शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तानंतर आशियातील आणखी २ देशात युद्धजन्य स्थिती; सीमेवर वाढवले सशस्त्र सैन्य
2
"उद्धव-राज एकत्र येऊ शकतात, उद्धवजींनी त्या लोकांपासून सावध राहावं", गजानन कीर्तिकरांचा ठाकरेंना महत्त्वाचा सल्ला
3
बिहार विधानसभा निवडणूक 2025 : NDA चा फॉर्म्युला ठरला! जाणून घ्या, कुणाच्या वाट्याला किती जागा येणार?
4
पोलीस नोकरी सोडली अन् बनला Youtuber; भारतीय क्रिएटर्सला अडकवलं, हेरगिरीसाठी पाकचा नवा डाव
5
सोनिया गांधी रूटीन चेकअपसाठी शिमला येथील IGMC हॉस्पिटलला दाखल; उपचारानंतर घरी सोडले
6
राज ठाकरेंसोबतच्या संबंधावर सोनाली बेंद्रेने मौन सोडलं; पहिल्यांदाच उघडपणे केला खुलासा
7
'या' कंपनीला रिलायन्सकडून मिळाली 700 कोटींची ऑर्डर; आता सोमवारी फोकसमध्ये राहणार शेअर?
8
स्वत:चं नग्न छायाचित्र दाखवलं संसदेत, खासदार लॉरा मॅकक्लूर यांनी सगळ्यांना दिला धोक्याचा इशारा
9
राहुल गांधींच्या 'महाराष्ट्र निवडणूक फिक्सिंग' लेखावरून राजकारण तापलं, काँग्रेस का हारते? जेपी नड्डा यांनी स्पष्टच सांगितलं!
10
"बापरे..., आम्ही एवढं घाबरलोय की...!"; राज-उद्धव युतीच्या चर्चेवर नितेश राणेंनी उडवली खिल्ली
11
IPL २०२६ मध्ये यंदाच्या विजेत्या RCB टीमवर बंदी आणणार?; बीसीसीआय का घेऊ शकतं मोठा निर्णय?
12
पोलिसांनी घेरताच आरोपी शूटर AK47 ने दिली इमारतीवरून उडी मारण्याची धमकी, नंतर...
13
नको त्या अवस्थेत दुसऱ्यासोबत पाहिले; संतापलेल्या पतीने बायकोचे मुंडके उडविले अन् थेट...
14
बलूचिस्तानात सैन्याला मिळाले बेफाम अधिकार; सर्वसामान्यांविरोधात पाकिस्तानात बनला कठोर कायदा
15
Viral Video: लग्नात नवरदेवाच्या मित्रांनी दिलं 'असं' गिफ्ट; पाहून वधूही लाजली, व्हिडीओ व्हायरल!
16
'टीव्ही बंद करून अभ्यास करायला बस' आईचं बोलणं जिव्हारी, दहावीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या!
17
अरेरे! ६ महिन्यांपूर्वीच लग्न करुन घरी आणली पण 'ती' दिरासोबत पळाली, गावात असं काय घडलं?
18
Jalgaon: ह्रदयद्रावक! आई वाट पाहत राहिली अन् तरुण मुलाचा धावत्या रेल्वेतून पडून गेला जीव
19
Diabetes Sign: डायबिटीस होण्याआधी शरीरात दिसू लागतात 'हे' पाच बदल; वेळीच सावध व्हा!
20
आमिरच्या घरी आला सचिन तेंडुलकर, सरप्राईज पाहून 'सितारे जमीन पर'मधील दिव्यांग मुलांचा जल्लोष

महिनाभरात वाहतूक व्यवस्था सुरळीत करु

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2020 04:16 IST

येथील शहर पोलीस ठाण्यात आयोजित पत्रपरिषदेत ते बोलत होते. याप्रसंगी प्रभारी उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. दिनेशकुमार कोल्हे, शहर पोलीस ...

येथील शहर पोलीस ठाण्यात आयोजित पत्रपरिषदेत ते बोलत होते. याप्रसंगी प्रभारी उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. दिनेशकुमार कोल्हे, शहर पोलीस निरीक्षक नानासाहेब उबाळे, ग्रामीणचे पोलीस निरीक्षक दीपककुमार वाघमारे, पोलीस उपनिरीक्षक सुनील गायकवाड, गजानन पाटील, शाहदेव खेडकर, ऐडके, शेख मुजाहिद, एस.एस. दुबळगुंडे, राजकुमार घोरपडे आदी उपस्थित होते.

पोलीस अधीक्षक पिंगळे म्हणाले, शहरातील वाहतुकीची समस्या कायमची सोडविण्यासाठी सर्वप्रथम शहरात पायाभूत सुविधांची गरज आहे. त्यासंदर्भात मी स्वतः जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा केली आहे. त्यांनी याबाबत सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. त्यानुसार गुरुवारी सकाळी पालिकेचे मुख्याधिकारी, महावितरणचे अधिकारी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता व महसूल प्रशासनाच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन वाहतूक व्यवस्थेत कशी सुधारणा करता येईल, त्या- त्या विभागांच्या अडचणी काय आहेत, याची माहिती घेतली. पालिकेने वाहतूक व्यवस्था व अतिक्रमण काढण्याबाबत सकारात्मक प्रतिसाद दिला देऊन पोलीस प्रशासनास सहकार्य करण्याची हमी देऊन शहरात एकेरी वाहतूक करण्यासाठी अहवाल दिला आहे.

शहरात प्रवासी वाहतूक करणारी खासगी जीप, टमटम, ट्रॅव्हल्सचे थांबे, शहरात प्रवासी वाहतूक करणाऱ्या ॲटोरिक्षांची तपासणी, हैदराबाद ते नांदेड, लातूर ते देगलूर मुख्य रस्त्याच्या बाजूला थांबणारे हातगाडे, अवजड वाहनांची याच मार्गाने होणारी वाहतूक, छत्रपती शिवाजी महाराज चौक, पंचायत समिती, तहसील, उपजिल्हाधिकारी कार्यालय, बसस्थानक परिसर, दूध डेअरी परिसर,

जयजवान चौक, पत्तेवार चौक, उमा चौक, शाहू चौक, कॅप्टन चौक आदी भागात होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे सामान्य नागरिकांना त्रास होत आहे.

नागरिकांनीही नियमांचे पालन करावे...

नगरपरिषद, सार्वजनिक बांधकाम विभाग, पोलीस प्रशासन, महसूल, महावितरण यांचे सहकार्य घेऊन सुरुवातीला प्रायोगिक तत्वावर जिल्हाधिकाऱ्यांमार्फत १ फेब्रुवारीपासून वाहतूक समस्येतून मुक्तता करण्याबाबतचा आदेश काढण्याबाबतचे नियोजन करण्यात येत आहे. त्यासाठी नागरिकांनीही प्रशासनास सहकार्य करण्याचे त्यांनी आवाहन केले. प्रत्येक ठिकाणी पोलीस पोहोचणे शक्य नाही. तेव्हा वाहतुकीचे नियम जनतेनेही पाळावेत, अशी त्यांनी अपेक्षा व्यक्त केली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी दक्ष रहावे, असेही ते म्हणाले.