शहरं
Join us  
Trending Stories
1
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
2
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
3
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
4
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
5
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
6
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
7
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
8
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
9
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
10
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
11
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
12
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
13
Chanakya Niti: रातोरात श्रीमंत व्हाल, जर चाणक्यनीतीच्या 'या' ५ सवयी आजच लावून घ्याल
14
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
15
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
16
“कुणीही एकत्र येऊ शकते, पण मराठी माणूस हा पूर्णपणे भाजपाच्या पाठीशी उभा आहे”; कुणाचा दावा?
17
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
18
घसरत्या रुपयाला सावरण्यासाठी आरबीआयची धडपड; बाजारात विकले तब्बल....अब्ज डॉलर
19
पंचक २०२५: सावधान! २४ ते २९ डिसेंबर दरम्यान 'पंचक' काळ; 'या' ७ राशींनी राहावे अधिक सतर्क!
20
सोन्या-चांदीचे दर गगनाला भिडले, आज सर्व जुने रेकॉर्ड मोडले! पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेटपर्यंतचे 'लेटेस्ट रेट'
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापुरी, सिमेंट बंधा-यांना मंजुरी, जळकोटात सिंचन क्षेत्र वाढणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 04:35 IST

जळकोट : डोंगरी म्हणून ओळखल्या जाणा-या जळकोट तालुक्यात सिंचनाचे प्रमाण वाढावे तसेच शेतक-यांची आर्थिक प्रगती व्हावी म्हणून जलसंधारण विभागाने ...

जळकोट : डोंगरी म्हणून ओळखल्या जाणा-या जळकोट तालुक्यात सिंचनाचे प्रमाण वाढावे तसेच शेतक-यांची आर्थिक प्रगती व्हावी म्हणून जलसंधारण विभागाने पाच कोटी ५४ लाख मंजूर केले आहेत. त्यातून कोल्हापुरी बंधारे, सिमेंट बंधा-यांची उभारणी करण्यात येणार आहे. त्यामुळे शेतक-यांतून समाधान व्यक्त होत आहे.

जळकोट तालुका हा पावसावर अवलंबून आहे. त्यामुळे तालुक्यातील बहुतांश शेतकरी केवळ खरीप हंगाम घेतात. तालुक्यात डोंगराळ भाग अधिक असल्याने शेती उत्पन्नाचे प्रमाण कमी आहे. त्याचबरोबर सिंचनाच्या सुविधाही कमी प्रमाणात आहेत. तालुक्यातील शेतक-यांची आर्थिक प्रगती होण्यासाठी शेती उत्पादन वाढणे आवश्यक आहे. त्यासाठी सिंचनाचे प्रमाण वाढणे गरजेचे आहे. त्यामुळे पाणीपुरवठा व स्वच्छता राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी सातत्याने पाठपुरावा केला. त्यामुळे अर्थसंकल्पीय अधिवेशनात जलसंधारण विभागाकडून पाच कोटी ५४ लाख रुपये मंजूर झाले आहेत.

या निधीतून कोल्हापुरी आणि सिमेंट बंधारे बांधण्यात येणार आहेत. जळकोटात एक कोटी ४२ लाख, तिरुका येथे एक कोटी ३२ लाख, डोंगरकोनाळीत एक कोटी ३७ लाख, उमरगा येथे एक कोटी ४३ लाख रुपये खर्चून सदरील कामे होणार आहेत. त्यामुळे तालुक्यातील या चार गावांतील शेतक-यांतून आनंद व्यक्त होत आहे. या कामामुळे पावसाच्या पाण्याचा संचय होऊन तो जमिनीत मुरणार आहे. त्याचा विहिरी, कूपनलिकांना लाभ होणार आहे.

हा निधी मंजूर झाल्याने राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष अर्जुन पाटील-आगलावे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष मारुती पांडे, बाजार समितीचे माजी सभापती मन्मथप्पा किडे, राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष संग्राम पाटील हसुळे, राष्ट्रवादी युवकचे तालुकाध्यक्ष सत्यवान पाटील-दळवे, उपाध्यक्ष विठ्ठल चव्हाण, गजानन दळवे, धनंजय भ्रमण्णा, श्याम डांगे, गोविंद ीभ्रमण्णा, दस्तगीर शेख, आकाश वाघमारे आदींनी आनंद व्यक्त केला आहे.

लवकरच टेंडर प्रक्रिया होणार...

राज्यमंत्री संजय बनसोडे म्हणाले, तालुक्यातील चार गावांतील सिंचनात वाढ व्हावी आणि शेतक-यांची प्रगती व्हावी म्हणून कोल्हापुरी व सिमेंट बंधारा कामासाठी जलसंधारण विभागाकडून पाच कोटी ५४ लाख रुपयांचा निधी मंजूर करून घेतला आहे. त्याची लवकरच टेंडर प्रक्रिया सुरू होणार आहे. ती झाल्यानंतर कामास सुरुवात होईल.

पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटणार...

तालुक्यात सिंचनाचे प्रमाण वाढल्यामुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही संपुष्टात येणार आहे. या बंधा-यामुळे हजारो एकर जमीन ओलिताखाली येणार आहे. त्याचा शेतक-यांसह सामान्यांना लाभ होणार आहे.