शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

मुख्य जलवाहिनीच्या व्हॉल्वला गळती, चाकुरला अशुध्द पाणीपुरवठा सुरु

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2021 04:14 IST

चाकूर : शहराला पाणीपुरवठा करणा-या मुख्य जलवाहिनीवरील व्हॉल्वला लिकेज असल्याने त्यात गटारीचे घाण पाणी जात आहे. परिणामी, शहरास अशुध्द ...

चाकूर : शहराला पाणीपुरवठा करणा-या मुख्य जलवाहिनीवरील व्हॉल्वला लिकेज असल्याने त्यात गटारीचे घाण पाणी जात आहे. परिणामी, शहरास अशुध्द पाणीपुरवठा होत आहे. ही समस्या नगरपंचायतीच्या निदर्शनास आणून देऊनही दुरुस्तीकडे दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे रोगराई वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

सध्या कोरोनाचा संसर्ग वाढला आहे. त्यामुळे प्रत्येकाला धास्ती वाढली आहे. अशा परिस्थितीत चाकुरात नवीन समस्या निर्माण झाली आहे. त्यामुळे नागरिकांतून संताप व्यक्त करण्यात येत आहे. चाकूर शहराला बोथी येथील पाझर तलावातून पाणी पुरवठा होतो. त्यासाठी बोथी ते चाकूर अशी मुख्य जलवाहिनी आहे. त्यावर अनेक ठिकाणी व्हॉल्व बसविण्यात आले आहेत. त्यापैकी काही ठिकाणच्या व्हॉल्वला गळती लागली आहे. त्यातून पाण्याची नासाडी होत आहे. परंतु शहरानजिक असलेल्या एका व्हॉल्वला अधिक गळती असून ज्यावेळी पाणीपुरवठा होत असतो, तेव्हा त्या व्हॉल्वमधून पाण्याचे फवारे उडून पाण्याची नासाडी होते.

जेव्हा पाणीपुरवठा बंद होतो, तेव्हा या व्हॉल्वमध्ये बाजूस असलेल्या गटारीतील पाणी जाते. पाणीपुरवठा सुरु झाल्यानंतर ते पुढे पाण्याच्या टाकीतून अशुध्द पाणी जाते. त्यानंतर जलकुंभातून शहरातील नागरिकांना जलवाहिनीद्वारे पाणीपुरवठा होतो. पाण्याच्या टाक्याही अस्वच्छ आहेत. टाकीत उतरण्यासाठी असलेली लोखंडी सिडी कुजली आहे. नगरपंचायतीच्या दुर्लक्षामुळे शहरवासियांना अशुध्द पाणी प्यावे लागत आहे. त्यातून विविध आजार पसरण्याची भीती व्यक्त होत आहे.

ही समस्या अनेकदा संबंधित पाणीपुरवठा विभागाच्या निदर्शनास आणून देण्यात आली आहे. मनसेने मुख्याधिका-यांना घेऊन स्पॉट पंचनामाही केला होता. तेव्हा मुख्याधिका-यांनी आठ दिवसांत या समस्या सोडविण्याचे आश्वासन दिले होते. मात्र अद्यापही दुरुस्ती करण्यात आली नाही. त्यामुळे संताप व्यक्त होत आहे.

मनसेकडून स्पॉट पंचनामा...

चाकुरातील अशुध्द पाणीपुरवठ्याच्या समस्येबाबत स्पॉट पंचनामा करुन आंदोलनही केले होते. तेव्हा ही समस्या लवकरच सोडविण्यात येईल, असे आश्वासन देण्यात आले. परंतु, अद्यापही दुरुस्ती करण्यात आली नाही. ही समस्या सोडवावी, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष डॉ. नरसिंह भिकाणे यांनी केली आहे.

संबंधितावर कार्यवाही करावी...

अशुध्द पाण्यामुळे रोगराई पसरण्याची भीती आहे. नगरपंचायत प्रशासन याकडे दुर्लक्ष करीत आहे. संबंधित अधिका-यांविरुध्द गुन्हे दाखल करण्यात यावेत, अशी मागणी लक्ष्मण धोंडगे यांनी केली.

अधिका-यांना बाटली बंद पाणी...

शासकीय अधिकारी कार्यालयात बाटली बंद पाणी पितात. त्यामुळे त्यांना जनतेच्या पाणी प्रश्नाचे काही देणे- घेणे नाही. या गंभीर समस्यांकडे दुर्लक्ष करणा-यांवर कार्यवाही करण्यात यावी, अशी मागणी अल्ताभ हरणमारे यांनी केली.

लवकरच दुरुस्ती...

मुख्य जलवाहिनीवरील व्हॉल्वची लवकरच दुरुस्ती करण्यात येईल. त्यासंबंधी संबंधित अधिकारी व कर्मचा-यांना सूचना केल्या जातील, असे नगरपंचायतीचे मुख्याधिकारी अजिंक्य रणदिवे यांनी सांगितले.