शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्याच्या सीमेवर वाहनांची तपासणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 04:32 IST

ट्रान्सफाॅर्मर दुरुस्तीसाठी करावी लागतेय वेटिंग लातूर : ग्रामीण भागात वीजपुरवठा सातत्याने खंडित होत आहे. त्यामुळे शेतीला पाणी देताना अडचणींचा ...

ट्रान्सफाॅर्मर दुरुस्तीसाठी करावी लागतेय वेटिंग

लातूर : ग्रामीण भागात वीजपुरवठा सातत्याने खंडित होत आहे. त्यामुळे शेतीला पाणी देताना अडचणींचा सामना करावा लागत आहे. काही ठिकाणी तर ट्रान्सफाॅर्मर नादुरुस्त झाले असल्याने शेतकऱ्यांची गैरसोय होत आहे. महावितरणकडे पाठपुरावा करूनही वेळेवर ट्रान्सफाॅर्मर दुरुस्त करून मिळत नसल्याची शेतकऱ्यांची ओरड आहे. याकडे महावितरण प्रशासनाने तत्काळ लक्ष देण्याची मागणी होत आहे.

एसटीच्या मालवाहतूक उपक्रमाला प्रतिसाद

लातूर : उत्पन्नाचा स्रोत निर्माण करण्यासाठी राज्य परिवहन महामंडळाच्या वतीने मालवाहतूक उपक्रम सुरू करण्यात आला आहे. गेल्या अकरा महिन्यांच्या काळात लातूर मंडळाला १ कोटी ८१ लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. सध्या २२ मालवाहतूक ट्रक सेवेत असून किराणा माल, शेतीविषयक खते, बियाणांची वाहतूक केली जात आहे. लातूर मंडळात औसा, निलंगा, उदगीर, अहमदपूर आणि लातूर या पाच आगारांचा समावेश आहे. या उपक्रमाला चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे महामंडळाने सांगितले.

ग्रामीण भागात पाणीटंचाईच्या झळा

लातूर : जिल्ह्यात उन्हाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून, ग्रामीण भागात पाणीटंचाईच्या झळा तीव्र झाल्या आहेत. अहमदपूर, लातूर, रेणापूर, उदगीर, जळकोट आदी तालुक्यांतील गावांनी अधिग्रहणासाठी पंचायत समितीस्तरावर प्रस्ताव सादर केले आहेत. तहसील कार्यालयातून पडताळणी केल्यानंतर या प्रस्तावांना मंजुरी देण्यात येणार आहे. दरम्यान, टंचाई निवारणासाठी प्रशासनाच्या वतीने आराखडा तयार करण्यात आला आहे. त्यानुसार उपाययोजना राबिवल्या जात आहेत.

ग्रामपंचायतीच्या वतीने जनजागृती मोहीम

लातूर : ग्रामीण भागात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने ग्रामपंचायतीच्या वतीने जनजागृती मोहीम तसेच लसीकरणाबाबत माहिती दिली जात आहे. स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे मुले, युवक तसेच गावातील ज्येष्ठांनी मिळून काही ठिकाणी अँटी कोरोना फोर्स कार्यान्वित केली आहे. दवंडीद्वारे विनाकारण बाहेर फिरू नये, अशा सूचना केल्या जात आहेत. ग्रामपंचायतीच्या वतीने निर्जंतुकीकरण फवारणी मोहीमही राबविली जात आहे. नागरिकांनी सर्दी, ताप, खोकला लक्षणे दिसताच आरोग्य तपासणी करावी. तसेच मास्क, फिजिकल डिस्टन्स आदी नियमांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन ग्रामपंचायतीच्या वतीने करण्यात आले आहे. दरम्यान, अनेक गावांत कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने नागरिकांनी शेतशिवारात स्थलांतर केले असल्याचे चित्र आहे.