शहरं
Join us  
Trending Stories
1
ENG vs IND : जसप्रीत बुमराहचा 'पंजा'! या ३ चुकांमुळे लीड्स कसोटीत टीम इंडियानं गमावली मोठ्या आघाडीची संधी
2
अमेरिकेच्या इराणवरील हल्ल्यावर फारूक अब्दुल्लांचे विधान; म्हणाले, “आज जागे झाले नाही तर...”
3
पावसाळ्यातही सुरू राहणार नक्षलविरोधी मोहीम; आत्मसमर्पण करा, अन्यथा...शाहांचा अल्टिमेटम
4
अमेरिकेनं इराणवर ज्या B-२ स्टिल्थ बॉम्बर्सनं हल्ला केला त्याची किंमत माहित्येय? तासाला किती खर्च येतो? जाणून थक्क व्हाल
5
Ashadhi Wari : दिवे घाटाची अवघड वाट पार करीत माउलींचा पालखी सोहळा कऱ्हेकाठी विसावला
6
CM देवेंद्र फडणवीसांना पाठवली कायदेशीर नोटीस, असीम सरोदे यांनी दिली माहिती; नेमके प्रकरण काय?
7
"...इराणला आपली अण्वस्त्रे देण्यास तयार!"; रशियाच्या माजी राष्ट्रपतींचा मोठा दावा; उद्या पुतीन यांची खास बैठक
8
अमेरिकेनं इराणवर चालवलं 'मिडनाइट हॅमर', केला ऑपरेशनच्या नावाचा खुलास; म्हणाले, ट्रम्प बोलें तो...!
9
१२५ लढाऊ विमाने, त्यात ७ बी२ बॉम्बर...! इराणला फसविले, पेंटागॉनने सांगितले अणुकेंद्रांवर कसा हल्ला चढविला...
10
ENG vs IND : कायद्यात राहून फायद्यात! जड्डू-साई सुदर्शन जोडीनं रिले कॅचसह लुटली मैफिल (VIDEO)
11
“८ वेळा निवडणुका जिंकलो, आता थांबण्याचा विचार करावासा वाटतो”; भास्कर जाधवांचे सूचक विधान
12
इराण तीन आठवड्यांत ९ अणुबॉम्ब बनवू शकला असता; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर फोर्डोचा सॅटेलाईट फोटो आला...
13
“वारीमुळे रस्ता जाम होतो, आम्ही तक्रार केली नाही”; अबू आझमींचे विधान, CM फडणवीसांचे उत्तर
14
रोहित-विराट वनडे वर्ल्ड कप खेळणं 'मुश्किल'; गांगुलीनं बोलून दाखवली मनातली गोष्ट
15
इस्रायल-इराण युद्धात आता अमेरिकेनंतर होणार रशियाची एन्ट्री? अराघची घेणार पुतिन यांची भेट, म्हणाले...
16
शिंदेंनंतर आता भाजपाने डाव टाकला; शेकडो पदाधिकारी, माजी नगरसेवकांचा ठाकरे गटाला जय महाराष्ट्र
17
डेटिंग अ‍ॅपवरून सुंदर तरुणी कॅफेत भेटायला आली, १२००० रुपयांचे बिल केले आणि पळून गेली... तरुण बिचारा...
18
एअर इंडियाच्या आणखी एका विमानाला बॉम्बची धमकी; सौदी अरेबियात आपत्कालीन लँडिंग
19
आता पैसे नसल्यामुळे शिक्षण थांबणार नाही; 'या' योजनेद्वारे घरबसल्या मिळेल बिनव्याजी कर्ज...
20
DSP सिराजनं बेन स्टोक्सला केलं 'अरेस्ट'! विकेट गमावल्यावर कॅप्टननं हवेत भिरकावली बॅट (VIDEO)

Latur: पाण्याच्या शोधात फिरत असलेल्या हरिणाचा अपघातात मृत्यू, श्वानांनी केला पाठलाग

By आशपाक पठाण | Updated: May 24, 2023 18:09 IST

Latur: उन्हाचा पारा ४१ अंशावर जात असल्याने माणसं पाण्यासाठी व्याकूळ होत आहेत. अनेकजण उष्णतेपासून बचावासाठी विविध उपाययोजना करीत आहेत. दुपारच्या वेळी तर शहरातील रस्त्यांवरही शुकशुकाट पहायला मिळत आहे.

