शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain Updates Live: मध्य रेल्वेची ठाणे ते सीएसएमटी दरम्यानची वाहतूक पूर्णपणे बंद
2
मिठी नदी धोक्याच्या पातळीवर; नदीलगतच्या कुटुंबांना सुरक्षित स्थळी हलवलं, बीकेसीत पाणी साचण्याची शक्यता
3
ती गुढ आग... ज्यात भारताचं सेमीकंडक्टर बनवण्याचं स्वप्न झालं होतं जळून खाक, ७ फेब्रुवारी १९८९ रोजी नेमकं काय झालं होतं?
4
सावधान! अनोळखी व्यक्तीला कॅशच्या बदल्यात पैसे ट्रान्सफर करताय? 'या' एका चुकीमुळे जावं लागेल थेट तुरुंगात
5
Himachal Pradesh: हिमाचलच्या कुल्लूमध्ये ढगफुटी; अनेक घरे, गाड्या गेल्या वाहून, ४०० रस्ते बंद!
6
Miss Universe India: २२ वर्षांच्या मनिका विश्वकर्माने जिंकला 'मिस युनिव्हर्स इंडिया २०२५' चा खिताब, कोण आहे ही सुंदरी?
7
ट्रम्प यांना भेटायला गेलेल्या झेलेन्स्कींनी मेलानियांसाठी पाठवले खास पत्र; काय आहे या पत्रात?
8
आज उपराष्ट्रपती पदासाठी उमेदवाराची घोषणा करणार 'I.N.D.I.A.'? ही 3 नावं शर्यतीत!
9
'हिंदुस्तान झिदाबाद...' तिरंग्यासाठी लंडनमध्ये पाकिस्तानींशी भिडल्या भारतीय तरुणी, पाहा VIDEO
10
पैसे दुप्पट करते ही सरकारी योजना; ५ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळेल १० लाखांचा गॅरंटीड रिटर्न, पाहा डिटेल्स
11
पतीच्या निधनामुळे खचलेल्या तिच्या आयुष्यात 'तो' आला अन् मोठा झटका देऊन गेला! तरुणीसोबत घडलं असं काही की...
12
LIC ची मोठी घोषणा! बंद पडलेल्या पॉलिसी पुन्हा सुरू करण्याची सुवर्णसंधी; विलंब शुल्कातही मोठी सूट
13
मुंबईतील सर्व सरकारी कार्यालयांना सुट्टी; खासगी कंपन्यांना वर्क फ्रॉम देण्याच्या सूचना, शाळा, कॉलेज बंद
14
रोनाल्डोचा साखरपुडा आणि सौदीचे ‘रहस्य’! स्थानिकांना वेगळा नियम आणि स्टारला वेगळा न्याय, का?
15
ठाकरे बंधू किंवा महायुती कुणीही निवडणूक जिंकली तरी बेस्ट कर्मचाऱ्यांना न्याय मिळेल का?
16
चिपळुणात वाशिष्ठी नदीने ओलांडली इशारा पातळी; पूरसदृश स्थितीमुळे कामाशिवाय घराबाहेर न पडण्याची सूचना
17
"२६ जुलैचा जलप्रलय, तुम्ही मला...", वीणा जामकरने सांगितली ज्योती चांदेकरांची भावुक आठवण
18
ट्रम्प यांच्यासोबतच्या बैठकीनंतर पुतिन यांना आली भारताची आठवण, डायल केला पंतप्रधान मोदींचा नंबर; सगळंच सांगितलं!
19
Pune Traffic: पुण्यात सकाळपासून मुसळधार! शहरात प्रचंड वाहतूककोंडी, प्रमुख मार्गांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा
20
"झोया अख्तर बड्या बापाची मुलगी...", 'गलीबॉय'साठी ऑडिशन द्यायला सांगितल्याने भडकल्या उषा नाडकर्णी

कोरोनामुळे मृत्यू होणाऱ्या कर्मचाऱ्यांना ५० लाखांचे विमा कवच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2021 04:18 IST

कोरोनासंबंधित कर्तव्य बजावत असताना कोरोनामुळे मृत्यू होणाऱ्या कर्मचाऱ्यांना प्रत्येकी ५० लाखांचे सानुग्रह साहाय्य लागू करण्याचे आदेश २९ मे २०२० ...

कोरोनासंबंधित कर्तव्य बजावत असताना कोरोनामुळे मृत्यू होणाऱ्या कर्मचाऱ्यांना प्रत्येकी ५० लाखांचे सानुग्रह साहाय्य लागू करण्याचे आदेश २९ मे २०२० रोजी राज्य शासनाने दिले होते. सदरील आदेश ३० सप्टेंबर २०२० पर्यंत लागू होते. त्यानंतर ३१ डिसेंबर २०२० पर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. त्यानंतर घडलेल्या मृत्यूची प्रकरणे वित्त विभागाच्या सहमतीने विशेष बाब म्हणून निकाली काढली जात होती.

दरम्यान, राज्यात कोविडची दुसरी लाट पसरली. हा संसर्ग रोखण्यासाठी शासकीय अधिकारी, कर्मचारी हे जीवाची पर्वा न करता अहोरात्र मेहनत घेत आहेत. त्यात काही अधिकारी व कर्मचाऱ्यांना सेवा करीत असताना कोविडमुळे स्वत:चे प्राण गमवावे लागले. मात्र, या कर्मचाऱ्यांच्या नातेवाइकांना मुदतीमुळे ५० लाखांचे सानुग्रह साहाय्य मिळणे कठीण झाले होते. त्यामुळे या साहाय्यासाठी मुदतवाढ देण्यात यावी, अशी मागणी जिल्हा परिषद अध्यक्ष राहुल केंद्रे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे करून पाठपुरावा केला होता. त्यांच्या पाठपुराव्यास यश आले असून शुक्रवारी राज्य शासनाने सहसचिव विवेक दहिफळे यांनी सदरील सानुग्रह साहाय्यासाठी १ जानेवारी २०२१ पासून ते ३० जून २०२१ पर्यंत मुदतवाढ देण्यात येत असल्याचा आदेश काढला आहे. त्यामुळे शासकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

अधिकारी-कर्मचाऱ्यांना दिलासा...

काेराेनामुळे मृत्यू होणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांसाठीच्या ५० लाखांच्या सानुग्रह साहाय्याची मुदत संपुष्टात आल्याने अधिकारी, कर्मचाऱ्यांतून नाराजी व्यक्त होत होती. दरम्यान, आपण मुख्यमंत्र्यांकडे मुदतवाढ देण्याची मागणी केली होती. त्यामुळे मुदतवाढ मिळाली असल्याने अधिकारी-कर्मचाऱ्यांतून समाधान व्यक्त होत आहे, असे जिल्हा परिषद अध्यक्ष राहुल केंद्रे यांनी सांगितले.