शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
2
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
3
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
4
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
5
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
6
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
7
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
8
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
9
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
10
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
11
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
12
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
13
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
14
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
15
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...
16
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
17
6 एअरबॅगची सुरक्षा, 23Km चे मायलेज अन् ₹70000 + ₹1.10 लाखाचा डिस्काउंट, आताच करा बुक...
18
“संजय राऊत शरद पवारांकडे बसलेले असायचे, त्यांच्यामुळेच ठाकरे गटाचे नुकसान”; शिंदे गटाचे उत्तर
19
"जेव्हा कोणतंच काम नव्हतं तेव्हा..."; लोकप्रिय अभिनेत्याने केला ७ वर्षे खूप स्ट्रगल
20
Asia Cup 2025: जो मॅटर गाजला तोच पॅटर्न! IND vs PAK हायहोल्टेज सामन्यासंदर्भात मोठा निर्णय

नेपाळच्या आयात टोमॅटोचा स्थानिक उत्पादकांना फटका, दर निम्म्यावर

By आशपाक पठाण | Updated: August 14, 2023 17:21 IST

दोन महिन्यांपासून टोमॅटोमच्या दरात अचानक वाढ झाली. ५ रूपये किलोचे टोमॅटो आठवडाभरात बघता बघता १६० रूपये किलोंवर पोहचले.

लातूर : सोन्याचा भाव आलेले टोमॅटो दोन महिन्यातच कोसळले असून लातूरच्या बाजारात ३० ते ६० रूपये किलोप्रमाणे टोमॅटोची विक्री होत आहे. केंद्र शासनाने नेपाळमधून टोमॅटो आयात केल्याने स्थानिक बाजारात दर कोसळले आहेत, त्यामुळे उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसला असून शासनाच्या धोरणाचा स्वाभिमानी शेतकरी संघटनेने निषेध केला आहे.

दोन महिन्यांपासून टोमॅटोमच्या दरात अचानक वाढ झाली. ५ रूपये किलोचे टोमॅटो आठवडाभरात बघता बघता १६० रूपये किलोंवर पोहचले. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांकडे टोमॅटो होते, अशा शेतकऱ्यांना सोन्याचा भाव मिळाला. किरकोळ बाजारातही २० किलोचे कॅरेट २ हजार रूपये किलोप्रमाणे विक्री झाले. त्यामुळे अनेकांच्या ताटातून टोमॅटो गायब झाले. हॉटेल, मेसमध्येही टोमॅटोला पर्याय म्हणून चिंचाचा वापर करण्यात आला. मागील आठवडाभरात टोमॅटोच्या दरात मोठी घसरण झाली आहे. गंजगोलाई, राजीव गांधी चौक, रेणापूर नाका, रयतू बाजारात टोमॅटो प्रतिकिलो ३० ते ६० रूपये किलोप्रमाणे विक्री होत असल्याचे विक्रेते शब्बीर शेख यांनी सांगितले.

आणखी दर घसरण्याची भीती...

टोमॅटोची आवक वाढली असून ग्राहकांची मागणी कमी झाली आहे. त्यामुळे दरात घसरण झाली आहे. मागच्या काही दिवसात किरकाेळ विक्रीही २०० रूपयांपर्यंत प्रतिकिलो गेली होती. सध्या चांगले टोमॅटो ५० रूपये किलोप्रमाणे विक्री होत आहेत. पुढील आठवड्यात आणखी दर कमी होण्याची भिती आहे, दरवाढ झाल्याचे पाहून अनेक शेतकऱ्यांनी टोमॅटोची लागवड केली आहे. दर कमी झाल्याचा फटका या शेतकऱ्यांना बसणार आहे.

सरकारचे धोरण शेतकरीविरोधी : सत्तार पटेल

सोयाबीन परवडत नसल्याने काही शेतकऱ्यांनी टोमॅटोची शेती केली. सुरुवातीस चांगला भाव मिळाला नाही तरीपण आज ना उद्या भाव वाढेल या आशेने शेतकऱ्यांनी टोमॅटोच्या बागा जतन केल्या. ज्यावेळेस शंभर रुपयांवर दर टोमॅटोला मिळू लागला त्यावेळेस सरकारचे डोके फिरले आणि थेट नेपाळ वरून टोमॅटो आयातीचा निर्णय झाला. तेथील टोमॅटो बाजारात येताच ५० टक्के दर घटले. ज्या वेळेला बाजारामध्ये टोमॅटो दोन रुपये किलो प्रमाणे विकले जात होते त्यावेळेला सरकार बघ्याची भूमिका घेत होते. सरकारने कसलाही हस्तक्षेप त्या वेळेला केला नाही किंवा टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांच्या बाजूने उभे राहून त्यांना धीर देण्याचे काम सुद्धा सरकारने केले नाही. सरकारचे शेतकरी विरोधी धोरण प्रत्येकवेळी शेतकऱ्यांना मारक असल्याचा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटना, स्वाभिमानी पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष सत्तार पटेल यांनी केला आहे.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून निषेध...

केंद्र शासनाने नेपाळमधून टोमॅटो आयात केले. त्यामुळे बाजारात टोमॅटोचे दर पडले. दहा वर्षातून पहिल्यांदाच शेतकऱ्यांना एवढा चांगला भाव मिळाला. दर कमी शासन मदतीसाठी पुढे येत नाही. शेतकरी फायद्यात आला की हस्तक्षेप का, असा सवाल स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे. टोमॅटो आयातीचा निर्णय निषेधार्ह असल्याचे जिल्हाध्यक्ष अरूणदादा कुलकर्णी, राजेंद्र मोरे, नवनाथ शिंदे, अशोक दहिफळे, जयराम पाटील आदींनी सांगितले

 

टॅग्स :laturलातूर