शहरं
Join us  
Trending Stories
1
६ ऑगस्टला बच्चू कडू राज ठाकरेंची भेट घेण्याची शक्यता; शेतकरी आंदोलनाला मनसेचं पाठबळ मिळणार?
2
"मराठीच्या आधी हिंदी भाषेला राजभाषेचा दर्जा मिळाला, तेव्हा महाराष्ट्रही अस्तित्वात नव्हता"
3
एकनाथ शिंदेंनी केला करेक्ट कार्यक्रम, बेळगावात पक्ष बळकट होणार; अनेक मठाधिपती शिवसेनेत
4
'किमान माणसासारखी तरी वागणूक...' IT अभियंता तरुणीची पोस्ट व्हायरल, म्हणाले मॅनेजरसमोरच मी...
5
Mumbai: बलात्कारानंतर गर्भवती राहिलेल्या अल्पवयीन मेहुणीची घरीच प्रसूती; भाऊजींसह बहिणीलाही अटक
6
“हिंदूंना बदनाम करण्याच्या आव्हाडांच्या आरोपांशी उद्धव ठाकरे सहमत आहेत का?”; भाजपाचा सवाल
7
धक्कादायक! रात्री ३ वाजता मुलीच्या खोलीत दिसले भयंकर दृश्य; वडिलांनी पाहताच पायाखालची जमीन सरकली
8
रीलस्टारलाही नॅशनल अवॉर्ड पण टीव्ही स्टार्सला नाही! स्पष्टच बोलली अनुपमा, म्हणाली- "आता स्मृती इराणींनी कमबॅक केलंय तर..."
9
"इतक्या दूरची नोकरी..."; रिक्षा चालकाने महिलेला रस्त्याच्या मध्येच सोडलं अन् विचारला प्रश्न
10
तिसऱ्या बाईच्या प्रेमासाठी दुसऱ्या पत्नीला संपवलं; नवऱ्याचं प्लॅनिंग, तान्ह्या बाळासमोर घडलं क्रूर कृत्य
11
जबरदस्त! ११३७ कोटींच्या मोहिमेसाठी सारा तेंडुलकरची निवड, सचिनच्या लेकीला मिळाली मोठी जबाबदारी
12
Baba Ramdev: "हिंदू धर्मात जन्मलेले काही लोक..." जितेंद्र आव्हांडाच्या वक्तव्यावर बाबा रामदेव यांची प्रतिक्रिया
13
मुलाची इंजिनियरिंग कॉलेजमध्ये निवड, पण फी चे पैसे जमवणे शक्य झाले नाही, हतबल पित्याने संपवलं जीवन
14
अमिताभ बच्चन यांच्या चित्रपटातून मिळाली प्रेरणा; फुटपाथवरुन सुरू झाला प्रवास, आता बनले व्यवसाय क्षेत्रातील 'शहंशाह'
15
"चीनने भारताची जमीन बळकावली हे तुम्हाला कसं कळलं? तुम्ही खरे भारतीय असता तर…’’, सुप्रीम कोर्टाचे राहुल गांधींना खडे बोल  
16
बीएसएनएलने आणला १ रुपयांत फ्रिडम प्लॅन! ३० दिवस डेटा, कॉलिंग अन्... मोफत...
17
“सप्टेंबरमध्ये देशात मोठ्या राजकीय घडामोडी”; संजय राऊतांचे भाकित, म्हणाले, “RSS बैठकीत...”
18
'तो' खेळणार नाही असं इंग्लंडनेच सांगितलं होतं, पण आता बॅटिंग करणार; असं कसं? ICC नियमांत बसतं?
19
पाणी पाकिस्तानची पाठ सोडेना! उन्हाळ्यात पाणी प्यायला मिळेना, पावसाळ्यात महापूर
20
"मी स्किन व्हाइटनिंग सर्जरी केलेली नाही तर...", काजोलने सांगितलेलं तिच्या फेअरनेसचं रहस्य

Latur: साडेबारा हजार शेतकरी लाभार्थ्यांच्या खात्यावर तीन महिन्यांचा लाभ, जळकोट तालुक्यात कामाला गती येईना

By आशपाक पठाण | Updated: August 1, 2023 18:01 IST

Latur News: राज्य शासनाने १ जानेवारीपासून शेतकरी रेशन कार्डधारकांना धान्याऐवजी रोख रक्कम देण्याचा निर्णय घेतला. त्यात काही निकष लावण्यात आल्याने कागदपत्रांची जुळवाजुळव करण्यात लाभार्थ्यांची धावपळ होत आहे.

