शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

Latur: पाण्याच्या शोधात फिरत असलेल्या हरिणाचा अपघातात मृत्यू, श्वानांनी केला पाठलाग

By आशपाक पठाण | Updated: May 24, 2023 18:09 IST

Latur: उन्हाचा पारा ४१ अंशावर जात असल्याने माणसं पाण्यासाठी व्याकूळ होत आहेत. अनेकजण उष्णतेपासून बचावासाठी विविध उपाययोजना करीत आहेत. दुपारच्या वेळी तर शहरातील रस्त्यांवरही शुकशुकाट पहायला मिळत आहे.

- आशपाक पठाणलातूर : उन्हाचा पारा ४१ अंशावर जात असल्याने माणसं पाण्यासाठी व्याकूळ होत आहेत. अनेकजण उष्णतेपासून बचावासाठी विविध उपाययोजना करीत आहेत. दुपारच्या वेळी तर शहरातील रस्त्यांवरही शुकशुकाट पहायला मिळत आहे. जिथे माणसं बेचैन झाली तिथे मुक्या जिवांचे काय. चाकूर तालुक्यातील घरणी ते आष्टामोड शिवारात पाण्याच्या शोधात भटकंती करीत असलेल्या एका हरिणाचा श्वानांनी पाठलाग केला. रस्ता ओलांडत असताना अज्ञात वाहनाच्या धडकेत गंभीर जखमी झालेल्या हरिणाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना बुधवारी दुपारी १२.४० वाजण्याच्या सुमारास घडली.

लातूर शहर वाहतूक शाखेचे पथक घरणी-आष्टामोड मार्गावर ओव्हरस्पीडच्या केसेस करीत थांबले होते. जवळपास अर्ध्या तासापासून एक हरीण पाण्यासाठी इकडे तिकडे भटकंती करीत असल्याचे काही कर्मचाऱ्यांनी पाहिले. त्याचवेळी एकट्या हरिणाला पाहून काही श्वानांनी त्याचा पाठलाग सुरू केला. उन्हामुळे पाण्यासाठी व्याकुळ झालेल्या हरिणाने श्वानापासून सुटका करून घेत मुख्य मार्ग गाठला. पण रस्ता ओलांडत असताना भरधाव आलेल्या एका वाहनाने त्याला जोराची धडक दिली. याबाबतची माहिती मिळताच वाहतूक शाखेचे कर्मचारी दिलीप राजुळे यांनी जखमी हरिणाच्या जवळ गेले. त्यांच्या गाडीत असलेला कपड्याने जखमी हरिणाच्या पोटाला बांधले. बाटलीत असलेले पाणीही पाजले. जखमीला तात्काळ मदत मिळेल म्हणून पक्षीमित्र महेबूब चाचा यांनाही फोन केला. मात्र, काही वेळातच जखमी हरिणाचा मृत्यू झाला. याबाबतची माहिती वन परिमंडळ अधिकारी सचिन रामपुरे यांना देण्यात आली. त्यांनी चाकूरच्या वनअधिकाऱ्यांना याची माहिती दिल्यावर काही वेळातच वन विभागाचे कर्मचारी घटनास्थळी आले. पंचनामा करून मयत हरिणाला घेऊन गेले. वाहतूक शाखेचे पोलीस कर्मचारी दिलीप राजुळे यांनी घटनेनंतर तत्परता दाखविल्याने त्यांचे वरिष्ठांनी कौतुक केले.

शेतशिवारात वन्य प्राण्यांसाठी पाणी ठेवा...उष्णता वाढल्याने पक्षी, प्राणी पाण्यासाठी व्याकूळ होऊन भटकंती करीत आहेत. शेतात ज्यांच्याकडे विहीर, बोअर आहे, पाण्याची सुविधा आहे, अशा शेतकऱ्यांनी मुक्या प्राण्यांना पाणी पिता येईल, यासाठी सोय करावी. तसेच वनविभागाने यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहन देणे गरजेचे आहे. पाण्याच्या शोधात भटकंती करीत असलेल्या त्या हरिणाला पाणी मिळाले असते तर कदाचित अपघात झाला नसता, असे पक्षीमित्र महेबूब चाचा यांनी सांगितले.

टॅग्स :laturलातूर