शहरं
Join us  
Trending Stories
1
Monorail Mumbai: मोनो रेल्वे पुन्हा बंद पडली, भर पावसात प्रवाशांना काढले बाहेर
2
Maharashtra Rain: आजचा दिवस पावसाचा, संपूर्ण महाराष्ट्राला झोडपणार; चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
3
४० हजार एन्ट्री फी, अख्खी रात्र 'Nude Party'; विना कपडे येणार होते २१ मुले-मुली, आयोजकांना अटक
4
पाकिस्तानवर ‘फिरकी बाॅम्ब’; इंडियाचा मैदानावरही 'बदला'; हायव्होल्टेज सामन्यात पाकचा दणदणीत पराभव
5
सकाळपासून ते रात्री झोपेपर्यंतच्या सर्व उत्पादनांवर जीएसटी सवलत मिळणार; निर्मला सीतारामण यांचा दावा
6
आजचे राशीभविष्य- १५ सप्टेंबर २०२५: रागावर नियंत्रण ठेवा, कुटुंबियांशी वादविवाद टाळावेत!
7
‘जिल्हा परिषदां’ना बळ मिळेल? पूर्वी जिल्हा परिषद अध्यक्षांना राज्यमंत्री पदाचा दर्जा होता
8
सायबर भामट्यांनी साेडले खात्यात केवळ ८६ रुपये; बोलण्यात गुंतवून पाठवली लिंक
9
मी शिवभक्त, विष गिळून टाकतो, पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; काँग्रेसने घुसखोरांना प्रोत्साहन दिले, गरिबांना नाकारले
10
महाराष्ट्रात एका वर्षात ‘आयुष्मान’चे लाभार्थी तिप्पट; ग्रामीण भागापर्यंत विस्तार करण्याचे राज्यासमोर आव्हान
11
पूजा खेडकरांच्या घरातून अपहृत चालकाची सुटका; ऐरोलीत अपघात, कारमध्ये कोंबून नेले पुण्याला
12
मोबाइलमध्ये अडकलेली तरुणाई सरस्वतीच्या दरबारात नेणार : विश्वास पाटील
13
प्रभादेवी तिकीट कार्यालयाचे स्थलांतर कुठे? २ ते ३ दिवसांमध्ये जागा निश्चित करणार
14
बांधकामातील बदल, कराने वाढला कोस्टल रोडचा खर्च; महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या शेवटच्या टप्प्यात २ हजार कोटींची वाढ
15
नेपाळच्या आगीत कोण आपली पोळी भाजते आहे?
16
साहित्य संमेलनाध्यक्षपदी ‘पानिपत’कार विश्वास पाटील ; १ ते ४ जानेवारीदरम्यान संमेलन होणार
17
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
18
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
19
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”

बाजारात तूर बारा हजार पार; सोयाबीन जैसे थे !

By संदीप शिंदे | Updated: May 18, 2024 16:21 IST

उदगीर बाजार समिती : हरभरा दरात १५० रुपयांची वाढ

उदगीर : मागील काही दिवसांपासून तुरीचे दर बारा हजार रुपयांच्या आसपास होते. मात्र, शनिवारी तुरीने १२ हजार ४०० रुपयांचा टप्पा पार केला असून, अनेक शेतकऱ्यांनी हा दर मिळण्याच्या अगोदरच तुरीची विक्री केलेली आहे. अगोदरच तुरीचे उत्पादन शेतकऱ्याच्या हाती कमी आलेले होते. त्यामुळे मोजक्यात शेतकऱ्यांना तुरीच्या दरातील वाढीचा फायदा होत आहे. शनिवारी उदगीर बाजार समितीच्या मार्केट यार्डमध्ये हरभऱ्याच्या दरात १५० रुपये प्रतिक्विंटलची वाढ झालेली दिसून आली. तर सोयाबीन ४ हजार ५०० रुपये प्रतिक्विंटल भावाने विक्री झाले.

