शहरं
Join us  
Trending Stories
1
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
2
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
3
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
4
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
5
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
6
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
7
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
8
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
9
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
10
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
11
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
12
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
13
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
14
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
15
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
16
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
17
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
18
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
19
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."

चिंता वाढली; तेरणावरील सर्व बंधाऱ्यांना लागली खरडण !

By संदीप शिंदे | Updated: April 6, 2024 11:30 IST

औराद बंधाऱ्यात केवळ १० दहा टक्के साठा : नदीकाठच्या गावांचे अधिग्रहणाचे प्रस्ताव

औराद शहाजानी : निलंगा तालुक्यातील औराद शहाजानी परिसरातून निम्न तेरणा नदी वाहते. या नदीवरील सातपैकी सहा बंधारे कोरडे पडले आहेत. यातच दिवसेंदिवस तापमानाचा पारा वाढत असून गुरुवारी औराद शहाजानी हवामान केंद्रावर ४३ अंशाची नोंद झाली आहे. परिणामी, बाष्पीभवन वाढले असून, तेरणा व मांजरा नदीवरील सर्व उच्चस्तरीय बंधारे कोरडेठाक पडले आहेत. त्यामुळे नदीकाठच्या गावांनाही पाणीटंचाईच्या झळा बसू लागल्या आहेत. या भागातील अनेक गावांनी विंधन विहीर अधिग्रहणाचे प्रस्ताव प्रशासनाकडे दाखल केले.

औराद शहाजानी परिसरातून वाहणाऱ्या तेरणा, मांजरा दोन्ही नद्यांवरील उच्चस्तरीय बंधारे, कोल्हापुरी बंधारे कोरडे पडले आहेत. याशिवाय या भागातील लघु साठवण तलावही कोरडेठाक आहेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणात पाणीटंचाई निर्माण झाली आहे. परतीचा पाऊस न पडल्याने व लवकरच पाणीसाठा उन्हाळ्याच्या प्रारंभी कोरडाठाक झाल्याने या भागातील अनेक विंधन विहिरी बंद पडल्या असून, या भागात पाणीटंचाईचा सामना एप्रिल महिन्यामध्येच करावा लागत असल्याचे दिसून येत आहे.

तगरखेडा ग्रामपंचायतीने दोन विंधन विहिरीचा प्रस्ताव अधिग्रहणासाठी निलंगा तहसीलकडे सादर केल्याचे उपसरपंच मदन बिराजदार म्हणाले. याच पद्धतीने तेरणापट्टा भागातील पाणीसाठा यावर्षी लवकर आटल्याने अनेक गावातील विंधन विहिरी बंद पडल्या असून, सार्वजनिक पाणीपुरवठा योजनेवरती मोठ्या प्रमाणात ताण आल्याने गावातील काही भागांमध्ये पाणीपुरवठा होत नसल्याचे चित्र आहे. या भागाला विंधन विहिरी अधिग्रहण करून पाणीपुरवठा करावा अशी मागणी अनेक गावातील लोकप्रतिनिधी यांच्याकडून प्रशासनाकडे केली जात आहे. सातपैकी औराद शहाजानी उच्चस्तरीय बंधाऱ्यात केवळ दहा टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. तर सर्वच बंधारे काेरडेठाक पडले असल्याचे जलसिंचन शाखा अधिकारी दिनेश काेल्हे यांनी सांगितले. दरम्यान, तहसीलदार प्रसाद कुलकर्णी म्हणाले, अधिग्रहणाचा आलेला प्रस्ताव त्याच दिवशी मंजूर करीत असून, ग्रामपंचायतीच्या बोर्डावर अधिग्रहण केलेल्या जलस्त्रोताचे ठिकाण दाखविले जात आहे. सध्या २५ गावांनी ४१ प्रस्ताव पाठविले असून, २६ प्रस्ताव मंजूर झाले आहेत.

हजारो हेक्टरवरील उसाचे क्षेत्र धोक्यात...चार वर्षे सातत्याने चांगला पाऊस झाला. यातच गेल्या वर्षीपासून उसाला चांगला दर मिळत असल्याने निलंगा, लातूर, धाराशिव व शेजारील कर्नाटक राज्यातील अनेक साखर कारखाने पुन्हा एकदा जोमाने सुरू झाले. त्यामुळे तेरणा पट्ट्यातील शेतकऱ्यांनी शाश्वत पीक म्हणून मोठ्या प्रमाणात उसाची लागवड केली आहे. मात्र, यावर्षी अत्यल्प पाऊस झाला. त्यात परतीच्या पावसानेही दगा दिला. त्यामुळे हजारो हेक्टरवरील उसाचे क्षेत्र धोक्यात आले आहे.

तापमानाचा पारा ४४ अंशावर...औराद शहाजानीसह परिसरात तापमानाचा पारा वाढला असून, बुधवारी ४२.५ अंशांवर असलेले तापमान गुरुवारी ४३ तर शुक्रवारी ४४ अंशांवर पोहोचल्याने अंगाची लाही-लाही होत आहे. दरम्यान, याच वातावरणात हलकेसे ढगाळ वातावरण निर्माण होत आहे. त्यामुळे उकाडा वाढलेला असून पुढील आठवड्यात सीमावर्ती भागामध्ये हलका पाऊस होण्याची शक्यता हवामान तज्ज्ञांनी वर्तविली आहे. वाढत्या उन्हामुळे दुपारच्या वेळी बाजारात शुकशुकाट दिसून येत असून, पाण्याचे बाष्पीभवन मोठ्या प्रमाणात वाढले आहे.

टॅग्स :laturलातूरWaterपाणी