शहरं
Join us  
Trending Stories
1
India Pakistan Tension: पाकिस्तान वेडापिसा! भारतातील 'या' ठिकाणांवर मिसाईल सोडली, Indian Army ने झटक्यात पाडली
2
India Pakistan War : भारताने लाहोर ते कराचीपर्यंतच्या ९ शहरांवर इस्रायली ड्रोनने हल्ला केला; घाबरलेल्या पाकिस्तानचा दावा
3
Operation Sindoor: भारतीय लष्कराचा पाकमध्ये आणखी एक 'धमाका'; लाहोरमधील HQ-9 डिफेन्स सिस्टम केली उद्ध्वस्त
4
भारत-पाकिस्तान तणावामुळे बाजारात दबाव; मिडकॅप-स्मॉलकॅप शेअर्समध्ये सर्वाधिक घसरण
5
ऑपरेशन सिंदूरः भारताने पाकिस्तानला दाखवलेत 'तारे', वाहतील का युद्धाचे वारे?; ग्रहस्थिती काय सांगतेय बघा!
6
'ऑपरेशन सिंदूर' भारतीय शौर्याचे प्रतीक, हा शब्द आता.. ट्रेडमार्कवर रिलायन्सचे स्पष्टीकरण
7
"दहशतवादी हल्ल्यामुळे आम्हाला प्रत्युत्तर द्यावं लागलं!"; इराणच्या परराष्ट्रमंत्र्यांसमोर एस जयशंकर काय म्हणाले?
8
India pakistan : दोन राज्यात पोलिसांच्या सुट्ट्या रद्द, शाळा बंद; राजस्थान, पंजाबमध्ये हायअलर्ट
9
चहा, डायपर ते सॅनिटायझिंग.. डाबर अनेक प्रॉडक्ट बंद करणार; सीईओंनी स्वतः सांगितलं कारण
10
Sophia Qureshi: बहीण असावी तर अशी! “मी तिच्याद्वारे माझं स्वप्न जगतेय”, कर्नल सोफिया यांचा कुटुंबीयांना अभिमान
11
भारत-पाक तणावादरम्यान सोन्या-चांदीचे दर आपटले; झाली मोठी घसरण, काय आहेत नवे दर?
12
पाकिस्ताने भारतातील १५ ठिकाणी क्षेपणास्त्रे डागली; एस-४०० 'सुदर्शन चक्र'ने हवेतच केली उद्ध्वस्त
13
Operation Sindoor: पाकिस्तानसोबतच चीनलाही दणका! भारतानं उद्ध्वस्त केलेली लाहोरमधील HQ-9 डिफेन्स सिस्टम काय आहे?
14
'आम्ही तुमच्यासोबत आहोत', ऑपरेशन सिंदूरनंतर सर्वपक्षीय बैठकीत विरोधकांचा सरकारला पाठिंबा
15
फिरोझ खान यांनी पाकिस्तानात जाऊन केलं होतं भारताचं कौतुक, मुशर्रफ भडकले आणि घातली प्रवेश बंदी!
16
जालना: घरासमोर खेळणाऱ्या सात वर्षाच्या मुलीचे श्वानांनी तोडले लचके, हल्ल्यात मुलीचा मृत्यू
17
Sanjay Singh : “पाकिस्तानने अमृतसर, होशियारपूरमध्ये क्षेपणास्त्रे डागण्याचा प्रयत्न केला, जो सैन्याने हाणून पाडला”
18
Raigad Accident: रायगडमध्ये भीषण अपघात! डंपर आणि एसटीच्या धडकेत चौघांचा मृत्यू, २० जण गंभीर जखमी
19
आधी सिंदूर आता आणणार पूर! भारताने उघडले बगलिहारचे दरवाजे, पाकिस्तानात पाणीच पाणी
20
"डॉक्टरांच्या चुकीमुळे गर्भपात झाला", प्रसिद्ध अभिनेत्रीची दुःखद कहाणी, म्हणाली- "तिसऱ्या महिन्यातच मला..."

