शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
3
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
4
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
5
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
6
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
7
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
8
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
9
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
10
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
11
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
12
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
13
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
14
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
15
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
16
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
17
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
18
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
19
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
20
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
Daily Top 2Weekly Top 5

शेकडो एकरवरील खरीप पिके पाण्यात, शेतकऱ्यांचे स्वप्न भंगले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2021 04:22 IST

औराद शहाजनी : सतत पाच दिवसांपासून सुरु असलेल्या पावसामुळे तेरणा व मांजरा नद्या दुथडी भरुन वाहत आहेत. दरम्यान, दोन्ही ...

औराद शहाजनी : सतत पाच दिवसांपासून सुरु असलेल्या पावसामुळे तेरणा व मांजरा नद्या दुथडी भरुन वाहत आहेत. दरम्यान, दोन्ही नद्यांच्या संगमावर पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. हे पाणी शेकडो एकरवरील शेतात घुसल्याने खरिपातील पिके पाण्याखाली गेली आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या स्वप्नांवर पाणी फिरले आहे.

निलंगा तालुक्यातील औराद शहाजानी व कर्नाटक सीमा भागात सतत पाऊस होत आहे. त्यामुळे तेरणा व मांजरा या दोन्ही नद्या दुथडी भरुन वाहत आहेत. त्यातच मांजरा नदीत धनेगाव प्रकल्पाचे पाणी साेडण्यात आले तर तेरणा नदीवरील उच्चस्तरीय बंधारे पूर्णपणे भरल्याने तेथील अतिरिक्त पाणी नदीपात्रात साेडण्यात आले आहे. त्यामुळे या नद्यांच्या संगमावर पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे औराद शहाजानी, तगरखेडा, हालसी, वांजरखेडा, काेंगळी, जामखंडी भागातील शेकडो एकरवरील पिके पाण्याखाली गेली आहेत.

पुराच्या पाण्यामुळे खरिपातील सोयाबीन, ज्वारी, ऊसासह भाजीपाल्याचे नुकसान झाले आहे. त्यामुळे हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावल्याने शेतकरी हतबल झाले आहेत. तसेच सततच्या पावसामुळे बागायती उत्पादनातही मोठी घट झाल्याने शेतकरी संकटात सापडले आहेत.

सतत होत असलेल्या मध्यम स्वरुपाच्या पावसामुळे खरीप हंगामातील पिकांच्या उत्पादनावर परिणाम झाला आहे. त्यातच गुरुवारी आणि शुक्रवारी झालेल्या संततधार पावसामुळे नदीतील पाणीपातळी वाढून पूर आला आणि नदीकाठची शेकडो एकरवरील पिके पाण्याखाली गेली आहेत. ही पिके पाण्यातच सडत आहेत.

शेती उत्पादनात घट होत असताना १५ दिवसांत सोयाबीनचे दर निम्म्यावर आले आहेत. त्यामुळे लागवडीसाठी केलेला खर्चही पदरी पडेल की नाही, अशी भीती निर्माण झाली आहे. सध्या काही शेतकरी सोयाबीनची काढणी करत आहेत. अशा परिस्थितीत पावसाची संततधार सुरु आहे. त्यामुळे काढणीचा दर वाढला असून, प्रत्येक बॅगला चार ते साडेचार हजार रुपये मजुरी घेतली जात आहे. यामुळे शेतकरी संकटात सापडला आहे. शासनाने नुकसानाचे तत्काळ पंचनामे करुन पीक विमा द्यावा, अशी मागणी होत आहे.

संकटामुळे शेतकरी झाले हतबल...

औराद शहाजानी येथील नदीकाठाजवळील शेतकरी जलिलमियाँ नाईकवाडे, मुस्ताक नाईकवाडे, खादरसाब नाईकवाडे, बालाजी भंडारे, श्रीरंग खरटमोल, इसाकमियाॅं नाईकवाडे, शिवपुत्र आगरे, दिगंबर माने, दत्ता माने, बालाजी शिवाजी भंडारे, अनंत भंडारे, बिरनाळे, दत्ता ढोरसिंगे, नारायण कुलकर्णी, कन्हैय्या पाटील, अनिकेत पाटील, सैलानी नाईकवाडे तसेच तगरखेडा येथील नदीकाठावरील रामराव थेटे, व्यंकटराव थेटे, धनराज गिरी, शाहुराज थेटे, सुभाष डावरगावे, बाबू बेलुरे आदी शेतकऱ्यांच्या शेतातील पिकांमध्ये पाणी साचले आहे.

लवकरच पंचनामे सुरु होणार...

मांजरा व तेरणा नदीकाठच्या गावातील शेतशिवारांमधील पिकांमध्ये पाणी साचले आहे. सततच्या पावसामुळे पिकांचे नुकसान झाले असून, पंचनामे करण्याच्या सूचना तहसीलदारांनी केल्या आहेत. त्यानुसार लवकरच पंचनाम्याला सुरुवात करण्यात येणार आहे, असे तालुका कृषी अधिकारी राजेंद्र काळे यांनी सांगितले.

पंचनामे करण्याच्या सूचना...

महसूल, कृषी, ग्रामसेवक या तिघांचे संयुक्त पथक तयार करुन मांजरा व तेरणा नदीकाठावरील शेतशिवारात पाणी साचून झालेल्या नुकसानाचे पंचनामे करण्याच्या सूचना केल्या आहेत. तसेच नदीकाठच्या गावांमधील जनतेला सतर्क राहण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत, असे तहसीलदार गणेश जाधव यांनी सांगितले.

आतापर्यंत ८३० मिमी पाऊस...

शनिवारी ३५ मिमी पाऊस झाल्याची नोंद येथील हवामान केंद्रावर झाली आहे. आतापर्यंत एकूण ८३० मिमी पाऊस झाला असून, वार्षिक सरासरीच्या तुलनेत अधिक पाऊस झाला आहे.