- आशपाक पठाण लातूर  - राज्य शासनाने १ जानेवारीपासून शेतकरी रेशन कार्डधारकांना धान्याऐवजी रोख रक्कम देण्याचा निर्णय घेतला. त्यात काही निकष लावण्यात आल्याने कागदपत्रांची जुळवाजुळव करण्यात लाभार्थ्यांची धावपळ होत आहे. जिल्हा पुरवठा विभागाला शासनाने निधी दिला असून आतापर्यंत १२ हजार ४४९ लाभार्थ्यांच्या खात्यावर ५६ लाख रूपये वर्ग करण्यात आले आहेत. निधी वाटपात चाकूर, लातूर, अहमदपूर तालुक्यातील लाभार्थी अधिक असून इतर तालुक्यात कामाला गती येण्याची गरज आहे.

लातूर जिल्ह्यात शेतकरी लाभार्थी ५२ हजार ९४३ इतकी आहेत. यात त्यांच्या कुटुंबालील लाभार्थी संदस्यांची संख्या २ लाख ४८ हजार ६७० आहे. या सर्व लाभार्थ्यांना दरमहा दीडशे रूपयांप्रमाणे कुटुंब प्रमुख महिलेच्या नावाने रक्कम द्यायची आहे. योजनेचा लाभ घेण्यासाठी अनेक ठिकाणी लाभार्थीच उदासिन असल्याचे दिसून येत आहे. सहा महिन्यांपासून अर्ज भरून घेण्याची प्रक्रिया सुरू असली तरी अजूनही जवळपास ३२ टक्के लाभार्थ्यांनी अर्जही भरून दिले नाहीत. शिवाय, ज्यांनी दिले त्यांची डाटा एन्ट्री तालुकास्तरावर केली जात आहे. जिल्हास्तरावर आलेल्या यादीत सर्व पडताळणी करून लाभार्थ्यांच्या खात्यावर रक्कम वर्ग करण्यात येत आहे. आतापर्यंत १२ हजार ४४९ कुटुंबियांच्या खात्यावर जवळपास ५६ लाख रूपये वर्ग करण्यात आले आहेत.यात सर्वाधिक लाभार्थी चाकूर तालुक्यातील आहेत.

रक्कम वाटपात चाकूरची आघाडी...लातूर जिल्ह्यात लाभार्थ्यांना जानेवारी ते मार्च, एप्रिल ते जून असे दोन टप्प्यात सहा महिन्यांचे धान्याऐवजी रक्कम देण्यासाठी पुरवठा विभागाकडे निधी वर्ग करण्यात आला आहे. प्रति लाभार्थी १५० रूपयांप्रमाणे अडीच लाख लाभार्थ्यांना सहा महिन्यांची रक्कम मिळणार आहे. यासाठी २३ कोटी ६८ लाखांचा निधी पुरवठ्याकडे आला आहे. चाकूर तालक्यात सर्वाधिक ३९७७ जणांच्या खात्यावर १७ लाख ८९हजार ६५० रूपयांची रक्कम वर्ग झाली आहे.

तालुकास्तरावर कामाला गती यावी...तालुकास्तरावर अनेक ठिकाणी मनुष्यबळाचा अभाव आहे. त्यामुळे डाटा एन्ट्री गतीने होत नाही. शिवाय, ३० टक्के लाभार्थ्यांनी अजून अर्जही दाखल केले नाहीत. तहसीलस्तरावर जवळपास ६८.२९ टक्के अर्ज प्राप्त झाले आहेत. त्यातील ४८.८९ टक्के अर्जाची डाटा एन्ट्री केली आहे. १२ हजार ४४९ लाभार्थ्यांच्या खात्यावर तीन महिन्याचे ५६ लाख १ हजार ९०० रूपये वर्ग करण्यात आले आहेत.- प्रियंका कांबळे (आयरे, जिल्हा पुरवठा अधिकारी, लातूर)

 एकुण लाभार्थी संख्या : ५३०६३निधी वाटप लाभार्थी : १२४४९आजवर दिलेला निधी : ५६०१९००

टॅग्स :Farmerशेतकरीlaturलातूर