जळकोट बाजार समितीतील मापतोल बंद, हमाल- मापाड्यांचा उदरनिर्वाहाचा प्रश्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2021 04:18 IST

जळकोट येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत तालुक्यातील ४७ गावांतील शेतकरी आपला शेतमाल विक्रीसाठी आणतात. सध्या रबीचा हा हंगाम संपुष्टात ...

जळकोट येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत तालुक्यातील ४७ गावांतील शेतकरी आपला शेतमाल विक्रीसाठी आणतात. सध्या रबीचा हा हंगाम संपुष्टात आल्याने शेतीमालाची आवक कमी झाली आहे. मात्र, सोयाबीन, हरभ-याच्या दरात वाढ झाल्याने हा शेतमाल साठवण केलेले शेतकरी आता शेतमाल विक्रीसाठी आणत आहेत. सध्या कोरोनाचा संसर्ग वाढला आहे. तो रोखण्यासाठी राज्य शासनाने कडक निर्बंध लागू केले आहेत. दरम्यान, ७ ते १४ मे या कालावधीत बाजार समितीही बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले. त्यामुळे बाजार समितीतील व्यवहार ठप्प झाले.

शुक्रवारपासून सकाळी ११ वा. पर्यंत बाजार समितीतील व्यवहार सुरु ठेवण्याची मुभा देण्यात आली असली तरी खेड्यापाड्यातील शेतकरी आपला शेतमाल घेऊन येईपर्यंत वेळेची मुदत संपत आहे. त्यामुळे मोठा प्रश्न निर्माण होत आहे. कडक निर्बंध लागू करण्यापूर्वी दररोज किमान हजार क्विंटलपर्यंत शेतमालाचे व्यवहार होत असत. त्यातून लाखो रुपयांची उलाढाल होत असे. आता ५० ते १०० क्विंटलपर्यंत व्यवहार होत आहेत. दरम्यान, हमाल मापाडी, वाहन चालकांना काम नसल्याने उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. सध्या बाजार समितीत तूर, सोयाबीनची नाममात्र स्वरुपात आवक होत आहे. परिणामी, शुकशुकाट दिसून येत आहे. त्यामुळे अर्थचक्र कोलमडले आहे.

वाहतुकीचे २५ ट्रक उभे...

लॉकडाऊनमुळे शेतमालाची विक्री करणे शेतक-यांना कठीण झाले आहे. परिणामी, शहरातील बाजार समितीत शेतमाल वाहतूक करणारे २५ ट्रक जागेवरच उभे आहेत. भाडे मिळत नसल्याने बँकेचे हप्ते कसे फेडावेत, असा प्रश्न निर्माण झाला आहे. दरम्यान, बँक, फायनान्स चालकांकडून सातत्याने वसुलीसाठी तगादा लावला जात आहे. हप्ता भरण्यासाठी सवलत द्यावी. तसेच व्याज आकारण्यात येऊ नये, अशी मागणी मोटार मालक संघाकडून करण्यात येत आहे.

मासिक ५ हजार अनुदान द्या...

काही दिवसांपासून बाजार समितीत नाममात्र प्रमाणात व्यवहार होत आहेत. परिणामी, हाताला काम मिळत नाही. कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा आणि आरोग्याचा प्रश्न निर्माण होत आहे. त्यामुळे मासिक ५ हजार रुपये अनुदान देण्यात यावे, अशी मागणी हमाल मापाडी संघटनेच्या वतीने करण्यात येत आहे.

व्यवहार नसल्याने वेतन नाही...

बाजार समितीत ५५ आडत दुकाने आहेत. तसेच हमाल मापाडी जवळपास शंभर आहेत. लॉकडाऊनमुळे परिस्थिती बिकट झाली आहे. बाजार समितीतील कर्मचा-यांना वेळेवर वेतन देण्यासाठीही पैसे नाहीत. कडक निर्बंधामुळे सर्वांनी नियमांचे पालन करणे बंधनकारक आहे, असे बाजार समितीचे प्रशासक अमोल वाघमारे व सचिव बालाजी उगिले यांनी सांगितले.