शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
2
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
3
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
4
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
5
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
6
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
7
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
8
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
9
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
10
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
11
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
12
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
13
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
14
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
15
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...
16
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
17
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या
18
एथर कंपनीसाठी बॅड न्यूज? ग्रे मार्केटमध्ये चांगले संकेत नाही, आयपीओ उघडण्यापूर्वीच जीएमपी क्रॅश
19
जरा थांबा! चमचमीत खाण्याच्या नादात 'या' गोष्टी गुपचूप वाढवताहेत तुमचं वजन, आरोग्यासही घातक
20
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा

Latur: ऊस तोड कामगारांच्या मुलांची यंदाही होरपळ, लातूर जिल्ह्यात ४ वसतिगृहांना मंजुरी

By आशपाक पठाण | Updated: August 29, 2023 17:15 IST

Latur: ऊस तोड कामगारांच्या मुलांची हेळसांड होणार नाही, यासाठी राज्य शासनाने त्यांना वसतिगृह मंजूर केले आहेत. गतवर्षी राज्यात जवळपास ८० वसतिगृहाला मंजुरी मिळाली असून पहिल्या टप्प्यात केवळ २० वसतिगृह सुरू करण्याचे आदेश निघाले.

- आशपाक पठाण लातूर - ऊस तोड कामगारांच्या मुलांची हेळसांड होणार नाही, यासाठी राज्य शासनाने त्यांना वसतिगृह मंजूर केले आहेत. गतवर्षी राज्यात जवळपास ८० वसतिगृहाला मंजुरी मिळाली असून पहिल्या टप्प्यात केवळ २० वसतिगृह सुरू करण्याचे आदेश निघाले. त्यात लातूर जिल्ह्यातील ४ वसतिगृहाचा समावेश नसल्याने अजून किमान एक वर्षे तरी कामगारांच्या मुलांना वाट पहावी लागणार आहे.

लातूर जिल्ह्यात दरवर्षी मांजरा, विकास, रेणा, ट्वेंटीवन, जागृती, मारूती महाराज, विकास २ तोंडार, किल्लारी आदी ८ साखर कारखाने कार्यरत आहेत. ऊस उत्पादनात लातूर, रेणापूर, औसा हे तालुके अग्रेसर आहे. हंगामात ऊस तोडणीचे काम करणाऱ्या मजुरांच्या मुलांना शिक्षणात अडथळा निर्माण होऊ नये, यासाठी राज्य शासनाने त्यांच्यासाठी वसतिगृहे मंजूर केली आहेत. मात्र मंजुरी मिळून वर्ष लोटले तरी अद्यापही त्याची अंमलबजावणी झाली नाही. यंदाच्या गळीत हंगामातही मजुरांना आपल्या मुलांची सोय स्वत:हून करावी लागणार आहे. त्यामुळे यंदाही शिक्षणाचा बट्ट्याबोळ होण्याची शक्यता आहे.

जळकोट, रेणापूरला प्रत्येकी २ वसतिगृह...ऊस तोड कामगारांच्या मुलांसाठी जळकोट आणि रेणापूर तालुक्यात प्रत्येकी २ असे एकुण चार वसतिगृह मंजूर करण्यात आली आहेत. जळकोट तालुक्यातील वाडी, तांड्यावरील अनेकजण ऊसतोडणीसाठी जातात. तसेच रेणापूर तालुक्यातूनही अनेकजण हंगामात ऊसतोडणीला जात असल्याने या भागातील मुलांची सोय व्हावी, मजुरांच्या मुलांना चांगला आश्रय मिळावा म्हणून वसतिगृह मंजूर करण्यात आले आहे. मात्र, आखणीन किती दिवस त्याची प्रतिक्षा करावी लागणार हे मात्र अजूनही निश्चित नाही.

कार्यारंभ आदेश निघाल्यावर प्रक्रिया...समाजकल्याण विभागामार्फत सुरू करण्यात येणाऱ्या ऊस तोड कामगारांच्या मुलांच्या वसतिगृहासाठी शासनाकडून मागील वर्षीच मंजुरी मिळाली आहे. परंतू कार्यारंभ आदेश आल्याशिवाय सुरू करता येणार नसल्याने अजून किती दिवस वाट पहावी लागणार हे स्थानिक अधिकारीही सांगू शकत नाही. यासंदर्भात राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर, आ. विक्रम काळे यांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरले. मात्र, शासनादेश आल्याशिवाय आपण काहीच करू शकत नाही, असे उत्तर समाज कल्याणच्या अधिकाऱ्यांनी दिल्याने आता पाठपुरावा कोण करणार, याकडे लक्ष लागले आहे.

टॅग्स :Agriculture Sectorशेती क्षेत्र