शहरं
Join us  
Trending Stories
1
Bihar Election 2025: बिहार निवडणुकीत प्रशांत किशोर यांच्या पक्षाला किती जागा? कुणाला बसणार फटक? समोर आला धक्कादायक सर्व्हे!
2
“३३ वर्षांनंतर महादेवीला न्याय, जिथे आहे तिकडे सुखरूप”; पेटा इंडियाचे समर्थन, मठाला सल्ला
3
मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यातील गाडीत बसण्याचा प्रयत्न; चालकाने पुढे नेली, नरेंद्र पाटील खाली पडले, दुखापत
4
मालेगाव बॉम्बस्फोट: निर्दोष मुक्तता झालेल्या प्रसाद पुरोहित यांना लष्कराने दिली बढती, कर्नल पदावर केली नियुक्ती
5
ठरलं!! अश्विन भारताबाहेर पाकिस्तानी खेळाडूसोबत एकाच संघात, 'या' नंबरची जर्सी घालणार!
6
पुन्हा एकदा निराशा! गुंतवणूकदारांचे ३.२४ लाख कोटी बुडाले! 'या' कारणांमुळे बाजार धडाम
7
रोहितने ऑस्ट्रेलिया मालिकेआधी कमी केलं १० किलो वजन, फिटनेस पाहून भल्याभल्यांची 'बोलती बंद'
8
मुलीचे लग्न आहे दिवाळीत, कसं होईल ?... महिला शेतकऱ्याला अश्रू अनावर; धनंजय मुंडे म्हणाले, आक्का, सगळा खर्च माझा...
9
VLF Mobster: इतकी स्वस्त की...; 'या' स्कूटरमुळं इतर दुचाकी निर्माता कंपन्यांना फुटला घाम!
10
२० दिवस अत्यंत धोक्याचे! मंगल-हर्षल षडाष्टक योग; घात-अपघातापासून कसे वाचावे?
11
आर्यन खानच्या 'द बॅड्स ऑफ बॉलिवूड'वर संतापले समीर वानखेडे, गौरी-शाहरूख खानविरोधात मानहानीचा खटला केला दाखल
12
VIRAL : भिंतीसारखं दिसणारं घर आतून आहे आलिशान; व्हिडीओ पाहून लोक थक्क, किंमत ऐकून धक्का बसेल!
13
नवरात्र २०२५: ५ कामे अवश्य करा, नैराश्य दूर होईलच, आनंद वाटेल; भाग्योदय, घरात शुभ तेच घडेल! 
14
‘आमदार फोडण्यासाठी, शक्तीपीठ महामार्गासाठी सरकारकडे पैसे आहेत पण…’, काँग्रेसची बोचरी टीका  
15
कर्जमुक्त होणे म्हणजे आर्थिक स्वातंत्र्य नव्हे! ३० वर्षीय तरुणाची 'ती' चूक, सीएने सांगितला मोठा धोका
16
फायद्याची गोष्ट! स्टील-अ‍ॅल्युमिनियम की लोखंड? स्वयंपाकासाठी कोणती भांडी सर्वात बेस्ट?
17
'दादा, कर्जमाफी करा ना'; अजित पवार संतापले; म्हणाले, "आम्ही काय इथे गोट्या खेळायला आलोय का?" (Video)
18
"आई माझ्या आयुष्यातली क्रिटिक...", शंतनू मोघेची प्रतिक्रिया, प्रियाच्या निधनानंतर मालिकेत कमबॅक
19
निवडणूक आयोगाने मतमोजणीबाबत घेतला मोठा निर्णय, आता पोस्टल बॅलेटनंतरच होणार EVM मधील मतांची मोजणी 
20
नाशिक होणार हायटेक सिटी! एनएमआरडीए २ हजार २३० चौ.किमीचा विकास आराखडा, सहा तालुक्यांचा समावेश

पाेलीस ठाण्यात पार्किंगचा अभाव; कर्मचारी अन् नागरिकांची परवड!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2021 04:14 IST

राजकुमार जाेंधळे / लातूर : शहरातील चार पाेलीस ठाण्यांना वाहन पार्किंगसाठी जागाच नसल्याने माेठ्या प्रमाणावर कर्मचाऱ्यांसह नागरिकांची परवड सुरू ...

राजकुमार जाेंधळे / लातूर : शहरातील चार पाेलीस ठाण्यांना वाहन पार्किंगसाठी जागाच नसल्याने माेठ्या प्रमाणावर कर्मचाऱ्यांसह नागरिकांची परवड सुरू आहे. तर कर्मचारी, नागरिकांना आपली वाहने आता ठाण्याबाहेरच रस्त्यावर उभी करावी लागत आहेत. परिणामी, रहदारीला अडथळा निर्माण हाेत आहे. आता या बेशिस्तपणे थांबणाऱ्या रस्त्यावरील वाहनांना शिस्त लावण्याची गरज आहे.

