शहरं
Join us  
Trending Stories
1
बीडमध्ये खळबळ! सरकारी वकिलाने कोर्टातच संपवले आयुष्य, न्यायाधीशासह दोघांवर गुन्हा; प्रकरण काय?
2
भारतीय ड्रायव्हर्संना डोनाल्ड ट्रम्प यांचा झटका! वर्कर व्हिसा मिळणार नाही, अमेरिकेतील नोकऱ्या जाणार
3
Pune: हनी ट्रॅप प्रकरणातील प्रफुल लोढाचे आणखी एक कांड; पिंपरी पोलिसांनी केली अटक; महिलेच्या तक्रारीत काय?
4
जोधपूरला जाणारे एअर इंडियाचे विमान अचानक परतले, मुंबई विमानतळावर गोंधळ! नेमकं झालं काय?
5
'कॅस्पियन समुद्र' गायब होतोय का? पाच वर्षात ३ फूट पाणी कमी झालं; 'या' ५ देशांना धोका, कारण...
6
डी-गँगच्या 'ड्रग्ज फॅक्टरी'वर धाड, 92 कोटींचे एमडी ड्रग्ज जप्त, मुंबई-ठाण्याचंही कनेक्शन
7
Rain Alert : गणपतीच्या आगमनाला पावसाचा 'ताशा'! पुढचे काही दिवस 'मुसळधार' कोसळणार; कोणत्या जिल्ह्यांना इशारा?
8
सलग ६ दिवसांच्या तेजीला ब्रेक! गुंतवणूकदारांचे २ लाख कोटींचे नुकसान, एशियन पेंट्समध्ये सर्वाधिक आपटला
9
इथेनॉलयुक्त पेट्रोलमुळे गाड्या खराब होतात; कोण पसरवतोय गैरसमज? नितीन गडकरीनी स्पष्टच बोलले
10
Shani Amavasya 2025: शनीची वक्री चाल 'या' ५ राशींचे पुढील २ महिने करणार हाल; जाणून घ्या उपाय!
11
आता आरोग्य विमा तुमच्या आवाक्यात राहणार! कंपन्यांच्या प्रीमियम वाढीवर IRDAI घेणार मोठा निर्णय
12
"ठाकरे बंधू बोलबच्चन...; बाळासाहेबांनंतर मराठी माणसांच्या मनात एकनाथ शिंदेंचं स्थान"
13
विश्वासातील 'टाटां'च्या शेअर्सनं केलं निराश, ग्रुपच्या या शेअरनं सर्वाधिक बुडवलं
14
'कर्मचारी निलंबित होऊ शकतो, तर पंतप्रधान का नाही?', PM-CM विधेयकावरुन मोदींचा काँग्रेसवर निशाणा
15
"मी २५ वर्षाची अन् बॉयफ्रेंड ७६ वर्षाचा, तरीही खूप खुश"; इंटरनेटवर व्हायरल जोडपं, गर्लफ्रेंड म्हणते...
16
Gold Silver Price 22 August: सोनं महागलं, चांदी सुस्साट; किंमतीत ₹१४४१ ची वाढ, खरेदीपूर्वी पाहा नवे दर
17
या ₹15 पेक्षाही कमी किंमतीच्या शेअरला 5 दिवसांपासून लागतंय अप्पर सर्किट, करतोय मालामाल! पण कारण काय?
18
ICC Women’s World Cup 2025 : ...तर नवी मुंबईतील मैदानात रंगणार वनडे वर्ल्ड कप स्पर्धेतील फायनल
19
WhatsApp वापरणाऱ्या प्रत्येकालाच 'हे' सीक्रेट सिक्युरिटी फीचर्स माहीत असायला हवेत!
20
"क्लर्कची नोकरी जाते, तर मुख्यमंत्री, पंतप्रधानांची खुर्ची का नाही?"; PM मोदी भ्रष्टाचार विरोधी विधेयकावर काय बोलले?

