शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

रासायनिक खतांच्या दरात वाढ, आर्थिक अडचणींमुळे बळीराजा हतबल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2021 04:20 IST

अहमदपूर : पावसाळा सुरू होण्यास जवळपास तीन आठवडे शिल्लक आहेत. त्यामुळे शेतकरी आतापासूनच खरिपाची तयारी करीत आहेत. बी- बिाणे, ...

अहमदपूर : पावसाळा सुरू होण्यास जवळपास तीन आठवडे शिल्लक आहेत. त्यामुळे शेतकरी आतापासूनच खरिपाची तयारी करीत आहेत. बी- बिाणे, खतांची खरेदी करण्यासाठी आर्थिक जुळवाजुळव सुरू झाली आहे. मात्र, गतवर्षीच्या तुलनेत यंदा बियाणे विशेषत: खतांच्या दरात मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे बळीराजा हतबल होत असल्याचे दिसून येत आहे.

यंदाच्या पावसाळ्यात समाधानकारक पाऊस होईल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. त्यामुळे शेतकरी आनंदित झाले आहेत. दरम्यान, पेरणीपूर्व मशागतीची कामे आटोपत आहेत. कोरोनाच्या संकटामुळे लागू करण्यात आलेल्या संचारबंदीचा भाजीपाला, फळ उत्पादकांना मोठा फटका बसला आहे. तसेच थकबाकीदार शेतकऱ्यांना पीककर्ज वाटपाचा गुंता अद्यापही कायम आहे. अशा परिस्थितीत बियाणांच्या दरात वाढ झाली आहे. गतवर्षी विविध कंपन्यांच्या सोयाबीन बियाणाची एक बॅग १ हजार ७०० ते १ हजार ९५० रुपयांपर्यंत मिळत होती. यंदा त्यात चांगलीच वाढ झाली आहे. उडीद, मूग बियाणांच्या दरातही वाढ झाली आहे. ऐन खरिपाच्या तोंडावर खतांच्या दरात सरासरी ६०० ते ७०० रुपयांची वाढ झाली आहे. त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. त्यामुळे नियोजन कोलमडले आहे.

खताचे नाव पूर्वीचे दर सध्याचे दर

१०-२६-२६ ११७५ १७७५

१२-३२-१६ ११९० १८००

२०-२०-० ९७५ १३५०

डीएपी १२०० १९००

पोटॅश ८५० १०००

सुपर फॉस्फेट ४०० ५००

केंद्र सरकारने किमती कमी कराव्यात...

कोरोनामुळे शेतीमाल विक्रीची व्यवस्था कोलमडली आहे. त्यातच रासायनिक खतांची दरवाढ झाली आहे. युरिया वगळता सर्वच खतांमध्ये ६०० ते ७०० रुपयांनी वाढ झाली आहे. खत विक्रेत्यांचा नफाही कमी होणार आहे. केंद्र सरकारने खतांच्या किमती कमी करून बळीराजाला दिलासा द्यावा.

- शिवाजीराव पाटील, कृषी सेवा केंद्र चालक.

शेतकऱ्यांच्या शेतीमाल उत्पादन खर्चात मोठी वाढ झाली आहे. त्या तुलनेत त्यांचे उत्पन्न कमी आहे. खतांच्या भावात ६०० ते ७०० रुपयांनी वाढ झाल्याने शेतकरी आणखी कर्जबाजारी होतील. उत्पादन खर्चाएवढाही भाव मिळत नाही. केंद्र सरकारने खतांचे भाव कमी करावेत.

- विश्वनाथ हेंगणे,

प्रगतिशील शेतकरी, हडोळती.

गेल्या वर्षी अति पावसाने सोयाबीनचे नुकसान झाले. यावर्षी सोयाबीन बियाणे दरात वाढ झाली.

दरवर्षी उद्भवणाऱ्या संकटामुळे शेतकऱ्यांना सतत आर्थिक अडचणीचा सामना करावा लागतो. आता बियाणे, खतांच्या दरात वाढ झाल्याने नवे संकट आले आहे. शासनाकडून मदतीची गरज आहे.

- संतोष कदम, प्रगतिशील शेतकरी,

तांबट सांगवी.