शहरं
Join us  
Trending Stories
1
संन्यस्त खड्ग नाटकावरुन पुण्यात वंचितच्या कार्यकर्त्यांचा राडा; यशवंत नाट्यगृहात घोषणाबाजी, पोलिसांचा फौजफाटा तैनात
2
अखेर ज्वालामुखी फुटलाच...! सत्य ठरली नव्या बाबा वेंगाची भविष्यवाणी! जपानमध्येही इतर भयावह भाकितं ठरतायत खरी!
3
IND vs ENG 3rd Test: नो आघाडी...नो पिछाडी; लॉर्ड्सच्या मैदानातील टेस्ट मॅचमध्ये पहिल्यांदाच 'टाय'चा ट्विस्ट!
4
समाज कंटकांनी कावड यात्रा मार्गावर टाकले काचेचे तुकडे; भाजप नेत्याचा दावा
5
अनैतिक संबंधांचा संशय, पतीनं अभिनेत्री पत्नीवर आधी 'पेर स्प्रे' मारला, मग चाकूनं सपासप वार केले अन्...
6
IND vs ENG : इंग्लंडच्या सलामीवीरांची 'नौटंकी'! टीम इंडियाचा 'सेनापती' गिलनं असा काढला राग (VIDEO)
7
'फ्यूल कंट्रोल स्विच'संदर्भात ही एक गोष्ट ऐकली असती तर अहमदाबाद विमान अपघात टळला असता? FAA नं 2018 मध्येच दिला होता इशारा
8
इगा स्वियातेक विम्बल्डनची नवी सम्राज्ञी! तिनं अमांडा अनिसिमोव्हाला रडवलं! १९८८ नंतर पहिल्यांदाच असं घडलं
9
"एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्याने वाईट वाटलं आणि घरी निघून गेलो,पण पुन्हा..."; रवींद्र चव्हाणांचा गौप्यस्फोट
10
मायक्रोसॉफ्टने AI वापरून वाचवले ४,२०० कोटी; पण १५,००० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं
11
शेवटच्या 3 सेकंदांत 'RUN' वरून 'CUTOFF' झालं 'फ्यूल कंट्रोल स्विच' अ्न...; एअर इंडिया प्लेन क्रॅशवेळी शेवटच्या क्षणाला नेमकं काय घडलं?
12
४०० प्लस धावांसह इंग्लंडच्या मैदानात रिषभ पंतचा 'भीम पराक्रम'! MS धोनीलाही जमलं नाही ते करून दाखवलं
13
"माझा नातेवाईक का असेना, टायरमध्ये घालून झोडायला सांगणार"; बारामतीत अजित पवारांचा कडक इशारा
14
मुलगी म्हणतेय, 'माझ्यावर हॉस्टेलमध्ये अत्याचार झाला'; वडील म्हणाले, 'ती कारमधून पडली'
15
KL राहुलची विक्रमी सेंच्युरी; लॉर्ड्सच्या मैदानात अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा भारतीय
16
भारतातील रस्त्यावरही टेस्लाच्या कार धावणार; या दिवशी पहिलं शोरूम सुरू होणार, लवकरच डिलिव्हरी सुरू होईल
17
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
18
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
19
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
20
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य

कडक निर्बंधाच्या नावाखाली लॉकडाऊच !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2021 04:20 IST

दिवसा जमावबंदी आणि रात्री संचारबंदीच्या नियमाला पोलीस प्रशासनाकडून कडक अंमलबजावणीला सोमवारी रात्रीच प्रारंभ झाला होता. त्यानुसार मंगळवारी शहरातील सर्व ...

दिवसा जमावबंदी आणि रात्री संचारबंदीच्या नियमाला पोलीस प्रशासनाकडून कडक अंमलबजावणीला सोमवारी रात्रीच प्रारंभ झाला होता. त्यानुसार मंगळवारी शहरातील सर्व व्यापारी प्रतिष्ठाने कडकडीत बंद होती. अत्यावश्यक सेवेतील आस्थापने वगळता अन्य आस्थापने बंद राहिली. प्रार्थनास्थळे, शाळा-महाविद्यालये, हॉटेल्स, खानावळी, बार, परमिट रुम, हेअर सलून, ब्युटी पार्लर बंद होती. कपडा, सराफा, लोखंड बाजार, गंजगोलाईतील भुसार लाईन, मेन रोड, गल्लीबोळातील दुकाने बंदच होती. ऑटोरिक्षा, टॅक्सी, बसेस सुरू होत्या. मात्र त्यांना प्रवासी नसल्यामुळे ताटकळत थांबावे लागले. दिवसा पाचपेक्षा अधिक लोकांना एकत्र येण्यास निर्बंध असल्याने गर्दी त्या तुलनेत विरळच होती. छोट्या-मोठ्या हॉटेलमधून मात्र पार्सल सेवा सुरू होती. दरम्यान, जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी., जिल्हा पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांनी फेसबुक लाईव्हद्वारे सोमवारी रात्री काय बंद, काय चालू या संदर्भात माहिती दिली होती. मात्र जनतेमध्ये संभ्रम मंगळवारी दिवसभर कायम होता. शासनाने दिलेल्या आदेशानुसार सार्वजनिक मैदाने, मॉल्स, बाजारपेठा, आठवडी बाजार, खाजगी कार्यालये, सिनेमागृह, व्हिडिओगृहे, प्रेक्षकगृह, करमणूक पार्क, स्वीमिंग टँक, प्लेईंग कार्ड, व्यायामशाळा, जीम, योगा क्लासेस, नृत्यवर्ग, केशकर्तनालय, ब्युटी पार्लर तसेच सामाजिक, राजकीय, धार्मिक कार्यक्रमांना बंदी आहे.

नियोजित लग्नाचा बस्ता कोठून बांधायचा?

नियोजित लग्नासाठी ५० लोकांना मुभा आहे. घरच्या घरी लग्न करण्यास परवानगी आहे. परंतु, या लग्नासाठी खरेदी कोठून करायची, असा प्रश्न बाजारात व्यापाऱ्यांसह नागरिकांनी उपस्थित केला.

ब्रेक दी चैन नसून, हार्ट दी ब्रेक

शासनाने कोरोनावर औषधोपचार, यंत्रसामुग्रीची सोय तसेच चाचणी, लसीकरण वाढवून कोरोनाला रोखायला हवे होते. कडक निर्बंधाच्या नावाखाली लॉकडाऊन लादायला नको होता. या कडक निर्बंधामुळे ब्रेक दी चैन होणार नसून, व्यापाऱ्यांचे हार्ट ब्रेक होईल, अशा शब्दात या निर्बंधाचा निषेध व्यापारी महासंघाचे प्रदीप सोलंकी यांनी केला.

मानसिकतेवर परिणाम होण्याची शक्यता

शासन, प्रशासनाच्या आवाहनाला नेहमीच व्यापाऱ्यांचा प्रतिसाद राहिला आहे. मागील ३२ दिवसांच्या लॉकडाऊनमुळे व्यापाऱ्यांची आर्थिकच नव्हे तर मानसिक अवस्था बिघडलेली आहे. एप्रिल, मे या दोन महिन्यांतच ५० ते ६० टक्के व्यवसाय वर्षभराचा होत असतो. आता याच महिन्यात लॉकडाऊन केल्याने व्यापारी कसे तगणार, असा प्रश्नही काही व्यापाऱ्यांनी उपस्थित केला. जून,जुलै महिन्यात पावसाळा सुरू होतो. त्यावेळी व्यवसायही थंड राहतो.