शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
4
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
5
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
6
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
7
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
8
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
9
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
10
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
11
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
12
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
13
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
14
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
15
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
16
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
17
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
18
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
19
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
20
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
Daily Top 2Weekly Top 5

परिवर्तनाची ठोस भूमिका साहित्याने घेतली पाहिजे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2021 04:24 IST

उदगीर : जागतिकीकरणाची प्रक्रिया प्राचीन आहे. ती परंपरेने चालत ब्रिटीश काळापर्यंत सुरू राहिली. भारतात ब्रिटीश कालखंडात जागतिकीकरण सुरू होते. ...

उदगीर : जागतिकीकरणाची प्रक्रिया प्राचीन आहे. ती परंपरेने चालत ब्रिटीश काळापर्यंत सुरू राहिली. भारतात ब्रिटीश कालखंडात जागतिकीकरण सुरू होते. १९६०नंतर साहित्य प्रवाह बदलले. १९८०मध्ये अर्थकारणाचा परिणाम झाला. त्यामुळे भाषा व साहित्यात बदल होत गेले. परिवर्तनाची ठोस भूमिका साहित्याने घेतली पाहिजे, असे मत प्राचार्य डॉ. वसंत बिरादार यांनी व्यक्त केले.

येथील शिवाजी महाविद्यालय व स्वारातीम विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मराठी विभागाने ‘जागतिकीकरण आणि मराठी साहित्य : प्रभाव, परिणाम व आव्हाने’ या विषयावर आयोजित एकदिवसीय राष्ट्रीय ऑनलाईन चर्चासत्रात ते बोलत होते. या चर्चासत्राचे उद्घाटन कि. शि. प्र. मंडळाचे सचिव ज्ञानदेव झोडगे यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी डाॅ. विनायकराव जाधव होते. यावेळी बीजभाषण डॉ. साहेब खंदारे यांचे झाले.

शोधनिबंध वाचन सत्राच्या अध्यक्षस्थानी उदयगिरी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. राजकुमार मस्के होते. दहा शोधनिबंध यावेळी सादर करण्यात आले. यावेळी डॉ. मस्के म्हणाले की, जागतिकीकरणाने मनुष्याची जगण्याची पद्धत बदलली. जागतिकीकरणात पैसा मोठा व माणूस छोटा झाला. कुटुंब व्यवस्था उद्ध्वस्त झाली. संवेदनशील साहित्यिकांनी या घटना व घडामोडींची नोंद घ्यायला हवी. यावेळी उपप्राचार्य डॉ. आर. एम. मांजरे उपस्थित होते. समारोपावेळी सहयोगी प्रा. डॉ. स्नेहा महांबरे, सहयोगी प्रा. डॉ. पी. विठ्ठल, कि. शि. प्र. मंडळाचे उपाध्यक्ष अशोकराव पाटील राजूरकर, उपप्राचार्य डॉ. एस. व्ही. जगताप उपस्थित होते. प्रास्ताविक डॉ. सुरेश शिंदे यांनी, सूत्रसंचालन प्रा. देविदास गायकवाड यांनी केले. सहसंयोजक डॉ. नरसिंग कदम यांनी आभार मानले. तंत्रसाह्य ग्रंथपाल डॉ. विष्णू पवार यांनी केले.