- आशपाक पठाणलातूर : उन्हाचा पारा ४१ अंशावर जात असल्याने माणसं पाण्यासाठी व्याकूळ होत आहेत. अनेकजण उष्णतेपासून बचावासाठी विविध उपाययोजना करीत आहेत. दुपारच्या वेळी तर शहरातील रस्त्यांवरही शुकशुकाट पहायला मिळत आहे. जिथे माणसं बेचैन झाली तिथे मुक्या जिवांचे काय. चाकूर तालुक्यातील घरणी ते आष्टामोड शिवारात पाण्याच्या शोधात भटकंती करीत असलेल्या एका हरिणाचा श्वानांनी पाठलाग केला. रस्ता ओलांडत असताना अज्ञात वाहनाच्या धडकेत गंभीर जखमी झालेल्या हरिणाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना बुधवारी दुपारी १२.४० वाजण्याच्या सुमारास घडली.

लातूर शहर वाहतूक शाखेचे पथक घरणी-आष्टामोड मार्गावर ओव्हरस्पीडच्या केसेस करीत थांबले होते. जवळपास अर्ध्या तासापासून एक हरीण पाण्यासाठी इकडे तिकडे भटकंती करीत असल्याचे काही कर्मचाऱ्यांनी पाहिले. त्याचवेळी एकट्या हरिणाला पाहून काही श्वानांनी त्याचा पाठलाग सुरू केला. उन्हामुळे पाण्यासाठी व्याकुळ झालेल्या हरिणाने श्वानापासून सुटका करून घेत मुख्य मार्ग गाठला. पण रस्ता ओलांडत असताना भरधाव आलेल्या एका वाहनाने त्याला जोराची धडक दिली. याबाबतची माहिती मिळताच वाहतूक शाखेचे कर्मचारी दिलीप राजुळे यांनी जखमी हरिणाच्या जवळ गेले. त्यांच्या गाडीत असलेला कपड्याने जखमी हरिणाच्या पोटाला बांधले. बाटलीत असलेले पाणीही पाजले. जखमीला तात्काळ मदत मिळेल म्हणून पक्षीमित्र महेबूब चाचा यांनाही फोन केला. मात्र, काही वेळातच जखमी हरिणाचा मृत्यू झाला. याबाबतची माहिती वन परिमंडळ अधिकारी सचिन रामपुरे यांना देण्यात आली. त्यांनी चाकूरच्या वनअधिकाऱ्यांना याची माहिती दिल्यावर काही वेळातच वन विभागाचे कर्मचारी घटनास्थळी आले. पंचनामा करून मयत हरिणाला घेऊन गेले. वाहतूक शाखेचे पोलीस कर्मचारी दिलीप राजुळे यांनी घटनेनंतर तत्परता दाखविल्याने त्यांचे वरिष्ठांनी कौतुक केले.

शेतशिवारात वन्य प्राण्यांसाठी पाणी ठेवा...उष्णता वाढल्याने पक्षी, प्राणी पाण्यासाठी व्याकूळ होऊन भटकंती करीत आहेत. शेतात ज्यांच्याकडे विहीर, बोअर आहे, पाण्याची सुविधा आहे, अशा शेतकऱ्यांनी मुक्या प्राण्यांना पाणी पिता येईल, यासाठी सोय करावी. तसेच वनविभागाने यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहन देणे गरजेचे आहे. पाण्याच्या शोधात भटकंती करीत असलेल्या त्या हरिणाला पाणी मिळाले असते तर कदाचित अपघात झाला नसता, असे पक्षीमित्र महेबूब चाचा यांनी सांगितले.

टॅग्स :laturलातूर