शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
2
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
3
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
4
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
5
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
6
मोठी बातमी! पालघरमधील मेलोडी फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
7
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
8
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
9
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
10
Shreyas Iyer : बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
11
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
12
पाकिस्तानात मोठी घडामोड! इम्रान खान तुरुंगातून बाहेर येणार? एकाचवेळी आठ प्रकरणांत मिळाला जामीन 
13
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!
14
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
15
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
16
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
17
Asia Cup 2025 : टीम इंडिया आशिया कप स्पर्धेत पाकविरुद्ध खेळणार का? मोठी माहिती आली समोर
18
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका
19
Nashik House Collapses: नाशकात दुमजली घर कोसळलं, आठ महिलांसह नऊ जण जखमी
20
भारताच्या सीमेवर 'चिनी' पकड मजबूत होतेय? जिनपिंग यांनी तिबेटला दिले 'हे' नवे निर्देश!

रासायनिक खतांच्या दरात वाढ, आर्थिक अडचणींमुळे बळीराजा हतबल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2021 04:20 IST

अहमदपूर : पावसाळा सुरू होण्यास जवळपास तीन आठवडे शिल्लक आहेत. त्यामुळे शेतकरी आतापासूनच खरिपाची तयारी करीत आहेत. बी- बिाणे, ...

अहमदपूर : पावसाळा सुरू होण्यास जवळपास तीन आठवडे शिल्लक आहेत. त्यामुळे शेतकरी आतापासूनच खरिपाची तयारी करीत आहेत. बी- बिाणे, खतांची खरेदी करण्यासाठी आर्थिक जुळवाजुळव सुरू झाली आहे. मात्र, गतवर्षीच्या तुलनेत यंदा बियाणे विशेषत: खतांच्या दरात मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे बळीराजा हतबल होत असल्याचे दिसून येत आहे.

यंदाच्या पावसाळ्यात समाधानकारक पाऊस होईल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. त्यामुळे शेतकरी आनंदित झाले आहेत. दरम्यान, पेरणीपूर्व मशागतीची कामे आटोपत आहेत. कोरोनाच्या संकटामुळे लागू करण्यात आलेल्या संचारबंदीचा भाजीपाला, फळ उत्पादकांना मोठा फटका बसला आहे. तसेच थकबाकीदार शेतकऱ्यांना पीककर्ज वाटपाचा गुंता अद्यापही कायम आहे. अशा परिस्थितीत बियाणांच्या दरात वाढ झाली आहे. गतवर्षी विविध कंपन्यांच्या सोयाबीन बियाणाची एक बॅग १ हजार ७०० ते १ हजार ९५० रुपयांपर्यंत मिळत होती. यंदा त्यात चांगलीच वाढ झाली आहे. उडीद, मूग बियाणांच्या दरातही वाढ झाली आहे. ऐन खरिपाच्या तोंडावर खतांच्या दरात सरासरी ६०० ते ७०० रुपयांची वाढ झाली आहे. त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. त्यामुळे नियोजन कोलमडले आहे.

खताचे नाव पूर्वीचे दर सध्याचे दर

१०-२६-२६ ११७५ १७७५

१२-३२-१६ ११९० १८००

२०-२०-० ९७५ १३५०

डीएपी १२०० १९००

पोटॅश ८५० १०००

सुपर फॉस्फेट ४०० ५००

केंद्र सरकारने किमती कमी कराव्यात...

कोरोनामुळे शेतीमाल विक्रीची व्यवस्था कोलमडली आहे. त्यातच रासायनिक खतांची दरवाढ झाली आहे. युरिया वगळता सर्वच खतांमध्ये ६०० ते ७०० रुपयांनी वाढ झाली आहे. खत विक्रेत्यांचा नफाही कमी होणार आहे. केंद्र सरकारने खतांच्या किमती कमी करून बळीराजाला दिलासा द्यावा.

- शिवाजीराव पाटील, कृषी सेवा केंद्र चालक.

शेतकऱ्यांच्या शेतीमाल उत्पादन खर्चात मोठी वाढ झाली आहे. त्या तुलनेत त्यांचे उत्पन्न कमी आहे. खतांच्या भावात ६०० ते ७०० रुपयांनी वाढ झाल्याने शेतकरी आणखी कर्जबाजारी होतील. उत्पादन खर्चाएवढाही भाव मिळत नाही. केंद्र सरकारने खतांचे भाव कमी करावेत.

- विश्वनाथ हेंगणे,

प्रगतिशील शेतकरी, हडोळती.

गेल्या वर्षी अति पावसाने सोयाबीनचे नुकसान झाले. यावर्षी सोयाबीन बियाणे दरात वाढ झाली.

दरवर्षी उद्भवणाऱ्या संकटामुळे शेतकऱ्यांना सतत आर्थिक अडचणीचा सामना करावा लागतो. आता बियाणे, खतांच्या दरात वाढ झाल्याने नवे संकट आले आहे. शासनाकडून मदतीची गरज आहे.

- संतोष कदम, प्रगतिशील शेतकरी,

तांबट सांगवी.