जिल्ह्याच्या सीमेवर वाहनांची तपासणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 04:32 IST

ट्रान्सफाॅर्मर दुरुस्तीसाठी करावी लागतेय वेटिंग लातूर : ग्रामीण भागात वीजपुरवठा सातत्याने खंडित होत आहे. त्यामुळे शेतीला पाणी देताना अडचणींचा ...

ट्रान्सफाॅर्मर दुरुस्तीसाठी करावी लागतेय वेटिंग

लातूर : ग्रामीण भागात वीजपुरवठा सातत्याने खंडित होत आहे. त्यामुळे शेतीला पाणी देताना अडचणींचा सामना करावा लागत आहे. काही ठिकाणी तर ट्रान्सफाॅर्मर नादुरुस्त झाले असल्याने शेतकऱ्यांची गैरसोय होत आहे. महावितरणकडे पाठपुरावा करूनही वेळेवर ट्रान्सफाॅर्मर दुरुस्त करून मिळत नसल्याची शेतकऱ्यांची ओरड आहे. याकडे महावितरण प्रशासनाने तत्काळ लक्ष देण्याची मागणी होत आहे.

एसटीच्या मालवाहतूक उपक्रमाला प्रतिसाद

लातूर : उत्पन्नाचा स्रोत निर्माण करण्यासाठी राज्य परिवहन महामंडळाच्या वतीने मालवाहतूक उपक्रम सुरू करण्यात आला आहे. गेल्या अकरा महिन्यांच्या काळात लातूर मंडळाला १ कोटी ८१ लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. सध्या २२ मालवाहतूक ट्रक सेवेत असून किराणा माल, शेतीविषयक खते, बियाणांची वाहतूक केली जात आहे. लातूर मंडळात औसा, निलंगा, उदगीर, अहमदपूर आणि लातूर या पाच आगारांचा समावेश आहे. या उपक्रमाला चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे महामंडळाने सांगितले.

ग्रामीण भागात पाणीटंचाईच्या झळा

लातूर : जिल्ह्यात उन्हाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून, ग्रामीण भागात पाणीटंचाईच्या झळा तीव्र झाल्या आहेत. अहमदपूर, लातूर, रेणापूर, उदगीर, जळकोट आदी तालुक्यांतील गावांनी अधिग्रहणासाठी पंचायत समितीस्तरावर प्रस्ताव सादर केले आहेत. तहसील कार्यालयातून पडताळणी केल्यानंतर या प्रस्तावांना मंजुरी देण्यात येणार आहे. दरम्यान, टंचाई निवारणासाठी प्रशासनाच्या वतीने आराखडा तयार करण्यात आला आहे. त्यानुसार उपाययोजना राबिवल्या जात आहेत.

ग्रामपंचायतीच्या वतीने जनजागृती मोहीम

लातूर : ग्रामीण भागात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने ग्रामपंचायतीच्या वतीने जनजागृती मोहीम तसेच लसीकरणाबाबत माहिती दिली जात आहे. स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे मुले, युवक तसेच गावातील ज्येष्ठांनी मिळून काही ठिकाणी अँटी कोरोना फोर्स कार्यान्वित केली आहे. दवंडीद्वारे विनाकारण बाहेर फिरू नये, अशा सूचना केल्या जात आहेत. ग्रामपंचायतीच्या वतीने निर्जंतुकीकरण फवारणी मोहीमही राबविली जात आहे. नागरिकांनी सर्दी, ताप, खोकला लक्षणे दिसताच आरोग्य तपासणी करावी. तसेच मास्क, फिजिकल डिस्टन्स आदी नियमांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन ग्रामपंचायतीच्या वतीने करण्यात आले आहे. दरम्यान, अनेक गावांत कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने नागरिकांनी शेतशिवारात स्थलांतर केले असल्याचे चित्र आहे.