शहरं
Join us  
Trending Stories
1
पहिली ते चौथी हिंदी भाषा नको, अजित पवारांची भूमिका; भाजपामुळे होतेय एकनाथ शिंदेंची कोंडी?
2
महाराष्ट्रातील खासदाराच्या ड्रायव्हरला ड्रायव्हरला १५० कोटी रुपयांची जमीन कोणी भेट दिली?,चौकशी सुरू
3
हे आहेत अंतराळात सर्वाधिक दिवस घालवणारे अंतराळवीर; जाणून घ्या पहिल्या क्रमांकावर कोण..?
4
"एक-दोन नव्हे, माझ्या जावयाच्या १२ गर्लफ्रेंड"; पत्नीला संपवणाऱ्या पतीची सासूने केली पोलखोल
5
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
6
Jio-Blackrock ला मिळाला ब्रोकिंग लायसन्स; अंबानींच्या या कंपनीचे शेअर्स सुस्साट, तुमच्याकडे आहे का?
7
"चौथीपर्यंत हिंदी लादणं योग्य नाही, पण देशात ५० टक्के लोक हिंदीत बोलतात, त्यामुळे...’’ शरद पवारांनी मांडलं स्पष्ट मत  
8
ब्रिटनचे मालवाहू विमान भारताकडे झेपावले, युद्धनौका समुद्रात नांगर टाकून; लढाऊ विमान दुरुस्तीसाठी ४० अभियंते येणार...
9
ना नतांज, ना फोर्डो...! इस्रायलच्या नादात अमेरिकाही फसली? इराणने चकवत दुसरीकडेच सिक्रेट अण्वस्त्र अड्डा बनविलेला...
10
एवढे कोणीच करत नाही, पण ग्रुपने रतन टाटांचा वारसा जपला; मृतांच्या कुटुंबीयांसाठी ट्रस्ट स्थापणार
11
शिखर धवन लपून छपून गर्लफ्रेंडला टीम इंडियाच्या हॉटेल रुममध्ये आणायचा! रोहितनं केली होती तक्रार
12
Jagannath Yatra 2025: जगन्नाथाच्या गाभाऱ्यात समुद्राची गाज अडवण्यास हनुमंत ठरले कारणीभूत!
13
"राजकारणात फक्त आशिष शेलारांना ओळखते..."; ठाकरे बंधूंच्या मराठी मोर्चावर आशा भोसले काय म्हणाल्या?
14
अदानींनी खरेदी केली आणखी एक कंपनी, किती कोटींना झाली डील? शेअर्स सुस्साट...
15
तुम्ही ज्या विमानातून प्रवास करणार, ते किती जुने? सर्व्हिसिंग कधी केलेली? अशाप्रकारे जाणून घ्या...
16
मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यासाठी १९ इनोव्हा मागवल्या, डिझेल भरायला गेल्या आणि पाणी भरून आल्या...
17
घरात सापडली संशयास्पद कागदपत्रे, पती देशद्रोही तर नाही ना? महिलेला आला संशय, त्यानंतर उचललं असं पाऊल   
18
आज दोघं एक पाऊल पुढे आलेत, भविष्यात एकत्र दिसतील ही खात्री; ठाकरे बंधूंचे मामा काय बोलले?
19
" हा तर गमावलेली राजकीय स्पेस मिळवण्याचा प्रयत्न, यांना मराठी भाषेशी…’’, ठाकरे बंधूंच्या एकत्र मोर्चाची भाजपाकडून खिल्ली

लिंबोटीचे पाणी अहमदपुरात पोहोचले, वितरण व्यवस्थेतील त्रुटी सुटेनात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2021 04:20 IST

अहमदपूर : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या लिंबोटी प्रकल्पावरूनच्या जलवाहिनीचे काम पूर्ण झाले असून, शहरातील जुन्या फिल्टर येथे पाणी पोहोचले आहे. ...

