शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
3
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
4
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
5
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
6
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
7
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
8
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
9
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
10
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
11
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
12
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
13
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
14
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
15
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
16
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
17
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
18
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
19
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
20
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
Daily Top 2Weekly Top 5

कार लावण्याच्या कारणावरून हाणामारी; जखमी एकाचा रूग्णालयात मृत्यू

By आशपाक पठाण | Updated: April 9, 2024 20:05 IST

लातूर -उमरगा महामार्गावरील घटना

लातूर : लातूर-उमरगा महामार्गावर दत्ता पाटीजवळील एका हॉटेलसमोर कार लावण्याच्या कारणावरून हाणामारी झाली. या घटनेत जखमी झालेल्या एकावर लातूरच्या खाजगी रूग्णायालयात उपचार सुरू होते. दरम्यान, मंगळवारी जखमी स्वप्नील कदम याचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणी किल्लारी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून मंगळवारी सायंकाळी दोघांना अटक करण्यात आली आहे.

पोलिसांनी सांगितले, लातूर-महामार्गावरील दत्ता पाटीजवळी हॉटेल श्रावणीसमोर ८ एप्रिल रोजी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास फिर्यादी शिवम राम कदम (वय ३०, रा. पारधेवाडी, ता. औसा) याने कार लावली असता यावेळी रणजित गुलाब बिराजदार, निवृत्ती आत्माराम बिराजदार, शुभम विष्णु गव्हाणे (सर्व रा. गोठेवाडी ता. औसा) यांनी संगणमत करुन शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी मारहाण सुरू केले. याप्रसंगी फिर्यादी शिवम कदम यांचा भाऊ स्वप्नील कदम, दशरथ शेषेराव कव्हे हा भांडण सोडविण्यासाठी आला असता रणजित बिराजदार व निवृत्ती बिराजदार यांनी फिर्यादीच्या भावास जिवे मारण्याच्या उद्देशाने त्याच्या हातातील दगड फेकून डोक्यात मारून जखमी केले. तसेच तुम्ही आमच्या नादाला लागलात तर एक एकाला खलास करतो म्हणून जीवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी किल्लारी पोलीस ठाण्यात तीन जणांवर कलम ३०७, ३३६ भादंविप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक प्रशांत राजपूत करीत आहेत.

तीन जणांवर गुन्हा दाखल...

मारहाणीच्या घटनेत फिर्यादीचा भाऊ स्वप्नील कदम (रा. पारधेवाडी ता. औसा) याच्या डोक्याला मार लागल्याने लातूर येथील खाजगी रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. दरम्यान, उपचार सुरू असताना मंगळवारी त्याचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणी किल्लारी पोलीस ठाण्यात तीन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून यातील दोघांना पोलिसांनी अटक केली असल्याचे पोलिसांनी सांगितले.