शहरं
Join us  
Trending Stories
1
"अनेकांची झोप उडवेल आजचा कार्यक्रम, जेथे मेसेज जायला हवा होता, तेथे पोहोचला"; नेमकं काय म्हणाले पीएम मोदी
2
“भावाला न्याय मिळत नाही तोपर्यंत चप्पल घालणार नाही”; संतोष देशमुख यांच्या बहिणीचा निर्धार
3
वादग्रस्त आयएएस प्रशिक्षणार्थी पूजा खेडकर पुणे पोलिसांत हजर; मनाने आलेली नाही, सामाजिक कार्यकर्त्यांचा आरोप 
4
Waves Summit 2025: "भारतात पुरेसे सिनेसमागृहच नाहीत..." आमिर खानने व्यक्त केली खंत
5
केवळ १००० रुपयांनी गुंतवणूक करून तुमच्या मुलांना बनवू शकता कोट्यधीश; कोणती आहे ही स्कीम?
6
पाकिस्तानने भारताची भीती घेतली! पीओकेमधील हॉटेल्स अन् गेस्ट हाऊसमध्ये सैन्य; मदरसे बंद
7
पाकिस्तानने अटारी, वाघा बॉर्डरचे गेट उघडले; धास्ती एवढी की पाकिस्तानींनाही घेत नव्हते...
8
प्रेक्षकांचा सूरज चव्हाणला 'गोलीगत धोका', 'झापुक झुपूक'ने पहिल्या आठवड्यात केली फक्त इतकी कमाई
9
श्रीराम दर्शनाची ओढ लागली, ३०० वर्षे जुनी परंपरा मोडली; हनुमानगढीचे महंत मंदिराबाहेर पडले!
10
हवाई दलाचं जबरदस्त शक्तिप्रदर्शन, हायवेवर उतरवली मिराज, राफेलसह ही लढाऊ विमानं
11
सिद्धार्थ-मितालीच्या घरी आला छोटा पाहुणा, फोटो शेअर करत दिली गुड न्यूज
12
WhatsApp वेबवर व्हॉइस आणि व्हिडीओ कॉलिंग फीचर लाँच; आता तुम्ही थेट करू शकता कॉल
13
बजाज चेतकला एप्रिल फूल बनविले; टीव्हीएस पहिल्यांदाच नंबर १, विक्रीत ओला कुठे...
14
पाकिस्तानी हवाई क्षेत्र बंद; एअर इंडियाला 5000 कोटी रुपयांचा फटका बसण्याचा अंदाज...
15
दारूच्या व्यसनाने आई आणि चुलतीचा खून; बीड जिल्हा दोन हत्येच्या घटनांनी हादरला
16
पंकजा मुंडेंना कॉल अन् पाठवला अश्लील मेसेज, पुण्यातील तरुणाला पोलिसांनी केली अटक
17
CEOs चा १ तासाचा पगार सामान्य कर्मचाऱ्याच्या वर्षाच्या पगाराइतका, एका रिपोर्टमध्ये झाले अनेक आश्चर्यकारक खुलासे
18
अन्न पुन्हा गरम करणं आरोग्यासाठी ठरतंय घातक; 'या' ५ गोष्टी टाळाल तरच ठणठणीत राहाल
19
 संतापजनक! मासिक पाळीत स्वयंपाक करणं महिलेच्या जीवावर बेतलं,नणंद आणि सासूने खून केल्याचा आरोप, दोन मुलं अनाथ
20
नवी मुंबईत ठाकरे गटाला खिंडार! माजी नगरसेवकांचे उद्धवसेनेला जय महाराष्ट्र, शिंदेसेनेत प्रवेश

कोल्हापुरी, सिमेंट बंधा-यांना मंजुरी, जळकोटात सिंचन क्षेत्र वाढणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 04:35 IST

जळकोट : डोंगरी म्हणून ओळखल्या जाणा-या जळकोट तालुक्यात सिंचनाचे प्रमाण वाढावे तसेच शेतक-यांची आर्थिक प्रगती व्हावी म्हणून जलसंधारण विभागाने ...