अहमदपूर : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या लिंबोटी प्रकल्पावरूनच्या जलवाहिनीचे काम पूर्ण झाले असून, शहरातील जुन्या फिल्टर येथे पाणी पोहोचले आहे. मात्र, वितरण व्यवस्थेतील त्रुटींमुळे शहरवासीयांना अद्याप सुरळीत पाणीपुरवठा होण्याची चिन्हे दिसत नाहीत. त्यामुळे नियमित पाणीपुरवठा अजूनही शहरवासियांना मृगजळच ठरत आहे.

तीन वर्षांपासून प्रलंबित असलेल्या पाणीपुरवठा योजनेचे केवळ जलवाहिनीचे काम पूर्ण झाले असून, शनिवारी पाणी शहरातील जुन्या फिल्टरमध्ये दाखल झाले. विद्युत पंप कार्यान्वित होऊन १९ दिवस झाले. १९ किमीच्या जलवाहिनीतून पाणी प्रवासासाठी पालिकेला १९ दिवस परिश्रम घ्यावे लागले. अनेक ठिकाणी गळती होणे, मोठे व्हॉल्व फुटणे, एअर वॉल बंदमुळे जलवाहिनी फुटणे असे प्रकार झाले. त्यामुळे जलवाहिनीच्या तांत्रिक दर्जावरही प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे.

महाराष्ट्र जीवन प्राधिकरण व पालिका प्रशासनाच्या प्रयत्नाने हे पाणी शहरातील जुन्या फिल्टरमध्ये आले असून आता यापुढे नियमित पाणीपुरवठा होण्यासाठी मोठ्या फिल्टरचे काम होणे गरजेचे आहे. लिंबोटीवरील पंप पूर्णक्षमतेने अजून सुरू केले नसून, त्यांची क्षमता ६५ लाख लीटर आहे. मात्र, शहरातील फिल्टरची क्षमता केवळ ४० लक्ष लीटर प्रति दिन असल्यामुळे पाणी जास्त येऊनही फिल्टर होणार नसल्यामुळे पाणीपुरवठा नियमित व सुरळीत होणार नाही.

नवीन फिल्टरचे काम अजून सहा महिने होणार नसल्याचे कामाच्या प्रगतीवरून दिसत आहे, तसेच शहरातील वितरण प्रणालीचे ८० टक्के काम पूर्ण झाले असून, २० टक्के कामामुळे वितरण प्रणालीही कार्यान्वित होणार नसल्याचे समजते. त्यामुळे अहमदपूरकरांना नियमित पाणीपुरवठ्यासाठी आणखीन काही काळ वाट पाहावी लागणार आहे.

सुरळीत पाणीपुरवठा करावा...

गुत्तेदाराने दर्जाहिन काम केल्यामुळे १९ किमीसाठी १९ दिवस लागले. शहरातील फिल्टरचे काम आणखीन सहा महिने होणार नाही. वितरण व्यवस्थेचे कामही प्रलंबित आहे. गुत्तेदाराच्या चुकीमुळे अहमदपूरकरांना सुरळीत पाणीपुरवठा होणार नाही. त्यामुळे नगरसेवक रवि महाजन व संदीप चौधरी यांनी पाण्याच्या टाकीवर जाऊन पालिका व गुत्तेदाराच्या निषेधार्थ २६ जानेवारी आंदोलन करणार असल्याचे सांगितले.

नियमित पुरवठ्यासाठी वेळ लागणार...

नियमित पाणीपुरवठ्यासाठी नवीन फिल्टर व्यवस्था सुरू होणे गरजेचे आहे. सध्या जलवाहिनीची ६५ लक्ष लीटर दररोज क्षमता असताना, फिल्टर मात्र ४० लाख लीटरने काम करीत आहे. त्यामुळे शहरवासीयांना आणखीन काही काळ प्रतीक्षा करावी लागणार आहे, असे पालिकेचे मुख्याधिकारी त्र्यंबक कांबळे यांनी सांगितले.