शहरं
Join us  
Trending Stories
1
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
2
दीपूचंद्र दासच्या मित्रांनीच केली 'गद्दारी', मारणाऱ्या धर्मांध जमावातच झाले सामील अन्...! सामोर आलं धक्कादायक सत्य
3
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
4
इंडिगो एअरलाइन्स मार्चनंतर तुर्कीकडून घेतलेली विमानांचे उड्डाण करणार नाही; DGCA ने दिला स्पष्ट नकार
5
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
6
आठ कोटी, बारा पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
7
८ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळवा ३,२८,००० रुपये फिक्स व्याज! ज्येष्ठ नागरिकांसाठी पोस्टाची 'खास' भेट
8
"मनसेचे जे काही नगरसेवक निवडून येतील, तेदेखील पळवतील", भाजपचा राज ठाकरेंना सावधगिरीचा सल्ला
9
गॅल्व्हेस्टनजवळ मेक्सिकन नौदलाच्या विमानाचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
10
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
11
२०२५चे शेवटचे पंचक: ५ दिवस अशुभ, पण ‘ही’ कामे करणे शुभ; दोष लागणार नाही, नेमके काय टाळावे?
12
Bigg Boss Marathi: लावणी डान्सरला 'बिग बॉस मराठी'ची ऑफर? म्हणाली- "मला त्यांच्याकडून मेल आलाय..."
13
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
14
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
15
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
16
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
17
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
18
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
19
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
20
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
Daily Top 2Weekly Top 5

रासायनिक खतांच्या दरात वाढ, आर्थिक अडचणींमुळे बळीराजा हतबल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2021 04:20 IST

अहमदपूर : पावसाळा सुरू होण्यास जवळपास तीन आठवडे शिल्लक आहेत. त्यामुळे शेतकरी आतापासूनच खरिपाची तयारी करीत आहेत. बी- बिाणे, ...

अहमदपूर : पावसाळा सुरू होण्यास जवळपास तीन आठवडे शिल्लक आहेत. त्यामुळे शेतकरी आतापासूनच खरिपाची तयारी करीत आहेत. बी- बिाणे, खतांची खरेदी करण्यासाठी आर्थिक जुळवाजुळव सुरू झाली आहे. मात्र, गतवर्षीच्या तुलनेत यंदा बियाणे विशेषत: खतांच्या दरात मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे बळीराजा हतबल होत असल्याचे दिसून येत आहे.

यंदाच्या पावसाळ्यात समाधानकारक पाऊस होईल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. त्यामुळे शेतकरी आनंदित झाले आहेत. दरम्यान, पेरणीपूर्व मशागतीची कामे आटोपत आहेत. कोरोनाच्या संकटामुळे लागू करण्यात आलेल्या संचारबंदीचा भाजीपाला, फळ उत्पादकांना मोठा फटका बसला आहे. तसेच थकबाकीदार शेतकऱ्यांना पीककर्ज वाटपाचा गुंता अद्यापही कायम आहे. अशा परिस्थितीत बियाणांच्या दरात वाढ झाली आहे. गतवर्षी विविध कंपन्यांच्या सोयाबीन बियाणाची एक बॅग १ हजार ७०० ते १ हजार ९५० रुपयांपर्यंत मिळत होती. यंदा त्यात चांगलीच वाढ झाली आहे. उडीद, मूग बियाणांच्या दरातही वाढ झाली आहे. ऐन खरिपाच्या तोंडावर खतांच्या दरात सरासरी ६०० ते ७०० रुपयांची वाढ झाली आहे. त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. त्यामुळे नियोजन कोलमडले आहे.

खताचे नाव पूर्वीचे दर सध्याचे दर

१०-२६-२६ ११७५ १७७५

१२-३२-१६ ११९० १८००

२०-२०-० ९७५ १३५०

डीएपी १२०० १९००

पोटॅश ८५० १०००

सुपर फॉस्फेट ४०० ५००

केंद्र सरकारने किमती कमी कराव्यात...

कोरोनामुळे शेतीमाल विक्रीची व्यवस्था कोलमडली आहे. त्यातच रासायनिक खतांची दरवाढ झाली आहे. युरिया वगळता सर्वच खतांमध्ये ६०० ते ७०० रुपयांनी वाढ झाली आहे. खत विक्रेत्यांचा नफाही कमी होणार आहे. केंद्र सरकारने खतांच्या किमती कमी करून बळीराजाला दिलासा द्यावा.

- शिवाजीराव पाटील, कृषी सेवा केंद्र चालक.

शेतकऱ्यांच्या शेतीमाल उत्पादन खर्चात मोठी वाढ झाली आहे. त्या तुलनेत त्यांचे उत्पन्न कमी आहे. खतांच्या भावात ६०० ते ७०० रुपयांनी वाढ झाल्याने शेतकरी आणखी कर्जबाजारी होतील. उत्पादन खर्चाएवढाही भाव मिळत नाही. केंद्र सरकारने खतांचे भाव कमी करावेत.

- विश्वनाथ हेंगणे,

प्रगतिशील शेतकरी, हडोळती.

गेल्या वर्षी अति पावसाने सोयाबीनचे नुकसान झाले. यावर्षी सोयाबीन बियाणे दरात वाढ झाली.

दरवर्षी उद्भवणाऱ्या संकटामुळे शेतकऱ्यांना सतत आर्थिक अडचणीचा सामना करावा लागतो. आता बियाणे, खतांच्या दरात वाढ झाल्याने नवे संकट आले आहे. शासनाकडून मदतीची गरज आहे.

- संतोष कदम, प्रगतिशील शेतकरी,

तांबट सांगवी.