लातूर शहरात गांधी चाैक, शिवाजीनगर, एमआयडीसी आणि विवेकानंद चाैक अशी चार पाेलीस ठाणी आहेत. शहराच्या विस्तारिकरणाबराेबरच लातूर ग्रामीण पाेलीस ठाण्याची निर्मिती करण्यात आली. लातूर ग्रामीण पाेलीस ठाणे वगळता इतर चार पाेलीस ठाण्यांना स्वतंत्र पार्किंगची व्यवस्थाच नाही. परिणामी, ठाण्यात कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांना, ठाण्यात तक्रार दाखल करण्यासाठी येणाऱ्या नागरिकांना आपली दुचाकी, चारचाकी वाहने ठाण्यासमाेरच रस्त्यावर बिनधास्त उभी करावी लागतात. पार्किंगअभावी कर्मचारी, नागरिकांची माेठ्या प्रमाणावर हेळसांड हाेत आहे. ठाण्याच्या परिसरात असलेली रिकामी जागा ही जप्त करण्यात आलेल्या वाहनांनी, मुद्देमालांनी व्यापली आहे. यातून पार्किंगसाठी वापरात येणारी जागाच गायब झाल्याने, पार्किंगचा प्रश्न निर्माण झाला आहे.

गांधी चाैक पाेलीस ठाणे, लातूर

लातूर शहरातील गांधी चाैक पाेलीस ठाण्याच्या परिसरात एकूण तीन कार्यालये थाटण्यात आली आहेत. यामध्ये ठाणे, उपविभागीय कार्यालय आणि शहर वाहतूक शाखेचा कारभार चालताे. त्यातच शहर वाहतूक शाखेच्यावतीने शहरातील वेगवेगळ्या मार्गावर टाेईंग केलेली वाहने आणली जातात. परिणामी, वाहनांची माेठ्या प्रमाणावर वर्दळ येथे कायम असते. आता ठाण्यात स्वतंत्र पुरेशी पार्किंगची व्यवस्था नसल्याने ठाण्यासमाेरील रस्त्यावर दुतर्फा वाहनांच्या रांगा लागत आहेत.

शिवाजीनगर पाेलीस ठाणे, लातूर

लातुरातील महत्त्वाचा चाैक असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज चाैकात शिवाजीनगर पाेलीस ठाणे आहे. या ठाण्यालाही पुरेशी जागा उपलब्ध नाही. परिणामी, पार्किंगसाठी जागाच उपलब्ध नाही. आहे त्या जागेत विविध गुन्ह्यांत जप्त करण्यात आलेली वाहने, इतर मुद्देमाल ठेवण्यात आला आहे. यातून ठाण्याच्या बाहेरच माेठ्या प्रमाणावर पाेलीस कर्मचारी, नागरिकांना वाहनांची पार्किंग करावी लागत आहे.

लातुरातील चार ठाण्यांना पार्किंगच नाही...

लातूर शहरातील गांधी चाैक, शिवाजीनगर, एमआयडीसी आणि विवेकानंद चाैक पाेलीस ठाण्यांना स्वतंत्र पार्किंगची व्यवस्थाच उपलब्ध नाही. आहे त्या जागेतच वाहनांचे पार्किंग करावे लागते. जागाच उपलब्ध नसल्याने चक्क रस्त्यावरच वाहनांचे पार्किंग करण्याची वेळ आली आहे. शहराच्या वाढत्या विस्तारिकरणामुळे आता ठाण्यातील उपलब्ध असलेली पार्किंगची जागा अपुरी पडत आहे.

पुनर्बांधणीनंतर सुटणार प्रश्न

लातूर शहरातील प्रमुख चार ठाणी, लातूर ग्रामीण, उदगीर येथील ठाण्यांच्या इमारतीच्या बांधकामाला मंजुरी मिळाली आहे. मात्र, निधीअभावी हे काम रखडल्याची माहिती उपलब्ध आहे. ज्यावेळी या इमारतीची पुनर्बांधणी हाेईल, त्यावेळी आपल्याला पुरेशी जागा उपलब्ध हाेणार आहे. यामध्ये आहे ती जागा अधिक उपयाेगात आणता येणार आहे. गांधी चाैकात एकाच इमारतीत ठाणे, उपविभागीय कार्यालय आणि शहर वाहतूक शाखा सुरू झाल्यावर पार्किंग जागेचा प्रश्न निकाली निघणार आहे.

- निखिल पिंगळे, पाेलीस अधीक्षक, लातूर