शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला झाले तब्बल 'इतक्या' कोटींचे नुकसान; भारतीय विमानांसाठी हवाई क्षेत्र बंद करणे पडले महागात!
2
गडकरींचे ३.५० लाख मतदार वगळले, कुटुंबीयांचाही समावेश; अजून पुरावे मागणार की माफी?; काँग्रेसचा सवाल
3
५ लाख देण्याचे आश्वासन अन् हातात पडले अवघ्या ५ हजाराचे धनादेश; उत्तरकाशीतील नागरिकांचा संताप
4
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये कोण जिंकलं? सेना प्रमुखांनी पाकिस्तानला थेट उत्तर दिलं! म्हणाले...
5
तुरुंगात असलेल्या सोनम रघुवंशीच्या आजीचे निधन; नातीच्या क्रूर कृत्यामुळे बसलेला धक्का
6
आजचे राशीभविष्य, १० ऑगस्ट २०२५: ७ राशींना शुभ दिवस, सरकारी कामात यश; धनलाभ योग
7
Bigg Boss 19: पहलगाम हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीला 'बिग बॉस'ची ऑफर! शोमध्ये दिसणार असल्याची चर्चा
8
लाडकी बहीण योजनेचे पैसे योग्य वेळी वाढवणार; योजनेत भ्रष्टाचार असल्याचा मुख्यमंत्र्यांनी केला इन्कार
9
साप्ताहिक राशीभविष्य: मोठी जोखीम टाळा, पैसे उसने देऊ नये; ८ राशींना लाभ, सुख-सुबत्ता-कल्याण!
10
भारत-पाकिस्तान युद्ध मीच थांबवले, डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा एकदा दावा, पाच विमाने पाडल्याच्या दाव्याची पुनरावृत्ती
11
वाराणसीच्या मंदिरात पूजेदरम्यान आग; पूजाऱ्यासह ९ जण होरपळले, ४ जणांची प्रकृती गंभीर  
12
विद्यार्थ्यांची जबाबदारी शासन घेणार का? गणपती विसर्जन, दहीहंडीची सुट्टी रद्द केल्याने शिक्षक नाराज
13
फसवणुकीच्या गुन्ह्यातील कैद्यांनी चार तास ढोसली दारू! ऑन ड्युटी नसलेल्या पाेलिस हवालदाराचा ‘हात’
14
'भारताने ५ फायटर जेट पाडले'; पाकिस्तानचा थयथयाट, संरक्षण मंत्री आसिफ म्हणाले...
15
वैष्णो देवी दर्शनाचा मार्ग आणखी सुकर होणार; तर महाराष्ट्राला मिळणार आणखी एक वंदे भारत, 'या' मार्गावर धावणार?
16
महाराष्ट्रातील 'या' नऊ राजकीय पक्षांना निवडणूक यादीतून हटवले; निवडणूक आयोगाची कारवाई कुणावर?
17
नागपूर: महालक्ष्मी मंदिराच्या प्रवेशद्वाराचे छत कोसळले, अनेक मजूर जखमी; NDRF कडून शोध कार्य सुरू
18
'निघालो तेव्हा बाजार होता, परतलो तेव्हा स्मशान'; धरालीतील ढगफुटीनंतर लोकांनी सांगितला थरारक अनुभव
19
ती आली अन् पाहुणेही आले... हार, तोरणं, पताका आणि फुलांनी भव्य सभामंडपही सज्ज
20
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त

Latur: पाण्याच्या शोधात फिरत असलेल्या हरिणाचा अपघातात मृत्यू, श्वानांनी केला पाठलाग

By आशपाक पठाण | Updated: May 24, 2023 18:09 IST

Latur: उन्हाचा पारा ४१ अंशावर जात असल्याने माणसं पाण्यासाठी व्याकूळ होत आहेत. अनेकजण उष्णतेपासून बचावासाठी विविध उपाययोजना करीत आहेत. दुपारच्या वेळी तर शहरातील रस्त्यांवरही शुकशुकाट पहायला मिळत आहे.

- आशपाक पठाणलातूर : उन्हाचा पारा ४१ अंशावर जात असल्याने माणसं पाण्यासाठी व्याकूळ होत आहेत. अनेकजण उष्णतेपासून बचावासाठी विविध उपाययोजना करीत आहेत. दुपारच्या वेळी तर शहरातील रस्त्यांवरही शुकशुकाट पहायला मिळत आहे. जिथे माणसं बेचैन झाली तिथे मुक्या जिवांचे काय. चाकूर तालुक्यातील घरणी ते आष्टामोड शिवारात पाण्याच्या शोधात भटकंती करीत असलेल्या एका हरिणाचा श्वानांनी पाठलाग केला. रस्ता ओलांडत असताना अज्ञात वाहनाच्या धडकेत गंभीर जखमी झालेल्या हरिणाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना बुधवारी दुपारी १२.४० वाजण्याच्या सुमारास घडली.

लातूर शहर वाहतूक शाखेचे पथक घरणी-आष्टामोड मार्गावर ओव्हरस्पीडच्या केसेस करीत थांबले होते. जवळपास अर्ध्या तासापासून एक हरीण पाण्यासाठी इकडे तिकडे भटकंती करीत असल्याचे काही कर्मचाऱ्यांनी पाहिले. त्याचवेळी एकट्या हरिणाला पाहून काही श्वानांनी त्याचा पाठलाग सुरू केला. उन्हामुळे पाण्यासाठी व्याकुळ झालेल्या हरिणाने श्वानापासून सुटका करून घेत मुख्य मार्ग गाठला. पण रस्ता ओलांडत असताना भरधाव आलेल्या एका वाहनाने त्याला जोराची धडक दिली. याबाबतची माहिती मिळताच वाहतूक शाखेचे कर्मचारी दिलीप राजुळे यांनी जखमी हरिणाच्या जवळ गेले. त्यांच्या गाडीत असलेला कपड्याने जखमी हरिणाच्या पोटाला बांधले. बाटलीत असलेले पाणीही पाजले. जखमीला तात्काळ मदत मिळेल म्हणून पक्षीमित्र महेबूब चाचा यांनाही फोन केला. मात्र, काही वेळातच जखमी हरिणाचा मृत्यू झाला. याबाबतची माहिती वन परिमंडळ अधिकारी सचिन रामपुरे यांना देण्यात आली. त्यांनी चाकूरच्या वनअधिकाऱ्यांना याची माहिती दिल्यावर काही वेळातच वन विभागाचे कर्मचारी घटनास्थळी आले. पंचनामा करून मयत हरिणाला घेऊन गेले. वाहतूक शाखेचे पोलीस कर्मचारी दिलीप राजुळे यांनी घटनेनंतर तत्परता दाखविल्याने त्यांचे वरिष्ठांनी कौतुक केले.

शेतशिवारात वन्य प्राण्यांसाठी पाणी ठेवा...उष्णता वाढल्याने पक्षी, प्राणी पाण्यासाठी व्याकूळ होऊन भटकंती करीत आहेत. शेतात ज्यांच्याकडे विहीर, बोअर आहे, पाण्याची सुविधा आहे, अशा शेतकऱ्यांनी मुक्या प्राण्यांना पाणी पिता येईल, यासाठी सोय करावी. तसेच वनविभागाने यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहन देणे गरजेचे आहे. पाण्याच्या शोधात भटकंती करीत असलेल्या त्या हरिणाला पाणी मिळाले असते तर कदाचित अपघात झाला नसता, असे पक्षीमित्र महेबूब चाचा यांनी सांगितले.

टॅग्स :laturलातूर