शहरं
Join us  
Trending Stories
1
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
2
राज ठाकरे यांच्याशी अधिकृत युती कधी जाहीर करणार?; उद्धव ठाकरे यांनी सरळ सांगितले, म्हणाले…
3
“देवाभाऊंच्या जाहिरातीला कोट्यवधी उधळले, तेच पैसे शेतकऱ्यांना दिले असते तर...”: उद्धव ठाकरे
4
टीम इंडियाला ज्या ज्या कंपन्यांनी स्पॉन्सर केले, त्यापैकी तीन कंपन्या बुडाल्या, बंद झाल्या...
5
'जत्रा २' येणार का? दिग्दर्शक केदार शिंदे म्हणाले, "मनापासून इच्छा आहे पण..."
6
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर; ३१ जानेवारी २०२६ पर्यंत मुदतवाढ, सुप्रीम कोर्टात काय घडलं?
7
बाजारात 'सुपर' तेजी! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी उसळी; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
8
भारतावर आणखी टॅरिफ लावण्याची धमकी अमेरिकेवरच उलटू शकते, जाणून घ्या का?
9
गायीने कहरच केला... धावता-धावता उडी मारून थेट कौलावरच चढली, Video पाहून व्हाल थक्क
10
Pitru Paksha 2025: पितृ पक्षात एखादी अंत्ययात्रा दिसणे शुभ की अशुभ? काय करावे उपाय? वाचा
11
सोन्याच्या किंमतीनं रचला इतिहा, विक्रमी पातळीवर पोहोचला भाव; पटापट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट!
12
झोमॅटोने रचला नवा विक्रम! टाटा-अदानी समुहातील मोठ्या कंपन्यांनाही 'या' बाबतीत टाकलं मागे
13
"जे झालं ते अचानक अन् चुकून झालं"; BMW कार अपघातातील आरोपी मागतेय जामीन
14
अपोलो टायर्स प्रत्येक मॅचमागे ४.५ कोटी रुपये मोजणार; टीम इंडियाला नवा स्पॉन्सर मिळाला
15
इस्राइल-गाझाचं उदाहरण देत शाहिद आफ्रिदीने भारताविरोधात ओकली गरळ, मोदींबाबत म्हणाला... 
16
धोक्याची घंटा! कच्ची केळी बादलीत टाकली अन् १ मिनिटात पिकली; लोकांच्या जीवाशी खेळ?
17
दबंग सून... मध्यरात्री गुंडांना घेऊन सासरी आली आणि केला धडाधड गोळीबार, त्यानंतर...  
18
IND vs PAK: पाकिस्तान जय शाहला घाबरला; आधी 'बड्या बाता' केल्या, आता गपचूप बसला, काय घडलं?
19
स्विगीने खास पुणेकरांसाठी लाँच केले 'Toing' ॲप; केवळ ५० रुपयांत मिळणार भरपेट जेवण, काय आहे वैशिष्ट्ये?

जमिनीचा पोत टिकविण्यासाठी सेंद्रिय कर्ब वाढवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2021 04:36 IST

लातूर : कृषी विभागाच्या वतीने लातूर तालुक्यातील साई येथे राष्ट्रीय शाश्वत शेती अभियानअंतर्गत जमीन आरोग्यपत्रिका प्रशिक्षण कार्यक्रम घेण्यात आला. ...

लातूर : कृषी विभागाच्या वतीने लातूर तालुक्यातील साई येथे राष्ट्रीय शाश्वत शेती अभियानअंतर्गत जमीन आरोग्यपत्रिका प्रशिक्षण कार्यक्रम घेण्यात आला. जमिनीचा पोत टिकविण्यासाठी सेंद्रिय कर्ब वाढवा, असे आवाहन मंडळ कृषी अधिकारी सचिन बावगे यांनी केले.

यावेळी पंचायत समितीचे उपसभापती प्रकाश उफाडे, उपसरपंच अमोल पवार, संचालक ज्ञानेश्वर पवार, कृषी पर्यवेक्षक प्रदीप रेड्डी, कृषी सहाय्यक पल्लवी बायसठाकूर, अजय घोडके, कृषी सहायक सूर्यकांत लोखंडे, संतोष सूर्यवंशी यांची उपस्थिती होती. सचिन बावगे म्हणाले, जमीन सुदृढ असेल तर पिकाच्या उत्पादनामध्ये वाढ शक्य होते. जमिनीतील सुपीकता वाढविण्यासाठी सेंद्रिय कर्बाचे प्रमाण वाढवा. यासाठी गांडूळ खत, हिरवळीचे खते, शेणखत यासारख्या निविष्ठांचा वापर वाढवा तरच आपली जमीन सुदृढ होईल, सुपीक राहील. जमिनीचा पोत टिकून राहील. कृषी पर्यवेक्षक प्रदीप रेड्डी यांनी गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना याबाबत मार्गदर्शन केले. यशस्वीतेसाठी शिवाजी पवार, माने, ग्रामसेवक आर.एस परमेश्वरे, बालासाहेब वलसे, रानबा क्षीरसागर, सुनिता पवार, मंगल पवार, शीतल पवार आदींसह परिसरातील शेतकरी उपस्थित होते.