शहरं
Join us  
Trending Stories
1
भूषण गवई यांच्यानंतर कोण होणार देशाचे पुढील सरन्यायाधीश?; केंद्र सरकारनं सुरू केली प्रक्रिया
2
नाग मिसाइल, टॉरपीडो आणि तोप...सैन्याची ताकद वाढणार; तिन्ही सैन्यदलासाठी ७९ हजार कोटी मंजूर
3
सत्यपाल मलिक यांना श्रद्धांजली वाहताना जम्म-काश्मीर विधानसभेत रणकंदन, नॅशनल कॉ़न्फ्रन्स आणि भाजपाचे आमदार भिडले 
4
मी विकृतीविरोधात लढतोय, भाजपा नाही; रवींद्र धंगेकरांचा पुन्हा हल्लाबोल, मोहोळांवर निशाणा
5
भारत ऑस्ट्रेलियाशी हरल्यावर 'कॅप्टन' गिलने घेतलं रोहितचं नाव; कुणावर फोडलं पराभवाचं खापर?
6
राज आणि उद्धव ठाकरेंसह संपूर्ण ठाकरे कुटुंब भाऊबीजेसाठी अनेक वर्षांनी आलं एकत्र, पाहा खास फोटो
7
उल्हासनगरात दिवाळीत पाणीटंचाईमुळे संताप; नागरिकांचा घरासमोर रिकामा हंडा ठेवून निषेध
8
Nagpur: नागपूर पदवीधरसाठी भाजपचा 'तो' चेहरा कोण? मुख्यमंत्र्यांनी दिले मोठे संकेत!
9
IND W vs NZ W, World Cup 2025 : टीम इंडियाची सुपरहिट जोडी! स्मृती-प्रतीकानं 'द्विशतकी' भागीदारीसह रचला इतिहास
10
Video: पेशावर शहरात ना पाकिस्तानी सैन्य ना सरकार; TTP चा कब्जा, असीम मुनीरच्या दाव्याची पोलखोल
11
Smriti Mandhana Century: स्मृतीची विक्रमी सेंच्युरी; वर्ल्ड रेकॉर्ड सेट करत झाली नवी 'सिक्सर क्वीन'
12
Jogeshwari Fire: १० व्या मजल्यावरुन 'ते' ओरडत होते, कपडे लपेटून घेतले; जोगेश्वरीतील अग्नितांडवाची थरारक दृश्य समोर...
13
ऑस्ट्रेलियाची 'दिवाळी'! भारतीय गोलंदाज 'फुसका बार'; कांगारुंनी फोडले 'मालिका विजया'चे फटाके
14
४० हजारांची नाणी घेऊन स्कूटी खरेदी करण्यासाठी पोहोचला शेतकरी, कर्मचाऱ्यांची तारांबळ, त्यानंतर...
15
Viral Video: पेट्रोलच्या पिशवीवर फटाका फोडला, तरुणासोबत घडलं भयंकर!
16
मुख्यमंत्र्यांनी आदेश दिले तर...! महायुती की स्वबळावर, निवडणुकीबाबत मुरलीधर मोहोळ काय म्हणाले?
17
फायदेच फायदे! साखर नसलेला चहा आरोग्यासाठी गुणकारी, वजन कमी करण्यासाठी प्रभावी
18
ठरलं! 'या' तारखेला टीम इंडियाला मिळणार Asia Cup ट्रॉफी; पण नक्वी यांनी पुन्हा ठेवली खास अट
19
फ्री सेलिब्रेशन पार्टी अन् २ लाख रोख, फक्त 'ती' गर्भवती राहिली पाहिजे; हॉटेल मालकानं दिली ऑफर
20
Pratika Rawal Equals World Record : अंपायरच्या लेकीची कमाल! सर्वात जलद १००० धावांसह विश्वविक्रमाची बरोबरी

रासायनिक खतांच्या दरात वाढ, आर्थिक अडचणींमुळे बळीराजा हतबल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2021 04:20 IST

अहमदपूर : पावसाळा सुरू होण्यास जवळपास तीन आठवडे शिल्लक आहेत. त्यामुळे शेतकरी आतापासूनच खरिपाची तयारी करीत आहेत. बी- बिाणे, ...