जळकोट : डोंगरी म्हणून ओळखल्या जाणा-या जळकोट तालुक्यात सिंचनाचे प्रमाण वाढावे तसेच शेतक-यांची आर्थिक प्रगती व्हावी म्हणून जलसंधारण विभागाने पाच कोटी ५४ लाख मंजूर केले आहेत. त्यातून कोल्हापुरी बंधारे, सिमेंट बंधा-यांची उभारणी करण्यात येणार आहे. त्यामुळे शेतक-यांतून समाधान व्यक्त होत आहे.

जळकोट तालुका हा पावसावर अवलंबून आहे. त्यामुळे तालुक्यातील बहुतांश शेतकरी केवळ खरीप हंगाम घेतात. तालुक्यात डोंगराळ भाग अधिक असल्याने शेती उत्पन्नाचे प्रमाण कमी आहे. त्याचबरोबर सिंचनाच्या सुविधाही कमी प्रमाणात आहेत. तालुक्यातील शेतक-यांची आर्थिक प्रगती होण्यासाठी शेती उत्पादन वाढणे आवश्यक आहे. त्यासाठी सिंचनाचे प्रमाण वाढणे गरजेचे आहे. त्यामुळे पाणीपुरवठा व स्वच्छता राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी सातत्याने पाठपुरावा केला. त्यामुळे अर्थसंकल्पीय अधिवेशनात जलसंधारण विभागाकडून पाच कोटी ५४ लाख रुपये मंजूर झाले आहेत.

या निधीतून कोल्हापुरी आणि सिमेंट बंधारे बांधण्यात येणार आहेत. जळकोटात एक कोटी ४२ लाख, तिरुका येथे एक कोटी ३२ लाख, डोंगरकोनाळीत एक कोटी ३७ लाख, उमरगा येथे एक कोटी ४३ लाख रुपये खर्चून सदरील कामे होणार आहेत. त्यामुळे तालुक्यातील या चार गावांतील शेतक-यांतून आनंद व्यक्त होत आहे. या कामामुळे पावसाच्या पाण्याचा संचय होऊन तो जमिनीत मुरणार आहे. त्याचा विहिरी, कूपनलिकांना लाभ होणार आहे.

हा निधी मंजूर झाल्याने राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष अर्जुन पाटील-आगलावे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष मारुती पांडे, बाजार समितीचे माजी सभापती मन्मथप्पा किडे, राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष संग्राम पाटील हसुळे, राष्ट्रवादी युवकचे तालुकाध्यक्ष सत्यवान पाटील-दळवे, उपाध्यक्ष विठ्ठल चव्हाण, गजानन दळवे, धनंजय भ्रमण्णा, श्याम डांगे, गोविंद ीभ्रमण्णा, दस्तगीर शेख, आकाश वाघमारे आदींनी आनंद व्यक्त केला आहे.

लवकरच टेंडर प्रक्रिया होणार...

राज्यमंत्री संजय बनसोडे म्हणाले, तालुक्यातील चार गावांतील सिंचनात वाढ व्हावी आणि शेतक-यांची प्रगती व्हावी म्हणून कोल्हापुरी व सिमेंट बंधारा कामासाठी जलसंधारण विभागाकडून पाच कोटी ५४ लाख रुपयांचा निधी मंजूर करून घेतला आहे. त्याची लवकरच टेंडर प्रक्रिया सुरू होणार आहे. ती झाल्यानंतर कामास सुरुवात होईल.

पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटणार...

तालुक्यात सिंचनाचे प्रमाण वाढल्यामुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही संपुष्टात येणार आहे. या बंधा-यामुळे हजारो एकर जमीन ओलिताखाली येणार आहे. त्याचा शेतक-यांसह सामान्यांना लाभ होणार आहे.