शहरं
Join us  
Trending Stories
1
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
2
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
3
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
4
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
5
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
6
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
7
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
8
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
9
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
10
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
11
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
12
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
13
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
14
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
15
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
16
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
17
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
18
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
19
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
20
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...

कडक निर्बंधाच्या नावाखाली लॉकडाऊच !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2021 04:20 IST

दिवसा जमावबंदी आणि रात्री संचारबंदीच्या नियमाला पोलीस प्रशासनाकडून कडक अंमलबजावणीला सोमवारी रात्रीच प्रारंभ झाला होता. त्यानुसार मंगळवारी शहरातील सर्व ...

दिवसा जमावबंदी आणि रात्री संचारबंदीच्या नियमाला पोलीस प्रशासनाकडून कडक अंमलबजावणीला सोमवारी रात्रीच प्रारंभ झाला होता. त्यानुसार मंगळवारी शहरातील सर्व व्यापारी प्रतिष्ठाने कडकडीत बंद होती. अत्यावश्यक सेवेतील आस्थापने वगळता अन्य आस्थापने बंद राहिली. प्रार्थनास्थळे, शाळा-महाविद्यालये, हॉटेल्स, खानावळी, बार, परमिट रुम, हेअर सलून, ब्युटी पार्लर बंद होती. कपडा, सराफा, लोखंड बाजार, गंजगोलाईतील भुसार लाईन, मेन रोड, गल्लीबोळातील दुकाने बंदच होती. ऑटोरिक्षा, टॅक्सी, बसेस सुरू होत्या. मात्र त्यांना प्रवासी नसल्यामुळे ताटकळत थांबावे लागले. दिवसा पाचपेक्षा अधिक लोकांना एकत्र येण्यास निर्बंध असल्याने गर्दी त्या तुलनेत विरळच होती. छोट्या-मोठ्या हॉटेलमधून मात्र पार्सल सेवा सुरू होती. दरम्यान, जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी., जिल्हा पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांनी फेसबुक लाईव्हद्वारे सोमवारी रात्री काय बंद, काय चालू या संदर्भात माहिती दिली होती. मात्र जनतेमध्ये संभ्रम मंगळवारी दिवसभर कायम होता. शासनाने दिलेल्या आदेशानुसार सार्वजनिक मैदाने, मॉल्स, बाजारपेठा, आठवडी बाजार, खाजगी कार्यालये, सिनेमागृह, व्हिडिओगृहे, प्रेक्षकगृह, करमणूक पार्क, स्वीमिंग टँक, प्लेईंग कार्ड, व्यायामशाळा, जीम, योगा क्लासेस, नृत्यवर्ग, केशकर्तनालय, ब्युटी पार्लर तसेच सामाजिक, राजकीय, धार्मिक कार्यक्रमांना बंदी आहे.

नियोजित लग्नाचा बस्ता कोठून बांधायचा?

नियोजित लग्नासाठी ५० लोकांना मुभा आहे. घरच्या घरी लग्न करण्यास परवानगी आहे. परंतु, या लग्नासाठी खरेदी कोठून करायची, असा प्रश्न बाजारात व्यापाऱ्यांसह नागरिकांनी उपस्थित केला.

ब्रेक दी चैन नसून, हार्ट दी ब्रेक

शासनाने कोरोनावर औषधोपचार, यंत्रसामुग्रीची सोय तसेच चाचणी, लसीकरण वाढवून कोरोनाला रोखायला हवे होते. कडक निर्बंधाच्या नावाखाली लॉकडाऊन लादायला नको होता. या कडक निर्बंधामुळे ब्रेक दी चैन होणार नसून, व्यापाऱ्यांचे हार्ट ब्रेक होईल, अशा शब्दात या निर्बंधाचा निषेध व्यापारी महासंघाचे प्रदीप सोलंकी यांनी केला.

मानसिकतेवर परिणाम होण्याची शक्यता

शासन, प्रशासनाच्या आवाहनाला नेहमीच व्यापाऱ्यांचा प्रतिसाद राहिला आहे. मागील ३२ दिवसांच्या लॉकडाऊनमुळे व्यापाऱ्यांची आर्थिकच नव्हे तर मानसिक अवस्था बिघडलेली आहे. एप्रिल, मे या दोन महिन्यांतच ५० ते ६० टक्के व्यवसाय वर्षभराचा होत असतो. आता याच महिन्यात लॉकडाऊन केल्याने व्यापारी कसे तगणार, असा प्रश्नही काही व्यापाऱ्यांनी उपस्थित केला. जून,जुलै महिन्यात पावसाळा सुरू होतो. त्यावेळी व्यवसायही थंड राहतो.