अहमदपूर : पावसाळा सुरू होण्यास जवळपास तीन आठवडे शिल्लक आहेत. त्यामुळे शेतकरी आतापासूनच खरिपाची तयारी करीत आहेत. बी- बिाणे, खतांची खरेदी करण्यासाठी आर्थिक जुळवाजुळव सुरू झाली आहे. मात्र, गतवर्षीच्या तुलनेत यंदा बियाणे विशेषत: खतांच्या दरात मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे बळीराजा हतबल होत असल्याचे दिसून येत आहे.

यंदाच्या पावसाळ्यात समाधानकारक पाऊस होईल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. त्यामुळे शेतकरी आनंदित झाले आहेत. दरम्यान, पेरणीपूर्व मशागतीची कामे आटोपत आहेत. कोरोनाच्या संकटामुळे लागू करण्यात आलेल्या संचारबंदीचा भाजीपाला, फळ उत्पादकांना मोठा फटका बसला आहे. तसेच थकबाकीदार शेतकऱ्यांना पीककर्ज वाटपाचा गुंता अद्यापही कायम आहे. अशा परिस्थितीत बियाणांच्या दरात वाढ झाली आहे. गतवर्षी विविध कंपन्यांच्या सोयाबीन बियाणाची एक बॅग १ हजार ७०० ते १ हजार ९५० रुपयांपर्यंत मिळत होती. यंदा त्यात चांगलीच वाढ झाली आहे. उडीद, मूग बियाणांच्या दरातही वाढ झाली आहे. ऐन खरिपाच्या तोंडावर खतांच्या दरात सरासरी ६०० ते ७०० रुपयांची वाढ झाली आहे. त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. त्यामुळे नियोजन कोलमडले आहे.

खताचे नाव पूर्वीचे दर सध्याचे दर

१०-२६-२६ ११७५ १७७५

१२-३२-१६ ११९० १८००

२०-२०-० ९७५ १३५०

डीएपी १२०० १९००

पोटॅश ८५० १०००

सुपर फॉस्फेट ४०० ५००

केंद्र सरकारने किमती कमी कराव्यात...

कोरोनामुळे शेतीमाल विक्रीची व्यवस्था कोलमडली आहे. त्यातच रासायनिक खतांची दरवाढ झाली आहे. युरिया वगळता सर्वच खतांमध्ये ६०० ते ७०० रुपयांनी वाढ झाली आहे. खत विक्रेत्यांचा नफाही कमी होणार आहे. केंद्र सरकारने खतांच्या किमती कमी करून बळीराजाला दिलासा द्यावा.

- शिवाजीराव पाटील, कृषी सेवा केंद्र चालक.

शेतकऱ्यांच्या शेतीमाल उत्पादन खर्चात मोठी वाढ झाली आहे. त्या तुलनेत त्यांचे उत्पन्न कमी आहे. खतांच्या भावात ६०० ते ७०० रुपयांनी वाढ झाल्याने शेतकरी आणखी कर्जबाजारी होतील. उत्पादन खर्चाएवढाही भाव मिळत नाही. केंद्र सरकारने खतांचे भाव कमी करावेत.

- विश्वनाथ हेंगणे,

प्रगतिशील शेतकरी, हडोळती.

गेल्या वर्षी अति पावसाने सोयाबीनचे नुकसान झाले. यावर्षी सोयाबीन बियाणे दरात वाढ झाली.

दरवर्षी उद्भवणाऱ्या संकटामुळे शेतकऱ्यांना सतत आर्थिक अडचणीचा सामना करावा लागतो. आता बियाणे, खतांच्या दरात वाढ झाल्याने नवे संकट आले आहे. शासनाकडून मदतीची गरज आहे.

- संतोष कदम, प्रगतिशील शेतकरी,

तांबट सांगवी.