शहरं
Join us  
Trending Stories
1
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
2
दीपूचंद्र दासच्या मित्रांनीच केली 'गद्दारी', मारणाऱ्या धर्मांध जमावातच झाले सामील अन्...! सामोर आलं धक्कादायक सत्य
3
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
4
इंडिगो एअरलाइन्स मार्चनंतर तुर्कीकडून घेतलेली विमानांचे उड्डाण करणार नाही; DGCA ने दिला स्पष्ट नकार
5
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
6
आठ कोटी, बारा पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
7
८ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळवा ३,२८,००० रुपये फिक्स व्याज! ज्येष्ठ नागरिकांसाठी पोस्टाची 'खास' भेट
8
"मनसेचे जे काही नगरसेवक निवडून येतील, तेदेखील पळवतील", भाजपचा राज ठाकरेंना सावधगिरीचा सल्ला
9
गॅल्व्हेस्टनजवळ मेक्सिकन नौदलाच्या विमानाचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
10
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
11
२०२५चे शेवटचे पंचक: ५ दिवस अशुभ, पण ‘ही’ कामे करणे शुभ; दोष लागणार नाही, नेमके काय टाळावे?
12
Bigg Boss Marathi: लावणी डान्सरला 'बिग बॉस मराठी'ची ऑफर? म्हणाली- "मला त्यांच्याकडून मेल आलाय..."
13
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
14
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
15
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
16
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
17
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
18
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
19
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
20
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
Daily Top 2Weekly Top 5

परिवर्तनाची ठोस भूमिका साहित्याने घेतली पाहिजे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2021 04:24 IST

उदगीर : जागतिकीकरणाची प्रक्रिया प्राचीन आहे. ती परंपरेने चालत ब्रिटीश काळापर्यंत सुरू राहिली. भारतात ब्रिटीश कालखंडात जागतिकीकरण सुरू होते. ...

उदगीर : जागतिकीकरणाची प्रक्रिया प्राचीन आहे. ती परंपरेने चालत ब्रिटीश काळापर्यंत सुरू राहिली. भारतात ब्रिटीश कालखंडात जागतिकीकरण सुरू होते. १९६०नंतर साहित्य प्रवाह बदलले. १९८०मध्ये अर्थकारणाचा परिणाम झाला. त्यामुळे भाषा व साहित्यात बदल होत गेले. परिवर्तनाची ठोस भूमिका साहित्याने घेतली पाहिजे, असे मत प्राचार्य डॉ. वसंत बिरादार यांनी व्यक्त केले.

येथील शिवाजी महाविद्यालय व स्वारातीम विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मराठी विभागाने ‘जागतिकीकरण आणि मराठी साहित्य : प्रभाव, परिणाम व आव्हाने’ या विषयावर आयोजित एकदिवसीय राष्ट्रीय ऑनलाईन चर्चासत्रात ते बोलत होते. या चर्चासत्राचे उद्घाटन कि. शि. प्र. मंडळाचे सचिव ज्ञानदेव झोडगे यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी डाॅ. विनायकराव जाधव होते. यावेळी बीजभाषण डॉ. साहेब खंदारे यांचे झाले.

शोधनिबंध वाचन सत्राच्या अध्यक्षस्थानी उदयगिरी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. राजकुमार मस्के होते. दहा शोधनिबंध यावेळी सादर करण्यात आले. यावेळी डॉ. मस्के म्हणाले की, जागतिकीकरणाने मनुष्याची जगण्याची पद्धत बदलली. जागतिकीकरणात पैसा मोठा व माणूस छोटा झाला. कुटुंब व्यवस्था उद्ध्वस्त झाली. संवेदनशील साहित्यिकांनी या घटना व घडामोडींची नोंद घ्यायला हवी. यावेळी उपप्राचार्य डॉ. आर. एम. मांजरे उपस्थित होते. समारोपावेळी सहयोगी प्रा. डॉ. स्नेहा महांबरे, सहयोगी प्रा. डॉ. पी. विठ्ठल, कि. शि. प्र. मंडळाचे उपाध्यक्ष अशोकराव पाटील राजूरकर, उपप्राचार्य डॉ. एस. व्ही. जगताप उपस्थित होते. प्रास्ताविक डॉ. सुरेश शिंदे यांनी, सूत्रसंचालन प्रा. देविदास गायकवाड यांनी केले. सहसंयोजक डॉ. नरसिंग कदम यांनी आभार मानले. तंत्रसाह्य ग्रंथपाल डॉ. विष्णू पवार यांनी केले.