उदगीर तालुक्यात व सीमा भागातील शेतकऱ्यांचे तूर हे खरिपातील महत्त्वाचे पीक आहे. परंतु मागील काही वर्षांपासून पेरणीच्या काळात तुरीची पीक चांगले जोमाने येते. परंतु फुलधारणा धरण्याच्या वेळेत फुलगळती किंवा शेंगा लागण्याच्या काळात किडीचा प्रादुर्भाव, या कारणांमुळे हाती आलेल्या पिकाची शेतकऱ्याच्या डोळ्यादेखत नासाडी होत असते. त्यामुळे या भागातील अनेक शेतकऱ्यांनी तुरीचा पेरा कमी केला होता. यावर्षी कडधान्यामध्ये तुरीला चांगला दर मिळत असल्याचे दिसून येत असले तरी याचा फायदा मात्र बोटावर मोजता येईल अशाच शेतकऱ्यांना मिळत आहे. शासनाने आयात शुल्क माफ करून हरभऱ्याची बाहेर देशातून आयात करण्यास परवानगी दिल्यामुळे मागील आठवड्यात हरभऱ्याच्या दरात घसरण झाली होती. शासनाच्या या निर्णयाचा परिणाम होऊन व्यापाऱ्यांनी हरभऱ्याची खरेदी करण्यास हात आखडता घेतला आहे. त्यामुळे रब्बी हंगामातील हरभऱ्याचे पीक शेतकऱ्यांच्या हाती आलेले असतानाच दर घसरणीचा फटका शेतकऱ्याला बसला आहे. मागील आठवड्यात हरभऱ्याची दर ६ हजार १५० प्रतिक्विंटल दराने विक्री झाली होती. परंतु या आठवड्याच्या शेवटच्या दिवशी दरात १५० रुपये प्रतिक्विंटल दराची वाढ झाली आहे. डाळीला व फुटाण्याला मागणी असल्याने दरात वाढ झाल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.

बाजारात सोयाबीनचे दर स्थिर...पुढील महिन्यापासून खरीप हंगामाची पेरणीचा काळ सुरू होईल. शेतकऱ्यापुढे सोयाबीनशिवाय इतर पिकांचा पर्याय नसल्या कारणामुळे पुन्हा यावर्षी खरिपाच्या पेरणीमध्ये सोयाबीन हे मुख्य पीक राहणार आहे. अनेक शेतकऱ्यांकडे दोन वर्षांपासूनचे सोयाबीन विक्रीविना घरी ठेवलेले आहे. दर वाढतील या आशेने ठेवलेला माल आता लाल पडू लागलेला आहे. त्यामुळे बाजारात ४ हजार ५०० च्यावर भाव नाही, तर दुसरीकडे घरात ठेवलेला शेतमाल खराब होत चालल्यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे.

शेतमाल विक्रीशिवाय पर्याय नाही...खरीप पेरणीच्या खर्चाची तरतूद करण्यासाठी शेतकऱ्यांना सोयाबीनचा माल विक्री करण्याशिवाय पर्याय नाही. सध्या बाजारात शेतमालाची आवक कमी असली तरी पुढील आठवड्यापासून आवक वाढण्याचा अंदाज व्यापारी वर्तवित आहेत. शेतीची मशागत, पेरणी, बियाणे, खतांचे नियोजन करण्यासाठी आर्थिक अडचण येते. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांकडे सोयाबीन घरीच साठवून आहे. ते शेतकरी बाजारात सोयाबीन विक्री करीत असून, आलेल्या पैशातून मशागतीच्या कामासोबतच खरिपाच्या बियाणांची खरेदी करीत आहेत.

यंदाही सोयाबीनचा पेरा अधिक राहणार...उदगीर तालुक्यात व सीमा भागातील शेतकऱ्यांचे तूर हे खरिपातील महत्त्वाचे पीक आहे. परंतु मागील काही वर्षांपासून पेरणीच्या काळात तुरीची पीक चांगले जोमाने येते. परंतु फुलधारणा धरण्याच्या वेळेत फुलगळती किंवा शेंगा लागण्याच्या काळात किडीचा प्रादुर्भाव, या कारणांमुळे हाती आलेल्या पिकाची शेतकऱ्याच्या डोळ्यादेखत नासाडी होत असते. त्यामुळे या भागातील अनेक शेतकऱ्यांनी तुरीचा पेरा कमी केला होता. आता यंदाच्या हंगामातही सोयाबीनचा पेरा सर्वाधिक राहणार असून, तूर पिकालाही शेतकरी पसंती देतील, असे चित्र आहे.

टॅग्स :laturलातूरAgriculture Sectorशेती क्षेत्र