शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; साध्वी प्रज्ञा ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
3
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
4
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
5
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
6
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
7
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."
8
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
9
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
10
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
11
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
12
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
13
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
14
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
15
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
16
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
17
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
18
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
19
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
20
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या

चिंता वाढली; तेरणावरील सर्व बंधाऱ्यांना लागली खरडण !

By संदीप शिंदे | Updated: April 6, 2024 11:30 IST

औराद बंधाऱ्यात केवळ १० दहा टक्के साठा : नदीकाठच्या गावांचे अधिग्रहणाचे प्रस्ताव

औराद शहाजानी : निलंगा तालुक्यातील औराद शहाजानी परिसरातून निम्न तेरणा नदी वाहते. या नदीवरील सातपैकी सहा बंधारे कोरडे पडले आहेत. यातच दिवसेंदिवस तापमानाचा पारा वाढत असून गुरुवारी औराद शहाजानी हवामान केंद्रावर ४३ अंशाची नोंद झाली आहे. परिणामी, बाष्पीभवन वाढले असून, तेरणा व मांजरा नदीवरील सर्व उच्चस्तरीय बंधारे कोरडेठाक पडले आहेत. त्यामुळे नदीकाठच्या गावांनाही पाणीटंचाईच्या झळा बसू लागल्या आहेत. या भागातील अनेक गावांनी विंधन विहीर अधिग्रहणाचे प्रस्ताव प्रशासनाकडे दाखल केले.

औराद शहाजानी परिसरातून वाहणाऱ्या तेरणा, मांजरा दोन्ही नद्यांवरील उच्चस्तरीय बंधारे, कोल्हापुरी बंधारे कोरडे पडले आहेत. याशिवाय या भागातील लघु साठवण तलावही कोरडेठाक आहेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणात पाणीटंचाई निर्माण झाली आहे. परतीचा पाऊस न पडल्याने व लवकरच पाणीसाठा उन्हाळ्याच्या प्रारंभी कोरडाठाक झाल्याने या भागातील अनेक विंधन विहिरी बंद पडल्या असून, या भागात पाणीटंचाईचा सामना एप्रिल महिन्यामध्येच करावा लागत असल्याचे दिसून येत आहे.

तगरखेडा ग्रामपंचायतीने दोन विंधन विहिरीचा प्रस्ताव अधिग्रहणासाठी निलंगा तहसीलकडे सादर केल्याचे उपसरपंच मदन बिराजदार म्हणाले. याच पद्धतीने तेरणापट्टा भागातील पाणीसाठा यावर्षी लवकर आटल्याने अनेक गावातील विंधन विहिरी बंद पडल्या असून, सार्वजनिक पाणीपुरवठा योजनेवरती मोठ्या प्रमाणात ताण आल्याने गावातील काही भागांमध्ये पाणीपुरवठा होत नसल्याचे चित्र आहे. या भागाला विंधन विहिरी अधिग्रहण करून पाणीपुरवठा करावा अशी मागणी अनेक गावातील लोकप्रतिनिधी यांच्याकडून प्रशासनाकडे केली जात आहे. सातपैकी औराद शहाजानी उच्चस्तरीय बंधाऱ्यात केवळ दहा टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. तर सर्वच बंधारे काेरडेठाक पडले असल्याचे जलसिंचन शाखा अधिकारी दिनेश काेल्हे यांनी सांगितले. दरम्यान, तहसीलदार प्रसाद कुलकर्णी म्हणाले, अधिग्रहणाचा आलेला प्रस्ताव त्याच दिवशी मंजूर करीत असून, ग्रामपंचायतीच्या बोर्डावर अधिग्रहण केलेल्या जलस्त्रोताचे ठिकाण दाखविले जात आहे. सध्या २५ गावांनी ४१ प्रस्ताव पाठविले असून, २६ प्रस्ताव मंजूर झाले आहेत.

हजारो हेक्टरवरील उसाचे क्षेत्र धोक्यात...चार वर्षे सातत्याने चांगला पाऊस झाला. यातच गेल्या वर्षीपासून उसाला चांगला दर मिळत असल्याने निलंगा, लातूर, धाराशिव व शेजारील कर्नाटक राज्यातील अनेक साखर कारखाने पुन्हा एकदा जोमाने सुरू झाले. त्यामुळे तेरणा पट्ट्यातील शेतकऱ्यांनी शाश्वत पीक म्हणून मोठ्या प्रमाणात उसाची लागवड केली आहे. मात्र, यावर्षी अत्यल्प पाऊस झाला. त्यात परतीच्या पावसानेही दगा दिला. त्यामुळे हजारो हेक्टरवरील उसाचे क्षेत्र धोक्यात आले आहे.

तापमानाचा पारा ४४ अंशावर...औराद शहाजानीसह परिसरात तापमानाचा पारा वाढला असून, बुधवारी ४२.५ अंशांवर असलेले तापमान गुरुवारी ४३ तर शुक्रवारी ४४ अंशांवर पोहोचल्याने अंगाची लाही-लाही होत आहे. दरम्यान, याच वातावरणात हलकेसे ढगाळ वातावरण निर्माण होत आहे. त्यामुळे उकाडा वाढलेला असून पुढील आठवड्यात सीमावर्ती भागामध्ये हलका पाऊस होण्याची शक्यता हवामान तज्ज्ञांनी वर्तविली आहे. वाढत्या उन्हामुळे दुपारच्या वेळी बाजारात शुकशुकाट दिसून येत असून, पाण्याचे बाष्पीभवन मोठ्या प्रमाणात वाढले आहे.

टॅग्स :laturलातूरWaterपाणी