; नेमका का होतोय उशीर?
18
५०० वर्षांनी गुरु अतिचारी गोचर: ६ राशींना लाभ, गुरु करेल मालामाल; अच्छे दिन येणार, शुभ घडणार!
19
IPO आणण्याची तयारी करतेय कंपनी; बुमराह, रोहित शर्मा, आमिर खान यांनीही केली गुंतवणूक; जाणून घ्या 
20
"हेच कारण आहे पहलगाममध्ये जे झालं ते..," असं काय म्हणाला सोनू निगम; दाखल झाला FIR

महावितरणने नळयोजनेचा वीजपुरवठा पुन्हा तोडला; औश्यात निर्जळी!

By हरी मोकाशे | Updated: March 25, 2023 16:04 IST

औसा नगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडे महावितरणाची जवळपास दीड ते दोन कोटी रुपयांची थकबाकी आहे.

औसा : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या जलशुद्धीकरण केंद्राचा वीजपुरवठा शुक्रवारी बंद करण्यात आला. पालिकेकडे जवळपास दीड कोटींची थकबाकी असून, ती न भरल्यामुळे महावितरणाने ही कारवाई केली. वीज खंडित करण्याची ही चौथी वेळ आहे. परिणामी, शहराचा पाणीपुरवठा बंद झाल्याने उन्हाळ्यात नागरिकांना निर्जळीचा सामना करावा लागत आहे.

औसा नगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडे महावितरणाची जवळपास दीड ते दोन कोटी रुपयांची थकबाकी आहे. पालिकेने केवळ १० ते २० लाख रुपये भरले आहेत. संपूर्ण वीजबिल भरण्याबाबत महावितरणकडून सातत्याने तगादा सुरु आहे. नळपट्टी वसुलीचे प्रमाण अत्यंत कमी असल्यामुळे संपूर्ण रक्कम भरण्यास पालिका असमर्थ आहे, असे पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचे अभियंता सोनवणे यांनी सांगितले.

शहरात सध्या ४ हजार ३०० अधिकृत नळ कनेक्शन असून अनधिकृत नळ कनेक्शनची संख्याही तेवढीच असल्याची माहिती पालिकेचे कार्यालयीन अधीक्षक प्रदीप पाटील यांनी दिली. मासिक १५ ते २० लाख रुपये वीजबिल येत असून, पाणीपट्टीची वसुली केवळ २ लाख रुपये होत असल्याचेही पाटील यांनी सांगितले. शहरातील सर्व अनधिकृत नळ कनेक्शन शोधून ते बंद करण्याची मोहीम सुरू केली असल्याचेही ते म्हणाले. दरम्यान, पाणीपुरवठा योजनेचा वीजपुरवठा वारंवार खंडित होत असल्यामुळे शहरात कृत्रिम पाणीटंचाई निर्माण होत आहे. त्याचा फायदा खाजगी पाणीपुरवठा करणाऱ्या टँकर चालकांना होत आहे.

पाणीपुरवठा योजनेचा विद्युत पुरवठा महावितरणने बंद केला आहे. थकबाकी भरण्यासंदर्भात महावितरण कार्यालयाने पत्र दिले आहे. शहरातील सर्वच सार्वजनिक बोअर (कुपनलिका) पालिकेने तात्काळ बंद केले असून, त्याचा वीजबिल भरणा करणे शक्य नाही. त्यामुळे त्याचे स्टार्टर काढून कनेक्शन बंद केले आहेत. अनधिकृत नळ कनेक्शन बंद करण्याची मोहीम राबवली जात असून दोन दिवसांत जवळपास २०० कनेक्शन बंद केले आहेत. शहरातील नळधारकांनी नळपट्टीची बाकी भरुन सहकार्य करावे.- अजिंक्य रणदिवे, मुख्याधिकारी.

टॅग्स :laturलातूरmahavitaranमहावितरण