शहरं
Join us  
Trending Stories
1
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
2
Mig 21 : ६० वर्षांत पाकिस्तानला अनेकदा दिली मात; निरोप घेण्यापूर्वी लढाऊ विमान 'मिग-२१'ने केले शेवटचे उड्डाण!
3
Rain Update : बाप्पाच्या स्वागतासाठी पावसाच्या 'पायघड्या'; पुढचे चार दिवस 'झोडपणार', कोणत्या भागांना इशारा?
4
जगातील सगळ्यात महागडी ७ शहरे! 'या' ठिकाणी राहायचा विचार करत असाल तर आताच जाणून घ्या...
5
नागपुरातील रस्त्यांवर कुत्र्यांना खाऊ घालाल तर खबरदार! कारवाईसाठी रहा तयार
6
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द
7
‘रोजगार महाकुंभ’चे आयोजन; ५०,००० हून अधिक तरुणांना नोकऱ्या देणार योगी सरकार!
8
विमान हवेतच गायब झालं! २२ दिवसापूर्वी तस्मानियाहून उड्डाण केलं होतं; नेमकं काय घडलं?
9
Beed: लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर गेवराईत हल्ला; आमदार पंडित यांचे कार्यकर्ते आक्रमक
10
क्षुल्लक कारणावरून वाद झाला, बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडच्या तोंडात बॉम्ब टाकला अन्...; घटना ऐकून होईल अंगाचा थरकाप!
11
Atharva Sudame : 'अक्कल शिकवतोय, तुझा धंदा मर्यादित ठेव'; अथर्व सुदामेला ब्राह्मण महासंघानेही सुनावले
12
एकाच घरात का केलं दोन्ही मुलींचं लग्न? निक्की भाटीच्या वडिलांनी सांगितलं कारण! म्हणाले...
13
"राज ठाकरे साहेब, आपण..."; हकालपट्टीनंतर वैभव खेडेकरांनी सोडलं मौन, राणेंच्या भेटीबद्दल काय सांगितलं?
14
"गौतम एका ठिकाणी बसून ओरडत होता"; सिंहगड किल्ल्यावरून बेपत्ता झालेल्या तरुणाला पोलिसांनी कसं शोधलं?
15
"कुटुंबाला सांगू नका, लोकांकडून पैसे घेऊन अंत्यसंस्कार करा"; मनातील वेदना कागदावर लिहून तरुणाने संपवलं आयुष्य
16
Video: कार चालकाने अचानक दरवाजा उघडला; क्रिकेटर थेट धडकला, जागीच मृत्यू
17
याला म्हणतात परतावा...! 11403% ने वाढला हा स्टॉक, आता कंपनीला DRDO कडून मिळाली ₹3.36 कोटींची ऑर्डर, शेअरची किंमत 200 हून कमी!
18
मोबाइल हॅक झाला आहे का? हे संकेत ओळखा आणि लगेच पावलं उचला
19
अथर्व सुदामेवर टीकेचा भडीमार, असिम सरोदे मैदानात; म्हणाले, "राज ठाकरेंनी तुझं कौतुक केलंय, तू..."
20
"पप्पांनीच मम्मीला काठीने मारलं, पंख्याला लटकवलं..."; ३ वर्षांच्या लेकीने केली हत्येची पोलखोल

लिंबोटीचे पाणी अहमदपुरात पोहोचले, वितरण व्यवस्थेतील त्रुटी सुटेनात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2021 04:20 IST

अहमदपूर : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या लिंबोटी प्रकल्पावरूनच्या जलवाहिनीचे काम पूर्ण झाले असून, शहरातील जुन्या फिल्टर येथे पाणी पोहोचले आहे. ...

अहमदपूर : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या लिंबोटी प्रकल्पावरूनच्या जलवाहिनीचे काम पूर्ण झाले असून, शहरातील जुन्या फिल्टर येथे पाणी पोहोचले आहे. मात्र, वितरण व्यवस्थेतील त्रुटींमुळे शहरवासीयांना अद्याप सुरळीत पाणीपुरवठा होण्याची चिन्हे दिसत नाहीत. त्यामुळे नियमित पाणीपुरवठा अजूनही शहरवासियांना मृगजळच ठरत आहे.

तीन वर्षांपासून प्रलंबित असलेल्या पाणीपुरवठा योजनेचे केवळ जलवाहिनीचे काम पूर्ण झाले असून, शनिवारी पाणी शहरातील जुन्या फिल्टरमध्ये दाखल झाले. विद्युत पंप कार्यान्वित होऊन १९ दिवस झाले. १९ किमीच्या जलवाहिनीतून पाणी प्रवासासाठी पालिकेला १९ दिवस परिश्रम घ्यावे लागले. अनेक ठिकाणी गळती होणे, मोठे व्हॉल्व फुटणे, एअर वॉल बंदमुळे जलवाहिनी फुटणे असे प्रकार झाले. त्यामुळे जलवाहिनीच्या तांत्रिक दर्जावरही प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे.

महाराष्ट्र जीवन प्राधिकरण व पालिका प्रशासनाच्या प्रयत्नाने हे पाणी शहरातील जुन्या फिल्टरमध्ये आले असून आता यापुढे नियमित पाणीपुरवठा होण्यासाठी मोठ्या फिल्टरचे काम होणे गरजेचे आहे. लिंबोटीवरील पंप पूर्णक्षमतेने अजून सुरू केले नसून, त्यांची क्षमता ६५ लाख लीटर आहे. मात्र, शहरातील फिल्टरची क्षमता केवळ ४० लक्ष लीटर प्रति दिन असल्यामुळे पाणी जास्त येऊनही फिल्टर होणार नसल्यामुळे पाणीपुरवठा नियमित व सुरळीत होणार नाही.

नवीन फिल्टरचे काम अजून सहा महिने होणार नसल्याचे कामाच्या प्रगतीवरून दिसत आहे, तसेच शहरातील वितरण प्रणालीचे ८० टक्के काम पूर्ण झाले असून, २० टक्के कामामुळे वितरण प्रणालीही कार्यान्वित होणार नसल्याचे समजते. त्यामुळे अहमदपूरकरांना नियमित पाणीपुरवठ्यासाठी आणखीन काही काळ वाट पाहावी लागणार आहे.

सुरळीत पाणीपुरवठा करावा...

गुत्तेदाराने दर्जाहिन काम केल्यामुळे १९ किमीसाठी १९ दिवस लागले. शहरातील फिल्टरचे काम आणखीन सहा महिने होणार नाही. वितरण व्यवस्थेचे कामही प्रलंबित आहे. गुत्तेदाराच्या चुकीमुळे अहमदपूरकरांना सुरळीत पाणीपुरवठा होणार नाही. त्यामुळे नगरसेवक रवि महाजन व संदीप चौधरी यांनी पाण्याच्या टाकीवर जाऊन पालिका व गुत्तेदाराच्या निषेधार्थ २६ जानेवारी आंदोलन करणार असल्याचे सांगितले.

नियमित पुरवठ्यासाठी वेळ लागणार...

नियमित पाणीपुरवठ्यासाठी नवीन फिल्टर व्यवस्था सुरू होणे गरजेचे आहे. सध्या जलवाहिनीची ६५ लक्ष लीटर दररोज क्षमता असताना, फिल्टर मात्र ४० लाख लीटरने काम करीत आहे. त्यामुळे शहरवासीयांना आणखीन काही काळ प्रतीक्षा करावी लागणार आहे, असे पालिकेचे मुख्याधिकारी त्र्यंबक कांबळे यांनी सांगितले.